शहरं
Join us  
Trending Stories
1
देशाला मजबूत पंतप्रधानांची गरज, नरेंद्र मोदी तर भाजपाचे प्रचारमंत्री; उद्धव ठाकरेंचा घणाघात
2
"मोठी किंमत चुकवावी लागेल माहितीये, पण..."; पंतप्रधान मोदींचे डोनाल्ड ट्रम्प यांच्या टॅरिफ बॉम्बवर थेट उत्तर
3
Video: भाषिक वादावरून उद्धव ठाकरे दिल्लीत कडाडले; राज ठाकरेंसोबतच्या युतीवरही स्पष्टच बोलले
4
ट्रम्प टॅरिफमुळे 'या' क्षेत्राला होणार ₹२४,००० कोटींचं नुकसान; या कंपन्यांचे शेअर्स क्रॅश, तुमच्याकडे आहेत का?
5
'सुहागरात' झाली, नवऱ्याला खोलीत कोंडून बायको बाल्कनीत आली अन्...; स्टोरी ऐकून पोलिसही चक्रावले
6
नवरा गंगास्नानासाठी गेला, बायकोने १५ लाखांच्या दागिन्यांवर डल्ला मारून बॉयफ्रेंडसह पळ काढला
7
पोस्ट ऑफिसच्या 'या' योजनेत वर्षाला फक्त १.५ लाख गुंतवून मिळवा ७० लाख रुपये, संपूर्ण रक्कम टॅक्स फ्री
8
ट्रम्पच्या ५०% टॅरिफने भारतीय उद्योगात खळबळ, पण आनंद महिंद्रांना दिसली 'संधी', दिले २ महत्त्वाचे सल्ले!
9
५० टक्के ट्रम्प टॅरिफचा वार, भारत कसा करणार बचाव? ७ पर्याय अजून खुले; अमेरिका गुडघे टेकेल!
10
ठरलेलं लग्न मोडलेला तरुण 'सैयारा' चित्रपट बघायला गेला, घरी परतला अन्...; संपूर्ण गावाला बसला मोठा धक्का!
11
संधी साधायची तर...! या ईलेक्ट्रीक कारवर मिळतोय १० लाखांपर्यंतचा डिस्काऊंट...
12
शरद पवार गटात नवे प्रदेशाध्यक्ष केवळ नामधारी? शशिकांत शिंदे नाही, रोहित पवारच अधिक सक्रिय
13
"पप्पा, मी वाचणार नाही...", मुलाचा अखेरचा कॉल; उत्तरकाशीतील दुर्घटनेनं दिली आयुष्यभराची जखम
14
"गरज असेल तर मी टक्कलही करेन...", कामातील कमिटमेंटबद्दल अभिनेत्री स्पष्टच बोलली
15
भारतानं रशियासोबत असं काही केलं की ट्रम्प यांचा होईल तिळपापड; अमेरिकेच्या दुखत्या नसेवर हात ठेवला का?
16
TCS मध्ये मोठा निर्णय! १ सप्टेंबरपासून पगार वाढणार, पण 'या' १२,००० कर्मचाऱ्यांची धडधड वाढली!
17
८ डावात फक्त एक फिफ्टी! टेस्टमध्ये 'नापास'चा ठपका; आता करुण नायर या मोठ्या स्पर्धेतून OUT
18
२०१८ मध्ये बनला उड्डाणपूल, २७ कोटींचा खर्च; अवघ्या ६ वर्षात BMC करणार जमीनदोस्त, कारण काय?
19
Trump Tariff News Apple Update: डोनाल्ड ट्रम्प यांच्या धमक्यांपुढे झुकले टीम कुक; ₹८७७७३२ कोटींची गुंतवणूक, Apple ची मोठी घोषणा
20
आकाशात उडत होतं विमान, अचानक धडकला मोठा पक्षी; विमानाचं मोठं नुकसान, प्रवासी थोडक्यात बचावले!

