शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणसोबत युद्धविराम करून ट्रम्प यांनी युद्धातून अंग काढले; आता इस्रायलला चुकवावी लागणार किंमत
2
इराणसोबत धोका? सीझफायरनंतर काही तासांतच लावन बेटावरील तेल रिफायनरीमध्ये भीषण स्फोट, जगाचे कान टवकारले...
3
इराण-अमेरिका युद्धबंदीने जग सुखावलं, पण 'हा' देश भडकला! पाकिस्तानच्या 'त्या' खेळीमुळे मित्रराष्ट्र नाराज
4
मोठी बातमी! इराण युद्धामुळे भारतीय अर्थव्यवस्थेसमोर निर्माण झाली ५ मोठी संकटे; आरबीआय गव्हर्नर संजय मल्होत्रांचा महागाईचा इशारा
5
‘तुमच्या बापात दम असेल तर आमच्याकडून वंदे मातरम् वदवून दाखवा’, काँग्रेस नगरसेविकेचं भाजपाला अव्हान, इंदूर महानगरपालिकेत गदारोळ
6
अवघ्या १५ वर्षांचा मुलगा जगाला नडतोय; मुंबई-राजस्थान सामन्यात भज्जीचा वैभव सूर्यवंशीला सॅल्यूट
7
सीजफायर लागू होताच पहिल्या देशाने आपली एअरस्पेस खुली केली, विमानतळही सुरु झाले...
8
Latest Marathi News Live: सुनेत्रा पवार मुख्यमंत्री फडणवीसांच्या भेटीला; बारामती निवडणुकीवर चर्चा
9
IndiGo, Air India ला संजीवनी; 'या' शुल्कात मोठी कपात, तिकिटांचे दर कमी होणार?
10
'धुरंधर'साठी गौरव गेराचं असं झालं ऑडिशन, 'त्या' सीननंतर मिळाली आलम भाईची भूमिका
11
Akshaya Tritiya 2026 Date: यंदा अक्षय तृतीया कधी आहे? १९ की २० एप्रिल? 'या' शुभ मुहूर्तावर करा सोने खरेदी; वाचा सविस्तर
12
Car Gift: बक्षीस असावं तर असं...! चेन्नईतील कंपनीने १२ मेहनती कर्मचाऱ्यांना दिली लग्झरी AUDI भेट
13
TATA च्या 'या' शेअरमध्ये तुफान तेजी; एका झटक्यात ११०० कोटींनी वाढली रेखा झुनझुनवालांची संपत्ती
14
पाकिस्तानच्या मध्यस्थीचे कोणी कोणी केले कौतुक? अमेरिका-इराण युद्धविरामाचे जगभरातून स्वागत! ट्रम्प यांच्या भाषेवर ऑस्ट्रेलियाची टीका
15
२१ लाख गुंतवणूकदारांसाठी खुशखबर! LIC पहिल्यांदाच देऊ शकते बोनस शेअर्स; 'या' दिवशी घोषणा होण्याची शक्यता
16
इराणच्या 'पीस प्लॅन'मध्ये मोठा घोळ! फारसी आणि इंग्रजी मसुद्यात आढळला फरक; युरेनियमच्या अटीवरून संभ्रम वाढला
17
इराणमधील युद्धविरामावर भारताची पहिली प्रतिक्रिया आली समोर, निर्णयाचं स्वागत करत व्यक्त केली अशी अपेक्षा 
18
'चमका हिंदुस्तान हमारा!'; अणुऊर्जा क्षेत्रात भारताचा 'करिश्मा'! रशियानंतर भारत दुसरा देश ठरला, ४०० वर्षांपर्यंत टेन्शन संपणार
19
'राधानगरी'त तीन अस्वले ट्रॅप कॅमेऱ्यात कैद; जैवविविधता अधोरेखितः परिसंस्थेतील महत्त्वाचा घटक
20
सस्पेन्स कायम! भारतीयांनो, इराण तात्काळ सोडा; युद्धविरामानंतर काही तासांत भारताने जारी केली सूचना
Daily Top 2Weekly Top 5

