शहरं
Join us  
Trending Stories
1
‘अच्छे दिन’ आल्याने आम्हालाही काही मिळावे हा भाव सोडा; सरसंघचालक भागवतांनी टोचले कान
2
सिनेमाचं आमिष, पार्ट्यांचा बहाणा...;खेवलकरच्या मोबाईलमध्ये १७०० अश्लील फोटो अन् व्हिडिओ, महिलांची तस्करी उघड
3
महाराष्ट्रातील गरजू आणि पात्र शेतकऱ्यांना कर्जमाफी मिळणार; महसूलमंत्री बावनकुळे यांनी दिली महत्त्वाची माहिती
4
कपिल शर्माच्या कॅनडा कॅफेमध्ये पुन्हा गोळीबार, 'या' गुंडाने व्हिडीओ पोस्ट करून जबाबदारी घेतली
5
राज ठाकरे सोबत आले, तर शिवसेना (UBT) इंडिया आघाडीतून बाहेर पडणार का? उद्धव ठाकरे म्हणाले...
6
'तुमच्याकडे पुरावे आहेत, न्यायालयात का जात नाही?', राहुल गांधींच्या आरोपांवर भाजपचा पलटवार
7
राहुल गांधींनी उल्लेख केलेला आदित्य श्रीवास्तव खरोखरच ३ राज्यांत मतदार आहे? समोर आली अशी माहिती  
8
शुबमन गिलची आशिया कपसाठीच्या संघातून सुट्टी? Duleep Trophy स्पर्धेत लागलीये कॅप्टन्सीची ड्युटी
9
'त्यांच्या मेंदूची चीप चोरीला गेलीये, म्हणून ते...'; CM देवेंद्र फडणवीस राहुल गांधींच्या ECI वरील आरोपांवर भडकले
10
Asia Cup 2025 मध्ये IND vs PAK सामना रद्द होणार का? दुबईतून आली मोठी अपडेट
11
या पाच कारणांमुळे डोनाल्ड ट्रम्प भडकलेत; म्हणून भारतावर कर लावलेत
12
येसूबाई अन् 'शंभुराज'! प्राजक्ता गायकवाडचा झाला साखरपुडा; होणाऱ्या नवऱ्यासोबत फोटोशूट
13
VIDEO : सॉरी सॉरी...! वैभव सूर्यवंशीची पॉवर; गोळीच्या वेगानं मारला चेंडू; बचावासाठी कॅमेरामनची 'कसरत'
14
ग्राहकांना आकर्षित करण्यासाठी सॅमसंगने आणलाय 5G फोन, किंमतही कमी!
15
रिक्षातून घरी जाणाऱ्या महिलेचं अपहरण, कारमध्ये नेऊन बलात्काराचा प्रयत्न, पाच जणांविरोधात गुन्हा दाखल
16
धुळ्यात ईव्हीएम स्ट्राँगरूम बाहेर ड्युटीवर असताना पोलिसाने स्वतःवरच झाडली गोळी
17
संजू सॅमसन राजस्थानची साथ सोडणार, मॅनेजमेंटकडे रिलीज करण्याची विनंती; पण नियम काय सांगतो?
18
"राहुल गांधी यांचा हा करंटेपणा, त्यांना..."; उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे का संतापले?
19
मंदिरात आला, पिंडीवर जल अर्पण केले, हात जोडले आणि तिथली भांडी चोरली, सीसीटीव्हीमध्ये रेकॉर्ड झाली चोरी
20
Asia Cup 2025 Hockey : पाकिस्तानची माघार; भारतात येऊन खेळण्यास दिला नकार, आता...

राजन तेली म्हणजे विषारी साप

By admin | Updated: June 3, 2016 00:44 IST

दत्ता सामंत : नारायण राणे यांनीच विष पचवले

सावंतवाडी : ज्याप्रमाणे शंकराच्या गळ्यात विषारी साप आहे. त्याचप्रमाणे नारायण राणे यांच्या बाजूला राजन तेलींसारखा विषारी साप बसत असे. यामुळे राणेंच्या खुर्चीपर्यंत पोहोचण्याचे धाडस कुणाचेच होत नसे. मात्र आता तेलींसारखा विषारी सर्प भाजपमध्ये गेल्यानेच काँग्रेसमध्ये नवचैतन्य निर्माण झाले आहे. अशी जोरदार टीका काँग्रेस जिल्हाध्यक्ष दत्ता सामंत यांनी तेलींवर पत्रकार परिषदेतून केली. काँगे्रस संपर्क कार्यालयात आयोजित पत्रकार परिषद सामंत बोलत होते. यावेळी सावंतवाडी तालुकाध्यक्ष संजू परब, जिल्हा परिषद शिक्षण सभापती आत्माराम पालयेकर, संदीप कुडतरकर, डॉ. जयेंद्र परूळेकर, जिल्हा सरचिटणीस मंदार नार्वेकर, शहराध्यक्ष सुधीर आडिवरेकर, दिलीप भालेकर, गुरूनाथ पेडणेकर आदी उपस्थित होते.यावेळी सामंत म्हणाले की, राजन तेली यांच्या टिकेला गांभिर्याने घेण्याची गरज नाही. ते काँग्रेसमध्ये कशाप्रकारे होते ते आम्ही जवळून पाहिलेले आहे. मात्र ते विषारी सापाप्रमाणे असल्याने आम्ही नारायण राणेंपर्यत पोहोचू शकत नव्हतो. तेली यांची कदाचित स्मृतीभ्रंश झालेली असेल, आमची नाही. राजन तेलींचं विष पचविण्याची ताकद फक्त नारायण राणेंमध्येच होती, भाजपमध्ये नाही, असेही सामंत यांनी सांगितले. तेली यांचा जन्मच भाजपमध्ये दीड वर्षाचा आहे. मात्र ते आपले अस्तित्व राखण्यासाठी सत्तेला दोन वर्ष झालेल्याचा पाढा वाचत आहेत. त्यांनी विसरू नये की पहिल्या सहा महिन्यातही भाजपविरोधी केलेली जोरदार टीका यामुळे भाजपच्या भुलथापा त्यांनी जनतेसमोर मांडू नयेत. राजन तेली जातील तिथे दोन गट पडतात. स्थानिक पातळीवर भाजपमध्ये दोन गट पाडण्याचे काम तेलींचे सुरू आहे. वेंगुर्ले तालुकाध्यक्ष निवडीसाठी पक्ष श्रेष्ठीपर्यंत जावे लागले, ही दुर्दैवी बाब आहे, असेही सामंत म्हणाले. (वार्ताहर)...तर केसरकरांचा सत्कार करूसिंधुदुर्गात आंतरराष्ट्रीय विमानतळ झाले की, सर्व पर्यटक सिंधुदुर्गात उतरणार होते. गोव्याची काळजी करू पाहत असलेले पालकमंत्री दीपक केसरकर यांनी मुद्दाम धावपट्टी ३४०० मीटरवरून २४०० आणली. त्यामुळे चिपी विमानतळाचा वापर फक्त लॅन्डीगसाठी करण्याचा केसरकरांचा डाव आहे. चिपी विमानतळावर २०१७ साली विमान उतरविण्याची वल्गना करणारे केसरकर यांनी खरोखरच २०१७ साली विमान उतरवले तर जिल्हाध्यक्ष म्हणून आपण स्वत: केसरकर यांचा सत्कार करू.- दत्ता सामंत, काँग्रेस जिल्हाध्यक्ष