शहरं
Join us  
Trending Stories
1
RSS सरसंघचालक मोहन भागवत यांची पंतप्रधान मोदींशी महत्त्वाची भेट; सुमारे दीड तास चर्चा - रिपोर्ट्स
2
IPL 2025 DC vs KKR : सुनील नरेन मॅजिक! ७ चेंडूत फिरवली मॅच; फाफची फिफ्टी ठरली व्यर्थ
3
धक्कादायक! वडिलांनी आठ वर्षांच्या मुलाचा गळा आवळून खून केला, मृतदेह पोत्यात भरला अन्...
4
काळजी करण्यासारखं काही नाही! खुद्द अजिंक्य रहाणेनं दिली आपल्या दुखापतीसंदर्भातील माहिती
5
VIDEO: रत्नागिरीजवळ रनपार खाडीत मासेमारी पाहण्यासाठी गेलेल्या १६ जणांना वाचविण्यात यश
6
भाजपाच्या अनेक नेत्यांचं आयएसआयशी संबंध, काँग्रेसचे ज्येष्ठ नेते रणदीप सुरजेवाला यांचा गंभीर आरोप   
7
गंभीर गुन्हा होण्यापूर्वीच पोलिसांनी डाव हाणून पाडला; परभणीत घरझडतीत घातक शस्त्र जप्त
8
IPL 2025 : 'चमत्कारी' चमीरा! 'सुपरमॅन' होऊन सीमारेषेवर टिपला IPL मधील एक सर्वोत्तम कॅच (VIDEO)
9
'ब्रेक फेल' झाल्याने पुण्याच्या चांदणी चौकात भीषण अपघात; PMPML बसने उडवली अनेक वाहने
10
लातूरच्या लेकींचा आंतरराष्ट्रीय क्रीडा स्पर्धेत बोलबाला! ज्योती पवारमुळे भारताला उपविजेतेपद
11
अक्षय्य तृतीयेच्या पूर्वसंध्येला नागपूर जिल्ह्यात दोन बालविवाह; काटोल, कन्हान हद्दीतील घटना
12
दक्षिण नागपूरात कमी दाबाने पाणीपुरवठा, हनुमाननगर झोनमध्ये शिवसेनेतर्फे पाण्यासाठी आंदोलन
13
ब्रेकरने खड्डे करत फाउंडेशन केले मजबूत! क्रीडा संकुलातील महिलांच्या ओपन जीमची नव्याने दुरुस्ती
14
आता पाकिस्तानची खैर नाही! पीएम मोदींचे सैन्याला फ्री हँड, उच्चस्तरीय बैठकीत ठरली रणनीती
15
पाकिस्तानात पाणी प्रश्नावरून जनता संतापली! लोक आक्रमक होत रस्त्यावर उतरले, वाहतूक अडवली...
16
जय हिंद म्हणत अतुल कुलकर्णीं यांनी लाल चौकातून देशवासीयांना दिला जबरदस्त संदेश, म्हणाले...  
17
श्री संत तुकाराम महाराजांच्या पालखीचे १८ जुनला प्रस्थान; ६ जुलैला पंढरपूरमध्ये होणार दाखल
18
अंत्यसंस्कार न करता मुलाने दोन वर्षे कपाटात लपवून ठेवला वडिलांचा मृतदेह, पोलिसांनी केली अटक, कारण वाचून येईल डोळ्यात पाणी
19
"नाशिकच्या हिंसक घटनेतील आरोपींना कठोर शिक्षा करा"; काँग्रेसची महायुती सरकारकडे मागणी
20
नवज्योत सिंग सिद्धू भाजपात सामील होणार? या पोस्टने वेधले लक्ष, उद्या करणार घोषणा

रमाई नदीतील गाळ उपसा होणार

By admin | Updated: March 26, 2015 00:10 IST

विनायक राऊत : मसुरेतील पूर परिस्थितीवर मात करण्यासाठी मदत

चौके : मालवण तालुक्यातील मसुरे येथील शेतकऱ्यांची जीवनवाहिनी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या रमाई नदीपात्रात साचलेल्या गाळामुळे नदी पूर्णपणे बुजून गेल्याची स्थिती आहे. या नदीच्या पाण्यावर हजारो एकर शेती अवलंबून असून, साचलेला गाळ पावसात पूर परिस्थितीस कारणीभूत ठरतो. तसेच इतर अनेक समस्यांना शेतकऱ्यांना सामोरे जावे लागते. ही बाब लक्षात घेता खासदार विनायक राऊत यांनी मंगळवारी रमाई नदीपात्राची पाहणी करत या नदीपात्रातील गाळ तातडीने उपसा करण्यासाठी अधिकारीवर्गाला सूचना देत अहवाल सादर करण्याचे आदेश दिल्या आहेत.या पाहणी दौऱ्यावेळी खासदार विनायक राऊत यांच्यासमवेत शिवसेना कामगार संघटना सरचिटणीस जयवंत परब, जिल्हा परिषद सदस्य संग्राम प्रभुगांवकर, युवा सेना जिल्हाप्रमुख हर्षद गावडे, तालुकाप्रमुख बबन शिंदे, विभागप्रमुख राजा कोरगांवकर, सतीश प्रभू यांच्यासह अन्य पदाधिकारी तसेच बंदर विभाग, खारलँडचे अधिकारी उपस्थित होते. नदीपात्रातील गाळ उपशाबाबत जयवंत परब यांनी वारंवार खासदार राऊत यांच्याकडे मागणी केली होती. त्यानुसार ही पाहणी करण्यात आली.डोझरच्या सहाय्याने हा गाळ तत्काळ काढला जावा व गोवा धर्तीवर नदीपात्रात फायबर बंधारे बांधण्यात यावेत असे सुचविले. यावेळी खासदार राऊत यांनी अधिकाऱ्यांशी चर्चा करून लवकरात लवकर गाळ काढण्याची कार्यवाही करावी. आवश्यक ती कागदपत्रे जमा करून अहवाल सादर करण्याचे आदेश दिले. (वार्ताहर)जिल्हा परिषदेतर्फे दीड कोटीची तरतूदया नदीपात्रातील गाळ गेली अनेक वर्षे वाढत आहे. वृक्षतोड, नदीवर बांधण्यात येणारे बंधारे तसेच माती व अन्य कारणांनी गाळ वाढत आहे. मात्र, गाळ उपसा करण्याची कार्यवाही झाली नाही. असे असले तरी २०१३ साली जिल्हा परिषदेच्या जिल्हा नियोजन बैठकीत याबाबत दीड कोटीची तरतूद करत गाळ उपशासाठी तत्वत: मंजुरी देण्यात आली आहे.- संग्राम प्रभुगावकर जिल्हा परिषद सदस्य, मसुरे