शहरं
Join us  
Trending Stories
1
SRH vs DC : दिल्लीच्या फलंदाजांनी नांगी टाकली; पण पावसाच्या बॅटिंगमुळे हैदराबाद फक्त बॉलिंग करून 'आउट'
2
"९० हजार सैनिकांचे पायजमे आजही तिथे टांगलेले आहेत’’, मुनीर आणि पाकिस्तानचं बलूच नेत्याकडून वस्रहरण   
3
IPL 2025 Playoffs Race : आता ४ जागेसाठी ७ दावेदार! कोणत्या संघासाठी कसे आहे प्लेऑफ्सचे समीकरण?
4
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केलं सरपंच संतोष देशमुख यांची कन्या वैभवीचं कौतुक
5
दोन्ही दिल्लीकर एकाच क्रीजमध्ये; रन आउटसाठी स्टँडमध्ये काव्या मारनची 'दातओठ खात' तळमळ (VIDEO)
6
"वेगळे राजकारण करून पॅनलला गालबोट लावण्याचा प्रयत्न केल्यास माझ्या दारात येऊ नका",अजित पवार यांचा इशारा
7
SRH vs DC : पॅट कमिन्सचा विकेट्सचा खास पॅटर्न! स्पेल बघून काव्या मारनही झाली शॉक
8
निकाल ऐकण्यापूर्वीच विद्यार्थिनीने संपवलं जीवन, नापास झाल्याच्या भीतीतून उचलले पाऊल
9
Shivalik Sharma: क्रिकेटरला अटक; लग्नाचे आमिष दाखवून तरुणीवर अत्याचार केल्याचा आरोप
10
रेल्वे स्थानकाच्या पायऱ्यांवर पाकिस्तानी ध्वज चिकटवला; पाहताच महिलेने घातला गोंधळ, व्हिडीओ व्हायरल
11
SRH vs DC : "डिअर क्रिकेट प्लीज प्लीज ..." दुसऱ्यांदा पदरी भोपळा पडल्यावर करूण नायर झाला ट्रोल
12
"महायुती म्हणजे 'तीन तिघाडा, काम बिघाडा"; काँग्रेस फोडण्याच्या मुद्द्यावरून प्रणिती शिंदेंची टीका
13
ड्रग्स टेस्टमध्ये दोषी आढळलेला कगिसो रबाडा पुन्हा IPL खेळणार, 'या' संघाविरूद्ध होणार 'कमबॅक'
14
हवाई हल्ल्याची तयारी... पाकिस्तानसोबत तणावाच्या पार्श्वभूमीवर गृह मंत्रालयाचे सर्व राज्यांना निर्देश
15
भारताच्या संरक्षण वेबसाईट्सवर पाकिस्तानकडून सायबर हल्ला, महत्त्वपूर्ण गोपनीय माहिती लीक झाल्याचा संशय
16
काही लोक काँग्रेस सोडत आहेत, आमची वेळ आल्यावर आम्हीही बदला घेऊ- विजय वडेट्टीवार
17
वाहतुकीचे नियम तोडले तर मिळतील निगेटिव्ह पॉईंट्स, ड्रायव्हिंग लायसन होणार सस्पेंड, अशी आहे नवी पॉईंट सिस्टिम
18
ही आहे भारताची ताकद; जर्मनी-फ्रान्सचा पाकिस्तानबाबत मोठा निर्णय, जाणून घ्या...
19
पाकवर आर्थिक हल्ला; ADB अध्यक्षांना भेटल्या निर्मला सीतारामण, निधी रोखण्याची केली मागणी
20
२२ महीने राबला, पगार मागताच हॉटेल मालक, मॅनेजरने स्वयंपाक्याचा गुप्तांग ठेचून खून केला

