शहरं
Join us  
Trending Stories
1
ज्योती मल्होत्रानंतर ISI च्या आणखी एका एजंटला अटक, उत्तर प्रदेश एटीएसची कारवाई
2
IPL 2025 Playoffs Scenarios: आता एका जागेसाठी ३ संघ! MI अन् DC त कडवी टक्कर; LSG चं काही खरं नाही
3
ज्योती मल्होत्रा बनली होती पाकिस्तानसाठी 'अ‍ॅसेट', 'ऑपरेशन सिंदूर'च्या काळात होती शत्रूच्या संपर्कात
4
IPL 2025 : गुजरात टायटन्ससह रॉयल चॅलेंजर्स बंगळुरु अन् पंजाब किंग्जला मिळालं प्लेऑफ्सचं तिकीट
5
RSS मुख्यालयावरील हल्ल्याचा सूत्रधार सैफुल्लाचा १९ वर्षांनंतर खात्मा, संघ वर्तुळातून ‘अज्ञात’ व्यक्तीच्या कृतीचे स्वागत
6
IPL च्या इतिहासात असं पहिल्यांदाच घडलं; शुबमन गिल-साई जोडीच्या जोरावर GT नं साधला विक्रमी डाव
7
मुंबईत तिहेरी हत्याकांड! दोन कुटुंबाचा वाद विकोपाला, कोयत्यानेच एकमेकांवर हल्ला; ४ जण जखमी
8
'गौरव गोगोई ट्रेनिंगसाठी पाकिस्तानला गेले होते', काँग्रेसच्या खासदारावर भाजपच्या मुख्यमंत्र्याचा गंभीर आरोप
9
Mumbai: ड्रग्ज तस्करांना दणका! १३ कोटींचे एमडी जप्त; मुंबई आणि नवी मुंबईतील पाच जणांना अटक
10
Solapur Fire: आगीत ८ जणांचा मृत्यू, PM मोदींनी व्यक्त केला शोक; CM फडणवीसांकडून पाच लाखांच्या मदतीची घोषणा
11
किंग कोहलीपेक्षा फास्टर निघाला KL राहुल! टी-२० त जलदगतीने गाठला ८००० धावांचा पल्ला
12
हल्दी घाटीमध्ये सराव, CDS ची रणनीती आणि..., अशी आहे ऑपरेशन सिंदूरच्या यशाची Inside Story  
13
गडचिरोली: यू-टर्न घेताना घात झाला अन् भरधाव ट्रक येऊन धडकला, कारमधील चौघे जागीच ठार
14
नाम तो सुना होगा! केएल राहुलनं शतकी खेळीसह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा एकमेव फलंदाज
15
कुख्यात दहशतवादी सैफुल्लाह खालिद ठार, भारतात झालेल्या तीन हल्ल्यांमागे होता हात, पाकिस्तानमध्ये अज्ञातांनी झाडल्या गोळ्या  
16
शिक्षण घोटाळ्यात नागपूर पोलिसांची एसआयटी स्थापन, अनेक मोठ्या अधिकाऱ्यांचा भांडाफोड होण्याची शक्यता
17
या महिलेवर लक्ष ठेवा, त्याने वर्षभरापूर्वीच दिला होता इशारा, आता त्या ट्विटची होतेय चर्चा
18
अभिनेत्री नुसरत फारियाला ढाका विमानतळावर अटक; कोणत्या प्रकरणात झाली कारवाई?
19
आणखी एका पाकिस्तानी हेराला ठोकल्या बेड्या, ISIला भारताची गोपनीय माहिती पुरवणारा अरमान अटकेत  
20
RR विरुद्धच्या विजयासह PBKS चा प्लेऑफ्सचा पेपर झाला सोपा! आता GT च्या निकालावर असतील नजरा, कारण...

