शहरं
Join us  
Trending Stories
1
'मला आवडतो पाकिस्तान, पण मोदी महान'; मुनीर भेटीदरम्यान काय म्हणाले डोनाल्ड ट्रम्प?
2
Maruti Chitampalli Death: 'अरण्यऋषी' मारुती चितमपल्ली यांचे निधन; वयाच्या ९३व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
3
कोण होते मारुती चितमपल्ली? जाणून घ्या त्यांचा जीवनप्रवास व दिनचर्या
4
मराठी साहित्य संपदा समृद्ध करणारा अरण्यऋषी, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची ज्येष्ठ साहित्यिक मारूती चितमपल्ली यांना श्रद्धांजली
5
Pune Crime News: लिपस्टिकने चिठ्ठी लिहिली अन् विवाहितेने चिमूरड्यासह पाचव्या मजल्यावरून स्वतःला झोकून दिलं
6
Viral Video : कशासाठी तो हट्ट? चिमुकल्याला सिंहाच्या पाठीवर बसवत होता बाबा, पुढे जे झालं ते बघाच... 
7
अमेरिका शेवटी विश्वासघातकीच! सोबत लढता लढता मध्येच या सैन्याला त्यांच्या नशिबावर सोडले 
8
एअर इंडियाच्या जिवात जीव आला! बोईंग-787 विमानांत मोठी समस्या सापडली नाही; डीजीसीएकडून घोषणा
9
Jejuri Accident : जेजुरी मोरगाव रोडवर भीषण अपघात;आठ ठार, पाच गंभीर जखमी
10
"सोनमनं दिली होती लग्न न करण्याची धमकी?", पोलिसांनी कुटुंबीयांना विचारले हे 10 प्रश्न!
11
F-35 Shot Down: इस्रायलचं पाचवं F-35 पाडलं, इराणच्या दाव्यानं अमेरिकेचं टेन्शन वाढलं! 
12
इस्राइलचा निशाणा 'सुप्रीम लीडर'वरच! खामेनेईंचा बंकर असलेल्या भागात केला बॉम्बचा मारा
13
फास्टॅग पास एक्स्प्रेस हायवे, समृद्धी, अटल सेतूवरही लागू होणार? जाणून घ्या, नेमका कुठे फायदा होणार
14
“भाजपा केवळ देशातील नव्हेच तर जगातील मोठा पक्ष, पण...”; जयंत पाटील नेमके काय म्हणाले?
15
Sonam Raghuvanshi : "आम्ही कोणतंही पाप केलेलं नाही..."; नार्को टेस्टच्या मागणीवर सोनम रघुवंशीचा भाऊ संतापला
16
“काँग्रेस दिशाहीन पक्ष”; CM फडणवीसांच्या उपस्थितीत जयश्रीताई पाटील यांचा भाजपा प्रवेश
17
एअर इंडियाच्या अपघातात विमा धारकाचाही मृत्यू अन् नॉमिनीचाही; विमा कंपन्या पेचात सापडल्या, इरडाचे तर स्पष्ट आदेश आहेत...
18
हजारो जीव वाचणार! आपत्कालीन परिस्थितीत विमानातील प्रवाशांचे केबिन वेगळे होणार, युक्रेनियन अभियंत्याने केले डिझाइन
19
"राजा भाई तुम तो गए...!" ...अन् अँकर गमतीत बोलला, ते खरं ठरलं; बघा संपूर्ण VIDEO 
20
जेव्हा James Bond चित्रपट सत्यात उतरतो; पहिल्यांदाच MI6 चे नेतृत्व एका महिलेकडे...

