शहरं
Join us  
Trending Stories
1
आधीच प्लॅन ठरला होता, आंतरवालीतील दगडफेकीमागे पवारांचे आमदार; छगन भुजबळांचा मोठा गौप्यस्फोट
2
ट्रम्प यांचा भारताला टॅरिफनंतर आणखी एक मोठा झटका, टेन्शन वाढणार! आता काय करणार मोदी सरकार?
3
Asia Cup 2025 स्पर्धेतील Super Four चं चित्र स्पष्ट! भारत-पाकसह कोण कुणाविरुद्ध अन् कधी भिडणार? जाणून घ्या सविस्तर
4
“राहुल गांधी हे सीरियल लायर, हायड्रोजनचं सोडा, लवंगी फटाकाही फोडू शकले नाहीत”: CM फडणवीस
5
Asia Cup 2025 : 'जानी दुश्मन' असलेल्या बांगलादेशच्या मदतीला धावला श्रीलंका; अफगाणिस्तानचा खेळ खल्लास!
6
Hindenberg प्रकरणात ‘सेबी’ची Adani समूहाला क्लीन चिट; गौतम अदानी म्हणाले, “सत्यमेव जयते...”
7
“देशातील Gen Z, विद्यार्थी, युवक संविधान-लोकशाही वाचवतील, मी सदैव पाठीशी राहीन”: राहुल गांधी
8
७५ वर्षांचे झाले, PM मोदींनी निवृत्ती घ्यावी का? शरद पवार म्हणाले, “त्यांनी थांबावे हे...”
9
"युक्रेन युद्ध थांबवणे सर्वात सोपे वाटत होते, पण पुतिन..."; ट्रम्प यांची रशियन राष्ट्राध्यक्षांवर थेट टीका, स्पष्टच बोलले
10
Best Catch In T20I : परेरानं घेतलेला झेल भारीच! पण सूर्या दादाला तोड नाय! कारण....(VIDEO)
11
जबरदस्त...! तब्बल 18.60 लाख रुपयांनी स्वस्त झाली अ‍ॅक्टर्स अन् नेत्यांच्या आवडीची ही ढासू SUV; आता किती रुपयांना मिळणार? जाणून घ्या
12
Mohammad Nabi Fastest Fifty : एका षटकात ५ षटकार! युवीचा विक्रम आला होता धोक्यात, पण...
13
पालघर-डहाणूत ठाकरे गटाला खिंडार; सरपंच-उपसरपंच-पदाधिकारी शिवसेनेत, एकनाथ शिंदे म्हणाले...
14
Nuwan Thushara Unplayable Delivery : 'बेबी मलिंगा'ची कमाल! लेगला चेंडू टाकत उडवली ऑफ स्टंप (VIDEO)
15
'हैदराबाद गॅझेटिअरच्या नावाखाली सरकारने फसवणूक केली'; मराठा गोलमेज परिषदेत आरोप
16
स्कॉर्पिओ, सेल्टोस अन् हॅरियरचीही ‘बोलती बंद’; लोकांनी या ढासू SUV वर लाखो रुपये केले खर्च! 
17
अमेरिकन राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचे विमान न्यू यॉर्कमध्ये अपघातातून थोडक्यात बचावले...
18
“तुम्ही बोलत नाही, आम्ही ओबीसी आरक्षणासाठी लढायचे नाही का?”; छगन भुजबळांचा शरद पवारांना सवाल
19
मतचोरीचा राहुल गांधींचा आरोप, एकनाथ शिंदेंचे खुले आव्हान; म्हणाले, “ठोस पुरावे द्या अन्...”
20
मर्सिडीज-हुरुनचा अहवाल आला! भारतात करोडपतींच्या संख्येत ९० टक्क्यांनी वाढ..., महाराष्ट्र टॉपर, प्रचंडच...