स्मार्ट शहराच्या यादीत रत्नागिरीच्या तोंडाला पाने

By admin | Updated: August 1, 2015 00:37 IST

रत्नागिरी : अंतिम दहा शहरांच्या यादीतून रत्नागिरीचे नाव गायब

रत्नागिरी : देशातील १०० शहरांना स्मार्ट शहर बनवण्याची घोषणा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केल्यानंतर त्यासाठी राज्यातील ३० पालिकांची प्राथमिक फेरीत निवड झाली. त्यातून निवडक, सक्षम तसेच सर्व निकष पूर्ण करणाऱ्या दहा शहरांची यादी आज मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी जाहीर केली. त्यात रत्नागिरी नगरपालिकेचा समावेश नसल्याने रत्नागिरीच्या विकासावर मर्यादा येणार आहेत.विविध अटींबरोबरच स्मार्ट शहरासाठी लोकसंख्येची अटही घालण्यात आली होती. यातील बहुतांश निकषांच्या पातळीवर रत्नागिरी पालिका आघाडीवर होती. मात्र, लोकसंख्येचा निकष पूर्ण होत नव्हता. स्मार्ट शहरासाठी १ लाख लोकसंख्येची अट घालण्यात आली होती. २०११च्या जनगणनेनुसार रत्नागिरी शहराची लोकसंख्या ७६ हजार आहे. त्यामुळे स्मार्ट शहराच्या स्पर्धेत रत्नागिरी टिकेल की नाही, याबाबत आधीपासूनच शंका व्यक्त केली जात होती. राज्यातील ३० पालिकांनी स्मार्ट शहरासाठी आपले प्रस्ताव राज्य सरकारकडे मागणीनुसार सादर केले होते. कोकणातील रत्नागिरी व पनवेल या दोन पालिकांकडूनही असे प्रस्ताव शासनाने मागविले होते. आठवड्यापूर्वीच मंत्रालयातील शहर विकास विभागाच्या सचिवांनी स्मार्ट शहरासाठी ३० प्रस्ताव आले असून, छाननीअंती त्यातील १० प्रस्तावाची अंतिम यादी ३१ जुलै २०१५ रोजी जाहीर होणार असल्याचे सूतोवाच केले होते. त्यानुसार आज या दहा शहरांची नावे जाहीर करण्यात आली. त्यामध्ये नवी मुंबई, पुणे, पिंपरी चिंचवड, ठाणे, मुंबई, अमरावती, सोलापूर, नागपूर, कल्याण-डोंबिवली आणि औरंगाबाद या शहरांचा समावेश आहे. रत्नागिरी पालिकेकडून राज्य शासनाने प्रस्ताव मागविल्याने गेले दोन महिने आवश्यक निकषांची पुर्तता किती व कशी होणार याबाबत विचारमंथन सुरू होते. प्रस्ताव तयार करण्यासाठी बैठका झाल्या. प्रस्ताव शासनाकडे पाठविण्यात आला. त्याबाबतच्या मार्गदर्शनासाठी दिल्लीतील देशव्यापी मार्गदर्शन शिबिरालाही नगराध्य्ाक्ष व अधिकाऱ्यांनी हजेरी लावली. मात्र हे सारे प्रयत्नच फोल गेल्याने रत्नागिरीकरांची आशा धुळीस मिळाली. (प्रतिनिधी)कोकण विभाग उपाशी...स्मार्ट शहर प्रकल्पासाठी शहरांची निवड करताना राज्यातील नागपूर, अमरावती, मराठवाडा, कोकण, पश्चिम महाराष्ट्र, उत्तर महाराष्ट्र या सहा महसुली विभागांना अंतिम १० शहरांच्या यादीत प्रतिनिधीत्व देण्यात येणार असल्याचे जाहीर झाले होते. त्यामुळे कोकण विभागातून पनवेल व रत्नागिरी या दोन शहरांपैकी किमान एका शहराला अंतिम यादीत स्थान मिळेल, अशी अपेक्षा व्यक्त करण्यात आली होती. प्रत्यक्षात कोकणच्या हाती काहीच लागले नाही. उलट विकसित असलेल्या मोठ्या शहरांनी बाजी मारली.