शहरं
Join us  
Trending Stories
1
उद्धवसेनेशी युतीच्या शक्यतेवर CM फडणवीस स्पष्टच बोलले; म्हणाले, "सध्याची महायुती..."
2
IND vs ENG 5th Test Day 3 Stumps: मियाँ मॅजिक! परफेक्ट यॉर्करसह थांबला खेळ; सलामी जोडी फुटली
3
हार्दिक पटेल यांनी आळवले बंडाचे सूर, मुख्यमंत्र्यांना पत्र लिहून दिला असा इशारा, गुजरातमध्ये भाजपाला धक्का बसणार?
4
Asia Cup 2025 Venues : भारत-पाक 'हायहोल्टेज' सामना दुबईत; या ठिकाणी रंगणार आशिया कप स्पर्धेतील सामने
5
Mumbai LocaL: तिकीट तपासणीवरून लोकलमध्ये वाद, प्रवाशाचा कर्मचाऱ्यांवर हल्ला, कार्यालयाचीही तोडफोड!
6
"मोदी, योगी आणि मोहन भागवतांवर आरोप कर, नाहीतर…’’, प्रज्ञा सिंह यांचा ATS वर गंभीर आरोप
7
रिलेशनमध्ये असतानाही ५० टक्के महिला ठेवतात बॅकअप पार्टनर, सर्वेतून धक्कादायक माहिती समोर
8
बेकरीत काम करणाऱ्या २५ वर्षीय तरुणाची आत्महत्या, ६ जणांविरुद्ध गुन्हा दाखल
9
आम्ही पुन्हा प्रयत्न करतोय...; सायना नेहवालचे Ex-पती पारूपल्ली कश्यपची 'पॅच-अप'; २० दिवसांत 'यू-टर्न'
10
VIDEO : एकदम कडक! ओव्हलच्या स्टेडियमवर दिसली हिटमॅन रोहितची झलक; अन्...
11
Amravati: अमरावतीत जागेच्या वादावरून महिला सरपंच अन् सदस्यांमध्ये फ्रीस्टाईल हाणामारी!
12
धनश्री वर्माशी शेवटचं बोलणं केव्हा झालं? क्रिकेटर युजवेंद्र चहलने सांगितला 'त्या' वेळचा किस्सा
13
माजी पंतप्रधानांचा नातू प्रज्वल रेवण्णाला जन्मठेपेची शिक्षा; मोलकरणीवर अत्याचार केल्याप्रकरणी दोषी
14
२० हजारांपेक्षा कमी किंमतीत वनप्लस, सॅमसंग आणि आक्यूओओचे 5G फोन!
15
Yashasvi Jaiswal Century : यशस्वी 'सेंच्युरी रोमान्स' अगेन्स इंग्लंड! जशी सुरुवात तसाच शेवट
16
"आम्ही स्वतः कारवाई केली नाही, माधुरीच्या भविष्यासाठी..."; वाढत्या विरोधानंतर वनताराकडून स्पष्टीकरण
17
"ती माझी चूकच..."; युजवेंद्र चहलने दिली प्रामाणिक कबुली, सांगितलं धनश्रीशी नातं तुटण्याचं कारण
18
 Crime: दोस्त दोस्त ना रहा! दारुसाठी मित्राच्या डोक्यात चाकू खुपसला, जालन्यातील घटना
19
Mumbai: आयआयटी मुंबई कॅम्पसमध्ये विद्यार्थ्याचा मृतदेह आढळल्याने खळबळ, पोलीस तपास सुरू!
20
Mumbai: मुंबईतील चारकोपच्या राजाचे १७७ दिवसांनी विसर्जन; ढोल-ताशांच्या गजरात बाप्पाला निरोप!

बाळासाहेबांमुळेच राणे, भुजबळ मंत्री झाले

By admin | Updated: July 7, 2016 00:40 IST

वैभव नाईक यांचा घणाघात : माणगाव खोऱ्यातील टाळंबा, आकारीपड प्रश्न सोडविण्यासाठी सेना कटीबद्ध

