शहरं
Join us  
Trending Stories
1
लढाऊ विमाने पाकिस्तानवर हल्ल्यासाठी झेपावली; पाकिस्तानी AWACS विमान उडविले, लाहोरकडे कूच
2
India Pakistan War : पाकिस्तानने कुपवाडा, बारामुल्लामध्ये केला हल्ला; लोकांना सुरक्षित ठिकाणी पाठवले
3
भारताकडून पाकिस्तानला प्रत्युत्तर देण्यास सुरुवात, लाहोरवर केला ड्रोन हल्ला, तणाव वाढला!
4
युद्धाची घोषणा होणार? राजनाथ सिंह सीडीएस, तिन्ही आर्मी प्रमुखांच्या भेटीला; मोदी डोवाल एकत्र...
5
भारत-पाकिस्तान तणाव शिगेला; पाकने राजस्थान बॉर्डरच्या दिशेने पाठवले रणगाडे, भारतीय सैन्य तयार
6
पाकिस्तानचा मोठा हल्ला उधळला, एफ-१६ जेटच्या उडवल्या ठिकऱ्या, आयएल-१७ एअर डिफेन्स गन सीमेवर तैनात
7
ऑपरेशन सिंदूरबाबत मोठी अपडेट! भारताने हल्ल्यात दोन पाकिस्तानी लढाऊ विमाने पाडली
8
पाकिस्तान सुधरेना, जम्मू विमानतळावर हल्ल्याचा प्रयत्न, नियंत्रण रेषेपलीकडून भीषण गोळीबार
9
भारताने हाणून पाडला 'नापाक' हल्ल्याचा प्रयत्न! 'या' ठिकाणी पाकिस्तानची मिसाईल्स केली नष्ट
10
Video: सायरन वाजले!! पाकिस्तानची ८ मिसाईल्स भारताने पाडली, 'नापाक' हल्ल्यांना चोख प्रत्युत्तर
11
IPL 2025 PBKS vs DC : पंजाब-दिल्ली यांच्यातील सामना अचानक थांबवण्याची वेळ: नेमकं काय घडलं?
12
Mumbai Metro: उद्यापासून आरे ते वरळी मेट्रो धावणार; मुंबईकरांची वाहतूक कोंडीतून सुटका, वेळही वाचणार!
13
दोन वेगवेगळे Uniform; कर्नल सोफिया अन् विंग कमांडर व्योमिका यांच्या गणवेशातून मोठा संदेश
14
पाकिस्तान दहशतवादाचे केंद्र, नेहमी दहशतवाद्यांना संरक्षण दिले; भारताकडून पाकची पोलखोल
15
मैत्रिणींनी केला घात! ठाण्यात नशेचे इंजेक्शन देऊन तरुणीवर सामूहिक बलात्कार
16
लालू प्रसाद यादव पुन्हा अडचणीत; राष्ट्रपतींनी 'या' प्रकरणात खटला चालवण्याची दिली परवानगी
17
घायाळ पाकिस्तानला अल कायदाची साथ, भारतात 'जिहाद फी सबीलिल्लाह' करण्याची दिली धमकी   
18
IPL 2025 : ईडन गार्डन्सनंतर आता जयपूर स्टेडियमवर बॉम्बस्फोट घडवून आणण्याची धमकी
19
Video - अतिथी देवो भव! रिक्षा चालकाच्या कृतीने जिंकलं परदेशी महिलेचं मन, असं काय घडलं?
20
पाकिस्तानला भारताचा 'डिजिटल' दणका! सोशल मीडिया पाठोपाठ वेब सिरीज, OTT वरही बंदी

गणेशोत्सवावर पावसाचे सावट

By admin | Updated: September 14, 2015 23:52 IST

सिंधुदुर्गात संततधार : बाजारपेठेतील उलाढालीवर परिणाम; यंत्रणा अलर्ट

कणकवली : सिंधुदुर्ग जिल्ह्यात सोमवारी सकाळपासूनच अधून-मधून जोरदार पाऊस कोसळत होता. सोमवारीही दिवसभर ढगाळ वातावरणासह कोसळणाऱ्या संततधार पावसाने गणेशोत्सवावर पावसाचे सावट राहणार आहे. त्यामुळे गणेशभक्तांमध्ये चिंतेचे वातावरण आहे. कोकण रेल्वे, एस. टी., खासगी प्रवाशी गाड्यांमधून लाखो चाकरमानी सिंधुदुर्गात दाखल होण्यास सुरुवात झाली असून त्यामुळे संबंधित यंत्रणा अलर्ट झाली आहे. दरवर्षी धो धो कोसळणारा पाऊस यावर्षी म्हणावा तसा पडलाच नाही. त्यामुळे भात शेतीच्या हंगामात शेतकऱ्यांच्या तोंडचे पाणी पळाले होते. सप्टेंबर महिना सुरु झाल्यानंतरही जोरदार पाऊस नसल्याने सर्वत्र काळजीचे वातावरण होते. अधून-मधून पावसाच्या तुरळक सरी कोसळत होत्या. मात्र, गेले दोन दिवस जोरदार पावसाने ‘कम बॅक’ केला आहे. ढगांचा गडगडाटही होत आहे. रविवारपासून तर पावसाचे प्रमाण वाढल्याने गणेशोत्सवाच्या तयारीत गुंतलेले भाविक धास्तावले आहेत. पावसामुळे बाजारपेठेत येणाऱ्या ग्राहकांवरही परिणाम होत असल्याने व्यापारीही चिंताग्रस्त झाले आहेत. बाजारपेठेतील उलाढालीवर पावसामुळे निश्चितच परिणाम होणार आहे. त्यामुळे त्याचा फटका मोठ्या व्यापाऱ्यांबरोबरच छोट्या व्यापाऱ्यांनाही बसणार आहे. त्याचप्रमाणे गणरायाच्या दर्शनासाठी मित्र परिवाराकडे जाण्यावर मर्यादा येणार असल्याने तरुणवर्ग काहीसा नाराज आहे. दरम्यान, पुन्हा एकदा पावसाने हजेरी लावल्याने शेतकरीवर्गातून आनंद व्यक्त होत असला तरी पावसाचा जोर असाच राहिला तर ऐन उत्सवाच्या काळात भक्तांच्या आनंदावर विरजण पडणार आहे, तर दुसरीकडे जिल्ह्यातील धरणे किंवा पाणी साठे पूर्णपणे भरले नसल्याने आगामी काळातील पाणी टंचाईपासून मुक्तता होण्यासाठी पावसाची गरज आहे, अशा प्रतिक्रियाही सर्वत्र ऐकायला मिळत आहेत. (वार्ताहर)