शहरं
Join us  
Trending Stories
1
क्रीडामंत्री माणिकराव कोकाटेंविरोधात अटक वॉरंट, कोणत्याही क्षणी अटक होणार, आमदारकीही जाणार?
2
राजकीय सूडबुद्धीतून रचलेले प्रकरण, ईडी-सीबीआयचा गैरवापर; 'नॅशनल हेराल्ड'वरुन खरगेंची मोदी-शाहांवर टीका
3
...अन् त्यावेळी राष्ट्रपती बनण्याचा प्रस्ताव वाजपेयींनी नाकारला; 'अटल संस्मरण' पुस्तकात दावा
4
“मातोश्रीबाबत मनात आदर कायम, पण...”; शिंदे गटात प्रवेश करताच बड्या नेत्याने सगळेच सांगितले
5
Video - हार्ट अटॅकमुळे वेदनेने तडफडत होता पती; पत्नीने जोडले हात, पण कोणीच केली नाही मदत
6
शेतकऱ्यांसाठी मोठा अलर्ट! फार्मर आयडीशिवाय पीएम किसानचे पैसे येणार नाहीत; अशी तयार करा ID
7
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीचे दागिने घेताना १०० वेळा विचार करावा लागणार; चांदी २ लाखांच्या पार, सोन्याच्या दरातही मोठी तेजी
8
‘मी काही चुकीचं बोललो नाही, माफी मागण्याचा प्रश्नच नाही..’, पृथ्वीराज चव्हाण ऑपरेशन सिंदूरबाबतच्या वक्तव्यावर ठाम  
9
BMC ELections: मुंबईत अजित पवार पडले एकटे, राष्ट्रवादीची किती जागांवर लढण्याची तयारी, बैठकीत काय झाला निर्णय? 
10
‘ते’ विधान भोवणार, संजय राऊत अडचणीत येणार?; गृहराज्यमंत्री म्हणाले, “…तर गुन्हा दाखल करू”
11
Video - लग्नात राडा! नवरदेवाच्या मित्रांनी नवरीला घातली 'स्नो स्प्रे'ने आंघोळ, मेकअपच गेला वाया
12
क्रेडिट कार्ड वापरताय? मग 'या' ७ चुका टाळा, अन्यथा बसेल आर्थिक फटका!
13
IPL मधील ऑक्शनची संपूर्ण रक्कम घरी नेतात का खेळाडू? पाहा टॅक्स, सॅलरी आणि इनहँड रकमेचा कसा असतो हिशोब
14
‘टायगर स्टेट’समोर गंभीर आव्हान! एका आठवड्यात 6 तर, वर्षभरात 54 वाघांचा मृत्यू; शिकारीचा संशय
15
शाल, गळ्यात रुद्राक्षांची माळ आणि डोक्यावर टिळा, अनंत अंबानींसोबत वनतारामध्ये दिसलं मेसीचं भारतीय रूप
16
कर्माची फळं इथेच भोगली! 'धुरंधर'मधील खनानी होता सगळ्यात खुंखार; भारतात पाठवायचा खोट्या नोटा, मिळाला खतरनाक मृत्यू
17
किडन्या फेल, डायलिसिससाठी पैसेच नाहीत; ७० दिवस 'डिजिटल अरेस्ट' करुन ५३ लाखांचा गंडा
18
Saif Ali Khan : "पॅरेलाइज होऊ शकलो असतो..."; सैफ अली खानने सांगितला हल्ल्याचा थरार, आजही वाटतेय भीती
19
"कायदा यांच्या कोठीवर नाचतोय, जोवर दिल्लीत आणि निवडणूक आयोगात हरामखोरांचं राज्य, तोवर...;" संजय राऊतांची जीभ घसरली!
Daily Top 2Weekly Top 5

रत्नागिरीला दरवर्षी ३00 कोटी देऊ

By admin | Updated: January 29, 2016 23:58 IST

चंद्रकांत पाटील : मुंबई-गोवा महामार्ग अन्य राज्यांना जोडणार

रत्नागिरी : रत्नागिरीचे पालकमंत्री रवींद्र वायकर यांच्या मागणीनुसार जिल्ह्यातील रस्त्यांच्या कामासाठी दरवर्षी हजार कोटी निधी देणे राज्य सरकारला शक्य नाही. मात्र, ३०० ते ४०० कोटी निधी रस्त्यांसाठी देता येईल, असे आश्वासन राज्याचे सार्वजनिक बांधकाम मंत्री चंद्रकांत पाटील यांनी दिले. चौपदरी होणारा मुंबई-गोवा महामार्ग अन्य राज्यातील सहा, आठ पदरी महामार्गांशी जोडण्याचाही गडकरी यांचा विचार असल्याचेही चंद्रकांतदादा यांनी स्पष्ट केले. निवळी - रत्नागिरी येथे चौपदरीकरणाच्या भूमिपूजन संमारंभात पाटील बोलत होते. राज्यात २० हजार किलोमीटर रस्त्यांची गरज आहे. त्यासाठी नियोजनबध्द आराखडा तयार करून निधीची तरतूद करावी लागेल, असेही पाटील म्हणाले. केंद्रीय अवजड उद्योगमंत्री अनंत गीते म्हणाले की, मुंबई-गोवा महामार्ग चौपदरी करण्याची मागणी आपण मंत्री गडकरी यांच्याकडे केली होती. त्यांनी ती मान्य केली. आज चौपदरीकरणाचे भूमिपूजन झाले. येत्या महिना-दोन महिन्यात भूसंपादन होईल. चौपदरीकरण सुरू होईल. त्याच्या भूसंपादनासाठी कोठेही बळाचा वापर होणार नाही. कोकणच्या विकासाचा हा महामार्ग चौपदरी झालाच पाहिजे. त्याचबरोबर रेवस-रेडी हा ४७५ किलोमीटरचा सागरी महामार्गही झाला पाहिजे. हा सागरी महामार्ग राज्याने केंद्राकडे हस्तांतरीत करावा व त्याला राष्ट्रीय महामार्गाचा दर्जा द्यावा, अशी मागणीही गीते यांनी यावेळी गडकरी यांच्याकडे केली. चौपदरीकरणाची सुरूवात रत्नागिरीतून होत आहे, ही स्वागतार्ह बाब आहे. जिल्हा प्रशासनाचे उत्तम सहकार्य यासाठी मिळत आहे. त्यामुळे मृत्यूचा सापळा बनलेला हा महामार्ग चौपदरीकरणानंतर आनंदी प्रवासाचा मार्ग ठरावा, अशी अपेक्षा विनायक राऊत यांनी व्यक्त केली. रत्नागिरीतील कामाच्या प्रगतीचे त्यांनी कौतुकही केले. पालकमंत्री वायकर म्हणाले की, जिल्ह्यातील रस्त्यांच्या नूतनीकरणासाठी, दुरुस्तीसाठी ५ हजार कोटींची गरज आहे. दरवर्षाला १ हजार कोटी रुपये मिळाले तर रस्ते चांगले करता येतील, असे ते म्हणाले. (प्रतिनिधी)