शहरं
Join us  
Trending Stories
1
'पोलिसांची परवानगी घेतली नव्हती', बंगळुरू चेंगराचेंगरी प्रकरणावर कर्नाटक सरकारचा अहवाल; कोहलीचेही नाव घेतले
2
"हाताचे बाहुले बनण्याच्या बदल्यात..."; प्रकाश आंबेडकरांचा आनंदराज आंबेडकरांना खरमरीत प्रश्न
3
मुलाचा वाढदिवस करून घरी परतणाऱ्यांवर काळाचा घाला; नाशिक इथं अपघातात ७ नातेवाईकांचा मृत्यू
4
Video - अग्निकल्लोळ! इराकमधील शॉपिंग मॉलमध्ये भीषण आग, ५० जणांचा होरपळून मृत्यू
5
एका भाजी विक्रेत्याच्या भांडणाने पेटले इस्रायल-सीरिया युद्ध; आतापर्यंत ३०० लोकांचा मृत्यू...
6
बांगलादेशात सुरक्षा दल अन् शेख हसीना समर्थकांमध्ये संघर्ष, चार जणांचा मृत्यू
7
"मला काही झाले, तर असीम मुनीरच जबाबदार"; पाकिस्तानच्या माजी पंतप्रधानांना कसली भीती वाटतेय?
8
IND vs ENG: "जसप्रीत बुमराह टीम इंडियासाठी अनलकी" माजी क्रिकेटपटू डेव्हिड लॉयड असे का म्हणाले? वाचा
9
कोहलीला तोड नाही! टी-२० सह कसोटीतून निवृत्ती; तरीही तो ठरला क्रिकेटच्या तिन्ही फॉरमॅटमधील 'किंग'
10
१०० युनिटपर्यंत वीज वापरणाऱ्यांना २६% दर कपात; ७० टक्के लोकांना फायदा: फडणवीसांची घोषणा
11
'मी १००० तरुणींसोबत रिलेशनशिपमध्ये होतो, पण आता मला...'; ३१ वर्षीय तरुण का आहे चर्चेत?
12
१.१७ कोटी आधार कार्ड झाली बंद; 'अशा' लोकांचं आधार कार्ड निष्क्रिय करतंय UIDAI, पाहा डिटेल्स
13
NEET परीक्षेत अपयशी ठरली, मग UPSC ची तयारीही सोडली: आता ७२ लाखांचं पॅकेज घेणारी युवती आहे कोण?
14
मुंबईत ४० लाखांचा पगारही कमी? 'या' आयटी तरुणाची कहाणी ऐकून तुम्हालाही बसेल धक्का!
15
८ दिवस रस्त्यावर आंदोलन, सरकार दखल घेईना; बिऱ्हाड आंदोलक मनसे प्रमुख राज ठाकरेंना भेटणार
16
धर्मांतरानंतर गायब झाल्या हिंदू मुली, छांगुर बाबाच्या आणखी एका चेल्याची पोलखोल; मेरठशीही थेट कनेक्शन!
17
मुंबईत लँडिंग आधी पायलटने 'PAN PAN PAN' मेसेज पाठवला; इंडिगोच्या विमानात नेमके काय घडले?
18
"मी तुझ्यावर प्रेम करतो, लग्न करशील?", जिनिलियाला चाहत्याचा मेसेज, अभिनेत्री म्हणाली- "मी विचार केला असता पण..."
19
विशीतल्या हिरोसोबत रोमान्स करणार करीना कपूर, आगामी सिनेमात साकारणार भूताची भूमिका
20
Stock Market Today: शेअर बाजाराची सुस्त सुरुवात; निफ्टी २५,२०० च्या वर, SBI, Hindalco, Eicher Motors मध्ये खरेदी

