शहरं
Join us  
Trending Stories
1
भारतीय सैन्य अन् पहलगाम हल्ल्यातील पीडित कुटुंबांना सर्व मॅचची फी देणार; सूर्यकुमार यादवची घोषणा
2
'४ वर्षांपूर्वीपासून...', सोनम वांगचुकच्या पाकिस्तान कनेक्शनवर त्याची पत्नी गीतांजली वांगचुक काय म्हणाल्या?
3
IND vs PAK Asia Cup Final : पाकिस्तानने आशिया कप ट्रॉफीसह टीम इंडियाची पदके चोरली, बीसीसीआयचा मोठा आरोप
4
लेहमध्ये सलग पाचव्या दिवशी सर्वत्र संचारबंदी; सोनम वांगचुक यांची त्वरित सुटका करण्याची देशभरातून मागणी
5
"आता प्रायश्चित्त घेण्याची वेळ, दसरा मेळावा रद्द करून..."; भाजपाची उद्धव ठाकरेंवर खोचक टीका
6
भारताचा आशिया चषकावर विजयी 'तिलक'; पाकिस्तानला सलग तिसऱ्यांदा नमवले! कुलदीप, तिलक यांचे मोलाचे योगदान
7
आजचे राशीभविष्य, २९ सप्टेंबर २०२५: महत्वाच्या कामासाठी खर्च झाला तरी सुद्धा आर्थिक लाभ होतील
8
पंधरा दिवसांत ६०% जास्त पाऊस! मराठवाडा, मध्य महाराष्ट्रातील चित्रच बदलले; आजही ६ जिल्ह्यांतऑरेंज अलर्ट
9
महिलांची सक्तीनं नसबंदी; ६० वर्षांनी माफी! ग्रीनलँडमध्ये ४५०० महिलांसोबत काय घडलेलं?
10
मोबाइलसारखीच लवकरच  बदलता येईल गॅसची कंपनी; काय बदल होणार? जाणून घ्या
11
आता पूर ओसरेल, मदत मिळेल... पण शेतकऱ्यांसमोर ३ वर्षे संकट! पुराने पळविले जमिनीचे पोषण, पुढील हंगामात धोका
12
विजयसाठी झुंबड ठरली जीवघेणी; तामिळनाडूच्या चेंगराचेंगरीतील मृतांची संख्या ४०वर
13
थंडगार वाळवंटात ही आग कुणी लावली? केंद्र सरकारशी बोलणी सुरू असतानाही हिंसाचार का?
14
IND vs PAK Asia Cup Final : दुबईत विजयाचा जल्लोष झाला; पण टीम इंडियानं बहिष्कारानं केला शेवट; नेमकं काय घडलं?
15
मुत्सद्देगिरी हेच औषध! ट्रम्प यांच्या 'टॅरिफ बॉम्ब'ने भारतीय फार्मा कंपन्यांचे काय होणार?
16
केवळ ३.९ टक्के महिलाच रोज करतात व्यायाम : सामाजिक मानसिकता बदलल्याशिवाय महिलांचा फिटनेस अशक्य
17
१७ विद्यार्थिनींचे लैंगिक शोषण, ‘बाबा’ अखेर अटकेत; आग्रा येथून घेतले ताब्यात 
18
‘साधी तक्रार पुरेशी नाही; ती पत्नीछळाचा गुन्हा ठरत नाही’; सर्वोच्च न्यायालयाने काय म्हटले?
19
क्रिकेटपटू, अभिनेते येणार आणखी अडचणीत;  ऑनलाइन बेटिंगप्रकरणी मालमत्तेवर येणार टाच
20
IND vs PAK: आधी 'सिंदूर', आता विजय 'तिलक'! भारताने आशिया कप जिंकला, पाकिस्तान पराभूत

