शहरं
Join us  
Trending Stories
1
कल्याणमध्ये ठाकरेंना मोठा धक्का, माजी आमदाराचा भाजपात प्रवेश; शिंदेसेनेची कोंडी करणार?
2
३ लाख पगार, सरकारी घर, हवी तिथे नोकरी; बुरखा प्रकरणातील डॉ. नुसरत यांना कुणी दिली मोठी ऑफर?
3
BMC निवडणुकीपूर्वी महायुतीत ट्विस्ट! भाजपा-राष्ट्रवादी नेत्यांची बैठक, शिंदेसेनेला डच्चू?
4
इम्रान खान आणि बुशरा बीबीला १७ वर्षांच्या तुरुंगवासाची शिक्षा; 'तोशाखाना-२' प्रकरणात पाकिस्तानच्या माजी पंतप्रधानांना मोठा धक्का!
5
Infosys ADR News: इन्फोसिसच्या एडीआरमध्ये ४० टक्क्यांची तेजी; ट्रेडिंगही थांबवलं, पाहा नक्की काय आहे प्रकरण
6
२००० किमी दूर रशियाच्या जहाजावर युक्रेनचा सर्वात मोठा हल्ला; याचा बदला घेणारच, पुतिन संतापले
7
ठाकरेंना जय महाराष्ट्र, भाजपचा आणखी एक धक्का! लोकसभा लढवणारे संजोग वाघेरेंचा मोठा निर्णय
8
“सावकारांचे रॅकेट विदर्भ-मराठवाड्यात सक्रिय, महायुती सरकार शेतकरी विरोधी”: विजय वडेट्टीवार
9
“काँग्रेसमध्ये पाठिंबा नाही, काम करणे कठीण; शिंदेसेनेत येताच महिला नेत्यांनी सगळे सांगितले
10
मल्लिका शेरावतने डोनाल्ड ट्रम्प यांच्यासोबत व्हाईट हाऊसमध्ये केलं ख्रिसमस डिनर; फोटो केले शेअर
11
"आता टॅरिफ माझा 5वा आवडता शब्द...!"; असं का म्हणाले डोनाल्ड ट्रम्प? अमेरिकेसाठी केली मोठी घोषणा
12
जागांवर तडजोड नाही, शिंदेसेना ठाम, भाजपाही मागे हटेना; अहिल्यानगरमध्ये महायुतीत फूट पडणार?
13
"मी शाहरुख खान, कृपया मला कॉल कर...", राधिकाला आलेला किंग खानचा मेसेज; म्हणाली...
14
'आयात' विरुद्ध 'निष्ठावंत' भाजपात वाढला संघर्ष; मूळ कार्यकर्ते अस्वस्थ, बंडखोरी वाढणार
15
Google नं पहिल्यांदाच आणलं क्रेडिट कार्ड, लगेच मिळणार कॅशबॅक आणि रिवॉर्ड; काय आहे खास?
16
अयोध्या राम मंदिरात ७० नवे पुजारी घेतले जाणार, ट्रस्टचा निर्णय; परिसरातील मंदिरात सेवा करणार
17
२१ डिसेंबर रोजी सुरु होणार पौष मास 'भाकड मास' का म्हटला जातो? शुभ कार्यालाही लागतो विराम!
18
पतीनं पत्नीकडून घरखर्चाचा हिशोब मागणं क्रूरता?; सुप्रीम कोर्टाने सुनावला महत्त्वाचा निकाल
19
Mumbai Crime: शीतपेयातून गुंगीचा पदार्थ, मुंबईत अल्पवयीन मुलींवर ४५ वर्षाच्या व्यक्तीने...; व्हिडीओही बनवला
20
Post Office ची धमाल स्कीम, व्हाल मालामाल; मॅच्युरिटीवर मिळतील ४० लाख रुपये, किती गुंतवणूक करावी लागणार?
Daily Top 2Weekly Top 5

