शहरं
Join us  
Trending Stories
1
मीरा भाईंदर: "...त्यातूनच लाडकी बहीण योजनेचा जन्म झाला"; एकनाथ शिंदे यांनी सांगितली कहाणी
2
अमेरिकेचं ‘ऑपरेशन हॉकआय स्ट्राइक’, इस्लामिक स्टेटच्या 70 ठिकाणांवर US चे मोठे हल्ले; प्रकरण काय?
3
"नीतीश वडिलांप्रमाणे, बाप-लेकीत..."; बिहार 'नकाब' वादावर राज्यपाल आरिफ मोहम्मद खान स्पष्टच बोलले
4
संरक्षण मंत्रालयात खळबळ; लेफ्टनंट कर्नल दीपक शर्मा यांना लाच घेताना सीबीआयने पकडले; घरात सापडले २ कोटींहून अधिक रोख
5
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
6
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
7
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
8
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
9
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
10
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
11
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
12
“भ्रष्ट महायुती सरकार विरोधात काँग्रेसचा वैचारिक लढा, मनपा निवडणुकीत...”: हर्षवर्धन सपकाळ
13
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
14
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
15
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
16
'त्या' प्रश्नावर सूर्याची बोलतीच बंद! सर्वांसमोर मुख्य निवडकर्ते आगरकरांना म्हणाला; "तुम्हीच सांगा"
17
खळबळजनक दावा! एपस्टीन फाईल्समध्ये Modi On Board उल्लेख, एका केंद्रीय मंत्र्याचेही नाव समोर
18
India T20 World Cup Squad Announced : टी-२० वर्ल्ड कपसाठी टीम इंडियाची घोषणा! गिलचा पत्ता कट, ईशान किशनला संधी
19
२०×१२×२० SIP Rule ची कमाल, दर महिन्याची छोटी रक्कम बनवेल कोट्यधीश; सोप्या भाषेत समजून घ्या
20
तुमचे आरोग्य खऱ्याच गोष्टीस पात्र आहे! बनावट उत्पादनांविरोधात हर्बालाइफ इंडियाचा उपक्रम
Daily Top 2Weekly Top 5

‘वनटाईम सेटलमेंट’चा प्रश्न अखेर मार्गी

By admin | Updated: September 9, 2014 23:55 IST

संदेश पारकर : तिलारी प्रकल्पग्रस्तांना मिळणार न्याय

कणकवली, सावंतवाडी : तिलारी प्रकल्पग्रस्तांना ‘वनटाईम सेटलमेंट’ म्हणून ५ लाख रुपये देण्याच्या निर्णयावर महाराष्ट्र राज्य कॅबिनेट मंत्रिमंडळाच्या बैठकीत मंगळवारी शिक्कामोर्तब करण्यात आले आहे. त्यामुळे या प्रकल्पग्रस्तांना आता लवकरच या रकमेचे वाटप करण्यात येणार असल्याची माहिती कोकण सिंचन पाटबंधारे महामंडळाचे उपाध्यक्ष संदेश पारकर यांनी ‘लोकमत’शी बोलताना दिली. तिलारी प्रकल्पामुळे १११० प्रकल्पग्रस्त बाधित झाले आहेत. त्यांना शासनाने नोकरीत सामावून घ्यावे अथवा ‘वनटाईम सेटलमेंट’ म्हणून एकरकमी रक्कम द्यावी, अशी मागणी प्रकल्पग्रस्तांच्यावतीने करण्यात येत होती. याबाबत आंदोलनही करण्यात आले होते. १ आॅगस्ट २०१४ रोजी महाराष्ट्र तसेच गोव्याच्या मुख्यमंत्र्यांची संयुक्त बैठक याबाबत झाली. यामध्ये प्रकल्पग्रस्तांना ५ लाख रुपये देण्याचा निर्णय घेण्यात आला.जलसंपदा विभागाकडून याबाबतची फाईल वित्त विभागाकडे पाठविण्यात आली. मात्र, वित्त विभागाचे प्रधान सचिव श्रीवास्तव व उपसचिव आठवले यांनी ही फाईल थांबविली होती. असा निर्णय शासनाने घेतल्यास इतर ठिकाणच्या प्रकल्पग्रस्तांनाही अशाचप्रकारे एकरकमी रक्कम द्यावी लागेल, असे त्यांचे म्हणणे होते. याबाबतचा निर्णय कॅबिनेट मंत्रिमंडळाच्या बैठकीत घ्यावा, अशी सूचनाही त्यांनी केली होती. उद्योगमंत्री नारायण राणे यांनी तिलारी प्रकल्पग्रस्तांच्या समस्येबाबत आग्रही भूमिका घेतली. मंगळवारी मुंबई येथे झालेल्या कॅबिनेट मंत्रिमंडळाच्या बैठकीत मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण, जलसंपदा मंत्री हसन मुश्रीफ यांच्या उपस्थितीत तिलारी प्रकल्पग्रस्तांना एकरकमी ५ लाख रुपये देण्याच्या निर्णयावर शिक्कामोर्तब करण्यात आले.प्रकल्पग्रस्तांना या रकमेचे वाटप करण्यामध्ये विधानसभेच्या आचारसंहितेची कोणतीही आडकाठी येणार नाही. महाराष्ट्र शासनाचा २६.७३ टक्के तर गोवा शासनाचा ७३.३४ टक्के इतका वाटा आहे. महाराष्ट्र शासन आपल्याकडील निधी तत्काळ उपलब्ध करून देईल, असेही पारकर यांनी सांगितले. (वार्ताहर)