शहरं
Join us  
Trending Stories
1
T20 World Cup: त्यावेळीच ठरलेलं Shubman Gill संघाबाहेर जाणार; टीम सिलेक्शनची Inside Story
2
नवी मुंबई: संजय नाईक पुन्हा 'भाजपावासी'; मुख्यमंत्री, प्रदेशाध्यक्षांची भेट घेत 'घरवापसी'
3
दाट धुक्यामुळे दिल्ली विमानतळाचे वेळापत्रक विस्कळीत, १३८ विमान उड्डाणे रद्द, श्रीनगरलाही फटका
4
"सत्ता आणि सामर्थ्य याचा अर्थ आता बदलला आहे..."; जागतिक अशांततेवर जयशंकर यांचे मोठे विधान
5
संरक्षण मंत्रालयात खळबळ; लेफ्टनंट कर्नल दीपक शर्मा यांना लाच घेताना सीबीआयने पकडले; घरात सापडले २ कोटींहून अधिक रोख
6
मीरा भाईंदर: "...त्यातूनच लाडकी बहीण योजनेचा जन्म झाला"; एकनाथ शिंदे यांनी सांगितली कहाणी
7
अमेरिकेचं ‘ऑपरेशन हॉकआय स्ट्राइक’, इस्लामिक स्टेटच्या 70 ठिकाणांवर US चे मोठे हल्ले; प्रकरण काय?
8
"नीतीश वडिलांप्रमाणे, बाप-लेकीत..."; बिहार 'नकाब' वादावर राज्यपाल आरिफ मोहम्मद खान स्पष्टच बोलले
9
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
10
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
11
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
12
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
13
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
14
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
15
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
16
“भ्रष्ट महायुती सरकार विरोधात काँग्रेसचा वैचारिक लढा, मनपा निवडणुकीत...”: हर्षवर्धन सपकाळ
17
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
18
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
19
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
20
'त्या' प्रश्नावर सूर्याची बोलतीच बंद! सर्वांसमोर मुख्य निवडकर्ते आगरकरांना म्हणाला; "तुम्हीच सांगा"
Daily Top 2Weekly Top 5

राजन तेली म्हणजे विषारी साप

By admin | Updated: June 3, 2016 00:44 IST

दत्ता सामंत : नारायण राणे यांनीच विष पचवले

सावंतवाडी : ज्याप्रमाणे शंकराच्या गळ्यात विषारी साप आहे. त्याचप्रमाणे नारायण राणे यांच्या बाजूला राजन तेलींसारखा विषारी साप बसत असे. यामुळे राणेंच्या खुर्चीपर्यंत पोहोचण्याचे धाडस कुणाचेच होत नसे. मात्र आता तेलींसारखा विषारी सर्प भाजपमध्ये गेल्यानेच काँग्रेसमध्ये नवचैतन्य निर्माण झाले आहे. अशी जोरदार टीका काँग्रेस जिल्हाध्यक्ष दत्ता सामंत यांनी तेलींवर पत्रकार परिषदेतून केली. काँगे्रस संपर्क कार्यालयात आयोजित पत्रकार परिषद सामंत बोलत होते. यावेळी सावंतवाडी तालुकाध्यक्ष संजू परब, जिल्हा परिषद शिक्षण सभापती आत्माराम पालयेकर, संदीप कुडतरकर, डॉ. जयेंद्र परूळेकर, जिल्हा सरचिटणीस मंदार नार्वेकर, शहराध्यक्ष सुधीर आडिवरेकर, दिलीप भालेकर, गुरूनाथ पेडणेकर आदी उपस्थित होते.यावेळी सामंत म्हणाले की, राजन तेली यांच्या टिकेला गांभिर्याने घेण्याची गरज नाही. ते काँग्रेसमध्ये कशाप्रकारे होते ते आम्ही जवळून पाहिलेले आहे. मात्र ते विषारी सापाप्रमाणे असल्याने आम्ही नारायण राणेंपर्यत पोहोचू शकत नव्हतो. तेली यांची कदाचित स्मृतीभ्रंश झालेली असेल, आमची नाही. राजन तेलींचं विष पचविण्याची ताकद फक्त नारायण राणेंमध्येच होती, भाजपमध्ये नाही, असेही सामंत यांनी सांगितले. तेली यांचा जन्मच भाजपमध्ये दीड वर्षाचा आहे. मात्र ते आपले अस्तित्व राखण्यासाठी सत्तेला दोन वर्ष झालेल्याचा पाढा वाचत आहेत. त्यांनी विसरू नये की पहिल्या सहा महिन्यातही भाजपविरोधी केलेली जोरदार टीका यामुळे भाजपच्या भुलथापा त्यांनी जनतेसमोर मांडू नयेत. राजन तेली जातील तिथे दोन गट पडतात. स्थानिक पातळीवर भाजपमध्ये दोन गट पाडण्याचे काम तेलींचे सुरू आहे. वेंगुर्ले तालुकाध्यक्ष निवडीसाठी पक्ष श्रेष्ठीपर्यंत जावे लागले, ही दुर्दैवी बाब आहे, असेही सामंत म्हणाले. (वार्ताहर)...तर केसरकरांचा सत्कार करूसिंधुदुर्गात आंतरराष्ट्रीय विमानतळ झाले की, सर्व पर्यटक सिंधुदुर्गात उतरणार होते. गोव्याची काळजी करू पाहत असलेले पालकमंत्री दीपक केसरकर यांनी मुद्दाम धावपट्टी ३४०० मीटरवरून २४०० आणली. त्यामुळे चिपी विमानतळाचा वापर फक्त लॅन्डीगसाठी करण्याचा केसरकरांचा डाव आहे. चिपी विमानतळावर २०१७ साली विमान उतरविण्याची वल्गना करणारे केसरकर यांनी खरोखरच २०१७ साली विमान उतरवले तर जिल्हाध्यक्ष म्हणून आपण स्वत: केसरकर यांचा सत्कार करू.- दत्ता सामंत, काँग्रेस जिल्हाध्यक्ष