भाजपामुळेच राणे आंदोलनासाठी रस्त्यावर

By admin | Updated: July 7, 2015 23:16 IST

अतुल काळसेकर यांचा आरोप : काँग्रेसच्या भाजपाविरोधी आंदोलनावर केली टीका

कणकवली : काँग्रेस शासनाने जनतेला दिलेली आश्वासने भाजपाचे शासन पूर्ण करीत आहे. गेल्या २५ वर्षांत काँग्रेसला जे जमले नाही ते अवघ्या सहा महिन्यात भाजपा शासनाने करावे अशी अपेक्षा कशी करण्यात येते? असा प्रश्न उपस्थित करतानाच जनतेने नारायण राणे यांना दिलेली संधी त्यांनी गमावली असून भाजपामुळेच त्यांना आता आंदोलनासाठी रस्त्यावर उतरावे लागत आहे, अशी टीका भाजपा जिल्हाध्यक्ष अतुल काळसेकर यांनी केली. येथील भाजपाच्या संपर्क कार्यालयात मंगळवारी आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते. यावेळी तालुकाध्यक्ष शिशिर परुळेकर उपस्थित होते. अतुल काळसेकर म्हणाले, ९ जुलै रोजी भाजपा शासनाच्याविरोधात जिल्हाधिकारी कार्यालयावर काँग्रेसच्यावतीने मोर्चा काढण्यात येणार आहे. सत्तेत येवून भाजपाला अवघे सहा महिनेच झाले आहेत. याउलट या जिल्ह्याचे नेतृत्व २५ वर्षांहून अधिक काळ नारायण राणे करीत होते. त्यामुळे या जिल्ह्याच्या रखडलेल्या विकासाला कोण कारणीभूत आहे हे दिसून येते. कोकणचे भाग्यविधाते म्हणविणारे नारायण राणे जिल्ह्याचा विकास करू शकले का? हे समजण्याइतकी येथील जनता शहाणी आहे. गेल्या २५ वर्षांत त्यांनी कोणाचेही भले केलेले नाही. ते ज्या प्रकल्पाबाबत शासन काही करीत नाही असे म्हणतात त्या सर्व प्रकल्पांची नुसती घोषणाच त्यांच्याच काँग्रेसने केली आहे. जिल्ह्यातील कोणतेही प्रकल्प बंद पडलेले नाहीत अथवा निधीही कमी झालेला नाही. या जिल्ह्याला भरघोस निधी देण्याचा प्रयत्न मुख्यमंत्री तसेच अर्थमंत्री करीत आहेत. जिल्हा नियोजनचा आराखडा ९० कोटीवरून १२५ कोटींवर आणण्यात आला आहे. चिपी विमानतळाबाबतचा आरोप खोटा असून त्याबाबत सावंतवाडी रेल्वे टर्मिनसच्या उद्घाटनप्रसंगी मुख्यमंत्र्यांनी खुलासा केला आहे. बदललेल्या स्थितीवरून सी वर्ल्डचा आराखडा बनविण्याचे काम सुरु आहे. महामार्ग चौपदरीकरणासाठी शासन जमीन बळकावत असल्याचा आरोप करण्यात येत आहे. मात्र भूमीधारकांना पाचपट नुकसानभरपाई देण्याचे मुख्यमंत्र्यांनी जाहीर केले आहे. चौपदरीकरणासाठी सर्व्हे पूर्ण झाला असून आॅगस्टमध्ये नोटीफिकेशन काढण्यात येईल. भात खरेदी आमच्यामुळेच झाली असे एकीकडे म्हणायचे आणि शासनाचे कौतुक करायचे तर शेतकऱ्यांसाठी शासन काही करत नाही असा टाहो फोडायचा ही विरोधकांची दुटप्पी भूमिका आहे. तीन वर्षे धान्य साठा पुरेल एवढ्या क्षमतेची गोदामे बांधण्याचा निर्णय शासनाने घेतला आहे. रेडी बंदर, विजयदुर्ग बंदर विकसित करण्याचा निर्णयही झाला आहे. मनसेचे काही कार्यकर्ते पदाधिकाऱ्यांना कंटाळून भाजपात आले आहेत. त्यामुळे ज्याप्रमाणे परशुराम उपरकर दुसऱ्या पक्षांच्या संघटनेत लक्ष घालतात तसा मी त्यांच्या संघटनेत लक्ष घालणार नाही, असा टोलाही एका प्रश्नाचे उत्तर देताना काळसेकरांनी लगावला. (वार्ताहर) गेल्या २५ वर्षात शेतकऱ्यांना जेवढी नुकसानभरपाई कधीही मिळाली नव्हती तेवढी नुकसानभरपाई शासन शेतकऱ्यांना देत आहे. १६ कोटींचा निधी नुकसान भरपाईपोटी जिल्ह्याला प्राप्त झाला आहे. त्यामुळे शासन येथील विकासासाठी संवेदनशील असून काँग्रेसने आंदोलनाची नौटंकी बंद करावी. - अतुल काळसेकर, भाजपा जिल्हाध्यक्ष