माणगाव : राणे, भुजबळ यांच्यासारखे नेते आमदार, खासदार, मंत्री झाले ते केवळ हिंदूहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांच्यामुळेच. सर्वसामान्यांना संधी देणारा हा पक्ष आहे. सेनेची जनसामान्यांच्या जीवावरच पुढची घौडदौड सुरू आहे. माणगाव खोऱ्यातील टाळंबा व आकारीपड प्रश्न सोडविण्यातही सेना कटीबद्ध असून आगामी विधानसभेवर भगवा फडकवून सेनेचाच मुख्यमंत्री करण्यासाठी सर्वांनी सज्ज रहावे, असे आवाहन शिवसेना जिल्हाप्रमुख तथा आमदार वैभव नाईक यांनी माणगाव येथील शिवबंधन मेळाव्यात केले.शिवसेनेच्या सुवर्णमहोत्सवी वर्षानिमित्त आमदार वैभव नाईक यांच्या संकल्पनेतून जिल्ह्यात सुरू असलेल्या शिवबंधन पंधरवडा कार्यक्रमांतर्गत बुधवारी माणगाव विभागाचा मेळावा माणगाव तिठा येथील हॉलमध्ये पार पडला. संपर्कप्रमुख गौरीशंकर खोत यांच्या हस्ते या मेळाव्याचे उद्घाटन करण्यात आले. यावेळी आमदार नाईक, विधानसभा संपर्कप्रमुख सुरेश पाटील, कुडाळ तालुका संपर्कप्रमुख बाळा म्हाडगुत, नागेंद्र परब, उपजिल्हाप्रमुख अभय शिरसाट, तालुकाप्रमुख राजन नाईक, एसटी सेना जिल्हाध्यक्ष संजय पडते, महिला जिल्हाप्रमुख जान्हवी सावंत, उपजिहाप्रमुख वर्षा कुडाळकर, युवासेना जिल्हाप्रमुख मंदार शिरसाट, नगरसेवक सचिन काळप, गणेश भोगटे, जिल्हा परिषद सदस्य रमाकांत तामाणेकर, बंड्या कुडतरकर, आपा मुंज आदींसह शिवसेना, युवा सेना पदाधिकारी व शिवसैनिक उपस्थित होते.आमदार नाईक म्हणाले, राणे, भुजबळ, गणेश नाईक हे जरी सेना सोडून गेले असले, तरीही पक्षावर कसलाच परिणाम झाला नाही. राज्यासह केंद्रातील सत्तेचा उपयोग करून जिल्ह्याच्या सर्वांगीण विकासासाठी पालकमंत्री केसरकर, खासदार विनायक राऊत यांच्या मार्गदर्शनाखाली अनेक प्रकल्प राबविले जात आहेत. वीज समस्यांबाबत ८३ कोटींचा निधी जिल्ह्याला उपलब्ध झाला आहे. तसेच मळगाव, कुडाळ या रेल्वेस्थानकांची सुधारणा, जिल्ह्यातील रस्त्यांकडून उपेक्षित असणाऱ्या वाड्यावस्त्यांना विविध खात्यांच्या निधीतून रस्ते निर्माण करण्याचा शिवसेनेचा ध्यास असून, आगामी काळात जिल्ह्यातील जनतेला मूलभूत सोयीसुविधा पुरविण्याचे आश्वासन नाईक यांनी दिले. यावेळी संपर्कप्रमुख गौरीशंकर खोत म्हणाले, घराणेशाहीच्या नावावर राणे यांनी शिवसेना सोडली आणि त्याचा परिपाक म्हणून स्वत:ची घराणेशाही जिल्ह्यावर लादली. आमदार वैभव नाईक, खासदार विनायक राऊत यांच्या मार्गदर्शनाखाली अल्पावधीतच जिल्हा भगवामय झाल्याने विरोधकांच्यात धडकी भरली असून आगामी निवडणुकांत त्याची प्रचितीहीे येईल. यावेळी संजय पडते, अभय शिरसाट यांनीही आपल्या मनोगतातून शिवसेनेच्या कार्याचा आढावा घेतला आणि आगामी निवडणुकांसाठी कार्यकर्त्यांनी सज्ज राहण्याचे आवाहन केले. मेळाव्यापूर्वी शिवसेनेच्या वाटचालीची चित्रफित दाखविण्यात आली. (प्रतिनिधी)सेना नऊही जागा जिंकेल : संजय पडते यांचा विश्वासआगामी जिल्हा परिषद निवडणुकीत कुडाळ तालुक्यातील नऊही जिल्हा परिषद सदस्य शिवसेनेचे निवडून येतील, त्यासाठी आतापासूनच कामाला लागा, असे आवाहन यावेळी संजय पडते यांनी केले. तर जिल्हा परिषदेवर भगवा फडकवा, असे आवाहन शिवसेना महिला जिल्हाप्रमुख जान्हवी सावंत यांनी केले. जिल्हा परिषदेत आज विरोधकांना बसायला जागा नाही आहे. अशी टीकाही त्यांनी यावेळी केली. आगामी निवडणुकांमध्ये शिवसेना निर्विवाद यश मिळविल, असा आशावाद यावेळी उपजिल्हाप्रमुख अभय शिरसाट यांनी व्यक्त केला.