शहरं
Join us  
Trending Stories
1
बांगलादेश पेटला! २८ पत्रकारांना जिवंत जाळण्याचा प्रयत्न, एका हिंदूला झाडाला उलटे टांगून जाळले...
2
महापालिका निवडणुकीत एकनाथ शिंदेंना मोठा धक्का; शिंदेसेनेच्या पदाधिकाऱ्यांचा सामुहिक राजीनामा
3
दिल्लीचे प्रदूषण रोखण्यासाठी चीनचा 'धक्कादायक' सल्ला! ३००० मोठे उद्योग बंद करण्याची सूचना; बीजिंगच्या धर्तीवर प्लॅन तयार?
4
"...म्हणून आम्ही सांगत होतो करा सदैव हिंदुत्वाची कदर"; पवारांचा उल्लेख, आशिष शेलारांनी उद्धव ठाकरेंवर डागली तोफ
5
Investment Plan : केवळ एका वर्षासाठी गुंतवणूक करायचीये? 'हे' ५ पर्याय देऊ शकतात तुम्हाला जबरदस्त रिटर्न, जाणून घ्या
6
गृहकर्जावर होईल १८ लाख रुपयांपर्यंतची बचत! EMI कमी करण्यापेक्षा वापरावा लागेल 'हा' पर्याय
7
कोल्हापूर हादरलं! मुलानेच केली आई-वडिलांची हत्या; धक्कादायक कारण आले समोर
8
ICICI Prudential AMC IPO Listing: आयसीआयसीआय प्रूडेंशियल एएमसीच्या आयपीओनं केलं मालामाल; प्रत्येक शेअरवर मिळाला 'इतका' नफा
9
बांगलादेशात ISI सक्रीय, कंटरपंथींकडून जाळपोळ, हिंसाचार सुरू; भारताविरोधात पाकिस्तानचं षडयंत्र?
10
नोकरी बदलणाऱ्यांना EPFO चा मोठा दिलासा! 'ब्रेक'बाबतचे नियम बदलले; आता शनिवार-रविवारची सुट्टी अडथळा ठरणार नाही
11
Dolphin in Mumbai: मुंबईकरांना सुखद धक्का! वरळी सी फेसच्या समुद्रकिनाऱ्यावर डॉल्फिनची मस्ती, व्हिडीओ व्हायरल
12
मुंबईत ठाकरे बंधू युतीत शरद पवारांची राष्ट्रवादी सहभागी होणार?; २२ जागांचा देणार प्रस्ताव
13
VIDEO: दादरमध्ये अजब प्रकार, एक तरुण या इमारतीवरुन त्या इमारतीवर मारतोय उड्या; पोलिसांची दमछाक
14
Stock Market Today: शेअर बाजाराची जबरदस्त सुरुवात; Sensex ची ३३० अंकांनी उसळी; IT Stocks सुस्साट
15
अमेरिकेतील नॉर्थ कॅरोलिनामध्ये जेट विमानाचा अपघात; संपूर्ण कुटुंबच उद्ध्वस्त
16
'...तर त्यांचा एक हात तोडून दुसऱ्या हातात दिला असता'; इम्तियाज जलील मंत्री संजय निषाद यांच्यावर संतापले
17
'या' कंपनीच्या गुंतवणूकदारांना ₹५५,५५० कोटींपेक्षा अधिकचा फटका; १६ महिन्यांत स्टॉक ८० टक्क्यांनी आपटला
18
मुंबई विमानतळाची गोपनीय माहिती चोरट्यांच्या हाती; ऐरोलीतील घटना : अदानी ग्रुपच्या मॅनेजरचा लॅपटॉप चोरीला
19
मी सर्वांसमोर तिला चुकीच्या पद्धतीने का किस करेल? ट्रोल झाल्यावर राकेश बेदींनी दिलं स्पष्टीकरण
20
Vijay Mallya : देशातून फरार, पण लंडनमध्ये मात्र जोरदार सेलिब्रेशन; ललित मोदीच्या घरी झाली विजय माल्ल्याची जंगी बर्थ डे पार्टी
Daily Top 2Weekly Top 5

नगरपंचायत क्षेत्रातील कुळांचा प्रश्न ‘जैसे थे’

By admin | Updated: June 20, 2015 00:34 IST

ही उद्भवलेली नवीन समस्या शासनासमोर मांडून लवकरच त्याबाबत योग्य निर्णय देऊ, अशी ग्वाही आयुक्तांनी दिली आहे.

