शहरं
Join us  
Trending Stories
1
Mumbai Rain: मुंबईत उद्या अतिवृष्टीचा इशारा; कामाशिवाय घराबाहेर पडू नका, BMC च्या सूचना
2
"ठाकरेंना हात जोडून विनंती की...!" उद्धव ठाकरे यांच्या शेतकऱ्यांसंदर्भातील 'त्या' विधानावर गुलाबराव पाटलांची एका वाक्यात प्रतिक्रिया
3
शेतकऱ्यांना मदत कधीपर्यंत मिळणार? DCM एकनाथ शिंदेंनी दिली आनंदाची बातमी; बळीराजाची दिवाळी गोड होणार!
4
Asia Cup Final 2025: भारत की पाकिस्तान, कोण जिंकणार? ग्रहांची साथ कुणाला? मोठी भविष्यवाणी...
5
प्रेरणादायी! सामान्य भाजी विक्रेत्याचे असामान्य दान; पूरग्रस्तांसाठी दिले १ लाख, माणुसकी जपली
6
विदर्भात 'या' जिल्ह्यांना मुसळधार पावसाचा फटका, पिकांचे अतोनात नुकसान ! अजून किती दिवस जोर राहणार कायम?
7
यावेळी बिहारमध्ये चार-चार दिवाळी उत्सव, किती जागा जिंकणार NDA? अमित शाह यांनी सेट केलं टार्गेट; राहुल-तेजस्वी यांच्यावरही बरसले
8
“आई कृपा कर, सरकारला बुद्धी दे!”; बाळासाहेब थोरातांचे मोहटादेवी चरणी साकडे, नुकसानीची पाहणी
9
“सोनू सूद पंजाबच्या मदतीला धावला, मराठी कलावंतांनी मराठवाड्याला मदत करावी”: अमोल मिटकरी
10
“भाजपाला प्रशासन चालवता येत नाही, CM सहायता फंडाबाबत फडणवीसांनी बोलू नये”; ठाकरेंचा पलटवार
11
महाराष्ट्रावर प्रचंड मोठे संकट असताना पंतप्रधान का फिरकले नाहीत? काँग्रेसचा सवाल
12
कंटाळा आला म्हणून मुलींनी मागवले ऑनलाइन जेवण; मद्यधुंद आईला राग अनावर, लेकींना बेदम मारहाण
13
३० सेकंदात रुग्णवाहिका तिथून निघून गेली; आरोपी गगनप्रीत कौरला जामीन मंजूर, कोर्टाने काय म्हटले?
14
१ ऑक्टोबरपासून लागू होणार ट्रेन तिकीट बुकींगचा नवा नियम, झटपट आटोपून घ्या हे काम, अन्यथा...
15
“पूरग्रस्तांचे संसार पुन्हा उभे करण्यासाठी सर्वस्व पणाला लावू”; अजित पवारांचा VCद्वारे संवाद
16
नवरात्रात सोनं खरेदी करणं झालं अवघड! सर्वकालीन उच्चांकी पातळीच्या अगदी जवळ जाऊन पोहोचलं; चेक करा 'लेटेस्ट रेट'
17
“PM केअर फंडात महाराष्ट्राचाही पैसा, ५० हजार कोटींची मदत जाहीर करावी”; उद्धव ठाकरेंची मागणी
18
“संकट आले तेव्हा आम्ही पंचांग काढून बसलो नाही, सरकारने सरसकट कर्जमाफी द्यावी”: उद्धव ठाकरे
19
दुहेरी हत्येच्या प्रयत्नाने दिल्ली हादरली, पतीने पत्नी आणि मुलावर झाडल्या गोळ्या 
20
'सोनम वांगचुकच्या संपर्कात पाकिस्तानी नागरिक, बांगलादेशातही गेले'; पोलिसांचा धक्कादायक खुलासा

नगरपंचायत क्षेत्रातील कुळांचा प्रश्न ‘जैसे थे’

By admin | Updated: June 20, 2015 00:34 IST

ही उद्भवलेली नवीन समस्या शासनासमोर मांडून लवकरच त्याबाबत योग्य निर्णय देऊ, अशी ग्वाही आयुक्तांनी दिली आहे.

रत्नागिरी : शासनाने बेदखल कुळांच्या अनेक वर्षांच्या समस्या संपवण्याच्या दृष्टीने मुंबई कूळवहिवाट व शेतजमीन अधिनियम १९४८ अंतर्गत सुधारणा अधिनियम लागू करून त्यांना मालकी हक्क मिळवून देण्याचा प्रयत्न केला असला तरी जिल्ह्यात नव्याने स्थापन झालेल्या नगरपंचायतींच्या क्षेत्रातील कुळांना मात्र या कायद्यापासून वंचित राहण्याची वेळ आली आहे.बेदखल कुळांना तसेच कुळवहिवाटदारांना आपला कूळहक्क शाबूत करण्यात यावा, यासाठी शासनाने मुंबई कूळवहिवाट व शेतजमीन अधिनियम १९४८ यात सुधारणा करून तशी तरतूद केली आहे. मात्र, यातही अडचणी येतच होत्या. त्यातच आता जिल्ह्यात नव्याने स्थापन झालेल्या मंडणगड, लांजा, देवरूख, गुहागर या नगरपंचायतींच्या क्षेत्रात येणाऱ्या कुळांना आता आपल्या मालकीहक्कापासून वंचित राहण्याची वेळ आली आहे. शासनाच्या या कायद्याने ग्रामीण भागातील कुळांनाच कूळहक्क शाबूत करता येते. नगरपरिषद अथवा नगरपंचायतीच्या क्षेत्रात येणाऱ्या कुळांसाठी तशी कायद्यात तरतूद नाही. त्यामुळे यावर्षी निर्माण झालेल्या या चार नगरपंचायतींच्या कार्यक्षेत्रात येणाऱ्या कुळांना आता नव्या समस्येला सामोरे जावे लागणार आहे.गुहागरमधील असगोली, लांजा शहर, गुहागर शहर आणि देवरूख शहर पूर्वी ग्रामीण भागात येत असल्याने येथील कुळांनी वहिवाट शाबूत करण्यासाठी प्रस्ताव दाखल केलेले आहेत. मात्र, आता या चारही शहरात नगरपंचायत झाल्याने ही शहरे ग्रामीण क्षेत्रात न येता नगरपंचायतीत समाविष्ट झाली आहेत. शहरातील कूळवहिवाटदारांच्या मालकीची जमीनही आता नगरपंचायतीच्या क्षेत्रात येत असल्याने नगरपंचायतीच्या आकृतीबंधानुसार त्यावर कुळांना हक्क सांगता येणार नाही. त्यामुळे आता ही कुळे अडचणीत आली आहेत.असगोली हे गाव गुहागर नगरपंचायतीमध्ये समाविष्ट झाले आहे. याबाबत असगोलीतील कुळांनी कोकण आयुक्त राधेश्याम मोपलवार यांच्या अध्यक्षतेखाली कोकण दौऱ्यावर आलेल्या समितीसमोर आपली व्यथा मांडली. ही उद्भवलेली नवीन समस्या शासनासमोर मांडून लवकरच त्याबाबत योग्य निर्णय देऊ, अशी ग्वाही आयुक्तांनी दिली आहे. मात्र, याबाबत सुधारणा होईस्तोवर कुळांना आपल्या जमिनीच्या हक्कासाठी झगडावे लागणार आहे. नगरपंचायत क्षेत्रातील कुळांना याबाबतचा न्याय कधी मिळणार, असा सवाल विचारला जात आहे. (प्रतिनिधी)