परतीच्या पावसामुळे भातपीक धोक्यात

By admin | Updated: October 6, 2015 00:17 IST

शेतकरी चिंतेत : जाता-जाता पावसाचा आणखी एक दणका

  रत्नागिरी : गेले चार-पाच दिवस परतीच्या पावसाने जिल्ह्यात धुमाकूळ घातला आहे. दुपारनंतर ढगांचा गडगडाट व विजांच्या कडकडाटासह पाऊस कोसळत असल्याने तयार भातपीक धोक्यात आले आहे. त्यामुळे यावर्षी कमी पावसामुळे आधीच भात उत्पादनावर परिणाम झाला असल्याने परतीच्या पावसामुळे भात पिकाचे नुकसान होत असल्याची माहिती डॉ. बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठअंतर्गत शिरगावच्या कृषी संशोधन केंद्राचे प्रभारी अधिकारी डॉ. बी. डी. वाघमोडे यांनी दिली. यावर्षी एकूणच पाऊस कमी झाला आहे. त्यामुळे पिण्याच्या पाण्याची भीषणता निर्माण होऊ नये, यासाठी पाऊस आवश्यक असला तरी तयार भातपिकास मारक ठरत आहे. जिल्ह्यात ४० टक्के हळवे, ४० निमगरवे, तर २० टक्के गरव्या जातीचे भात बियाणे लावण्यात आले आहे. हळवे भात तयार झाले असून, शेतकऱ्यांनी कापणीस प्रारंभ केला आहे. मात्र, एक तारखेपासून सलग लागत असलेल्या पावसामुळे तयार भातपिकाचे नुकसान होत आहे. शेतकऱ्यांनी कापून वाळत ठेवलेले भात शेतावरच भिजत असल्याने संबंधित भात वाळण्याऐवजी पुन्हा भिजत आहे. सलग पाच दिवस भिजल्याने भाताला अंकुर येण्याचा धोका वर्तवण्यात येत आहे. काही ठिकाणी वाऱ्यामुळे भातपीक जमीनदोस्त झाले आहे. एकूणच ‘शेतकऱ्यांच्या हातातील घास हिरावून घेण्याचा प्रकार’ असल्याने शेतकरी निराश झाले आहेत.निमगरवे भातपीकही तयार होण्याच्या मार्गावर आहे. लोंब टाकण्यात आली असून, दाणा तयार होण्याची प्रक्रिया सुरू झाली आहे. गरवे भात आता फुलोऱ्यात आहे. पावसामुळे फुलोरा झडण्याची भीती निर्माण झाली आहे. एकूणच तयार हळव्या भातपिकाबरोबर गरव्या, निमगरव्या भातासाठी पाऊस नुकसानकारक ठरणार आहे. गतवर्षी अवेळी पावसामुळे आंबा, काजूच्या पीक नुकसान झाले होते. भातलागवडीसाठी पुरेसा पाऊस झाला नाही. शेतकऱ्यांनी मिळेल त्या पाण्यावर लागवड केली होती. मात्र, पाऊस गायब असल्याने पिके पिवळट पडली होती. परंतु अधूनमधून लागणाऱ्या सरीमुळे भाताला जीवदान मिळाले. एकूणच दरवर्षीपेक्षा एकहजार मिलिमीटर कमी पावसाची नोंद झाली आहे. त्यामुळे उत्पादकता घटण्याचा धोका कृषी विभागाने व्यक्त केला होता. (प्रतिनिधी) भात कापणीयोग्य झाले असतानाच पावसाने पुन्हा एकदा मोठ्या प्रमाणावर बरसायला सुरुवात केली. त्यामुळे ‘आधी उल्हास त्यात फाल्गुन मास’प्रमाणे आधीच बिकट स्थिती असलेल्या भात पिकाची स्थिती वाईट झाल्याने शेतकरीवर्ग पुन्हा एकदा आर्थिक संकटात सापडला असल्याचे चित्र दिसत आहे.