परतीच्या पावसामुळे भातपीक धोक्यात

By admin | Updated: October 6, 2015 00:17 IST

शेतकरी चिंतेत : जाता-जाता पावसाचा आणखी एक दणका

  रत्नागिरी : गेले चार-पाच दिवस परतीच्या पावसाने जिल्ह्यात धुमाकूळ घातला आहे. दुपारनंतर ढगांचा गडगडाट व विजांच्या कडकडाटासह पाऊस कोसळत असल्याने तयार भातपीक धोक्यात आले आहे. त्यामुळे यावर्षी कमी पावसामुळे आधीच भात उत्पादनावर परिणाम झाला असल्याने परतीच्या पावसामुळे भात पिकाचे नुकसान होत असल्याची माहिती डॉ. बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठअंतर्गत शिरगावच्या कृषी संशोधन केंद्राचे प्रभारी अधिकारी डॉ. बी. डी. वाघमोडे यांनी दिली. यावर्षी एकूणच पाऊस कमी झाला आहे. त्यामुळे पिण्याच्या पाण्याची भीषणता निर्माण होऊ नये, यासाठी पाऊस आवश्यक असला तरी तयार भातपिकास मारक ठरत आहे. जिल्ह्यात ४० टक्के हळवे, ४० निमगरवे, तर २० टक्के गरव्या जातीचे भात बियाणे लावण्यात आले आहे. हळवे भात तयार झाले असून, शेतकऱ्यांनी कापणीस प्रारंभ केला आहे. मात्र, एक तारखेपासून सलग लागत असलेल्या पावसामुळे तयार भातपिकाचे नुकसान होत आहे. शेतकऱ्यांनी कापून वाळत ठेवलेले भात शेतावरच भिजत असल्याने संबंधित भात वाळण्याऐवजी पुन्हा भिजत आहे. सलग पाच दिवस भिजल्याने भाताला अंकुर येण्याचा धोका वर्तवण्यात येत आहे. काही ठिकाणी वाऱ्यामुळे भातपीक जमीनदोस्त झाले आहे. एकूणच ‘शेतकऱ्यांच्या हातातील घास हिरावून घेण्याचा प्रकार’ असल्याने शेतकरी निराश झाले आहेत.निमगरवे भातपीकही तयार होण्याच्या मार्गावर आहे. लोंब टाकण्यात आली असून, दाणा तयार होण्याची प्रक्रिया सुरू झाली आहे. गरवे भात आता फुलोऱ्यात आहे. पावसामुळे फुलोरा झडण्याची भीती निर्माण झाली आहे. एकूणच तयार हळव्या भातपिकाबरोबर गरव्या, निमगरव्या भातासाठी पाऊस नुकसानकारक ठरणार आहे. गतवर्षी अवेळी पावसामुळे आंबा, काजूच्या पीक नुकसान झाले होते. भातलागवडीसाठी पुरेसा पाऊस झाला नाही. शेतकऱ्यांनी मिळेल त्या पाण्यावर लागवड केली होती. मात्र, पाऊस गायब असल्याने पिके पिवळट पडली होती. परंतु अधूनमधून लागणाऱ्या सरीमुळे भाताला जीवदान मिळाले. एकूणच दरवर्षीपेक्षा एकहजार मिलिमीटर कमी पावसाची नोंद झाली आहे. त्यामुळे उत्पादकता घटण्याचा धोका कृषी विभागाने व्यक्त केला होता. (प्रतिनिधी) भात कापणीयोग्य झाले असतानाच पावसाने पुन्हा एकदा मोठ्या प्रमाणावर बरसायला सुरुवात केली. त्यामुळे ‘आधी उल्हास त्यात फाल्गुन मास’प्रमाणे आधीच बिकट स्थिती असलेल्या भात पिकाची स्थिती वाईट झाल्याने शेतकरीवर्ग पुन्हा एकदा आर्थिक संकटात सापडला असल्याचे चित्र दिसत आहे.