शहरं
Join us  
Trending Stories
1
मराठीशी तडजोड चालणार नाही! राजकीय लेबलं लावू नका, याकडे संकट म्हणून पाहा; राज ठाकरेंनी ठणकावलं
2
जय मराठी! ५ जुलैला विजयी मेळावा होईल, पण तो कोणत्याही पक्षाचा नसेल; राज ठाकरेंनी स्पष्टच सांगितलं
3
भारतात राहण्यासाठी काहीही! ५ बांगलादेशी पुरुषांनी निवडला 'विचित्र' मार्ग, कसे सापडले पोलिसांच्या तावडीत?
4
घसरणीनंतर पुन्हा वाढले सोन्याचे दर... खरेदीची संधी गेली का? २४ कॅरेटचा आजचा भाव काय?
5
हिंदी सक्ती : "समिती कोणतीही असू दे, आता सक्ती विषय..."; उद्धव ठाकरेंचा महायुती सरकारला इशारा 
6
ऐकावे ते नवलंच! एकटा दरोडेखोरांशी भिडला; कंबरेत गोळी घुसली, २ km पर्यंत कळालेही नाही...
7
रस्ते, मेट्रो, सिंचन, कुंभमेळा...सरकारने सादर केल्या 57 हजार 509 कोटींच्या पुरवणी मागण्या
8
'ChatGPT' ला हे प्रश्न विचारू नका, नाहीतर तुम्ही मोठ्या अडचणीत सापडू शकता
9
प्रेमात मिळाला धोका तेव्हा खासगी आयुष्यातील 'तो' व्हिडिओ केला लीक; क्रिकेटर अडकला होता वादात
10
अदानी ग्रीन एनर्जीचा ऐतिहासिक विक्रम! अक्षय ऊर्जा क्षेत्रात असं काम करणारी पहिलीच भारतीय कंपनी
11
सौरभ गोखले आणि अनुजा साठेला नकोय मूल, अभिनेत्री म्हणाली- "आम्हाला प्राणी जास्त आवडतात..."
12
मर्यादेपेक्षाही अधिक महाग होणार चांदी; रॉबर्ड कियोसाकी यांच्या दाव्यात किती तथ्य?
13
"मराठी बोला तुम्ही मराठी बोला...", मुंबईच्या लोकलमध्ये तरुणाईचा गजर, व्हिडिओ होतोय तुफान व्हायरल!
14
श्वेता तिवारीला एक्स पतीने कारमध्ये एका व्यक्तीसोबत पकडलं होतं रंगेहाथ, राजा चौधरीचा खुलासा
15
"ठाकरे बंधूंच्या ताकदीपुढे सरकारनं माघार घेतली; ही विजयाची पहिली पायरी, यापुढे..."
16
येत्या ७ जुलैला सार्वजनिक सुट्टी मिळणार? सोमवारी जाहीर झाली तर काय काय बंद असणार...
17
शुबमन गिलचा एक मेसेज अन् तो सासरवाडीतून थेट टीम इंडियाच्या ताफ्यात (VIDEO)
18
तेलंगणात रसायनांनी भरलेल्या टँकरचा स्फोट, किमान १० कामगारांचा मृत्यू, अनेक गंभीर जखमी
19
Wimbledon 2025 : नोव्हाक जोकोविच विक्रमी २५ वे ग्रँडस्लॅम जिंकण्याचा डाव साधणार का?
20
दरोडा, खून...महाराष्ट्रासह चार राज्यांमध्ये १६ गंभीर गुन्हे; कुख्यात गुंडाचा उत्तर प्रदेशात एन्काउंटर

ग्रामसडक योजनेत रत्नागिरीचा अपेक्षाभंग

By admin | Updated: November 7, 2014 23:31 IST

पहिल्या टप्प्यात २७००पैकी केवळ ८८ किलोमीटर्सचे रस्ते झाले. तत्कालिन केंद्रीय नेत्यांच्या दुर्लक्षामुळे हे घडले

रत्नागिरी : पंतप्रधान ग्रामसडक योजनेच्या पहिल्या टप्प्यात रत्नागिरी व सिंधुदुर्ग जिल्ह्यात झालेल्या कामांचा आढावा घेतल्यानंतर अपेक्षाभंग झाल्याचे समोर आले आहे. रत्नागिरी जिल्ह्यात या योजनेतून पहिल्या टप्प्यात २७००पैकी केवळ ८८ किलोमीटर्सचे रस्ते झाले. तत्कालिन केंद्रीय नेत्यांच्या दुर्लक्षामुळे हे घडले असून, आता केंद्रातील आमचे एनडीएचे सरकार या दोन्ही जिल्ह्यांवर झालेला अन्याय या योजनेच्या दुसऱ्या टप्प्यात दूर करेल, अशी ग्वाही खासदार विनायक राऊत यांनी दिली.महामार्ग चौपदरीकरणासाठीच्या प्रारंभिक कामांचा आढावा घेण्यासाठी आज जिल्हाधिकारी कार्यालयात लोकप्रतिनिधी व संबंधित विभागाचे अधिकारी यांची आढावा बैठक आयोजित करण्यात आली होती. त्यानंतर राऊत पत्रकारांशी बोलत होते. राज्यात भाजपा सरकार स्थापन झाले. मात्र, सेनेला सहभाग मिळालेला नाही, याबाबत विचारता ते म्हणाले, भाजपबरोबर चर्चा सुरू आहे. केंद्रात दोघांना मंत्रिपदाची आॅफर दिली आहे. त्याबाबत विचारता याबाबतचा निर्णय पक्षप्रमुख उध्दव ठाकरे हेच घेतील, असे ते म्हणाले. रत्नागिरी, सिंधुदुर्ग जिल्ह्यातील उत्खननावर असलेली बंदी उठविण्यात यश आले होते. मात्र, त्याला उच्च न्यायालयात स्थगिती मिळाली. केंद्रीय पातळीवर याप्रश्नी पाठपुरावा करीत असल्याचे सांगितले. (प्रतिनिधी)