शहरं
Join us  
Trending Stories
1
"हा अमेरिकेचा दुटप्पीपणाच, भारताने आता..."; शशी थरुर यांनी मोदी सरकारला काय दिला सल्ला?
2
"राष्ट्रहिताच्या रक्षणासाठी आम्ही..."; ५० टक्के टॅरिफनंतर भारताचे डोनाल्ड ट्रम्प यांना उत्तर
3
"अंधभक्तांना विनंती, राजकीय नियुक्तीचे समर्थन करु नका; कारण..."; रोहित पवारांनी काय दिला इशारा?
4
अहिल्यानगर: चौथीत शिकणाऱ्या मुलीवर शिक्षकाकडूनच अत्याचाराचा प्रयत्न, नेत्याने प्रकरण दाबले; पण...
5
डोनाल्ड ट्रम्प यांनी टाकला 'टॅरिफ' बॉम्ब! भारतावर लादला तब्बल ५० टक्के कर, आदेशावर केली स्वाक्षरी
6
'पंतप्रधानांना महादेवाची प्रतिमा भेट दिली, कारण...'; उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे मोदींच्या भेटीनंतर काय बोलले?
7
कोल्हापुरकरांसाठी आनंदाची बातमी! वनताराच्या सीईओंनी केली मोठी घोषणा; महास्वामीही म्हणाले, अंबानींच्या भूमिकेला....
8
बापाचा दारु प्यायल्यामुळे मृत्यू, बारचालकांचा बदला घेण्यासाठी मुलगा बनला चोर; सगळं प्रकरण ऐकून पोलिसही चक्रावले
9
उद्धव ठाकरे-राज ठाकरेंची युती झाली! मुंबई पालिकेआधी 'या' निवडणुका एकत्र लढवणार...
10
Ankita Lokhande: मुंबई पोलिसांचे आभार... 'त्या' दोन बेपत्ता मुली सुखरूप; अंकिता लोखंडेने दिली माहिती
11
Mumbai Rape: प्रशिक्षणाच्या नावाखाली १३ वर्षाच्या मुलीवर लैंगिक अत्याचार, क्रिकेट प्रशिक्षकाला अटक
12
यंदा चिंचपोकळीच्या ‘चिंतामणी’चं आगमन कधी? गणेशभक्तांनो 'ही' तारीख ठेवा लक्षात!
13
डोनाल्ड ट्रम्प यांनी केली उत्तराधिकाऱ्याची घोषणा, जाहीर केलं या नेत्याचं नाव    
14
संघाचा शतकमहोत्सव थाटात साजरा होणार, कार्यक्रमांची रेलचेल, देशोदेशीच्या दूतावासांना निमंत्रण, पण...
15
Dharali Cloud Burst: उरले फक्त दगड आणि गाळ! ढगफुटीनंतरचा धरालीतील पहिला ड्रोन व्हिडीओ
16
Vaishnavi Patil : छोरियां छोरों से कम नहीं! कल्याणच्या ढाबा चालकाच्या लेकीची कुस्तीत मोठी झेप, दिग्गजांना केलं चितपट
17
मुंबईत भरणार 'क्रीडा महाकुंभ'! लेझीम, फुगडीसह शिवकालीन पारंपरिक खेळांना मिळणार पुनर्वैभव
18
गलवानमधील संघर्षानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी पहिल्यांदाच चीनच्या दौऱ्यावर जाणार, एससीओ संमेलनात सहभागी होणार
19
मोबाईलमध्ये नको ते व्हिडिओ सापडले, भीतीपोटी पतीला मारले; जीव वाचवण्यासाठी प्रियकराला अडकवले, पण...
20
विकेटची गॅरेंटी देणारा बुमराहच ठरतोय टीम इंडियासाठी 'पनौती'? भयावह आकडेवारीवर सचिन तेंडुलकर म्हणाला...

रेल्वेमार्गासाठी प्रयत्न अन् एकजूट हवी

By admin | Updated: December 17, 2014 22:51 IST

अनेक वर्षांचे स्वप्न : कोकणचं पश्चिम महाराष्ट्राशी नातं जुळणार?

