शहरं
Join us  
Trending Stories
1
CA नगराध्यक्ष सगळ्यांचा हिशेब ठेवतील अन् काहींचा 'हिशोब करतील'...; फडणवीसांचे सूचक विधान
2
माणिकराव कोकाटे यांना अखेर मोठा दणका; त्यांच्याकडची मंत्रिपदाची सर्व खाती अजित पवारांकडे!
3
U19 Asia Cup 2025 : ...तर आशिया कप जेतेपदासाठी भारत-पाक यांच्यात रंगणार फायनल!
4
महागाईचा ‘रॉकेट’ वेग! चांदी २ लाखांच्या पार, तर सोने १.३७ लाखांवर... आतापर्यंत सर्व विक्रम मोडले
5
Lokmat Parliamentary Award 2025: सुधा मूर्ती ते दिग्विजय सिंह... 'लोकमत पार्लिमेंटरी अवार्ड २०२५'ने ८ प्रतिभावान खासदारांचा गौरव
6
IND vs SA T20I: पहिल्यांदाच असं घडलं! धुक्यामुळे भारत-दक्षिण आफ्रिका यांच्यातील चौथा सामना रद्द
7
मुंबई: कोस्टल रोड प्रवेशद्वारावर अचानक लागली भीषण आग; वाहनांच्या लांब रांगा, प्रवाशांचे हाल
8
धनंजय मुंडे परत मंत्री झाले तर...; अंजली दमानियांकडून भाजपा लक्ष्य; 'तो' फोटोही केला शेअर
9
"पंडित नेहरूंची पत्रे अजूनही सोनिया गांधींकडेच"; केंद्राचा खळबळजनक दावा; म्हणाले, 'हा देशाचा वारसा'
10
“मी माझ्या पक्षाचा पर्मनंट चिफ, कुणी बायपास करणार नाही, तसा प्रयत्न झाला तर…”: रामदास आठवले
11
IND vs SA 4th T20I : शुभमन गिल 'आउट'; टॉसला उशीर! जाणून घ्या त्यामागचं कारण
12
गुरुवारी मार्गशीर्ष शिवरात्रि २०२५: ‘असे’ करा व्रत, शिवाचे विशेष पूजन; काही कमी पडणार नाही!
13
"मला कधीच वाटलं नव्हतं की इतकी पर्सनल..."; MMS लीक प्रकरणावर Payal Gaming चे स्पष्टीकरण
14
“माणिकराव कोकाटेंना वाचवण्याचा सरकारकडून प्रयत्न, २४ तास झाले अद्याप अटक का नाही?”: सपकाळ
15
वांद्रे-वरळी सी लिंकवर २५२ किमी प्रतितास वेगाने पळवली लॅम्बॉर्गिनी, पोलिसांनी केली अशी कारवाई  
16
आवळा कँडी ते च्यवनप्राश... आरोग्यासाठी ठरू शकतं घातक; न्यूट्रिशनिस्टने सांगितले साइड इफेक्ट
17
"शिक्षा देण्यापेक्षा माफ करण्यातच कायद्याचा मोठेपणा"; बूट फेक प्रकरणावर माजी सरन्यायाधीश गवईंचे रोखठोक भाष्य
18
Maruti Suzuki ने लॉन्च केली नवीन WagonR; वृद्ध आणि दिव्यांगांसाठी मिळणार खास 'स्विव्हल सीट'
19
प्रियंका आणि राहुल गांधी यांच्यात वाद, कुटुंबीयांशी भांडून परदेशात गेले; केंद्रीय मंत्र्याचा मोठा दावा
20
“SIR प्रक्रिया निरर्थक, ५०० परदेशींसाठी ८ कोटी लोकांचा छळ”; माजी निवडणूक आयुक्त थेट बोलले
Daily Top 2Weekly Top 5