कलिंगडाच्या शेतीला पावसाचा तडाखा

By admin | Updated: March 30, 2015 00:19 IST

आठ एकर शेतीचे नुकसान : शेतकरी हवालदिल, आंबा-काजूच्या धर्तीवर नुकसानभरपाईची मागणी

शिवाजी गोरे - दापोली  कोकणातील शेतकरी अलिकडे केवळ भातशेतीवर अवलंबून न राहता दुबार पीक घेऊ लागला आहे. भातशेतीचा हंगाम संपल्यावर भाजीपाला, कलिंगडाचे मोठ्या प्रमाणावर उत्पन्न घेतले जात आहे. दापोली तालुक्यात ठिकठिकाणी आता कलिगडांची लागवड केली जात आहे. पंकज सुरेश जागडे या तरुण शेतकऱ्याने १२ वर्षे कलिंगड शेतीचा यशस्वी प्रयत्न केला होता. मात्र, पावसाने कलिंगड पिकावर करपा पडून संपूर्ण पीक हातचे गेल्यामुळे जीवन जगायचे कसे, हा प्रश्न त्यांच्यापुढे निर्माण झाला आहे.अवकाळी पावसाने आंबा, काजूचे नुकसान झाल्याने बागायतदार शेतकऱ्यांना नुकसान भरपाई देण्यासाठी कृषी विभागामार्फत पंचनामे सुरु आहेत.आंबा, काजू नुकसान भरपाईचे पंचनामे करण्याचे आदेश कृषी विभागाला मिळाल्याने पंचनामे सुरु झाले आहेत. पंरतु कलिंगड शेतीचा पंचनामा न झाल्याने नुकसान भरपाई मिळेल की नाही, याबद्दल शेतकऱ्याला चिंता वाटू लागली आहे.पंकज जागडे हा गेली १२ वर्षे कलिंगड शेती करीत आहे. स्वत:कडे जमीन नसतानासुद्धा भाड्याच्या जमिनीत कलिंगडाची लागवड करुन सुशिक्षीत बेकार तरुण मोठ्या जिद्दीने उभा राहात होता. यावर्षीसुद्धा ८ एकर जमिनीवर कलिंगडाची लागवड केली होती. २ लाख रुपये कर्ज काढून भाड्याने जमीन घेऊन मोठ्या जिद्दीने कलिंगडाची लागवड केली होती. पंकज जागडे व प्राजक्ता जागडे या जोडप्याने दिवसरात्र मेहनत करुन कलिंगड शेती केली होती. शेतसुद्धा मोठ्या जोमाने वाढले. कर्ज फिटून आपल्याला ३ लाख ते ४ लाख रुपये नफा मिळेल, अशी अपेक्षा बाळगून सुखी कुटुंबाची स्वप्नसुद्धा रंगवली जात होती. मात्र, अवकाळी पाऊस आला व होत्याचे नव्हते झाले. अवकाळी पावसाने कलिंगडाच्या वेलीवर करपा पडला व संपूर्ण वेलच वाळून गेली. करपा पडल्यानंतर अवघ्या दोन - तीन दिवसात शेती नष्ट झाली. कलिंगडाचे पीक तयार होण्याच्या मार्गावर होते. परंतु अचानक पडलेल्या अवकाळी पावसामुळे या शेतकऱ्याच्या आशा धुळीस मिळाल्या. दर्जेदार उत्पन्न घेण्यासाठी कलिंगडाची इंडो अमेरिका, अगस्ता ३ किलो बियाण्याची लागवड केली. औषध फवारले, पंपाने नदीचे पाणी आणून कलिंगड शेती फुलविली. या शेतीतून चांगले उत्पन्न मिळेल, असे वाटत असताना अवकाळी पाऊस झाला.कोकणात केवळ आंबा, काजूला मदत दिली जाते. परंतु आंबा, काजूप्रमाणे इतर पिकांनासुद्धा नुकसान भरपाई मिळावी. कलिंगड पिकाचे नुकसान झाल्याने आमचा संसारच उद्ध्वस्त झाला आहे. बँकेचे कर्ज कसे फेडायचे, याचीच काळजी वाटत आहे. स्वत:ची शेतजमीन नसल्यामुळे भाड्याची शेती घेऊन वर्षातून एकदाच कलिंगड पीक घेतो. त्या पिकावर आमचा उदरनिर्वाह चालतो. आता पीकच गेले जीवन जगायचे कसे हा प्रश्न भेडसावत आहे.- पंकज जागडे, शेतकरी