राजापूर : याआधी युपीए सरकारच्या कार्यकाळात रेल्वे अर्थसंकल्पात सुतोवाच करण्यात आलेल्या कोल्हापूर-राजापूर या नवीन मार्गाला सुरेश प्रभूंच्या रेल्वेमंत्रिपदाचा फायदा होण्याची आशा निर्माण झाली आहे. या मागणीचा सातत्याने पाठपुरावा केला गेला तर प्रत्यक्षात हा मार्ग अस्तित्त्वात यायला वेळ लागणार नाही. या नवीन मार्गामुळे कोल्हापूर (पश्चिम महाराष्ट्र) व राजापूर (कोकण) यांच्या दृष्टीने अत्यंत सोयीस्कर व किफायतशीर असाच प्रवास लाभणार आहे.दळणवळणाच्या दृष्टीने कोकण रेल्वे व पश्चिम महाराष्ट्राशी संबंधित विशेषत: कोल्हापूर या जिल्ह्याला जोडणारा अद्याप तरी मार्ग नाही. त्या पार्श्वभूमीवर राजापूर-कोल्हापूर अशा नवीन मार्गाची घोषणा चार-पाच वर्षापूर्वी झालेल्या रेल्वेच्या अर्थसंल्पनात करण्यात आली होती आणि त्यानंतर राजापूरवासियांच्या आशा पल्लवीत झाल्या होत्या. मात्र, त्यानंतर काहीच हालचाल न झाल्याने शासनाची आणि पर्यायाने तत्कालीन केंद्रीय रेल्वेमंत्र्यांची घोषणा पोकळ ठरली होती. अधूनमधून या मागणीचा पुनरुच्चार झाला. मात्र त्यादृष्टीने प्रयत्न झाले नाहीत. मागणीचा रेटा लावण्यासाठी एकजूट नसल्याने हा प्रश्न अजूनही जैसे थेच आहे.या नियोजित मार्गाचे सर्वेक्षण सुरु आहे, अशीही उत्तरे दिली गेली. तथापि हा मार्ग नक्की कुठून असेल ते आजतागायत स्पष्ट करण्यात आलेले नाही. त्यामुळे निर्माण झालेली संभ्रमावस्था कायम राहिली आहे. दरम्यान कोल्हापूर-रत्नागिरी, कोल्हापूर -चिपळूण अशा नवीन रेल्वे मार्गाबाबतही अधूनमधून काही ना काही माहिती पुढे येत आहे. त्यामुळे कोल्हापूर-राजापूर असा मार्ग होणार की, चिपळूण-कोल्हापूर असा मार्ग होणार, हा प्रश्न अजून कायम आहे.याआधी संसदेत राजापूर लोकसभा मतदार संघाचे प्रतिनिधित्त्व केलेल्या सुरेश प्रभूंसारख्या अभ्यासू व्यक्तींकडे आता रेल्वे खात्याचे मंत्रीपद असल्याने राजापूर-कोल्हापूर मार्गाच्या कामाला गती मिळेल, अशी अपेक्षा राजापूरकर व्यक्त करत आहेत.पश्चिम महाराष्ट्राशी नाते जोडणारा असा हा नियोजित मार्ग ठरु शकेल. बाजारपेठ म्हणून कोल्हापूर हे कोकणासाठी महत्त्वाचे ठिकाण आहे. त्यामुळे कोल्हापूर-राजापूर रेल्वेमार्ग झाला तर भविष्यात राजापूरचे महत्वही वाढेल. त्यामुळे हा मार्ग व्हावा आणि त्यासाठी राजापूर तालुक्यातील लोकप्रतिनिधींकडून रेल्वेमंत्री सुरेश प्रभू यांच्याकडे पाठपुरावा केला जावा, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे. त्यासाठी सर्वसामान्यांच्या मागणीला महत्त्व येणार आहे. जर ही मागणी पूर्ण झाली तर पश्चिम महाराष्ट्र आणि कोकण यांचं व्यापारी नातं तयार होणार आहे.(प्रतिनिधी)