शहरं
Join us  
Trending Stories
1
T20 World Cup: त्यावेळीच ठरलेलं Shubman Gill संघाबाहेर जाणार; टीम सिलेक्शनची Inside Story
2
नवी मुंबई: संजय नाईक पुन्हा 'भाजपावासी'; मुख्यमंत्री, प्रदेशाध्यक्षांची भेट घेत 'घरवापसी'
3
दाट धुक्यामुळे दिल्ली विमानतळाचे वेळापत्रक विस्कळीत, १३८ विमान उड्डाणे रद्द, श्रीनगरलाही फटका
4
"सत्ता आणि सामर्थ्य याचा अर्थ आता बदलला आहे..."; जागतिक अशांततेवर जयशंकर यांचे मोठे विधान
5
संरक्षण मंत्रालयात खळबळ; लेफ्टनंट कर्नल दीपक शर्मा यांना लाच घेताना सीबीआयने पकडले; घरात सापडले २ कोटींहून अधिक रोख
6
मीरा भाईंदर: "...त्यातूनच लाडकी बहीण योजनेचा जन्म झाला"; एकनाथ शिंदे यांनी सांगितली कहाणी
7
अमेरिकेचं ‘ऑपरेशन हॉकआय स्ट्राइक’, इस्लामिक स्टेटच्या 70 ठिकाणांवर US चे मोठे हल्ले; प्रकरण काय?
8
"नीतीश वडिलांप्रमाणे, बाप-लेकीत..."; बिहार 'नकाब' वादावर राज्यपाल आरिफ मोहम्मद खान स्पष्टच बोलले
9
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
10
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
11
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
12
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
13
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
14
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
15
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
16
“भ्रष्ट महायुती सरकार विरोधात काँग्रेसचा वैचारिक लढा, मनपा निवडणुकीत...”: हर्षवर्धन सपकाळ
17
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
18
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
19
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
20
'त्या' प्रश्नावर सूर्याची बोलतीच बंद! सर्वांसमोर मुख्य निवडकर्ते आगरकरांना म्हणाला; "तुम्हीच सांगा"
Daily Top 2Weekly Top 5

रत्नागिरी विभाग : एस. टी. महामंडळाला वावडे?

By admin | Updated: October 15, 2015 00:37 IST

तारेवरची कसरत : जादा सेवेमुळे मानसिक त्रास

मेहरुन नाकाडे-रत्नागिरी--प्रत्येक क्षेत्रात महिलावर्गाने आपले वर्चस्व स्थापित केले आहे. खासगी असो वा शासकीय क्षेत्रात पुरूषवर्गाच्या खांद्याला खांदा लावून महिला काम करत आहेत. राज्य परिवहन महामंडळामध्ये केवळ चालक वगळता अन्य सर्व पदांवर महिला कार्यरत आहेत. राज्य परिवहन महामंडळाच्या रत्नागिरी विभागात एकूण ४ हजार ५०० कर्मचारी विविध पदांवर कार्यरत आहेत. त्यापैकी विविध पदांवर ३१७ महिला काम करत आहेत. त्यामुळे महिलांची संख्या एकूण कर्मचाऱ्यांच्या तुलनेत केवळ ७.४ टक्के इतकीच आहे.एस. टी.मध्ये पाच सीटस् महिलांसाठी आरक्षित ठेवणाऱ्या एस. टी.च्या महामंडळात मात्र महिलांना नगण्यच स्थान असल्याचे दिसून येते. कारण केवळ ७.४ टक्केच महिलांना एस. टी. महामंडळाने सामावून घेतले आहे. सहाय्यक कार्यशाळा अधीक्षकापासून सफाई कामगारापर्यंत विविध पदांवर महिला कार्यरत आहेत. सहाय्यक कार्यशाळा अधीक्षकपदी एक, सहाय्यक वाहतूक अधीक्षक ४, सहाय्यक वाहतूक निरीक्षक ३, वरिष्ठ कार्यादेशक १, वहातूक निरीक्षक १, भांडारपाल १, लेखाकार १, वरिष्ठ लिपीक/रोखपाल १०, लिपिक ७४, शिपाई ७, वाहतूक नियंत्रक १४, वाहक १४९, कारागीर ‘क’ २, सहाय्यक २१, स्वच्छक १२, सफाई कामगार ५ मिळून एकूण ३१२ महिला कर्मचारी विविध पदांवर कार्यरत आहेत.महिलांना ३३ टक्के आरक्षण शासनाने दिल्याने विविध क्षेत्रात आज महिला कार्यरत आहेत. वर्ग १च्या अधिकारीपदापासून अगदी सफाई कामगार या पदावर महिला काम करतात. प्रामाणिकपणा, वक्तशीरपणा, सचोटी या गुणांमुळे घर सांभाळून नोकरीतील जबाबदारी त्या यशस्वीरित्या पार पाडत आहेत. महिलांना ५० टक्के जागा देण्याची मागणी आहे. जर महिलांना ५० टक्के जागा दिल्या तर प्रत्येक क्षेत्रात असलेल्या महिला कर्मचाऱ्यांच्या संख्येत निश्चित वाढ होईल.तारेवरची कसरत : जादा सेवेमुळे मानसिक त्राससहाय्यक कार्यशाळा अधीक्षक ते सफाई कर्मचाऱ्यांपर्यत केवळ वाहक वगळता अन्य कर्मचाऱ्यांना कार्यालयीन वेळेत कामकाज करावे लागते. महिला वाहकांना रात्रवस्तीसाठी पाठवले जात नाही. त्यांना दिवसाची ड्युटी देण्यात येते. परंतु, पहाटे चार वाजलेपासून या महिलांना ड्युटीवर हजर व्हावे लागते. कौटूंबिक जबाबदाऱ्या पार पाडत पहाटे घर सोडावे लागते. अनेकवेळा सलग आठ तास ड्युटी करावी लागते.चालकांच्या तुलनेत वाहकांची संख्या कमी असल्याने ओव्हरटाईम देखील करावा लागतो. अशावेळी अधिकची ड्युटी करून घरी पोहोचेपर्यत रात्र देखील होते. एकूणच तारेवरची कसरत करत या महिला कौटुंबिक व कार्यालयीन जबाबदारी सांभाळत आहेत.चालकपदी पुरुषचराज्य परिहवन महामंडळामध्ये चालक पदावर काम करण्यासाठी अवजड वाहन चालविण्याचा परवाना आवश्यक आहे. मात्र, अवजड परवाना काढणाऱ्या महिलावर्गाची संख्या हातावर मोजण्याइतकीच आहे. अन्य राज्यात ही संख्या जास्त असली तरी महाराष्ट्रात ही संख्या अल्प आहे. त्यामुळे अद्याप तरी एस. टी.मध्ये चालक पदावर पुरूषवर्गाचीच मक्तेदारी राहिली आहे.रत्नागिरी विभागात एकूण ४ हजार ५०० कर्मचारी विविध पदांवर कार्यरत.विविध पदांवर केवळ ३१७ महिला.सहाय्यक कार्यशाळा अधीक्षकापासून सफाई कामगारापर्यंत विविध पदांवर महिला कार्यरत.