शहरं
Join us  
Trending Stories
1
बालेंद्र शाहांचा नकार; सुशीला कार्की होणार नेपाळच्या पंतप्रधान? तरुणांचा सर्वाधिक पाठिंबा...
2
रुमाल पडला; तो क्रीजमध्ये यायला विसरला! सूंजचा डायरेक्ट थ्रो; पण Out बॅटरला सूर्यानं दिलं Not Out
3
महाराष्ट्राचे नवे राज्यपाल कोण? सीपी राधाकृष्णन राजीनामा देणार; १२ सप्टेंबरला उपराष्ट्रपतीपदाची शपथ घेण्याची शक्यता
4
शोरुममधून बाहेर पडताच नवीन कारचा अपघात झाला तर विमा मिळतो का? जाणून घ्या...
5
IND vs UAE : सूर्यानं टॉस जिंकला! बॉलिंग घेतल्यावर UAE चा कॅप्टन म्हणाला; बॅटिंग करायची ना...
6
दात घासताना ८० वर्षीय वृद्धाच्या अन्ननलिकेत झाडाची काडी अडकली; ७ दिवस उपाशी राहिले अन्...
7
पुण्यात भलामोठा आयकर रिटर्न घोटाळा; आयटी, मल्टीनॅशनल कंपन्यांचे कर्मचारी अडकले... 
8
नेपाळमधील सत्तापालटावर चीनची पहिली प्रतिक्रिया; माजी पंतप्रधान ओलींचं नाव घेणं टाळलं!
9
मुंबई महापालिका निवडणुकीसाठी शिंदेसेनेची 'जम्बो टीम'; २१ नेत्यांची मुख्य कार्यकारी समिती जाहीर
10
आर्टिफिशियल फ्लेवर्स, प्रिझर्व्हेटिव्ह्जशिवाय घरीच करा 'अ‍ॅपल जॅम'; मुलं म्हणतील, यम्मी...
11
ठाकरेंचा आवाज छत्रपती शिवाजी महाराज पार्कवर घुमणार; दसरा मेळाव्याला महापालिकेची परवानगी
12
Samruddhi Mahamarg : ‘समृद्धी महामार्गावर’वर दिसणारे ते खिळे नाहीत, मग काय?; समजून घ्या 'इपॉक्सी ग्राउटिंग' तंत्रज्ञान
13
वायफाय राउटरच्या बाजूला ठेवल्यात 'या' गोष्टी? आताच बाजूला करा अन्यथा...
14
आयटी सेक्टरमध्ये तेजी! गुंतवणूकदारांनी कमावले २.६४ लाख कोटी रुपये; 'हे' स्टॉक्स ठरले टॉप गेनर
15
वॉशिंग्टन सुरक्षित केले म्हणून डोनाल्ड ट्रम्प हॉटेलमध्ये जेवायला गेले...; लोकांनी जे केले...
16
अमरावतीची 'हवा'च न्यारी! देशात डंका, राष्ट्रीय स्तरावर पटकावला पहिला क्रमांक
17
उपराष्ट्रपती निवडणुकीत 'क्रॉस व्होटिंग'च्या संशयाची सुई; कोणत्या खासदारांनी ऐनवेळी पलटी मारली?
18
भरणी श्राद्ध २०२५: गुरुवारी भरणी श्राद्ध, एकदा करावे की दरवर्षी? अधिकार कोणाला आणि नियम काय?
19
भारतीय अर्थव्यवस्था सुसाट! टॅरिफचा धाक दाखवणाऱ्या अमेरिकेला 'फिच' रिपोर्टने धक्का! इतका वाढणार जीडीपी
20
भयंकर! नेपाळनंतर फ्रान्समध्ये सरकारविरुद्ध मोठं आंदोलन; रस्त्यावर जाळपोळ अन् तोडफोड