पालकमंत्र्यांमुळे जिल्ह्याच्या विकासाला खीळ : राणे

By admin | Updated: August 18, 2015 00:39 IST

मेळाव्यात टीका : पाचशे कोटींतील तीनशे कोटी मागील सरकारचे

सावंतवाडी : पाचशे कोटींचा हिशेब सांगणाऱ्या पालकमंत्री केसरकर यांनी तीनशे कोटी मागील सरकारने दिले आहेत, याचे भान ठेवावे. या पालकमंत्र्यांमुळे जिल्ह्याच्या विकासाला खीळ बसली असून साखर, गूळ देऊन लोकांना लाचार बनविण्यापेक्षा सक्षम बनवा, अशी टीका माजी मुख्यमंत्री नारायण राणे यांनी पालकमंत्र्यांवर केली. ते सावंतवाडी येथे आयोजित काँग्रेस कार्यकर्त्यांच्या मेळाव्यात बोलत होते. या मेळाव्याला जिल्हाध्यक्ष सतीश सावंत, तालुकाध्यक्ष संजू परब, जिल्हा परिषद उपाध्यक्ष रणजीत देसाई, डॉ. जयेंद्र परुळेकर, संदीप कुडतरकर, महिला जिल्हाध्यक्षा प्रणिता पाताडे, सभापती प्रमोद सावंत, प्रमोद कामत, पंढरी राऊळ, अन्वर खान, शहर अध्यक्ष मंदार नार्वेकर, अ‍ॅड. दिलीप नार्वेकर, युवक जिल्हाध्यक्ष आनंद शिरवलकर, शिक्षण सभापती गुरू पेडणेकर, दिलीप भालेकर, प्रमोद गावडे, रवींद्र मडगावकर, माजी सभापती प्रियंका गावडे, आदी यावेळी उपस्थित होते. नारायण राणे म्हणाले, अच्छे दिन म्हणणाऱ्यांनी येथील जनतेला बुरे दिन दाखविण्यास सुरुवात केली आहे. अनेक आश्वासनांना आपण भुलून त्यांना मते दिली, पण आता काय वाट्याला आले ते प्रत्येकाने बघावे. राज्याचे मुख्यमंत्री तर हे करू आणि ते करू सांगतात. त्यांना निधीचे नियोजन कसे करावे, हे माहीत नाही. हे राज्यातील सरकार जास्त दिवस टिकेल असे वाटत नाही, अशी टीकाही त्यांनी केली. विद्यमान पालकमंत्र्यांना विधानसभेत बोलता येत नाही. निधी कोण देतो हे माहीत नाही. ते ५०० कोटींचा हिशेब सांगत आहेत. त्यातील चिपी विमानतळाचे काम यापूर्वी खासगी कंपनीला काँग्रेसच्या काळात ‘बांधा वापरा व हस्तांतर करा’ या तत्त्वावर दिले आहे, तर पर्यटनासाठी आलेले शंभर कोटी केंद्र सरकारने काँग्रेसच्या काळातच दिले आहेत. तीनशे कोटींचा निधी हा मागील सरकारचा आहे. उर्वरित दोनशे कोटी हे पालकमंत्र्यांचे कर्तृत्व नसून हा निधी प्रत्येक सरकारकडून बांधकाम तसेच अन्य कामासाठी येतच असतो. निवडणुकीत साखर, गूळ देऊन लोकांना लाचार बनविण्यापेक्षा त्यांना सक्षम बनवा, असा सल्लाही यावेळी राणे यांनी दिला आहे. मी काय केले म्हणणाऱ्यांनी सी-वर्ल्ड, उत्तम स्टील कंपनी, विमानतळ, रेडी बंदर कोणी आणले ते सांगावे, असे आव्हान यावेळी राणे यांनी दिले. कार्यकर्त्यांनी पराभवाच्या छायेतून बाहेर येऊन काम करावे. तालुकाध्यक्ष म्हणून नेमणूक केल्यानंतर संजू परब यांनी विश्वास सार्थ केला, असे राणे म्हणाले. जिल्हाध्यक्ष सतीश सावंत यांनी पालकमंत्री, भाजप व शिवसेनेवर जोरदार टीका केली. या मेळाव्यात शिवसेनेच्या महिला कार्यकर्त्यांनी काँग्रेसमध्ये प्रवेश केला. काँग्रेसमधून गेले ते लोंबकळत राहिले : अ‍ॅड. नार्वेकर काँग्रेस पक्ष सोडला त्यांची अवस्था बघा. काँग्रेस हा महासागर असून पक्ष विकासातून घडतो व निष्ठावंत कार्यकर्त्यांच्या बळावर उभा असतो, असे सांगत अ‍ॅड. नार्वेकर यांनी काँग्रेसमधून गेलेले सध्या लोंबकळत असल्याची टीका केली.