शहरं
Join us  
Trending Stories
1
'मला आवडतो पाकिस्तान, पण मोदी महान'; मुनीर भेटीदरम्यान काय म्हणाले डोनाल्ड ट्रम्प?
2
Maruti Chitampalli Death: 'अरण्यऋषी' मारुती चितमपल्ली यांचे निधन; वयाच्या ९३व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
3
कोण होते मारुती चितमपल्ली? जाणून घ्या त्यांचा जीवनप्रवास व दिनचर्या
4
मराठी साहित्य संपदा समृद्ध करणारा अरण्यऋषी, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची ज्येष्ठ साहित्यिक मारूती चितमपल्ली यांना श्रद्धांजली
5
Pune Crime News: लिपस्टिकने चिठ्ठी लिहिली अन् विवाहितेने चिमूरड्यासह पाचव्या मजल्यावरून स्वतःला झोकून दिलं
6
Viral Video : कशासाठी तो हट्ट? चिमुकल्याला सिंहाच्या पाठीवर बसवत होता बाबा, पुढे जे झालं ते बघाच... 
7
अमेरिका शेवटी विश्वासघातकीच! सोबत लढता लढता मध्येच या सैन्याला त्यांच्या नशिबावर सोडले 
8
एअर इंडियाच्या जिवात जीव आला! बोईंग-787 विमानांत मोठी समस्या सापडली नाही; डीजीसीएकडून घोषणा
9
Jejuri Accident : जेजुरी मोरगाव रोडवर भीषण अपघात;आठ ठार, पाच गंभीर जखमी
10
"सोनमनं दिली होती लग्न न करण्याची धमकी?", पोलिसांनी कुटुंबीयांना विचारले हे 10 प्रश्न!
11
F-35 Shot Down: इस्रायलचं पाचवं F-35 पाडलं, इराणच्या दाव्यानं अमेरिकेचं टेन्शन वाढलं! 
12
इस्राइलचा निशाणा 'सुप्रीम लीडर'वरच! खामेनेईंचा बंकर असलेल्या भागात केला बॉम्बचा मारा
13
फास्टॅग पास एक्स्प्रेस हायवे, समृद्धी, अटल सेतूवरही लागू होणार? जाणून घ्या, नेमका कुठे फायदा होणार
14
“भाजपा केवळ देशातील नव्हेच तर जगातील मोठा पक्ष, पण...”; जयंत पाटील नेमके काय म्हणाले?
15
Sonam Raghuvanshi : "आम्ही कोणतंही पाप केलेलं नाही..."; नार्को टेस्टच्या मागणीवर सोनम रघुवंशीचा भाऊ संतापला
16
“काँग्रेस दिशाहीन पक्ष”; CM फडणवीसांच्या उपस्थितीत जयश्रीताई पाटील यांचा भाजपा प्रवेश
17
एअर इंडियाच्या अपघातात विमा धारकाचाही मृत्यू अन् नॉमिनीचाही; विमा कंपन्या पेचात सापडल्या, इरडाचे तर स्पष्ट आदेश आहेत...
18
हजारो जीव वाचणार! आपत्कालीन परिस्थितीत विमानातील प्रवाशांचे केबिन वेगळे होणार, युक्रेनियन अभियंत्याने केले डिझाइन
19
"राजा भाई तुम तो गए...!" ...अन् अँकर गमतीत बोलला, ते खरं ठरलं; बघा संपूर्ण VIDEO 
20
जेव्हा James Bond चित्रपट सत्यात उतरतो; पहिल्यांदाच MI6 चे नेतृत्व एका महिलेकडे...

रत्नागिरी विमानतळ विस्तारीकरणाचा प्रारंभ २६ रोजी?

By admin | Updated: October 16, 2015 00:01 IST

जिल्ह्यात येऊ घातलेल्या उद्योगांसाठी विमानसेवा महत्त्वाची आहेच.

रत्नागिरी : तटरक्षक दलाच्या ताब्यात असलेल्या रत्नागिरी विमानतळाच्या विस्तारीकरण कामाचा प्रारंभ आॅक्टोबरच्या अखेरच्या आठवड्यात होणार असल्याचे संकेत आहेत. या कामाची सुरुवात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते होणार असून, त्यासाठी २६ आॅक्टोबर २०१५ हा दिवस निश्चित झाला असल्याचे सांगितले जात आहे. मात्र, अधिकृत दौरा जाहीर झाला नसल्याने याबाबत प्रशासन स्तरावरून गुप्तता पाळली जात आहे. या कार्यक्रमाबाबतची तयारी रत्नागिरीत सुरू झाली आहे. तटरक्षक दलाच्या विमानांसाठी हे विस्तारीकरण असले, तरी या विमानतळावरून प्रवासी विमानसेवा सुरू करण्याबाबत शासन गांभीर्याने विचार करीत आहे. मुंबई व गोवा या दोन महत्त्वाच्या शहरांदरम्यान रत्नागिरी हे महत्त्वाचे ठिकाण आहे. रत्नागिरीचा विस्तार होत असून, येथील औद्योगिक विकासाच्या पार्श्वभूमीवर हा विमानतळ विस्तारित करून येथून प्रवासी विमान वाहतूक सेवा सुरू करण्याचा शासनाचा मानस आहे. रत्नागिरीच्या या विमानतळावरून काही वर्षांपूर्वी छोट्या (पान १ वरून)प्रवासी विमानांची सेवा सुरू करण्यात आली होती. मात्र, त्यावेळी पुरेसा प्रतिसाद मिळाला नव्हता. आता स्थिती बदलली असून पुणे, मुंबई व गोवा येथे तत्काळ जाण्यासाठी उद्योजक व व्यावसायिक यांना रत्नागिरी विमानतळावरून प्रवासी विमान वाहतूक सुरू होणे महत्त्वाचे वाटते आहे. जिल्ह्यात येऊ घातलेल्या उद्योगांसाठी विमानसेवा महत्त्वाची आहेच. शिवाय विमानसेवा नसल्याने उद्योजक याठिकाणी येण्यास नाराज आहेत. याचा विचार करूनच शासनाने या विमानतळाचा विस्तार करण्याचा निर्णय घेतला आहे. (प्रतिनिधी) गडकरींचे सुतोवाच खरे ठरणार!काही महिन्यांपूर्वी रत्नागिरीत एका कार्यक्रमासाठी आलेले केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी रत्नागिरीत विमानसेवा सुरू करण्याबाबत सरकार गंभीर असल्याचे सूतोवाच केले होते. त्यामुळे गडकरी यांचे ते वक्तव्य विमानतळाच्या विस्तारीकरणाच्या निमित्ताने खरे ठरणार आहे. रनवे १८०० मीटर्सनी वाढणार... गोवा व मुंबई दरम्यान सागरी क्षेत्रात महत्त्वाची भूमिका बजावणाऱ्या रत्नागिरी तटरक्षक दलासाठी या विमानतळाचे विस्तारीकरण महत्त्वाचे मानले जात आहे. तटरक्षक दलाच्या विमानांची ये-जा अधिक सुलभ होणार आहे. राज्यात व देशातील अन्य काही ठिकाणचे विमानतळ तटरक्षक दलाकडे सोपविण्यात आली आहेत. मात्र, तेथून प्रवासी विमान वाहतूकही सुरू आहे. त्याच धर्तीवर रत्नागिरी विमानतळावरून प्रवासी विमानसेवा सुरू होईल, असा शासनाचा प्रयत्न राहणार आहे.