शहरं
Join us  
Trending Stories
1
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
2
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
3
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
4
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
5
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
6
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
7
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
8
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
9
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
10
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
11
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
12
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
13
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
14
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
15
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
16
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
17
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
18
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
19
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
20
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
Daily Top 2Weekly Top 5

सिंधुदुर्गात पावसाचा कहर-२४ तासांपासून मुसळधार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 19, 2017 19:28 IST

लोकमत न्यूज नेटवर्कसिंधुदुर्गनगरी : सिंधुदुर्ग जिल्'ात अतिवृष्टी होणार असल्याचा हवामान खात्याचा अंदाज खरा ठरला. गेल्या दोन दिवसांपासून जिल्'ात मुसळधार कोसळणाºया पावसाने आज दुसºया दिवशी देखील आपला कहर सुरूच ठेवला. परिणामी ठिकठिकाणी पूरस्थिती होऊन जनजीवन विस्कळीत झाले होते. महामार्गावर कुडाळ येथील बेल नदीचे पाणी रस्त्यावर आल्याने महामार्ग काही काळ ठप्प झाला ...

ठळक मुद्दे२७ गावांचा संपर्क तुटला, महामार्ग काही काळ ठप्पआचरा येथे पुरात बस अडकली-जिल्ह्यातील अनेक पुले पुराच्या पाण्याखाली

लोकमत न्यूज नेटवर्कसिंधुदुर्गनगरी : सिंधुदुर्ग जिल्'ात अतिवृष्टी होणार असल्याचा हवामान खात्याचा अंदाज खरा ठरला. गेल्या दोन दिवसांपासून जिल्'ात मुसळधार कोसळणाºया पावसाने आज दुसºया दिवशी देखील आपला कहर सुरूच ठेवला. परिणामी ठिकठिकाणी पूरस्थिती होऊन जनजीवन विस्कळीत झाले होते. महामार्गावर कुडाळ येथील बेल नदीचे पाणी रस्त्यावर आल्याने महामार्ग काही काळ ठप्प झाला होता. तर आचरा येथे विद्यार्थ्यांना घेऊन जाणारी बस पुराच्या पाण्यात अडकल्याने थोडी भीतीदायक परिस्थिती निर्माण झाली होती. ग्रामीण भागात नदी नाल्यांना मोठ्या प्रमाणात पूर आल्याने सुमारे २७ गावांचा संपर्क तुटला असल्याची प्राथमिक माहिती आहे.

दरम्यान सर्वांनाच पावसाचा फटका बसला असून बºयाच घरांची, शेतमंगरांची पडझड होऊन लाखो रुपयांचे नुकसान झाले आहे. दरम्यान, पुढील ४८ तासात जिल्'ात मुसळधार पाऊस पडणार असल्याचा इशारा हवामान खात्याने दिला आहे.जिल्हाला गेले तीन दिवस मुसळधार पावसाने अक्षरश: झोडपून काढले आहे. सोमवार रात्री पासून सुरु झालेला पाऊस दुसºयांदा दिवशी रात्री उशिरापर्यं थांबण्याचे नावच घ्यायला तयार नव्हता. परिणामी जिल्'ात ठीक ठिकाणी पुरस्थिती निर्माण झाली होती. जिल्'ातील मुख्य सर्वच नद्यांनी धोक्याची पातळी ओलांडली होती. यात गडनदी, भंगसाळ नदी, जानवली नदी यासह ग्रामीण भागातही ओहळाना पूर आल्याने जनजीवन विस्कळीत झाले होते. जवळ जवळ सर्वच ठिकाणची भात शेती पाण्याखाली गेली होती.

