शहरं
Join us  
Trending Stories
1
'विरोधकांनी स्वतःच्या पायावर धोंडा मारुन घेतला', ऑपरेशन सिंदूरवरुन PM मोदींची बोचरी टीका
2
"लाल किल्ल्यावर भगवा फडकवा पण तिरंगा मानलाच पाहिजे"; संभाजी भिडेंच्या विधानाची चर्चा
3
TCS ऑफिसबाहेर फुटपाथवरच झोपला कर्मचारी, थकीत सॅलरीवरून वाद; टाटा कंपनीनं मौन सोडलं
4
राज ठाकरे म्हणाले, आपलीच सत्ता येणार; पण कशी? उद्धवसेनेशी युती करून की स्वबळावर?
5
शिंदेसेनेत प्रवेश करणाऱ्या नेत्याचा प्रताप; पक्षप्रवेशात ४०-५० नावे बोगस निघाली, प्रकरण काय?
6
धाराशिव हादरले! जुन्या वादातून महाकाली कलाकेंद्र परिसरात गोळीबार, एक जखमी
7
पत्नीशी झाला वाद, पित्याने दोन चिमुकल्यांवर काढला राग! मुलांना वाहत्या नदीत फेकलं अन्...
8
'मस्त राहा, सगळं मस्तच होईल' प्रेमानंद महाराजांनी सांगितले आनंदी जीवनाचे ६ मार्ग!
9
चक्क २० वर्षीय युवकानं बनवला स्वत:चा देश, ४०० जणांना दिलं नागरिकत्व; युरोपियन देश अवाक् झाले
10
Aditya Infotech IPO Listing: ५१% प्रीमिअमवर लिस्ट झाला 'हा' IPO; गुंतवणुकदारांवर पैशांचा पाऊस, एन्ट्री घेताच खरेदीसाठी उड्या
11
बापरे! हे तर भलतेच...! इलेक्ट्रीक कार जास्त प्रदूषण करतात; पेट्रोल, डिझेलशी तुलना कराल तर...थक्क व्हाल
12
स्वप्न साकार! वडील भाजी विकायचे, आईने गहाण ठेवले दागिने; लेकीने केलं कष्टाचं सोनं
13
प्रत्येक भारतीयाच्या डोक्यावर १.३२ लाखांचे कर्ज; ...तर कराचा बोजा अधिक वाढेल
14
"कोणी तुम्हाला इच्छेविरोधात हात...", तसल्या सीनबद्दलच्या दृष्टिकोनावर काय म्हणाली मराठी अभिनेत्री?
15
मध्यमवर्गीयांची धाव SIP पर्यंत; पण, देशातील सर्वात श्रीमंत १% लोक करतात 'या' २ गोष्टीत सर्वाधिक गुंतवणूक
16
"लॉकेट आणलंय, डोळे बंद कर"; पत्नीने सरप्राइजसाठी डोळे बंद करताच पती झाला राक्षस, केले २० वार!
17
"भाऊ, मी यावेळी राखी बांधू शकणार नाही"; पती आणि सासरच्यांना कंटाळून महिलेने संपवलं जीवन
18
चातुर्मासातील पहिला बुध प्रदोष: कसे करावे व्रत? ‘या’ मंत्रांचा जप करा, महादेव शुभच करतील!
19
इथेनॉल मिश्रित पेट्रोल वाहनांचे इंजिन, मायलेजवर परिणाम करते? लोकांमध्ये दावे सुरु होताच मंत्रालयाने केला खुलासा...
20
गुंतवणूकदारांसाठी 'सुवर्ण संधी'! 'हे' ५ स्टॉक खरेदी करण्याचा ब्रोकरेज फर्मचा सल्ला, काय आहे टार्गेट प्राइस?

रत्नागिरी विमानतळ विस्तारीकरणाचा प्रारंभ २६ रोजी?

By admin | Updated: October 16, 2015 00:01 IST

जिल्ह्यात येऊ घातलेल्या उद्योगांसाठी विमानसेवा महत्त्वाची आहेच.

रत्नागिरी : तटरक्षक दलाच्या ताब्यात असलेल्या रत्नागिरी विमानतळाच्या विस्तारीकरण कामाचा प्रारंभ आॅक्टोबरच्या अखेरच्या आठवड्यात होणार असल्याचे संकेत आहेत. या कामाची सुरुवात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते होणार असून, त्यासाठी २६ आॅक्टोबर २०१५ हा दिवस निश्चित झाला असल्याचे सांगितले जात आहे. मात्र, अधिकृत दौरा जाहीर झाला नसल्याने याबाबत प्रशासन स्तरावरून गुप्तता पाळली जात आहे. या कार्यक्रमाबाबतची तयारी रत्नागिरीत सुरू झाली आहे. तटरक्षक दलाच्या विमानांसाठी हे विस्तारीकरण असले, तरी या विमानतळावरून प्रवासी विमानसेवा सुरू करण्याबाबत शासन गांभीर्याने विचार करीत आहे. मुंबई व गोवा या दोन महत्त्वाच्या शहरांदरम्यान रत्नागिरी हे महत्त्वाचे ठिकाण आहे. रत्नागिरीचा विस्तार होत असून, येथील औद्योगिक विकासाच्या पार्श्वभूमीवर हा विमानतळ विस्तारित करून येथून प्रवासी विमान वाहतूक सेवा सुरू करण्याचा शासनाचा मानस आहे. रत्नागिरीच्या या विमानतळावरून काही वर्षांपूर्वी छोट्या (पान १ वरून)प्रवासी विमानांची सेवा सुरू करण्यात आली होती. मात्र, त्यावेळी पुरेसा प्रतिसाद मिळाला नव्हता. आता स्थिती बदलली असून पुणे, मुंबई व गोवा येथे तत्काळ जाण्यासाठी उद्योजक व व्यावसायिक यांना रत्नागिरी विमानतळावरून प्रवासी विमान वाहतूक सुरू होणे महत्त्वाचे वाटते आहे. जिल्ह्यात येऊ घातलेल्या उद्योगांसाठी विमानसेवा महत्त्वाची आहेच. शिवाय विमानसेवा नसल्याने उद्योजक याठिकाणी येण्यास नाराज आहेत. याचा विचार करूनच शासनाने या विमानतळाचा विस्तार करण्याचा निर्णय घेतला आहे. (प्रतिनिधी) गडकरींचे सुतोवाच खरे ठरणार!काही महिन्यांपूर्वी रत्नागिरीत एका कार्यक्रमासाठी आलेले केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी रत्नागिरीत विमानसेवा सुरू करण्याबाबत सरकार गंभीर असल्याचे सूतोवाच केले होते. त्यामुळे गडकरी यांचे ते वक्तव्य विमानतळाच्या विस्तारीकरणाच्या निमित्ताने खरे ठरणार आहे. रनवे १८०० मीटर्सनी वाढणार... गोवा व मुंबई दरम्यान सागरी क्षेत्रात महत्त्वाची भूमिका बजावणाऱ्या रत्नागिरी तटरक्षक दलासाठी या विमानतळाचे विस्तारीकरण महत्त्वाचे मानले जात आहे. तटरक्षक दलाच्या विमानांची ये-जा अधिक सुलभ होणार आहे. राज्यात व देशातील अन्य काही ठिकाणचे विमानतळ तटरक्षक दलाकडे सोपविण्यात आली आहेत. मात्र, तेथून प्रवासी विमान वाहतूकही सुरू आहे. त्याच धर्तीवर रत्नागिरी विमानतळावरून प्रवासी विमानसेवा सुरू होईल, असा शासनाचा प्रयत्न राहणार आहे.