पावसाचा जोर कायम

By admin | Updated: July 14, 2016 00:32 IST

पीठढवळ नदीला पूर : चार तासांनी मुंबई-गोवा महामार्गावरील वाहतूक सुरळीत

ओरोस : मंगळवारी रात्री उशिरापर्यंत पावसाचा जोर कायम राहिल्याने ठिकठिकाणी पूरस्थिती निर्माण झाल्याने जनजीवन विस्कळीत झाले होते. मुंबई-गोवा महामार्गावरील ओरोस पीठढवळ नदीला पूर आला. पुराचे पाणी महामार्गावर आल्याने महामार्ग सुमारे चार तास ठप्प झाला होता. त्यामुळे महामार्गावर वाहनांची रांगच रांग लागली होती. या पावसाळी हंगामात पहिल्यांदाच महामार्गावर पाणी आल्याने महामार्ग वाहतूक पोलिसांची दमछाक उडाली. पोलिसांनी रात्री ११ वाजता वाहतूक ओरोसमार्गे कसाल, कट्टा, पेंडूरमार्गे कुडाळकडे, तर कुडाळ-अणावमार्गे ओरोस कणकवलीकडे वळविली. त्यामुळे तब्बल चार तासांनी महामार्ग सुरळीत करण्यात आला. रविवारपासून तीन दिवस मुसळधार पावसाने जिल्ह्याला झोडपले असून, अनेक ठिकाणी नुकसानही झाले आहे. ठिकठिकाणी पूर येऊन जनजीवन विस्कळीत झाले होते. तसेच अवघ्या दीड महिन्यात निम्म्यापेक्षा जास्त पाण्याची सरासरी पावसाने गाठली आहे. मंगळवारी सकाळपासून सुरू झालेला पाऊस रौद्र रूप धारण करीत रात्री उशिरापर्यंत धो-धो कोसळला. त्यामुळे जिल्ह्यात ठिकठिकाणी पूरस्थिती निर्माण झाली होती. रात्री १० च्या सुमारास महामार्गावरील पीठढवळ पुलावर पुराचे पाणी आल्याने महामार्ग तीन तास ठप्प झाला होता. महामार्गावर पाच फूट उंचावरून पाणी वाहत होते. त्यामुळे गाड्यांच्या लांबच लांब रांगा लागल्या होत्या. पाणी ओसरायला जवळजवळ चार तास लागले. महामार्ग पोलिसांनी घटनास्थळी येऊन परिस्थितीचा आढावा घेत महामार्गावरील वाहतूक सुरळीत करण्याचा प्रयत्न केला. ओरोस, सुकळवाड-कट्टामार्गे कुडाळच्या दिशेने, तर कुडाळ, अणाव, धामापूरमार्गे कसाल, कणकवलीच्या दिशेने वाहतूक वळविल्याने थोड्या प्रमाणात वाहतूक सुरळीत झाली; परंतु अवजड वाहनांचे पुराचे पाणी ओसरल्यानंतर मार्गक्रमण झाले. (वार्ताहर) महामार्गावर पहिल्यांदाच पाणी यावर्षीच्या पावसाळी हंगामात पहिल्यांदाच महामार्ग पार करून जाणाऱ्या पीठढवळ नदीने धोक्याची पातळी ओलांडल्याने महामार्गावर पाणी आले होते. महामार्गावरून तब्बल पाच फूट उंचावरून पाणी जात होते. या नदीने अक्राळविक्राळ रूप धारण केले होते. गतवर्षी या नदीला एकदाही पूर आला नव्हता. जिल्ह्यातील २४ तासांतील पाऊस पुढीलप्रमाणे : दोडमार्ग ११४ मि.मी., सावंतवाडी ९०, वेंगुर्ला ५८, कुडाळ ६६, मालवण ६४, कणकवली १११, देवगड ४२, वैभववाडी १५५ अशी नोंद झाली आहे. जिल्ह्यात सरासरी ८७.५० मि.मी. पावसाची नोंद झाली आहे. आपत्ती नियंत्रण कक्ष नावापुरताच पावसाळी हंगामात जिल्ह्यात नैसर्गिक आपत्ती उद्भवल्याची माहिती तत्काळ प्रशासनास मिळावी, यासाठी जिल्हा व प्रत्येक तालुकास्तरावर आपत्ती नियंत्रण कक्षाची स्थापना करण्यात आली आहे. मात्र, या पावसाळी हंगामात नैसर्गिक आपत्तीमध्ये घडलेल्या गंभीर घटनांची नोंदही जिल्हास्तरीय आपत्ती नियंत्रण कक्षात येत नाही. मंगळवारी महामार्गावरील वाहतूक तब्बल तीन तास खोळंबली होती. या घटनेची साधी नोंदही या कक्षाकडे नसल्याने हा कक्ष केवळ नावापुरताच मर्यादित राहिला आहे.