शहरं
Join us  
Trending Stories
1
कुठल्याही क्षणी अटकेची शक्यता असताना माणिकराव कोकाटे पडले आजारी; लीलावती रुग्णालयात दाखल
2
रेल्वे प्रवाशांसाठी खुशखबर! वेटिंग-RAC तिकिटाची स्थिती आता १० तास आधी कळणार
3
कर्जदारांना 'अच्छे दिन'! भारतीय अर्थव्यवस्था 'गोल्डीलॉक्स' स्थितीत; गव्हर्नर मल्होत्रा म्हणाले...
4
काँग्रेसची कार्यकर्ती, वरपर्यंत ओळख असल्याचं सांगून आणायची प्रेमासाठी दबाव, त्रस्त पोलीस इन्स्पेक्टरची महिलेविरोधात तक्रार
5
मुंबई इंडियन्सची 'ती गोष्ट 'जितेंद्र भाटवडेकर'च्या मनाला लागली? रोहितसोबतचा फोटो शेअर करत म्हणाला...
6
‘टॅरिफला आता हत्यार बनवले जातेय’, निर्मला सीतारमण यांनी सांगितला 'ट्रम्प टॅरिफ'मागील खेळ...
7
वंदे भारत की राजधानी, कोणत्या ट्रेनच्या लोको पायलटला सर्वाधिक पगार मिळतो? आकडा पाहून व्हाल थक्क
8
ICICI Prudential AMC IPO Allotment: कसं चेक कराल अलॉटमेंट स्टेटस? जीएमपीमध्येही जोरदार तेजी
9
गणवेशावरून चिडवलं, घरी येताच चौथीत शिकणाऱ्या प्रशांतने...; आईवडिलांच्या पायाखालची जमीनच सरकली
10
“काँग्रेसचे पाक प्रेम उतू चाललेय, ऑपरेशन सिंदूरचा हिशोब विचारणारे देशद्रोही”: एकनाथ शिंदे
11
Meesho च्या शेअरला अपर सर्किट; इश्यू प्राईजच्या दुप्पट झाली किंमत, सह-संस्थापक बनले अब्जाधीश
12
ढाका येथील भारतीय उच्चायुक्तालयाला धमकी, सरकारने बांगलादेशी अधिकाऱ्याला समन्स बजावले
13
विराट-अनुष्काने घेतली प्रेमानंद महाराजांकडून दीक्षा, गळ्यात तुळशी माळ; जाणून घ्या त्याचे महत्व
14
Payal Gaming: कोण आहे पायल गेमिंग? १.२० मिनटांचा MMS लीक झाल्यानंतर आली चर्चेत!
15
Video: BJP आमदाराच्या मुलाचा शाही विवाह सोहळा; तब्बल ७० लाखांच्या फटाक्यांची केली आतषबाजी
16
ओला-उबरला टक्कर! १ जानेवारीपासून 'भारत टॅक्सी' ॲप होणार लाँच; प्रवाशांना स्वस्त प्रवास आणि ड्रायव्हर्सची होणार जास्त कमाई
17
लग्नानंतर एका वर्षात शोभिता धुलिपाला देणार गुडन्यूज? सासरे नागार्जुन म्हणाले, "योग्य वेळ..."
18
भारतीय बाजारात उद्याच स्वस्तातली सात सीटर कार लाँच होणार; अर्टिगा, ट्रायबरला मिळणार टक्कर...
19
स्वस्त 'पर्सनल लोन'च्या शोधात आहात? 'या' ५ बँकांमध्ये मिळतोय सर्वात कमी व्याजदर; १२ लाखांचा EMI किती?
20
क्रीडामंत्री माणिकराव कोकाटेंविरोधात अटक वॉरंट, कोणत्याही क्षणी अटक होणार, आमदारकीही जाणार?
Daily Top 2Weekly Top 5

रत्नागिरी नगरपालिकेतही राजकीय ‘घटस्फोटा’ची तयारी सुरु ?