स्मार्ट शहराच्या यादीत रत्नागिरीच्या तोंडाला पाने

By admin | Updated: August 1, 2015 00:37 IST

रत्नागिरी : अंतिम दहा शहरांच्या यादीतून रत्नागिरीचे नाव गायब

रत्नागिरी : देशातील १०० शहरांना स्मार्ट शहर बनवण्याची घोषणा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केल्यानंतर त्यासाठी राज्यातील ३० पालिकांची प्राथमिक फेरीत निवड झाली. त्यातून निवडक, सक्षम तसेच सर्व निकष पूर्ण करणाऱ्या दहा शहरांची यादी आज मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी जाहीर केली. त्यात रत्नागिरी नगरपालिकेचा समावेश नसल्याने रत्नागिरीच्या विकासावर मर्यादा येणार आहेत.विविध अटींबरोबरच स्मार्ट शहरासाठी लोकसंख्येची अटही घालण्यात आली होती. यातील बहुतांश निकषांच्या पातळीवर रत्नागिरी पालिका आघाडीवर होती. मात्र, लोकसंख्येचा निकष पूर्ण होत नव्हता. स्मार्ट शहरासाठी १ लाख लोकसंख्येची अट घालण्यात आली होती. २०११च्या जनगणनेनुसार रत्नागिरी शहराची लोकसंख्या ७६ हजार आहे. त्यामुळे स्मार्ट शहराच्या स्पर्धेत रत्नागिरी टिकेल की नाही, याबाबत आधीपासूनच शंका व्यक्त केली जात होती. राज्यातील ३० पालिकांनी स्मार्ट शहरासाठी आपले प्रस्ताव राज्य सरकारकडे मागणीनुसार सादर केले होते. कोकणातील रत्नागिरी व पनवेल या दोन पालिकांकडूनही असे प्रस्ताव शासनाने मागविले होते. आठवड्यापूर्वीच मंत्रालयातील शहर विकास विभागाच्या सचिवांनी स्मार्ट शहरासाठी ३० प्रस्ताव आले असून, छाननीअंती त्यातील १० प्रस्तावाची अंतिम यादी ३१ जुलै २०१५ रोजी जाहीर होणार असल्याचे सूतोवाच केले होते. त्यानुसार आज या दहा शहरांची नावे जाहीर करण्यात आली. त्यामध्ये नवी मुंबई, पुणे, पिंपरी चिंचवड, ठाणे, मुंबई, अमरावती, सोलापूर, नागपूर, कल्याण-डोंबिवली आणि औरंगाबाद या शहरांचा समावेश आहे. रत्नागिरी पालिकेकडून राज्य शासनाने प्रस्ताव मागविल्याने गेले दोन महिने आवश्यक निकषांची पुर्तता किती व कशी होणार याबाबत विचारमंथन सुरू होते. प्रस्ताव तयार करण्यासाठी बैठका झाल्या. प्रस्ताव शासनाकडे पाठविण्यात आला. त्याबाबतच्या मार्गदर्शनासाठी दिल्लीतील देशव्यापी मार्गदर्शन शिबिरालाही नगराध्य्ाक्ष व अधिकाऱ्यांनी हजेरी लावली. मात्र हे सारे प्रयत्नच फोल गेल्याने रत्नागिरीकरांची आशा धुळीस मिळाली. (प्रतिनिधी)कोकण विभाग उपाशी...स्मार्ट शहर प्रकल्पासाठी शहरांची निवड करताना राज्यातील नागपूर, अमरावती, मराठवाडा, कोकण, पश्चिम महाराष्ट्र, उत्तर महाराष्ट्र या सहा महसुली विभागांना अंतिम १० शहरांच्या यादीत प्रतिनिधीत्व देण्यात येणार असल्याचे जाहीर झाले होते. त्यामुळे कोकण विभागातून पनवेल व रत्नागिरी या दोन शहरांपैकी किमान एका शहराला अंतिम यादीत स्थान मिळेल, अशी अपेक्षा व्यक्त करण्यात आली होती. प्रत्यक्षात कोकणच्या हाती काहीच लागले नाही. उलट विकसित असलेल्या मोठ्या शहरांनी बाजी मारली.