शहरं
Join us  
Trending Stories
1
Israel-Iran War: भारतासाठी कायपण ! परतीसाठी इराणने आपले हवाई क्षेत्र उघडले, आणखी दोन विमाने नवी दिल्लीत पोहोचणार
2
भीषण अपघात! नवी मुंबईत मुलीने मर्सिडीजने दुचाकीला उडवले; महिलेचा जागेवर मृत्यू, एकजण गंभीर जखमी
3
इराणमधील अणुकेंद्रांबाबत ट्रम्प यांचं मोठं विधान, म्हणाले, इस्राइल इराणमधील अणुकेंद्रं... 
4
Devendra Fadnavis: "बोल बच्चन भैरवी असणाऱ्यांना मी उत्तरे देत नाही" फडणवीसांची उद्धव ठाकरेंवर टीका
5
मराठमोळ्या अभिनेत्याने केली आत्महत्या, काम मिळत नसल्याने उचललं टोकाचं पाऊल
6
Amit Shah: इतक्या वर्षांत महाराष्ट्रासाठी, मुंबईसाठी तुम्ही काय केले? अमित शाहांची काँग्रेसवर टीका
7
बिझनेसमन संजय कपूर यांना मैदानावरच देण्यात आलेला CPR, शेवटचा Video समोर
8
आता विका जिकडे विकायचंय.., पाकिस्तान 'याचा' जगातील सर्वात मोठा उत्पादक, भारतानं नाकारलं आता अन्य देशांचे दरवाजे ठोठावतोय
9
अहमदाबादमधील विमान अपघातात प्रसिद्ध चित्रपट निर्मात्याचा मृत्यू, DNA चाचणीमधून झालं उघड  
10
आजचे राशीभविष्य - २१ जून २०२५, या राशीच्या व्यक्तींना आज सामाजिक, आर्थिक तसेच कौटुंबिक क्षेत्रात लाभ होतील
11
FD पेक्षा अधिक रिटर्न, रिस्कही कमी! 'याला' म्युच्युअल फंडाचं सेफ झोन म्हणतात, तुमच्यासाठी योग्य आहे का?
12
Iran Israel War : इराण मागे हटेना! अमेरिकेसोबत बोलण्यास नकार, इस्त्रायलने अनेक इराणी लष्करी तळ उद्ध्वस्त केले
13
अक्षय कोठारीला मिळालं बालपणीचं प्रेम, 'लक्ष्मीच्या पावलांनी' फेम अभिनेता अडकला विवाहबंधनात
14
Air India च्या भाड्यात १५% पर्यंतची घसरण; अहमदाबाद विमान अपघातानंतर बुकिंग मोठ्या प्रमाणात घटलं
15
Air India Plane Crash: ‘त्या’ विमानात कोणताही बिघाड नव्हता, एअर इंडियाचे सीईओ कॅम्पबेल विल्सन यांची ग्वाही
16
Nana Patole: निवडणुकीच्या 'या' नियमात मोठा बदल; पटोलेंचा केंद्र अन् निवडणूक आयोगाला थेट सवाल!
17
Navi Mumbai: मुलीवरून चिडवल्याने मित्राचा कापला गळा, नवी मुबईतील घटनेने खळबळ!
18
लोकलमध्ये दोन महिलांत डोकं फुटेपर्यंत हाणामारी; नेमकं कशामुळं पेटलं भांडण? खरं कारण आलं समोर
19
Nagpur: राजधानी एक्सप्रेसवर दगडफेक, प्रवाशांमध्ये दहशत 
20
Elections: आगामी निवडणुका एकत्र की स्वतंत्र? महाआघाडीमध्ये अद्यापही सूर जुळेना!

गणेशोत्सवासाठी रत्नागिरी विभाग सज्ज

By admin | Updated: August 15, 2016 00:29 IST

राज्य मार्ग परिवहन महामंडळ : मोबाईल अ‍ॅपव्दारे आरक्षण

रत्नागिरी : राज्य मार्ग परिवहन महामंडळाचा रत्नागिरी विभाग गणेशोत्सवासाठी सज्ज झाला आहे. मुंबईहून कोकणात २२११ जादा गाड्यांचे नियोजन करण्यात आले आहे, तर रत्नागिरीहून मुंबईकडे परतीसाठी २०१७ गाड्या सोडण्यात येणार आहेत. आॅनलाईन आरक्षणला विशेष पसंती दिली जात आहे. मुंबईतून ७०० गाड्यांचे आरक्षण झाले आहे. याशिवाय महामंडळाने मोबाईल अ‍ॅपव्दारे आरक्षण प्रक्रिया सुरू केल्याने प्रवाशांचा त्याकडे वाढता कल आहे. महामार्गावर प्रशिक्षण बस तसेच खास पथकाव्दारे ‘स्पेशल पेट्रोलिंग’ करण्यात येणार आहे. गणेशोत्सव कालावधीत राज्यातील अन्य जिल्ह्यातून चालक गाड्या घेऊन येत असतात, त्यांना मार्ग दाखवण्यासाठी मार्गदर्शन करण्यात येणार आहे. उत्सव कालावधीत सर्व बसस्थानकांवर प्रवाशांची गर्दी मोठ्या प्रमाणावर उसळते. त्यामुळे पिण्याचे पाणी, प्रसाधनगृह स्वच्छता तसेच उपाहारगृहातून वाढीव खाद्यपदार्थ उपलब्ध करून देण्याच्या सूचना करण्यात आल्या आहे. प्रत्येक आगारात पालक अधिकाऱ्यांची नियुक्ती करण्यात आली आहे. जेणेकरून वाहतूक नियोजनास त्याची मदत होणार आहे. एखाद्या गावातील प्रवाशांनी ४४ सीटचे एकत्रित आरक्षण केल्यास त्यांना गावासाठी खास बस उपलब्ध करून देण्यात येणार आहे. दि. १ तारखेपासून कोकणात गाड्या येणार आहेत. याशिवाय नियमितच्या ८० गाड्या रत्नागिरी विभागातून धावणार आहेत. मुंबई सेंट्रल, पुणे, बोरिवली, ठाणे, भांडुप, कुर्ला नेहरूनगर, विठ्ठलवाडी, नालासोपारा, परळ, कल्याण आदी मार्गावर जादा गाड्या सोडण्यात येणार आहेत. आॅनलाईन आरक्षणामुळे मुंबईतून ७०० गाड्यांचे आरक्षण करण्यात आले आहे. गौरी गणपती विसर्जनानंतर मुंबईकरांच्या परतीसाठी १०पासून गाड्यांचे नियोजन करण्यात आले आहे. (प्रतिनिधी)