शहरं
Join us  
Trending Stories
1
RSS सरसंघचालक मोहन भागवत यांची पंतप्रधान मोदींशी महत्त्वाची भेट; सुमारे दीड तास चर्चा - रिपोर्ट्स
2
IPL 2025 DC vs KKR : सुनील नरेन मॅजिक! ७ चेंडूत फिरवली मॅच; फाफची फिफ्टी ठरली व्यर्थ
3
धक्कादायक! वडिलांनी आठ वर्षांच्या मुलाचा गळा आवळून खून केला, मृतदेह पोत्यात भरला अन्...
4
काळजी करण्यासारखं काही नाही! खुद्द अजिंक्य रहाणेनं दिली आपल्या दुखापतीसंदर्भातील माहिती
5
VIDEO: रत्नागिरीजवळ रनपार खाडीत मासेमारी पाहण्यासाठी गेलेल्या १६ जणांना वाचविण्यात यश
6
भाजपाच्या अनेक नेत्यांचं आयएसआयशी संबंध, काँग्रेसचे ज्येष्ठ नेते रणदीप सुरजेवाला यांचा गंभीर आरोप   
7
गंभीर गुन्हा होण्यापूर्वीच पोलिसांनी डाव हाणून पाडला; परभणीत घरझडतीत घातक शस्त्र जप्त
8
IPL 2025 : 'चमत्कारी' चमीरा! 'सुपरमॅन' होऊन सीमारेषेवर टिपला IPL मधील एक सर्वोत्तम कॅच (VIDEO)
9
'ब्रेक फेल' झाल्याने पुण्याच्या चांदणी चौकात भीषण अपघात; PMPML बसने उडवली अनेक वाहने
10
लातूरच्या लेकींचा आंतरराष्ट्रीय क्रीडा स्पर्धेत बोलबाला! ज्योती पवारमुळे भारताला उपविजेतेपद
11
अक्षय्य तृतीयेच्या पूर्वसंध्येला नागपूर जिल्ह्यात दोन बालविवाह; काटोल, कन्हान हद्दीतील घटना
12
दक्षिण नागपूरात कमी दाबाने पाणीपुरवठा, हनुमाननगर झोनमध्ये शिवसेनेतर्फे पाण्यासाठी आंदोलन
13
ब्रेकरने खड्डे करत फाउंडेशन केले मजबूत! क्रीडा संकुलातील महिलांच्या ओपन जीमची नव्याने दुरुस्ती
14
आता पाकिस्तानची खैर नाही! पीएम मोदींचे सैन्याला फ्री हँड, उच्चस्तरीय बैठकीत ठरली रणनीती
15
पाकिस्तानात पाणी प्रश्नावरून जनता संतापली! लोक आक्रमक होत रस्त्यावर उतरले, वाहतूक अडवली...
16
जय हिंद म्हणत अतुल कुलकर्णीं यांनी लाल चौकातून देशवासीयांना दिला जबरदस्त संदेश, म्हणाले...  
17
श्री संत तुकाराम महाराजांच्या पालखीचे १८ जुनला प्रस्थान; ६ जुलैला पंढरपूरमध्ये होणार दाखल
18
अंत्यसंस्कार न करता मुलाने दोन वर्षे कपाटात लपवून ठेवला वडिलांचा मृतदेह, पोलिसांनी केली अटक, कारण वाचून येईल डोळ्यात पाणी
19
"नाशिकच्या हिंसक घटनेतील आरोपींना कठोर शिक्षा करा"; काँग्रेसची महायुती सरकारकडे मागणी
20
नवज्योत सिंग सिद्धू भाजपात सामील होणार? या पोस्टने वेधले लक्ष, उद्या करणार घोषणा

राजन तेली म्हणजे विषारी साप

By admin | Updated: June 3, 2016 00:44 IST

दत्ता सामंत : नारायण राणे यांनीच विष पचवले

सावंतवाडी : ज्याप्रमाणे शंकराच्या गळ्यात विषारी साप आहे. त्याचप्रमाणे नारायण राणे यांच्या बाजूला राजन तेलींसारखा विषारी साप बसत असे. यामुळे राणेंच्या खुर्चीपर्यंत पोहोचण्याचे धाडस कुणाचेच होत नसे. मात्र आता तेलींसारखा विषारी सर्प भाजपमध्ये गेल्यानेच काँग्रेसमध्ये नवचैतन्य निर्माण झाले आहे. अशी जोरदार टीका काँग्रेस जिल्हाध्यक्ष दत्ता सामंत यांनी तेलींवर पत्रकार परिषदेतून केली. काँगे्रस संपर्क कार्यालयात आयोजित पत्रकार परिषद सामंत बोलत होते. यावेळी सावंतवाडी तालुकाध्यक्ष संजू परब, जिल्हा परिषद शिक्षण सभापती आत्माराम पालयेकर, संदीप कुडतरकर, डॉ. जयेंद्र परूळेकर, जिल्हा सरचिटणीस मंदार नार्वेकर, शहराध्यक्ष सुधीर आडिवरेकर, दिलीप भालेकर, गुरूनाथ पेडणेकर आदी उपस्थित होते.यावेळी सामंत म्हणाले की, राजन तेली यांच्या टिकेला गांभिर्याने घेण्याची गरज नाही. ते काँग्रेसमध्ये कशाप्रकारे होते ते आम्ही जवळून पाहिलेले आहे. मात्र ते विषारी सापाप्रमाणे असल्याने आम्ही नारायण राणेंपर्यत पोहोचू शकत नव्हतो. तेली यांची कदाचित स्मृतीभ्रंश झालेली असेल, आमची नाही. राजन तेलींचं विष पचविण्याची ताकद फक्त नारायण राणेंमध्येच होती, भाजपमध्ये नाही, असेही सामंत यांनी सांगितले. तेली यांचा जन्मच भाजपमध्ये दीड वर्षाचा आहे. मात्र ते आपले अस्तित्व राखण्यासाठी सत्तेला दोन वर्ष झालेल्याचा पाढा वाचत आहेत. त्यांनी विसरू नये की पहिल्या सहा महिन्यातही भाजपविरोधी केलेली जोरदार टीका यामुळे भाजपच्या भुलथापा त्यांनी जनतेसमोर मांडू नयेत. राजन तेली जातील तिथे दोन गट पडतात. स्थानिक पातळीवर भाजपमध्ये दोन गट पाडण्याचे काम तेलींचे सुरू आहे. वेंगुर्ले तालुकाध्यक्ष निवडीसाठी पक्ष श्रेष्ठीपर्यंत जावे लागले, ही दुर्दैवी बाब आहे, असेही सामंत म्हणाले. (वार्ताहर)...तर केसरकरांचा सत्कार करूसिंधुदुर्गात आंतरराष्ट्रीय विमानतळ झाले की, सर्व पर्यटक सिंधुदुर्गात उतरणार होते. गोव्याची काळजी करू पाहत असलेले पालकमंत्री दीपक केसरकर यांनी मुद्दाम धावपट्टी ३४०० मीटरवरून २४०० आणली. त्यामुळे चिपी विमानतळाचा वापर फक्त लॅन्डीगसाठी करण्याचा केसरकरांचा डाव आहे. चिपी विमानतळावर २०१७ साली विमान उतरविण्याची वल्गना करणारे केसरकर यांनी खरोखरच २०१७ साली विमान उतरवले तर जिल्हाध्यक्ष म्हणून आपण स्वत: केसरकर यांचा सत्कार करू.- दत्ता सामंत, काँग्रेस जिल्हाध्यक्ष