शहरं
Join us  
Trending Stories
1
एअर इंडियाच्या जिवात जीव आला! बोईंग-787 विमानांत मोठी समस्या सापडली नाही; डीजीसीएकडून घोषणा
2
"सोनमनं दिली होती लग्न न करण्याची धमकी?", पोलिसांनी कुटुंबीयांना विचारले हे 10 प्रश्न!
3
F-35 Shot Down: इस्रायलचं पाचवं F-35 पाडलं, इराणच्या दाव्यानं अमेरिकेचं टेन्शन वाढलं! 
4
इस्राइलचा निशाणा 'सुप्रीम लीडर'वरच! खामेनेईंचा बंकर असलेल्या भागात केला बॉम्बचा मारा
5
फास्टॅग पास एक्स्प्रेस हायवे, समृद्धी, अटल सेतूवरही लागू होणार? जाणून घ्या, नेमका कुठे फायदा होणार
6
“भाजपा केवळ देशातील नव्हेच तर जगातील मोठा पक्ष, पण...”; जयंत पाटील नेमके काय म्हणाले?
7
Sonam Raghuvanshi : "आम्ही कोणतंही पाप केलेलं नाही..."; नार्को टेस्टच्या मागणीवर सोनम रघुवंशीचा भाऊ संतापला
8
“काँग्रेस दिशाहीन पक्ष”; CM फडणवीसांच्या उपस्थितीत जयश्रीताई पाटील यांचा भाजपा प्रवेश
9
एअर इंडियाच्या अपघातात विमा धारकाचाही मृत्यू अन् नॉमिनीचाही; विमा कंपन्या पेचात सापडल्या, इरडाचे तर स्पष्ट आदेश आहेत...
10
हजारो जीव वाचणार! आपत्कालीन परिस्थितीत विमानातील प्रवाशांचे केबिन वेगळे होणार, युक्रेनियन अभियंत्याने केले डिझाइन
11
"राजा भाई तुम तो गए...!" ...अन् अँकर गमतीत बोलला, ते खरं ठरलं; बघा संपूर्ण VIDEO 
12
जेव्हा James Bond चित्रपट सत्यात उतरतो; पहिल्यांदाच MI6 चे नेतृत्व एका महिलेकडे...
13
Video - जिंकलंत मित्रांनो! झोमॅटो डिलिव्हरी बॉयचे पाणावले डोळे, ग्राहकांनी दिलं मोठं सरप्राईज
14
काहीतरी विपरित घडणार? तामिळनाडूत आढळली Doomsday fish; सोशल मीडियावर वेगळीच चर्चा
15
लग्नासाठी गोव्याला घेऊन गेला, पण तिथेच नेऊन खेळ संपवला! माथेफिरू प्रियकराला अटक
16
१९९५पासूनचा बालेकिल्ला ढासळला, कोकणात ठाकरे गटाला धक्का; माजी आमदार, नेते NCP अजित पवार गटात
17
आतापर्यंत इस्रायलच्या हल्ल्यात इराणचे किती लोक मारले गेले? आकडा पाहून धक्का बसेल; तेहरान सोडून पळ काढणाऱ्यांचीही लागली रांग
18
इतिहासाची पुनरावृत्ती... तारीख, दिवस अन् घटनाही त्याच; ८४ वर्षापूर्वी घडलेले, सेम टू सेम...
19
एका दिवसांत किती वेळाही Toll क्रॉस करा; वार्षिक पासमुळे सामान्यांना काय होणार फायदा?

रत्नागिरी हापूस युरोपला रवाना

By admin | Updated: April 2, 2016 00:57 IST

उष्णजल प्रक्रियेला मान्यता : निर्णय रखडला

रत्नागिरी : फळमाशीमुळे युरोपीय देशांनी बंदी घातलेल्या हापूसची यावर्षी परदेश वारी निश्चित झाली आहे. रत्नागिरी तालुक्यातील कोळंबे येथील समीर दामले यांनी ५०० किलो हापूस युरोपला पाठविण्यासाठी मुंबईला पाठविला आहे. तेथून पुढील प्रवास सुरू झाला आहे. फळमाशीमुळे उष्णजल प्रक्रियेचा निकष निश्चित झाला आहे. अपेडाने याबाबचा अहवाल फरिदाबाद येथील नॅशनल प्लॅन प्रोटेक्शन आॅर्गनायझेशनकडे पाठविला आहे. मात्र, आंब्याची निर्यात सुरू झाली तरी अद्याप निर्णय न दिल्याने नाराजी व्यक्त होत आहे.फळमाशीमुळे युरोपीय देशांनी दोन वर्षांपूर्वी आंबा निर्यातीवर बंदी आणली होती. मात्र, गतवर्षी फळमाशी नष्ट होण्यासाठी उष्णजल प्रक्रियेस मान्यता देण्यात आली. उष्णजल प्रक्रियेंतर्गत ४८ अंश सेल्सियसला ६० मिनिटे आंबा ठेवला तर फळमाशीच्या अळ्या मरून जातात. त्यानंतर निर्यातीस युरोपीय देशांनी मान्यता दिली होती. मात्र गतवर्षी संशोधनास झालेला उशीर शिवाय अवकाळी पावसामुळे पिकाच्या उत्पादनात झालेली घट यामुळे आंबा निर्यात होऊ शकला नाही. गतवर्षी आंबा काजू बोर्डातर्फे करण्यात आलेल्या संशोधनात ४७ अंश सेल्सियसला ५० मिनिटे ठेवलेला आंबा निर्यातीस योग्य असल्याचा अहवाल विद्यापीठाच्या संशोधकांनी ‘अपेडा’कडे पाठविला. अपेडाने फरिदाबाद येथील नॅशनल प्लॅन प्रोटेक्शन आॅर्गनायझेशनकडे पुढील मान्यतेसाठी पाठविला आहे. मँगोनेट कार्यशाळेत निर्णयाची अपेक्षा होती, मात्र अद्याप त्याबाबत निर्णय नसल्यामुळे सध्यातरी रत्नागिरीच्या बागायतदारांना वाशी येथील व्हेपरी ट्रीटमेंटद्वारे (बाष्पजल प्रक्रिया) आंबा निर्यात करावा लागणार आहे. (प्रतिनिधी)उत्पादनात घटरत्नागिरी हापूसला परदेशात मोठ्या प्रमाणात मागणी होत आहे. मात्र उत्पादनातील घट यामुळे मागणीप्रमाणे निर्यात होऊ शकत नाही. यावर्षी हापूसचे प्रमाण कमी असल्याने परदेशात आंबा मागणीप्रमाणे पोहचू शकत नसल्याचे दिसत आहे. परदेशातील हापूसची मागणी पूर्ण करण्यासाठी हापूसचे पीक अधिक येणे गरजेचे आहे.समीर दामले यांच्याकडून ५०० किलो आंबारत्नागिरी तालुक्यातील कोळंबे येथील समीर दामले यांचा ५०० किलो आंबा युरोपला जाणार असून, रत्नागिरी पणन केंद्रात रायपनिंग प्रक्रिया करून बाष्पजल प्रक्रिया करण्यासाठी वाशी येथे पाठविण्यात आला आहे. तेथून आंबा विमानाने युरोपला निर्यात होणार आहे.