शहरं
Join us  
Trending Stories
1
भाषेवरून राजकारण पेटले, उद्धव ठाकरेंची सडकून टीका, एकनाथ शिंदेंचा जोरदार पलटवार!
2
इराण-इस्रायल युद्धात दोन गटात विभागलं केलं जग? रशियानंतर आता चीनचीही 'एन्ट्री', भारताची भूमिका काय?
3
Vivek Lagoo: ज्येष्ठ अभिनेते विवेक लागू यांचं निधन, रंगभूमीवरचा शिस्तप्रिय नट हरपला
4
IND vs ENG : गिलनं दिला 'ब्लू प्रिंट'चा दाखला; 'लगान' वसूल करण्यासाठी रोहित-विराटचाही घेतलाय सल्ला
5
“आम्ही कट्टर देशाभिमानी हिंदू, भ्रष्ट भाजपावाले घरोघरी ‘सिंदूर’ वाटणार होते”: उद्धव ठाकरे
6
जाईन गे माये तया पंढरपुरा, भेटेन माहेर आपुलिया! अलंकापुरीतून माऊलींच्या पालखीचे वैभवी प्रस्थान
7
साताऱ्यातील पर्यटनस्थळांवर १९ ऑगस्टपर्यंत निर्बंध; धबधब्यांसह कास पठार, महाबळेश्वरमधील स्थळे अन् धरणांचाही समावेश
8
"महाराष्ट्रात हिंदी लादल्यास रस्त्यावर उतरू", मराठी अस्मितेसाठी उद्धव ठाकरेंचा एल्गार
9
नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाला दिबांचे नाव लवकरात लवकर द्या, सर्वपक्षीय कृती समितीची मागणी
10
"आपला मेळावा बाळासाहेबांच्या विचारांचा, तर दुसरा..."; एकनाथ शिंदेंचा जोरदार हल्लाबोल
11
ऑपरेशन सिंधू: भारत सरकार इस्रायलमधील भारतीयांना परत आणणार! कशी करता येणार नोंदणी? जाणून घ्या
12
“पहलगाम हल्लातील दहशतवादी आकाशात गेले, पाताळात गेले की भाजपात गेले?”; ठाकरेंचा बोचरा सवाल
13
"पाकिस्तानात ठेवलं जाणार इराणचं अण्वस्त्र साहित्य?"; ट्रम्प यांनी मुनीर यांना नेमकं का जेवायला बोलावलं? सगळं विचित्रच...!
14
"अमेरिकेनं इस्रायलला थेट लष्करी मदत केली तर..." आता इराण-इस्रायल युद्धात रशियाची 'एन्ट्री'; दिली खुली धमकी!
15
आरोपांची उठली राळ, मंत्री संजय शिरसाटांचा इम्तियाज जलीलांविरोधात कायदेशीर पलटवार
16
आजचा अग्रलेख: चटका लावणारा चकवा
17
सोनम आणि राज कुशवाह यांना दिलासा नाही, न्यायालयाने पोलीस कोठडीत केली वाढ!
18
ऑपरेशन सिंदूर: मोदींनी अमेरिकेच्या न झालेल्या ५१ व्या राज्यात जाऊन सुनावले, ट्रम्प वठणीवर आले...
19
मेहुणीवर जीव जडला, प्रेमाच्या मर्यादा ओलांडल्या, प्रेग्नंट झाल्याचं कळताच केलं कांड!
20
देशातील सर्वात महागडा टीव्ही ३० लाखांना विकला गेला; कंपनीचे नाव पाहून तुम्ही म्हणाल...

रत्नागिरीला दरवर्षी ३00 कोटी देऊ

By admin | Updated: January 29, 2016 23:58 IST

चंद्रकांत पाटील : मुंबई-गोवा महामार्ग अन्य राज्यांना जोडणार

रत्नागिरी : रत्नागिरीचे पालकमंत्री रवींद्र वायकर यांच्या मागणीनुसार जिल्ह्यातील रस्त्यांच्या कामासाठी दरवर्षी हजार कोटी निधी देणे राज्य सरकारला शक्य नाही. मात्र, ३०० ते ४०० कोटी निधी रस्त्यांसाठी देता येईल, असे आश्वासन राज्याचे सार्वजनिक बांधकाम मंत्री चंद्रकांत पाटील यांनी दिले. चौपदरी होणारा मुंबई-गोवा महामार्ग अन्य राज्यातील सहा, आठ पदरी महामार्गांशी जोडण्याचाही गडकरी यांचा विचार असल्याचेही चंद्रकांतदादा यांनी स्पष्ट केले. निवळी - रत्नागिरी येथे चौपदरीकरणाच्या भूमिपूजन संमारंभात पाटील बोलत होते. राज्यात २० हजार किलोमीटर रस्त्यांची गरज आहे. त्यासाठी नियोजनबध्द आराखडा तयार करून निधीची तरतूद करावी लागेल, असेही पाटील म्हणाले. केंद्रीय अवजड उद्योगमंत्री अनंत गीते म्हणाले की, मुंबई-गोवा महामार्ग चौपदरी करण्याची मागणी आपण मंत्री गडकरी यांच्याकडे केली होती. त्यांनी ती मान्य केली. आज चौपदरीकरणाचे भूमिपूजन झाले. येत्या महिना-दोन महिन्यात भूसंपादन होईल. चौपदरीकरण सुरू होईल. त्याच्या भूसंपादनासाठी कोठेही बळाचा वापर होणार नाही. कोकणच्या विकासाचा हा महामार्ग चौपदरी झालाच पाहिजे. त्याचबरोबर रेवस-रेडी हा ४७५ किलोमीटरचा सागरी महामार्गही झाला पाहिजे. हा सागरी महामार्ग राज्याने केंद्राकडे हस्तांतरीत करावा व त्याला राष्ट्रीय महामार्गाचा दर्जा द्यावा, अशी मागणीही गीते यांनी यावेळी गडकरी यांच्याकडे केली. चौपदरीकरणाची सुरूवात रत्नागिरीतून होत आहे, ही स्वागतार्ह बाब आहे. जिल्हा प्रशासनाचे उत्तम सहकार्य यासाठी मिळत आहे. त्यामुळे मृत्यूचा सापळा बनलेला हा महामार्ग चौपदरीकरणानंतर आनंदी प्रवासाचा मार्ग ठरावा, अशी अपेक्षा विनायक राऊत यांनी व्यक्त केली. रत्नागिरीतील कामाच्या प्रगतीचे त्यांनी कौतुकही केले. पालकमंत्री वायकर म्हणाले की, जिल्ह्यातील रस्त्यांच्या नूतनीकरणासाठी, दुरुस्तीसाठी ५ हजार कोटींची गरज आहे. दरवर्षाला १ हजार कोटी रुपये मिळाले तर रस्ते चांगले करता येतील, असे ते म्हणाले. (प्रतिनिधी)