शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानवर काऊंटर अ‍ॅटॅक सुरू! रावळपिंडी सह तीन एअरबेसवर हल्ला, इस्लामाबाद, लाहोरमध्ये मोठे स्फोट
2
आकाशातून भारताचे हल्ले होत असतानाच पाकिस्तानात भूकंप; पाकिस्तानी जागच्याजागी हादरले...
3
भारत-पाकिस्तान युद्धाच्या तोंडावर आयएमएफ देणार १ अब्ज डॉलर; पाकिस्तानच्या बेलआऊट पॅकेजला मंजुरी
4
रात्र वैऱ्याची! दोन्ही देश रात्रीचेच हल्ले का करत आहेत? मागे कारण काय... अंधार पडला की...
5
Operation Sindoor Live Updates: पाकिस्तानच्या नूर खान बेसवर हल्ला; Video समोर आला...
6
Pakistan Drone Attack: बारामुल्लापासून भूजपर्यंत पाकिस्तानकडून २६ ठिकाणी ड्रोन हल्ल्याचा प्रयत्न, भारतीय सुरक्षा यंत्रणांनी उधळले मनसुबे 
7
पंतप्रधान नरेंद्र मोदींची सैन्य प्रमुखांसह अजित डोवाल यांच्यासोबत बैठक, परिस्थितीचा घेतला आढावा, पुढचा प्लॅन तयार?  
8
Video: 'नीच' पाकिस्तानचे भारतीय नागरिकांवर ड्रोन हल्ले; फिरोजपूरमध्ये संपूर्ण कुटुंब जखमी
9
India Pakistan Tension: जम्मू, सांबा, पठाणकोट विभागात दिसले पाकिस्तानी ड्रोन, जम्मू, उधमपूरमध्ये ब्लॅकआऊट 
10
गरज पडली तर युद्धात मदरशातील मुलांचा वापर करू, पाकिस्तानी संरक्षण मंत्र्यांचे हास्यास्पद विधान
11
हे आहेत तुर्कीचे ड्रोन, ज्यांना पाकिस्तानने विध्वंस घडवण्यासाठी पाठवले होते भारतात, अशी आहेत वैशिष्टे
12
भारत-पाकिस्तान यांच्यातील तणावामुळं दादर चौपाटी पर्यटकांसाठी बंद? मुंबई पोलिसांची महत्त्वाची पोस्ट
13
धोनी, तेंडुलकरही पाकिस्तानविरूद्ध युद्धभूमीत दिसणार? तणावादरम्यान भारत सरकारचा मोठा निर्णय
14
युद्धसदृश परिस्थिती, आयपीएलला स्थगिती, जय हिंद म्हणत विराट कोहलीने व्यक्त केल्या भावना
15
Mumbai: ६३ टक्क्यांहून अधिक मुंबईकर सहा तासांपेक्षा कमी झोपतात, कारण तर ऐका!
16
निशस्त्र ड्रोन पाठवण्यामागे पाकिस्तानचा होता मोठा कट, परराष्ट्र मंत्रालयाने दिली धक्कादायक माहिती
17
"भारतीय सैन्याचा जोश... High! पाकिस्तानला तोडीस तोड उत्तर मिळेल"; उरी भेटीनंतर LGचे विधान
18
India Pakistan Tensions: बिथरलेल्या पाकिस्तानकडून नागरी विमानांचा ढाल म्हणून वापर, परराष्ट्र मंत्रालयाची माहिती
19
"धार्मिक स्थळांवर हल्ले...दुटप्पीपणा...त्यांनी खालची पातळी गाठली"; परराष्ट्र सचिवांनी वाचला पाकिस्तानच्या कुकर्मांचा पाढा
20
तुर्कीत निर्मिती झालेल्या ३०० ते ४०० ड्रोनद्वारे पाकिस्तानचा भारतातील ३६ ठिकाणी हल्ला, कर्नल सोफिया कुरेशी यांनी दिली माहिती 

रेशन दुकानदारांचा बंद होणार

By admin | Updated: April 1, 2015 00:14 IST

प्रशासनाला निवेदन : शासन धोरणाचा निषेध

रत्नागिरी : रेशन दुकानदार व केरोसीन वितरकांच्या समस्यांकडे शासनाने गेल्या कित्येक वर्षांपासून दुर्लक्ष केले आहे. त्यामुळे आता शासनाला जाग यावी, यासाठी जिल्ह्यातील सर्व रेशन दुकानदार आणि केरोसीन वितरक एकवटले असून, येत्या १ मे पासून दुकाने बंद ठेवण्याचा निर्णय घेतला आहे. याबाबत जिल्हा प्रशासनाला संघटनेतर्फे निवेदन देण्यात आले.अन्न सुरक्षा विधेयकातील तरतुदीनुसार सुधारित धान्य वितरण प्रणालीमार्फत दुकानापर्यंत धान्य पोच मिळावे, तसेच गेली १० ते १२ वर्षे तात्पुरते परवाने देऊन विनातक्रार दुकाने चालवणाऱ्या दुकानदारांना कायम परवाने मिळावेत, या प्रमुख मागण्यांसह शासन निर्णयानुसार धान्य दुकानदारांना वाहतूक रिबेट मिळत आहे. २००५पासून डिझेल दर वाढीनुसार वाहतूक रिबेटचा खर्च मिळावा. साखरेचे कमिशन व वाहतूक रिबेट वाढवून मिळावा. गेली कित्येक वर्षे रेशन दुकाने व केरोसीन परवाने तात्पुरते आहेत ते कायमस्वरूपी करण्यात यावेत, शालेय पोषण आहार, रोजगार हमी योजना यांची देयके त्वरित देण्यात यावीत. एपीएल धान्य कोटा पूर्ववत देण्यात यावा. रॉकेल कोटा वाढवून मिळावा. एफ. सी. आय.कडून मिळणाऱ्या धान्याची व बारदानाची प्रमाणित प्रत मिळावी, आदी संघटनेच्या मागण्या आहेत. ग्राहकांच्या गैरसोयीचा विचार करून आत्तापर्यंत रास्तदर धान्य दुकानदार आणि केरोसीन वितरक यांनी सनदशीर मार्गाने लढा सुरू ठेवला आहे. २८ फेब्रुवारी चालक - मालक संघटनेने प्रत्येक तहसील कार्यालयासमोर आंदोलन केले. २ मार्च रोजी जिल्ह्यातील सर्व रास्तदर धान्य दुकानदारांनी जिल्हाधिकारी कार्यालयावर मूक मोर्चा काढला. मात्र, याबाबत शासनाने डोळझाकपणा केल्याने आता दुकानदारांनी १ मेपासून दुकाने बंद ठेवण्याचा निर्णय घेतला आहे.याबाबत संघटनेने जिल्हा पुरवठा अधिकारी नीता शिंदे-सावंत यांची भेट घेऊन त्यांच्याशी चर्चा केली. यावेळी त्यांना संघटनेतर्फे मागण्यांचे निवेदन देण्यात आले. यावेळी जिल्हाध्यक्ष अशोक कदम, जिल्हा सचिव नितीन कांबळे, उपाध्यक्ष शशिकांत दळवी, प्रशांत पाटील, विजय राऊत, योगेश शिंदे, संतोष गुरव, राजाभाऊ चाळके उपस्थित होते. (प्रतिनिधी)