सिंधुदुर्ग जिल्'ात १७ ते १९ सप्टेंबर कालावधीत सरासरी पाऊस २१५.४ मि मी इतका झालेला आहे. दि १ जून १७ ते १९ पर्यंत आज सकाळ पर्यंत जिल्'ात एकूण सरासरी पाऊस २८0८.२१ मि मि इतका झालेला आहे. १९ रोजी चा जिल्'ाचा एकूण पाऊस ९0२.२ मि मि झालेला असून सरासरी पाऊस ११२.७७ मि मी इतका झालेला आहे.जिल्ह्यातील अनेक पुले पाण्याखाली, वाहतूक बंदया पावसात दोडामार्ग तालुक्यातील भेडशी पुलावर, कुडाळ तालुक्यातील आंबेरी पुलावर व शिवापूर पुलावर, मालवण तालुक्यातील मालवण-बागायत, कांदळगाव-मसुरे , कसाल-वायंगवडे या मार्गावर पुराचे पाणी आल्याने वाहतूक बंद झाली होती. राष्ट्रीय महामार्गावरील पिट ढवळ पुलावर पाणी आहे ,मात्र पयार्यी पूल झाल्याने या ठिकाणी वाहतूक सुरू आहे. कणकवली तालुक्यात वागदे सातरल कासरल पुलावर पाणी आल्याने या मार्गावरील वाहतूक बंद आहे. नुकसानीचे त्वरित पंचनामे करून माहिती देण्याबाबत सर्वांना आदेशीत करण्यात आलेले आहे.मुंबई-गोवा महामार्ग काहीकाळ ठप्पकोसळणाºया मुसळधार पावसामुळे महामार्गावरील कुडाळ तालुक्यातील बेल नदीला पूर आल्याने सकाळी या नदीचे पाणी महामार्गावर आले होते. परिणामी काहीकाळ महामार्ग ठप्प झाला होता. यापूर्वी महामार्गावर पिठढवळ पुलावर पाणी येऊन महामार्ग ठप्प होत होता. मात्र या पुलाला जोडून लगतच नव्याने पूल बांधल्याने आता या पुलावरून वाहतूक सुरु आहे.२७ गावांचा संपर्क तुटलाग्रामीण भागात मोठ्या प्रमाणात पूरस्थिती निर्माण झाल्याने त्याचा फटका तेथील लोकांना बसला आहे. प्राथमिक माहिती नुसार जिल्'ातील सुमारे २७ गावांचा संपर्क तुटला होता. या ग्रामस्थांनी योग्य ती काळजी घ्यावी असे आवाहन प्रशासनाच्यावतीने करण्यात आले आहे.शाळा सोडल्या; पुरात बस अडकलीपावसाचा कहर पाहता जिल्हा परिषद प्रशासनाने जिल्'ातील बहुतांश शाळा सोडल्या आहेत. आचरा गावातील हिरलेवाडी-गाऊडवाडी रस्त्यावर पावसाच्या व उधाणाच्या पाण्याने पूर येवून सदर रस्ता वाहतुकीस बंद झालेला होता. याच दरम्यान विद्यार्थ्यांना घेऊन जाणारी बस या पुराच्या वेड्यात फसली. चालकाला पाण्याचा अंदाज न आल्याने या रस्त्यावरील पाण्यात स्कूल बस अडकली होती. मात्र पोलीस पाटील, ग्रामपंचायत कर्मचारी व ग्रामस्थांच्या मदतीने सदर मुलांना सुरक्षितपणे बाहेर काढण्यात आले आहे. अशी माहिती आपत्ती व्यवस्थापन विभागाने दिली.नुकसानीचा आकडा लाखोंच्या घरातमंगळवारी जिल्'ात झालेल्या मुसळधार पावसामुळे ठिकठिकाणी पडझड होऊन सुमारे लाखो रुपयांचे नुकसान झाले आहे.यात घरांची पडझड,गोट्यांची पडझड,घरांचे पत्रे उडने,यांचा समावेश आहे.४८ तासात मुसळधार पावसाची शक्यतायेत्या ४८ तासात जिल्'ात मुसळधार पाऊस होण्याची शक्यता हवामान खात्याने वर्तविली आहे. त्यानुसार जिल्हाधिकारी उदय चौधरी यांनी सर्व विभागांना सतर्क राहण्याचे आदेश दिले आहेत.