शहरं
Join us  
Trending Stories
1
Hindi Inclusion: राज्यात हिंदी सक्तीवरून वादंग, सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये जुंपली!
2
Operation Sindoor: ऑपरेशन सिंदूर थांबविण्यामध्ये अमेरिकेचा कसलाच संबंध नाही!
3
आजचे राशीभविष्य - १९ जून २०२५, या राशीच्या व्यक्तींना सामाजिक आणि अन्य क्षेत्रांमध्ये प्रसिद्धी व प्रतिष्ठा लाभेल
4
Toll Pass: तीन हजारांत मिळणार टोलचा वार्षिक पास, आधीच्या फास्टॅगचे काय?
5
'मला आवडतो पाकिस्तान, पण मोदी महान'; मुनीर भेटीदरम्यान काय म्हणाले डोनाल्ड ट्रम्प?
6
Maruti Chitampalli Death: 'अरण्यऋषी' मारुती चितमपल्ली यांचे निधन; वयाच्या ९३व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
7
कोण होते मारुती चितमपल्ली? जाणून घ्या त्यांचा जीवनप्रवास व दिनचर्या
8
आजचा अग्रलेख: हे प्रिय आकाशीच्या देवा...
9
मराठी साहित्य संपदा समृद्ध करणारा अरण्यऋषी, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची ज्येष्ठ साहित्यिक मारूती चितमपल्ली यांना श्रद्धांजली
10
Pune Crime News: लिपस्टिकने चिठ्ठी लिहिली अन् विवाहितेने चिमूरड्यासह पाचव्या मजल्यावरून स्वतःला झोकून दिलं
11
Viral Video : कशासाठी तो हट्ट? चिमुकल्याला सिंहाच्या पाठीवर बसवत होता बाबा, पुढे जे झालं ते बघाच... 
12
अमेरिका शेवटी विश्वासघातकीच! सोबत लढता लढता मध्येच या सैन्याला त्यांच्या नशिबावर सोडले 
13
एअर इंडियाच्या जिवात जीव आला! बोईंग-787 विमानांत मोठी समस्या सापडली नाही; डीजीसीएकडून घोषणा
14
Jejuri Accident : जेजुरी मोरगाव रोडवर भीषण अपघात;आठ ठार, पाच गंभीर जखमी
15
"सोनमनं दिली होती लग्न न करण्याची धमकी?", पोलिसांनी कुटुंबीयांना विचारले हे 10 प्रश्न!
16
F-35 Shot Down: इस्रायलचं पाचवं F-35 पाडलं, इराणच्या दाव्यानं अमेरिकेचं टेन्शन वाढलं! 
17
इस्राइलचा निशाणा 'सुप्रीम लीडर'वरच! खामेनेईंचा बंकर असलेल्या भागात केला बॉम्बचा मारा
18
विशेष लेख: बाय बाय अमेरिका, आम्ही चाललो!
19
“भाजपा केवळ देशातील नव्हेच तर जगातील मोठा पक्ष, पण...”; जयंत पाटील नेमके काय म्हणाले?
20
Sonam Raghuvanshi : "आम्ही कोणतंही पाप केलेलं नाही..."; नार्को टेस्टच्या मागणीवर सोनम रघुवंशीचा भाऊ संतापला

रेल्वेमार्गासाठी प्रयत्न अन् एकजूट हवी

By admin | Updated: December 17, 2014 22:51 IST

अनेक वर्षांचे स्वप्न : कोकणचं पश्चिम महाराष्ट्राशी नातं जुळणार?

राजापूर : याआधी युपीए सरकारच्या कार्यकाळात रेल्वे अर्थसंकल्पात सुतोवाच करण्यात आलेल्या कोल्हापूर-राजापूर या नवीन मार्गाला सुरेश प्रभूंच्या रेल्वेमंत्रिपदाचा फायदा होण्याची आशा निर्माण झाली आहे. या मागणीचा सातत्याने पाठपुरावा केला गेला तर प्रत्यक्षात हा मार्ग अस्तित्त्वात यायला वेळ लागणार नाही. या नवीन मार्गामुळे कोल्हापूर (पश्चिम महाराष्ट्र) व राजापूर (कोकण) यांच्या दृष्टीने अत्यंत सोयीस्कर व किफायतशीर असाच प्रवास लाभणार आहे.दळणवळणाच्या दृष्टीने कोकण रेल्वे व पश्चिम महाराष्ट्राशी संबंधित विशेषत: कोल्हापूर या जिल्ह्याला जोडणारा अद्याप तरी मार्ग नाही. त्या पार्श्वभूमीवर राजापूर-कोल्हापूर अशा नवीन मार्गाची घोषणा चार-पाच वर्षापूर्वी झालेल्या रेल्वेच्या अर्थसंल्पनात करण्यात आली होती आणि त्यानंतर राजापूरवासियांच्या आशा पल्लवीत झाल्या होत्या. मात्र, त्यानंतर काहीच हालचाल न झाल्याने शासनाची आणि पर्यायाने तत्कालीन केंद्रीय रेल्वेमंत्र्यांची घोषणा पोकळ ठरली होती. अधूनमधून या मागणीचा पुनरुच्चार झाला. मात्र त्यादृष्टीने प्रयत्न झाले नाहीत. मागणीचा रेटा लावण्यासाठी एकजूट नसल्याने हा प्रश्न अजूनही जैसे थेच आहे.या नियोजित मार्गाचे सर्वेक्षण सुरु आहे, अशीही उत्तरे दिली गेली. तथापि हा मार्ग नक्की कुठून असेल ते आजतागायत स्पष्ट करण्यात आलेले नाही. त्यामुळे निर्माण झालेली संभ्रमावस्था कायम राहिली आहे. दरम्यान कोल्हापूर-रत्नागिरी, कोल्हापूर -चिपळूण अशा नवीन रेल्वे मार्गाबाबतही अधूनमधून काही ना काही माहिती पुढे येत आहे. त्यामुळे कोल्हापूर-राजापूर असा मार्ग होणार की, चिपळूण-कोल्हापूर असा मार्ग होणार, हा प्रश्न अजून कायम आहे.याआधी संसदेत राजापूर लोकसभा मतदार संघाचे प्रतिनिधित्त्व केलेल्या सुरेश प्रभूंसारख्या अभ्यासू व्यक्तींकडे आता रेल्वे खात्याचे मंत्रीपद असल्याने राजापूर-कोल्हापूर मार्गाच्या कामाला गती मिळेल, अशी अपेक्षा राजापूरकर व्यक्त करत आहेत.पश्चिम महाराष्ट्राशी नाते जोडणारा असा हा नियोजित मार्ग ठरु शकेल. बाजारपेठ म्हणून कोल्हापूर हे कोकणासाठी महत्त्वाचे ठिकाण आहे. त्यामुळे कोल्हापूर-राजापूर रेल्वेमार्ग झाला तर भविष्यात राजापूरचे महत्वही वाढेल. त्यामुळे हा मार्ग व्हावा आणि त्यासाठी राजापूर तालुक्यातील लोकप्रतिनिधींकडून रेल्वेमंत्री सुरेश प्रभू यांच्याकडे पाठपुरावा केला जावा, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे. त्यासाठी सर्वसामान्यांच्या मागणीला महत्त्व येणार आहे. जर ही मागणी पूर्ण झाली तर पश्चिम महाराष्ट्र आणि कोकण यांचं व्यापारी नातं तयार होणार आहे.(प्रतिनिधी)