रत्नागिरी : शासनाने बेदखल कुळांच्या अनेक वर्षांच्या समस्या संपवण्याच्या दृष्टीने मुंबई कूळवहिवाट व शेतजमीन अधिनियम १९४८ अंतर्गत सुधारणा अधिनियम लागू करून त्यांना मालकी हक्क मिळवून देण्याचा प्रयत्न केला असला तरी जिल्ह्यात नव्याने स्थापन झालेल्या नगरपंचायतींच्या क्षेत्रातील कुळांना मात्र या कायद्यापासून वंचित राहण्याची वेळ आली आहे.बेदखल कुळांना तसेच कुळवहिवाटदारांना आपला कूळहक्क शाबूत करण्यात यावा, यासाठी शासनाने मुंबई कूळवहिवाट व शेतजमीन अधिनियम १९४८ यात सुधारणा करून तशी तरतूद केली आहे. मात्र, यातही अडचणी येतच होत्या. त्यातच आता जिल्ह्यात नव्याने स्थापन झालेल्या मंडणगड, लांजा, देवरूख, गुहागर या नगरपंचायतींच्या क्षेत्रात येणाऱ्या कुळांना आता आपल्या मालकीहक्कापासून वंचित राहण्याची वेळ आली आहे. शासनाच्या या कायद्याने ग्रामीण भागातील कुळांनाच कूळहक्क शाबूत करता येते. नगरपरिषद अथवा नगरपंचायतीच्या क्षेत्रात येणाऱ्या कुळांसाठी तशी कायद्यात तरतूद नाही. त्यामुळे यावर्षी निर्माण झालेल्या या चार नगरपंचायतींच्या कार्यक्षेत्रात येणाऱ्या कुळांना आता नव्या समस्येला सामोरे जावे लागणार आहे.गुहागरमधील असगोली, लांजा शहर, गुहागर शहर आणि देवरूख शहर पूर्वी ग्रामीण भागात येत असल्याने येथील कुळांनी वहिवाट शाबूत करण्यासाठी प्रस्ताव दाखल केलेले आहेत. मात्र, आता या चारही शहरात नगरपंचायत झाल्याने ही शहरे ग्रामीण क्षेत्रात न येता नगरपंचायतीत समाविष्ट झाली आहेत. शहरातील कूळवहिवाटदारांच्या मालकीची जमीनही आता नगरपंचायतीच्या क्षेत्रात येत असल्याने नगरपंचायतीच्या आकृतीबंधानुसार त्यावर कुळांना हक्क सांगता येणार नाही. त्यामुळे आता ही कुळे अडचणीत आली आहेत.असगोली हे गाव गुहागर नगरपंचायतीमध्ये समाविष्ट झाले आहे. याबाबत असगोलीतील कुळांनी कोकण आयुक्त राधेश्याम मोपलवार यांच्या अध्यक्षतेखाली कोकण दौऱ्यावर आलेल्या समितीसमोर आपली व्यथा मांडली. ही उद्भवलेली नवीन समस्या शासनासमोर मांडून लवकरच त्याबाबत योग्य निर्णय देऊ, अशी ग्वाही आयुक्तांनी दिली आहे. मात्र, याबाबत सुधारणा होईस्तोवर कुळांना आपल्या जमिनीच्या हक्कासाठी झगडावे लागणार आहे. नगरपंचायत क्षेत्रातील कुळांना याबाबतचा न्याय कधी मिळणार, असा सवाल विचारला जात आहे. (प्रतिनिधी)