शहरं
Join us  
Trending Stories
1
T20 World Cup: त्यावेळीच ठरलेलं Shubman Gill संघाबाहेर जाणार; टीम सिलेक्शनची Inside Story
2
नवी मुंबई: संजय नाईक पुन्हा 'भाजपावासी'; मुख्यमंत्री, प्रदेशाध्यक्षांची भेट घेत 'घरवापसी'
3
दाट धुक्यामुळे दिल्ली विमानतळाचे वेळापत्रक विस्कळीत, १३८ विमान उड्डाणे रद्द, श्रीनगरलाही फटका
4
"सत्ता आणि सामर्थ्य याचा अर्थ आता बदलला आहे..."; जागतिक अशांततेवर जयशंकर यांचे मोठे विधान
5
संरक्षण मंत्रालयात खळबळ; लेफ्टनंट कर्नल दीपक शर्मा यांना लाच घेताना सीबीआयने पकडले; घरात सापडले २ कोटींहून अधिक रोख
6
मीरा भाईंदर: "...त्यातूनच लाडकी बहीण योजनेचा जन्म झाला"; एकनाथ शिंदे यांनी सांगितली कहाणी
7
अमेरिकेचं ‘ऑपरेशन हॉकआय स्ट्राइक’, इस्लामिक स्टेटच्या 70 ठिकाणांवर US चे मोठे हल्ले; प्रकरण काय?
8
"नीतीश वडिलांप्रमाणे, बाप-लेकीत..."; बिहार 'नकाब' वादावर राज्यपाल आरिफ मोहम्मद खान स्पष्टच बोलले
9
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
10
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
11
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
12
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
13
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
14
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
15
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
16
“भ्रष्ट महायुती सरकार विरोधात काँग्रेसचा वैचारिक लढा, मनपा निवडणुकीत...”: हर्षवर्धन सपकाळ
17
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
18
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
19
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
20
'त्या' प्रश्नावर सूर्याची बोलतीच बंद! सर्वांसमोर मुख्य निवडकर्ते आगरकरांना म्हणाला; "तुम्हीच सांगा"
Daily Top 2Weekly Top 5

राणेंची दहशत प्रवृत्ती उघड

By admin | Updated: July 21, 2014 23:22 IST

वैभव नाईक : राजकीय भवितव्यासाठी राजीनामा नाट्य

कणकवली : विरोधकांकडून दहशतीचा बागुलबुवा केला जात असल्याचे पालकमंत्री नारायण राणे सांगत होते. मात्र, दगड उचलणाऱ्यांचे हात तोडण्याचे आदेश कार्यकर्त्यांना देणाऱ्या नारायण राणेंनी आपली दहशत माजवण्याची प्रवृत्ती पुन्हा एकदा दाखवून दिली आहे, अशी टीका शिवसेना जिल्हाप्रमुख वैभव नाईक यांनी पत्रकार परिषदेत केली. वैभव नाईक म्हणाले की, नारायण राणे यांचे जयवंत परब, श्रीकांत सरमळकर, रविंद्र फाटक, गौरीशंकर खोत असे डावे-उजवे हात शिवसेनेने घेतले आहेत. त्यामुळे दगड मारणाऱ्यांचे हात तोडणारे त्यांच्याकडे शिल्लक राहिले नाहीत. राणेसमर्थक असलेले काही माजी आमदार ‘मातोश्री’ बाहेर घिरट्या घालत आहेत, असे राजन तेली यांचे नाव न घेता नाईक म्हणाले. राज्यस्तरीय नेतृत्व म्हणून आता नारायण राणेंकडे आमदारच शिल्लक नाहीत. इकोसेन्सिटीव्ह झोनखाली १९२ गावे अजूनही आहेत. जिल्ह्यातील ४८ हजार हेक्टर जमिन वनसंज्ञेखाली आहे. टाळंबा, नरडवे आदी धरणप्रकल्प निधी अभावी रखडले आहेत. सोलापूर-पुणे, नगर-पुणे मार्ग चौपदरीकरण होत आहे. तर नाशिक-मुंबई आठ पदरी होत आहे. परंतु मुंबई-गोवा महामार्ग गेली दहा वर्षे चौपदरीकरणापासून रखडला आहे. या बाबींसाठी कधी राणेंनी राजीनामा अस्त्र वापरून दबाव आणला नाही. मात्र, आपल्या राजकीय भवितव्यासाठी ते राजीनाम्याची खेळी करत आहेत. नारायण राणेंवर टीका केल्याने प्रसिद्धी मिळते हे त्यांचे विधान चुकीचे आहे. भावी मुख्यमंत्री म्हणून शिवसेना कार्याध्यक्ष उद्धव ठाकरे यांचे नाव चर्चेत आहे. त्यांच्यावर टीका करून उलट राणे प्रसिद्धी मिळवत आहेत. (प्रतिनिधी)रविंद्र फाटक लवकरच जिल्हा दौऱ्यावरशिवसेनेत प्रवेश केलेले ठाण्याचे नगरसेवक रविंद्र फाटक हे पुढील आठवड्यात जिल्हा दौऱ्यावर येत आहेत. यावेळी फाटक त्यांचे अनेक समर्थक व ‘विरोधक’ शिवसेनेत सामावून घेणार आहेत. फाटक यांचे सिंधुदुर्गात जल्लोषी स्वागत केले जाईल, असे वैभव नाईक यांनी सांगितले.