शहरं
Join us  
Trending Stories
1
३१ जानेवारीपर्यंत निवडणुका पार पाडा; सर्वोच्च न्यायालयाचा आदेश, राज्य निवडणूक आयोगाला सुनावले खडेबोल
2
मोदी हाच जगातील सर्वांत मोठा ब्रँड; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस : भाजप कार्यकर्त्यांचा ब्रँड निर्माण करून देणारा पक्ष
3
स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुका तीन टप्प्यांत? जाणून घ्या सविस्तर
4
एकनाथ शिंदेंवरील टीकेला प्रत्युत्तर देणार; खा. नरेश म्हस्के यांचा मंत्री नाईकांना अप्रत्यक्ष इशारा
5
परवाना मिळण्याआधीच मोडले नियम; ई-बाईकऐवजी चक्क पेट्रोलवरील गाडी हजर
6
रेसकोर्सवरील थीम पार्कवर पुन्हा ‘इव्हेंट’; काम सुरू होईपर्यंत कार्यक्रमांसाठी देणार भाड्याने
7
“बेस्ट निवडणुकीत हसे करून घेतले, ब्रँडचा बँड वाजला”; CM फडणवीसांची ठाकरे बंधूंवर बोचरी टीका
8
“लिहून घ्या, काही झाले तरी आता मुंबईत...”; CM फडणवीसांनी मुंबई मनपा निवडणुकीचे रणशिंग फुंकले
9
Asia Cup 2025 : बांगलादेशनं मॅच जिंकली; अफगाणिस्तानला अजूनही स्वबळावर बाजी पलटण्याची संधी, पण...
10
'आपण दहशतवादी नाही… पाकिस्तानसाठी लढलो'; काय म्हणाला जैश कमांडर? भारताविरुद्धही ओकली गरळ
11
West Indies Squad For India Test Series : दिग्गजाच्या पोराला संधी; माजी कर्णधाराचा पत्ता कट
12
लाखो लोकांची फसवणूक, दीड वर्षांपासून फरार; अखेर ‘ज्ञानराधा’च्या अर्चना कुटे यांना अटक
13
७ तास चालली चर्चा, भारतावर लादलेला ट्रम्प टॅरिफ अमेरिका कमी करणार? पाहा, बैठकीत काय झाले...
14
दोन मुंबईकरांसोबत नेट प्रॅक्टिस करताना दिसला हिटमॅन रोहित शर्मा; फोटो व्हायरल
15
“सध्याचे वातावरण सरकारला पोषक नाही, पराजयाच्या भीतीने निवडणुका पुढे ढकलल्या”: विजय वडेट्टीवार
16
BAN vs AFG : 'चमत्कारी' खानचा हिट शो! भुवीचा विक्रम मोडला; हार्दिक पांड्यालाही संधी, पण...
17
म्युच्युअल फंड असावा तर असा...! ₹10000 ची SIP गुंतवणूक ₹1.79 कोटींवर पोहोचली, गुंतवणूकदारांना केलं मालामाल
18
इस्रायलचा येमेनच्या बंदरावर मोठा हवाई हल्ला, हुथी बंडखोरांचा दावा!
19
‘भारताने अमेरिकेच्या मध्यस्थीचा प्रस्ताव नाकारला’, पाकिस्तानने केली ट्रम्प यांच्या दाव्याची पोलखोल
20
IND vs PAK मॅचनंतर वातावरण तापलंय! बॉयकॉटची धमकी देणाऱ्या पाक संघानं घेतला हा निर्णय

राणेंची दहशत प्रवृत्ती उघड

By admin | Updated: July 21, 2014 23:22 IST

वैभव नाईक : राजकीय भवितव्यासाठी राजीनामा नाट्य

कणकवली : विरोधकांकडून दहशतीचा बागुलबुवा केला जात असल्याचे पालकमंत्री नारायण राणे सांगत होते. मात्र, दगड उचलणाऱ्यांचे हात तोडण्याचे आदेश कार्यकर्त्यांना देणाऱ्या नारायण राणेंनी आपली दहशत माजवण्याची प्रवृत्ती पुन्हा एकदा दाखवून दिली आहे, अशी टीका शिवसेना जिल्हाप्रमुख वैभव नाईक यांनी पत्रकार परिषदेत केली. वैभव नाईक म्हणाले की, नारायण राणे यांचे जयवंत परब, श्रीकांत सरमळकर, रविंद्र फाटक, गौरीशंकर खोत असे डावे-उजवे हात शिवसेनेने घेतले आहेत. त्यामुळे दगड मारणाऱ्यांचे हात तोडणारे त्यांच्याकडे शिल्लक राहिले नाहीत. राणेसमर्थक असलेले काही माजी आमदार ‘मातोश्री’ बाहेर घिरट्या घालत आहेत, असे राजन तेली यांचे नाव न घेता नाईक म्हणाले. राज्यस्तरीय नेतृत्व म्हणून आता नारायण राणेंकडे आमदारच शिल्लक नाहीत. इकोसेन्सिटीव्ह झोनखाली १९२ गावे अजूनही आहेत. जिल्ह्यातील ४८ हजार हेक्टर जमिन वनसंज्ञेखाली आहे. टाळंबा, नरडवे आदी धरणप्रकल्प निधी अभावी रखडले आहेत. सोलापूर-पुणे, नगर-पुणे मार्ग चौपदरीकरण होत आहे. तर नाशिक-मुंबई आठ पदरी होत आहे. परंतु मुंबई-गोवा महामार्ग गेली दहा वर्षे चौपदरीकरणापासून रखडला आहे. या बाबींसाठी कधी राणेंनी राजीनामा अस्त्र वापरून दबाव आणला नाही. मात्र, आपल्या राजकीय भवितव्यासाठी ते राजीनाम्याची खेळी करत आहेत. नारायण राणेंवर टीका केल्याने प्रसिद्धी मिळते हे त्यांचे विधान चुकीचे आहे. भावी मुख्यमंत्री म्हणून शिवसेना कार्याध्यक्ष उद्धव ठाकरे यांचे नाव चर्चेत आहे. त्यांच्यावर टीका करून उलट राणे प्रसिद्धी मिळवत आहेत. (प्रतिनिधी)रविंद्र फाटक लवकरच जिल्हा दौऱ्यावरशिवसेनेत प्रवेश केलेले ठाण्याचे नगरसेवक रविंद्र फाटक हे पुढील आठवड्यात जिल्हा दौऱ्यावर येत आहेत. यावेळी फाटक त्यांचे अनेक समर्थक व ‘विरोधक’ शिवसेनेत सामावून घेणार आहेत. फाटक यांचे सिंधुदुर्गात जल्लोषी स्वागत केले जाईल, असे वैभव नाईक यांनी सांगितले.