पावसाचा जोर कायम

By admin | Updated: July 14, 2016 00:32 IST

पीठढवळ नदीला पूर : चार तासांनी मुंबई-गोवा महामार्गावरील वाहतूक सुरळीत

ओरोस : मंगळवारी रात्री उशिरापर्यंत पावसाचा जोर कायम राहिल्याने ठिकठिकाणी पूरस्थिती निर्माण झाल्याने जनजीवन विस्कळीत झाले होते. मुंबई-गोवा महामार्गावरील ओरोस पीठढवळ नदीला पूर आला. पुराचे पाणी महामार्गावर आल्याने महामार्ग सुमारे चार तास ठप्प झाला होता. त्यामुळे महामार्गावर वाहनांची रांगच रांग लागली होती. या पावसाळी हंगामात पहिल्यांदाच महामार्गावर पाणी आल्याने महामार्ग वाहतूक पोलिसांची दमछाक उडाली. पोलिसांनी रात्री ११ वाजता वाहतूक ओरोसमार्गे कसाल, कट्टा, पेंडूरमार्गे कुडाळकडे, तर कुडाळ-अणावमार्गे ओरोस कणकवलीकडे वळविली. त्यामुळे तब्बल चार तासांनी महामार्ग सुरळीत करण्यात आला. रविवारपासून तीन दिवस मुसळधार पावसाने जिल्ह्याला झोडपले असून, अनेक ठिकाणी नुकसानही झाले आहे. ठिकठिकाणी पूर येऊन जनजीवन विस्कळीत झाले होते. तसेच अवघ्या दीड महिन्यात निम्म्यापेक्षा जास्त पाण्याची सरासरी पावसाने गाठली आहे. मंगळवारी सकाळपासून सुरू झालेला पाऊस रौद्र रूप धारण करीत रात्री उशिरापर्यंत धो-धो कोसळला. त्यामुळे जिल्ह्यात ठिकठिकाणी पूरस्थिती निर्माण झाली होती. रात्री १० च्या सुमारास महामार्गावरील पीठढवळ पुलावर पुराचे पाणी आल्याने महामार्ग तीन तास ठप्प झाला होता. महामार्गावर पाच फूट उंचावरून पाणी वाहत होते. त्यामुळे गाड्यांच्या लांबच लांब रांगा लागल्या होत्या. पाणी ओसरायला जवळजवळ चार तास लागले. महामार्ग पोलिसांनी घटनास्थळी येऊन परिस्थितीचा आढावा घेत महामार्गावरील वाहतूक सुरळीत करण्याचा प्रयत्न केला. ओरोस, सुकळवाड-कट्टामार्गे कुडाळच्या दिशेने, तर कुडाळ, अणाव, धामापूरमार्गे कसाल, कणकवलीच्या दिशेने वाहतूक वळविल्याने थोड्या प्रमाणात वाहतूक सुरळीत झाली; परंतु अवजड वाहनांचे पुराचे पाणी ओसरल्यानंतर मार्गक्रमण झाले. (वार्ताहर) महामार्गावर पहिल्यांदाच पाणी यावर्षीच्या पावसाळी हंगामात पहिल्यांदाच महामार्ग पार करून जाणाऱ्या पीठढवळ नदीने धोक्याची पातळी ओलांडल्याने महामार्गावर पाणी आले होते. महामार्गावरून तब्बल पाच फूट उंचावरून पाणी जात होते. या नदीने अक्राळविक्राळ रूप धारण केले होते. गतवर्षी या नदीला एकदाही पूर आला नव्हता. जिल्ह्यातील २४ तासांतील पाऊस पुढीलप्रमाणे : दोडमार्ग ११४ मि.मी., सावंतवाडी ९०, वेंगुर्ला ५८, कुडाळ ६६, मालवण ६४, कणकवली १११, देवगड ४२, वैभववाडी १५५ अशी नोंद झाली आहे. जिल्ह्यात सरासरी ८७.५० मि.मी. पावसाची नोंद झाली आहे. आपत्ती नियंत्रण कक्ष नावापुरताच पावसाळी हंगामात जिल्ह्यात नैसर्गिक आपत्ती उद्भवल्याची माहिती तत्काळ प्रशासनास मिळावी, यासाठी जिल्हा व प्रत्येक तालुकास्तरावर आपत्ती नियंत्रण कक्षाची स्थापना करण्यात आली आहे. मात्र, या पावसाळी हंगामात नैसर्गिक आपत्तीमध्ये घडलेल्या गंभीर घटनांची नोंदही जिल्हास्तरीय आपत्ती नियंत्रण कक्षात येत नाही. मंगळवारी महामार्गावरील वाहतूक तब्बल तीन तास खोळंबली होती. या घटनेची साधी नोंदही या कक्षाकडे नसल्याने हा कक्ष केवळ नावापुरताच मर्यादित राहिला आहे.