शहरं
Join us  
Trending Stories
1
युतीचा श्रीगणेशा! उद्धव ठाकरे सहकुटुंब राज ठाकरेंच्या 'शिवतीर्थ'वर दाखल; गणपतीचं घेतले दर्शन
2
भारतावर 50% टॅरिफ लावून ट्रम्प यांनी स्वतःच्याच पायावर कुऱ्हाड मारली, आता लागणार अमेरिकेची 'लंका'! आला असा अहवाल
3
मुंबईच्या दिशेने मराठा मोर्चा: "शांततेचं आंदोलन कुणीच रोखू शकत नाही," मनोज जरांगेंचा निर्धार
4
"लोक ओरडत होते, मी दगड पडताना पाहिले, मला..."; वैष्णोदेवी मार्गावर नेमकं काय घडलं?
5
३६ दिवस डिजिटल अरेस्ट; सायबर ठगांनी निवृत्त एअरफोर्स अधिकाऱ्याकडून ३.२२ कोटी लुटले...
6
बिहारमध्ये मंत्री श्रवण कुमार यांच्यावर जीवघेणा हल्ला; अनेक किलोमीटर पाठलाग, बॉडीगार्ड जखमी
7
भारतासमोर 'ट्रम्प'नीती अयशस्वी; मोदी फोन न उचलण्याचं कारण काय, अमेरिकन एक्सपर्ट सांगतात..
8
वैष्णोदेवी भूस्खलनात आतापर्यंत ३० मृत्युची नोंद; बचावकार्य सुरू, मृतांची संख्या वाढण्याची शक्यता
9
Ganesh Chaturthi 2025: फक्त गणेश चतुर्थीला बाप्पाला दुर्वा नाही तर तुळस वाहतात; असे का? ते जाणून घ्या
10
मनोज जरांगेंच्या ताफ्याला जालना पोलिसांचा 40 अटींसह हिरवा कंदील, ड्रोनद्वारे राहणार नजर
11
ट्रम्प टॅरिफचा भारताच्या कोण-कोणत्या क्षेत्रांवर परिणाम होणार? 'या' क्षेत्रांना कमी तर 'या' सेक्टरला बसू शकतो सर्वाधिक फटका!
12
अंतरवाली सराटीतून आज मराठा बांधव मुंबईकडे, गावा-गावात स्वागताची जय्यत तयारी
13
KCL 2025: पदार्पणाच्या सामन्यात हॅटट्रिक, भारताच्या युवा गोलंदाजाचा केसीएलमध्ये धुमाकूळ!
14
"एवढे शुल्क लाऊ की तुमचं...!"; पंतप्रधान मोदींसोबतच्या फोन कॉलसंदर्भात ट्रम्प यांचा मोठा दावा!
15
Vasai: वसईत चार मजली इमारतीचा भाग कोसळला; दोघांचा मृत्यू, ९ जण जखमी!
16
गणेश चतुर्थी २०२५: गणपतीच्या नावापुढे 'बाप्पा' आणि 'मोरया' हे शब्द का आणि कसे जोडले गेले? वाचा!
17
Amravati: पॉर्न व्हिडिओ पाहण्यापासून रोखल्याने मुलांचा वडिलांवर हल्ला, अमरावतीतील घटना!
18
भारताचे ‘सुदर्शन चक्र’ होणार ढाल अन् तलवारही, भारताचे आत्मनिर्भर होण्याच्या दृष्टीने आणखी एक पाऊल
19
खासगी शिकवणीकडे वाढला विद्यार्थ्यांचा ओढा, शालेय शिक्षणावर केंद्र सरकारने केलेल्या सर्वेक्षणातील निष्कर्ष
20
एका पक्षकाराला सकाळी, दुसऱ्याला दुपारी बोलावले अन् प्रकरण निकाली! राज्य माहिती आयोगाचा असाही कारभार

ग्रामसडक योजनेत रत्नागिरीचा अपेक्षाभंग

By admin | Updated: November 7, 2014 23:31 IST

पहिल्या टप्प्यात २७००पैकी केवळ ८८ किलोमीटर्सचे रस्ते झाले. तत्कालिन केंद्रीय नेत्यांच्या दुर्लक्षामुळे हे घडले

रत्नागिरी : पंतप्रधान ग्रामसडक योजनेच्या पहिल्या टप्प्यात रत्नागिरी व सिंधुदुर्ग जिल्ह्यात झालेल्या कामांचा आढावा घेतल्यानंतर अपेक्षाभंग झाल्याचे समोर आले आहे. रत्नागिरी जिल्ह्यात या योजनेतून पहिल्या टप्प्यात २७००पैकी केवळ ८८ किलोमीटर्सचे रस्ते झाले. तत्कालिन केंद्रीय नेत्यांच्या दुर्लक्षामुळे हे घडले असून, आता केंद्रातील आमचे एनडीएचे सरकार या दोन्ही जिल्ह्यांवर झालेला अन्याय या योजनेच्या दुसऱ्या टप्प्यात दूर करेल, अशी ग्वाही खासदार विनायक राऊत यांनी दिली.महामार्ग चौपदरीकरणासाठीच्या प्रारंभिक कामांचा आढावा घेण्यासाठी आज जिल्हाधिकारी कार्यालयात लोकप्रतिनिधी व संबंधित विभागाचे अधिकारी यांची आढावा बैठक आयोजित करण्यात आली होती. त्यानंतर राऊत पत्रकारांशी बोलत होते. राज्यात भाजपा सरकार स्थापन झाले. मात्र, सेनेला सहभाग मिळालेला नाही, याबाबत विचारता ते म्हणाले, भाजपबरोबर चर्चा सुरू आहे. केंद्रात दोघांना मंत्रिपदाची आॅफर दिली आहे. त्याबाबत विचारता याबाबतचा निर्णय पक्षप्रमुख उध्दव ठाकरे हेच घेतील, असे ते म्हणाले. रत्नागिरी, सिंधुदुर्ग जिल्ह्यातील उत्खननावर असलेली बंदी उठविण्यात यश आले होते. मात्र, त्याला उच्च न्यायालयात स्थगिती मिळाली. केंद्रीय पातळीवर याप्रश्नी पाठपुरावा करीत असल्याचे सांगितले. (प्रतिनिधी)