By admin | Updated: November 11, 2014 22:20 IST

प्रथमच राष्ट्रवादीने व्हीप बजावून भाजपला शहर विकासासाठी साथ देण्याचे ठरवल्याने

रत्नागिरी : राज्यात सत्तारूढ झालेले भाजप सरकार आता कोणाच्या बळावर ‘विश्वास’ जिंकतं, हे जरी भविष्याच्या कप्प्यात बंद असलं तरी शिवसेनेला बाजूला सारून राष्ट्रवादीशी सलगी करण्याची भाजपची नवी खेळी ही रत्नागिरी पालिकेपर्यंत येऊन पोहोचल्याचे पाहायला मिळत आहे. रत्नागिरी उपनगराध्यक्ष पदाच्या निवडीत प्रथमच राष्ट्रवादीने व्हीप बजावून भाजपला शहर विकासासाठी साथ देण्याचे ठरवल्याने राज्याची समीकरणेही अशीच असणार की काय? अशी शंका उपस्थित होऊ लागली आहे.विधानसभा निवडणुकीचे कारण पुढे करत भाजपने शिवसेनेकडून नगराध्यक्षपद पदरात पाडून घेतले. निवडणूक मतदानाच्या काही दिवस अगोदर राज्यातील युतीचे धागे तुटले आणि विधानसभा निवडणूक भाजपने स्वबळावर लढवण्याचे ठरवले. यामुळे रत्नागिरी जिल्ह्यात भाजपची पीछेहाट झाली असली तरी रत्नागिरी पालिकेत भाजपने नशिबाच्या वा खेळीच्या जोरावर असेल यश मिळवले आहे. नगराध्यक्षपद शिवसेनेकडून गोड बोलून काढून घेणाऱ्या भाजपविरोधात आता अविश्वास ठराव मांडणेही शिवसेनेला तेवढे सोपे राहिलेले नाही. कोणत्याही नगराध्यक्षावर सहा महिन्यांशिवाय अविश्वास ठराव मांडता येत नाही. त्यामुळे शिवसेनेची गोची झाली आहे.विधानसभा निवडणुकीपूर्वी खेळलेल्या खेळीमुळे आत्मविश्वास दुणावलेल्या भाजपने उपनगराध्यक्ष निवडणुकीतही शिवसेनेला पदापासून दूर ठेवण्याचे कारस्थान केले खरे; मात्र काही दिवसांपूर्वीच सेनागृही परतलेल्या माजी राज्यमंत्री उदय सामंत यांच्या पालिकेतील समर्थकांनी शिवसेनेची लाज राखली. सामंत यांच्या चार समर्थकांनी राष्ट्रवादीची साथ सोडत वेगळा गट स्थापन केला आणि शिवसेनेला साथ दिली. वेगळा गट स्थापनेची ‘आयडिया’ या चार समर्थकांनी केली नसती, तर रत्नागिरी पालिकेत मंगळवारी भाजपचाच उपनगराध्यक्ष दिसला असता आणि सर्वात मोठा पक्ष असूनही शिवसेनेला दोन्ही पदांपासून लांब राहावे लागले असते. कारण उपनगराध्यक्षपद निवडणुकीत शहर विकासासाठी भाजपला साथ देण्याचा व्हीप राष्ट्रवादीने बजावला होता. हा व्हीप थोडा लवकर बजावला असता तरीही शिवसेनेची गोची झाली असती.या संपूर्ण प्रकरणात भाजपला राष्ट्रवादीने साथ द्यावी आणि तीही शहर विकासाच्या नावाखाली द्यावी, हे एक न उलगडणारे कोडे आहे. भाजप जवळ करो वा न करो. मात्र, राष्ट्रवादी भाजपच्या अगदी निकट जाऊ पाहातेय, हेच चित्र सध्या रत्नागिरीत पाहायला मिळत आहे. भाजप आपल्या जुन्या मित्राला विसरून नव्या पक्षाशी मैत्री करत आहे आणि विशेष म्हणजे राष्ट्रवादीने राज्यस्तरावर भाजपला बाहेरून पाठिंबा देण्याचा निर्णय जाहीर केल्यानंतरच रत्नागिरीत या घडामोडी घडल्या आहेत. त्यामागे उदय सामंत यांनी राष्ट्रवादीचा त्याग केल्याने शिवसेनेला पाठिंबा नाही, ही राष्ट्रवादीची भूमिका असू शकते. मात्र, त्याहीपेक्षा राज्यस्तरावर भाजप-राष्ट्रवादी संबंधांची किनार जास्त आहे, हेही तेवढेच निश्चित.विधानसभा निवडणुकीत पराभव झाल्यानंतर पत्रकार परिषद घेऊन भाजप प्रवक्ते बाळ माने यांनी यापुढे जिल्ह्यात भाजप शिवसेनेची साथ न घेता स्वबळावर स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये लढेल, असे म्हटले होते, त्याचीच ही सुरूवात असू शकते. भाजपने पहिल्या खेळीत शिवसेनेला कोंडीत पकडले, तर दुसऱ्या खेळीत शिवसेनेने राष्ट्रवादीतील फुटीर गटाच्या मदतीने भाजपला धडा शिकवला. सामना बरोबरीत सुटलाय. पण, आगामी राजकारणात कोण बाजी मारणार, याची उत्सुकता यापुढच्या प्रत्येक निवडणुकीत असेल. (प्रतिनिधी)