रत्नागिरी पॅटर्न राज्यभर राबविणार

By admin | Updated: February 12, 2016 23:50 IST

राम शिंदे : पोलीसपाटील व पोलीस मित्र मेळाव्यात घोषणा

रत्नागिरी : सर्वसामान्यांचे म्हणणे ऐकून घेण्यासाठी जिल्ह्यातील पोलीस स्थानकांमध्ये सुरू केलेले स्वागत कक्ष, तसेच जिल्हा पोलीस दलाला पोलीसपाटील व पोलीस मित्र, सागररक्षक यांचे मिळणारे सहकार्य आदर्शवत आहे. त्यामुळे माणसातला पोलीस व पोलिसातला माणूस या रुपाचे खरेखुरे दर्शन आपल्याला या जिल्ह्यात झाले. पोलीस खात्याच्या उपक्रमाचा हा ‘रत्नागिरी पॅटर्न’ राज्यभरात राबवण्यासाठी पावले उचलणार असल्याची घोषणा गृहराज्यमंत्री राम शिंदे यांनी आज (शुक्रवारी) येथे केली. रत्नागिरी शहरातील स्वातंत्र्यवीर सावरकर नाट्यगृहात आयोजित सागरी सुरक्षा जनजागृती पोलीसपाटील व पोलीस मित्र मेळाव्यात मंत्री शिंदे बोलत होते. यावेळी त्यांच्यासोबत व्यासपीठावर कोकण परिक्षेत्राचे विशेष पोलीस महानिरीक्षक प्रशांत बुरडे, जिल्हा पोलीस अधीक्षक डॉ. संजय शिंदे, रत्नागिरी विभाग तटरक्षक दलाचे कमांडंट एस. एम. सिंग, अपर पोलीस अधीक्षक तुषार पाटील, माजी आमदार व भाजप जिल्हाध्यक्ष बाळ माने, नगराध्यक्ष महेंद्र मयेकर, नगरसेवक उमेश शेट्ये आदी उपस्थित होते. पोलीस अधीक्षक डॉ. शिंदे यांच्या नेतृत्त्वाखाली रत्नागिरी जिल्ह्यातील १३ गावे दारूमुक्त करण्यात आली, ही बाब अत्यंत चांगली असून, जिल्हा पोलिसांच्या या कामगिरीची मंत्री शिंदे यांनी प्रशंसा केली. कोकणचे विशेष पोलीस महानिरीक्षक बुरडे म्हणाले, कायदा व सुव्यवस्था ही प्रगती व विकासासाठी महत्त्वाची बाब आहे. कायदा व सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी आम्ही सर्वांनीच आम्हाला कायद्याने दिलेल्या अधिकारांचा उपयोग केला पाहिजे. या कार्यक्रमाचे प्रास्ताविक पोलीस अधीक्षक संजय शिंदे यांनी केले. प्रास्ताविकात पोलीस अधीक्षक डॉ. शिंदे म्हणाले की, जिल्ह्यात ६८७ सागररक्षक आहेत. १० संस्थांचे २०० लोक सागरी सुरक्षेसाठी बॅँ्रड अ‍ॅम्बेसेडर म्हणून काम करीत आहेत. यावेळी जिल्हा पोलिसांना मदत करणाऱ्या विविध संस्था व व्यक्तींचा सत्कार करण्यात आला. (प्रतिनिधी)रत्नागिरीलाही पर्यटन जिल्हा बनविणाररत्नागिरी जिल्ह्यात पर्यटनाच्या विकासाला खूप वाव आहे. काही ठराविक भागांचा पर्यटन विकास झाला आहे. मात्र, शेजारी असलेल्या सिंधुदुर्ग जिल्ह्याप्रमाणेच रत्नागिरी जिल्ह्यात पर्यटन विकास होऊ शकतो. त्यातून मोठ्या प्रमाणात रोजगार संधी उपलब्ध होणार आहेत. त्यामुळे सिंधुदुर्गप्रमाणेच रत्नागिरी जिल्हाही पर्यटन जिल्हा बनविण्यासाठी आवश्यक ती पावले उचलली जातील, अशी ग्वाही मंत्री शिंदे यांनी दिली.