शहरं
Join us  
Trending Stories
1
CSK प्लेऑफ्सच्या शर्यतीतून आउट; IPL च्या इतिहासात धोनीच्या संघावर पहिल्यांदाच आली ही वेळ
2
पाकिस्तान हादरला !! बसले भूकंपाचे तीव्र धक्के; किती होती तीव्रता? काय आहे सध्याची परिस्थिती?
3
जातिनिहाय जनगणना निर्णयावरुन आता श्रेयवादाची लढाई; भाजपा नेत्यांचा राहुल गांधींवर पलटवार
4
चहलनं साधला मोठा डाव; IPL मधील दुसऱ्या हॅटट्रिकसह युवराज सिंगच्या विक्रमाशी बरोबरी
5
"आम्ही सुरुवात करणार नाही, पण...!"; पाकिस्तानची भारताला पोकळ धमकी
6
"2043 पर्यंत या देशांमध्ये असेल मुस्लिमांचं राज्य", बाबा वेंगा यांची भविष्यवाणी!
7
दिशा सालियन प्रकरण: सतीश सालियन यांच्या याचिकेवर भूमिका स्पष्ट करा; HCचे सरकारला निर्देश
8
'सरकारला 'टेकू' असला की मनमानी करता येत नाही'; जातनिहाय जनगणनेच्या मुद्द्यावरून खोचक टोला
9
संध्याकाळचे पेट्रोलिंग टाळले म्हणून पोलिस आयुक्तांनी ठाण्यात पोहोचून ठाणेदारांना फटकारले!
10
देशहितासाठी आ‌वश्यक ते सर्व केंद्राने करावे; जातनिहाय जनगणनेवर संघाची भूमिका
11
धक्कादायक! सांगलीतील आष्ट्यात विहिरीत पोहण्यासाठी गेलेल्या दोन जणांचा बुडून मृत्यू
12
भारत कधीही हल्ला करेल; पाकिस्तान घाबरला, PoK ला जाणारी सर्व देशांतर्गत उड्डाणे केली रद्द
13
"मोदी सरकारने घेतलेला निर्णय ऐतिहासिक...", जात जनगणनेवरून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा काँग्रेसवर गंभीर आरोप 
14
यवतमाळ: १२ तासात दोन खून! दारूच्या वादात जावायाला संपवले; मालमत्तेच्या वादातून मोठ्या भावाची हत्या
15
गंगेप्रमाणेच राष्ट्रीय स्वयंसेवक संघालाही थांबविण्याचे कोणाकडे साहस नाही: भैय्याजी जोशी
16
जातिनिहाय जनगणनेचा निर्णय हा राहुल गांधींच्या संघर्ष व विचारांचा मोठा विजय: हर्षवर्धन सपकाळ
17
अमूल दूध २ रुपयांनी महागले, महागाईने बेजार झालेल्या सर्वसामन्यांना झटका!
18
कोकण मंडळाच्या योजनेअंतर्गत म्हाडा विकणार १३,३९५ घरे; तुम्ही ऑनलाईन अर्ज केला का?
19
जातीय जनगणनेसाठी सरकारला पूर्ण पाठिंबा, पण..., राहुल गांधींच्या केंद्राला 'या' 4 मागण्या
20
दाैंडच्या खून प्रकरणी १२ जणांना जन्मठेप! आरोपींमध्ये चार सख्खे भाऊ, तीन महिलांचा समावेश

रत्नागिरी हापूस युरोपला रवाना

By admin | Updated: April 2, 2016 00:57 IST

उष्णजल प्रक्रियेला मान्यता : निर्णय रखडला

रत्नागिरी : फळमाशीमुळे युरोपीय देशांनी बंदी घातलेल्या हापूसची यावर्षी परदेश वारी निश्चित झाली आहे. रत्नागिरी तालुक्यातील कोळंबे येथील समीर दामले यांनी ५०० किलो हापूस युरोपला पाठविण्यासाठी मुंबईला पाठविला आहे. तेथून पुढील प्रवास सुरू झाला आहे. फळमाशीमुळे उष्णजल प्रक्रियेचा निकष निश्चित झाला आहे. अपेडाने याबाबचा अहवाल फरिदाबाद येथील नॅशनल प्लॅन प्रोटेक्शन आॅर्गनायझेशनकडे पाठविला आहे. मात्र, आंब्याची निर्यात सुरू झाली तरी अद्याप निर्णय न दिल्याने नाराजी व्यक्त होत आहे.फळमाशीमुळे युरोपीय देशांनी दोन वर्षांपूर्वी आंबा निर्यातीवर बंदी आणली होती. मात्र, गतवर्षी फळमाशी नष्ट होण्यासाठी उष्णजल प्रक्रियेस मान्यता देण्यात आली. उष्णजल प्रक्रियेंतर्गत ४८ अंश सेल्सियसला ६० मिनिटे आंबा ठेवला तर फळमाशीच्या अळ्या मरून जातात. त्यानंतर निर्यातीस युरोपीय देशांनी मान्यता दिली होती. मात्र गतवर्षी संशोधनास झालेला उशीर शिवाय अवकाळी पावसामुळे पिकाच्या उत्पादनात झालेली घट यामुळे आंबा निर्यात होऊ शकला नाही. गतवर्षी आंबा काजू बोर्डातर्फे करण्यात आलेल्या संशोधनात ४७ अंश सेल्सियसला ५० मिनिटे ठेवलेला आंबा निर्यातीस योग्य असल्याचा अहवाल विद्यापीठाच्या संशोधकांनी ‘अपेडा’कडे पाठविला. अपेडाने फरिदाबाद येथील नॅशनल प्लॅन प्रोटेक्शन आॅर्गनायझेशनकडे पुढील मान्यतेसाठी पाठविला आहे. मँगोनेट कार्यशाळेत निर्णयाची अपेक्षा होती, मात्र अद्याप त्याबाबत निर्णय नसल्यामुळे सध्यातरी रत्नागिरीच्या बागायतदारांना वाशी येथील व्हेपरी ट्रीटमेंटद्वारे (बाष्पजल प्रक्रिया) आंबा निर्यात करावा लागणार आहे. (प्रतिनिधी)उत्पादनात घटरत्नागिरी हापूसला परदेशात मोठ्या प्रमाणात मागणी होत आहे. मात्र उत्पादनातील घट यामुळे मागणीप्रमाणे निर्यात होऊ शकत नाही. यावर्षी हापूसचे प्रमाण कमी असल्याने परदेशात आंबा मागणीप्रमाणे पोहचू शकत नसल्याचे दिसत आहे. परदेशातील हापूसची मागणी पूर्ण करण्यासाठी हापूसचे पीक अधिक येणे गरजेचे आहे.समीर दामले यांच्याकडून ५०० किलो आंबारत्नागिरी तालुक्यातील कोळंबे येथील समीर दामले यांचा ५०० किलो आंबा युरोपला जाणार असून, रत्नागिरी पणन केंद्रात रायपनिंग प्रक्रिया करून बाष्पजल प्रक्रिया करण्यासाठी वाशी येथे पाठविण्यात आला आहे. तेथून आंबा विमानाने युरोपला निर्यात होणार आहे.