स्मार्ट शहराच्या यादीत रत्नागिरीच्या तोंडाला पाने

By admin | Updated: August 1, 2015 00:37 IST

रत्नागिरी : अंतिम दहा शहरांच्या यादीतून रत्नागिरीचे नाव गायब

रत्नागिरी : देशातील १०० शहरांना स्मार्ट शहर बनवण्याची घोषणा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केल्यानंतर त्यासाठी राज्यातील ३० पालिकांची प्राथमिक फेरीत निवड झाली. त्यातून निवडक, सक्षम तसेच सर्व निकष पूर्ण करणाऱ्या दहा शहरांची यादी आज मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी जाहीर केली. त्यात रत्नागिरी नगरपालिकेचा समावेश नसल्याने रत्नागिरीच्या विकासावर मर्यादा येणार आहेत.विविध अटींबरोबरच स्मार्ट शहरासाठी लोकसंख्येची अटही घालण्यात आली होती. यातील बहुतांश निकषांच्या पातळीवर रत्नागिरी पालिका आघाडीवर होती. मात्र, लोकसंख्येचा निकष पूर्ण होत नव्हता. स्मार्ट शहरासाठी १ लाख लोकसंख्येची अट घालण्यात आली होती. २०११च्या जनगणनेनुसार रत्नागिरी शहराची लोकसंख्या ७६ हजार आहे. त्यामुळे स्मार्ट शहराच्या स्पर्धेत रत्नागिरी टिकेल की नाही, याबाबत आधीपासूनच शंका व्यक्त केली जात होती. राज्यातील ३० पालिकांनी स्मार्ट शहरासाठी आपले प्रस्ताव राज्य सरकारकडे मागणीनुसार सादर केले होते. कोकणातील रत्नागिरी व पनवेल या दोन पालिकांकडूनही असे प्रस्ताव शासनाने मागविले होते. आठवड्यापूर्वीच मंत्रालयातील शहर विकास विभागाच्या सचिवांनी स्मार्ट शहरासाठी ३० प्रस्ताव आले असून, छाननीअंती त्यातील १० प्रस्तावाची अंतिम यादी ३१ जुलै २०१५ रोजी जाहीर होणार असल्याचे सूतोवाच केले होते. त्यानुसार आज या दहा शहरांची नावे जाहीर करण्यात आली. त्यामध्ये नवी मुंबई, पुणे, पिंपरी चिंचवड, ठाणे, मुंबई, अमरावती, सोलापूर, नागपूर, कल्याण-डोंबिवली आणि औरंगाबाद या शहरांचा समावेश आहे. रत्नागिरी पालिकेकडून राज्य शासनाने प्रस्ताव मागविल्याने गेले दोन महिने आवश्यक निकषांची पुर्तता किती व कशी होणार याबाबत विचारमंथन सुरू होते. प्रस्ताव तयार करण्यासाठी बैठका झाल्या. प्रस्ताव शासनाकडे पाठविण्यात आला. त्याबाबतच्या मार्गदर्शनासाठी दिल्लीतील देशव्यापी मार्गदर्शन शिबिरालाही नगराध्य्ाक्ष व अधिकाऱ्यांनी हजेरी लावली. मात्र हे सारे प्रयत्नच फोल गेल्याने रत्नागिरीकरांची आशा धुळीस मिळाली. (प्रतिनिधी)कोकण विभाग उपाशी...स्मार्ट शहर प्रकल्पासाठी शहरांची निवड करताना राज्यातील नागपूर, अमरावती, मराठवाडा, कोकण, पश्चिम महाराष्ट्र, उत्तर महाराष्ट्र या सहा महसुली विभागांना अंतिम १० शहरांच्या यादीत प्रतिनिधीत्व देण्यात येणार असल्याचे जाहीर झाले होते. त्यामुळे कोकण विभागातून पनवेल व रत्नागिरी या दोन शहरांपैकी किमान एका शहराला अंतिम यादीत स्थान मिळेल, अशी अपेक्षा व्यक्त करण्यात आली होती. प्रत्यक्षात कोकणच्या हाती काहीच लागले नाही. उलट विकसित असलेल्या मोठ्या शहरांनी बाजी मारली.