शहरं
Join us  
Trending Stories
1
पहलगाम हल्ल्यानंतर पहिल्यांदाच पंतप्रधान मोदींना भेटले मुख्यमंत्री उमर अब्दुल्ला, 30 मिनिटे चालली चर्चा
2
IPL 2025: कगिसो रबाडा ड्रग टेस्टमध्ये दोषी, झाले निलंबन! स्पर्धा सोडून परतला मायदेशी
3
पाकिस्तानी महिलेशी केलेला विवाह लपवला; CRPF ने देशासाठी धोकादायक म्हणत मुनीर अहमदला केले बडतर्फ
4
मुफ्ती दहशतवाद्यांच्या घरी जायच्या, काश्मिरी पंडितांना हाकलून कोणी दिलं? फारुख अब्दुल्लांचा आरोप
5
"आम्ही पाकिस्तानी लोकांना मारणार नाही, कारण..."; काय म्हणाले फारुख अब्दुल्ला? सिंधूच्या पाण्यासंदर्भातही मोठं विधान
6
IHMCL Recruitment: आयएचएमसीएलमध्ये नोकरी, एक लाखांहून अधिक पगार; जाणून घ्या पात्रता आणि निवड
7
"घरं तोडायला येतील त्यांना सांगा, राज ठाकरेंशी बोलून घ्या"; एल्फिन्स्टन पूल बाधितांना मनसेने दिला धीर
8
"मी सत्तेसाठी कधीच हपापलेलो नाही, सर्वाधिक सत्ता..."; अजित पवारांनी मांडलं रोखठोक मत
9
Alka Kubal: अलका कुबल यांनी 'माहेरची साडी'साठी घेतलं होतं फक्त इतकं मानधन, पहिल्या कमाईचा आकडाही आला समोर
10
"दादांना विचारतो त्यांनी कुठल्या ज्योतिष्याकडे पाहिलं"; CM व्हावं वाटतं म्हणणाऱ्या अजित पवारांना गोगावलेंचा टोला
11
"शिंदे कसले वाघ, मंत्र्यांचा निधी वळवला जातो, अडचण येताच गावी पळून जातात": अंबादास दानवे
12
Temple: शिवालयाच्या पायरीवर असलेल्या 'या' राक्षसाला नमस्कार करून मंदिरात जाण्याचा प्रघात का?
13
पहलगाम दहशतवादी हल्ल्याचा आखाती देशांतील मराठी अनिवासी भारतीयांकडूनही तीव्र निषेध
14
बलुचिस्तानात मोठा खेला...! भारताला पोकळ धमक्या देणारा पाक उघडा पडला; सरकारी इमारतींवर बंडखोरांचा ताबा, लावली आग
15
१३२ सेवा, २४ राज्ये, २८४ जिल्ह्यांना जोडणाऱ्या ‘वंदे भारत’मुळे रेल्वेची किती कमाई होते?
16
Pune Accident: कीर्तन ऐकून घरी परतताना भरधाव मर्सिडीजनं उडवलं; दुचाकीस्वार जागीच ठार
17
Hingoli: डिव्हायडर तोडून टिप्पर थेट ऑटोवर उलटला; टिप्परखाली दबून दोन प्रवाशांचा मृत्यू
18
“प्रत्येकाने सद्भावना मंत्र जोपासावा, महाराष्ट्र धर्म वाचवण्यासाठी काँग्रेसचा सत्याग्रह”
19
कमालच झाली राव! लहान मुलंच म्हणतील फोनला टाटा-बायबाय; फक्त पालकांनी करावं असं काही...
20
मुंबई, पंजाब नाहीतर 'हा' संघ जिंकणार आयपीएलची ट्रॉफी; सुनील गावस्कर यांची भविष्यवाणी

नगरपंचायत क्षेत्रातील कुळांचा प्रश्न ‘जैसे थे’

By admin | Updated: June 20, 2015 00:34 IST

ही उद्भवलेली नवीन समस्या शासनासमोर मांडून लवकरच त्याबाबत योग्य निर्णय देऊ, अशी ग्वाही आयुक्तांनी दिली आहे.

रत्नागिरी : शासनाने बेदखल कुळांच्या अनेक वर्षांच्या समस्या संपवण्याच्या दृष्टीने मुंबई कूळवहिवाट व शेतजमीन अधिनियम १९४८ अंतर्गत सुधारणा अधिनियम लागू करून त्यांना मालकी हक्क मिळवून देण्याचा प्रयत्न केला असला तरी जिल्ह्यात नव्याने स्थापन झालेल्या नगरपंचायतींच्या क्षेत्रातील कुळांना मात्र या कायद्यापासून वंचित राहण्याची वेळ आली आहे.बेदखल कुळांना तसेच कुळवहिवाटदारांना आपला कूळहक्क शाबूत करण्यात यावा, यासाठी शासनाने मुंबई कूळवहिवाट व शेतजमीन अधिनियम १९४८ यात सुधारणा करून तशी तरतूद केली आहे. मात्र, यातही अडचणी येतच होत्या. त्यातच आता जिल्ह्यात नव्याने स्थापन झालेल्या मंडणगड, लांजा, देवरूख, गुहागर या नगरपंचायतींच्या क्षेत्रात येणाऱ्या कुळांना आता आपल्या मालकीहक्कापासून वंचित राहण्याची वेळ आली आहे. शासनाच्या या कायद्याने ग्रामीण भागातील कुळांनाच कूळहक्क शाबूत करता येते. नगरपरिषद अथवा नगरपंचायतीच्या क्षेत्रात येणाऱ्या कुळांसाठी तशी कायद्यात तरतूद नाही. त्यामुळे यावर्षी निर्माण झालेल्या या चार नगरपंचायतींच्या कार्यक्षेत्रात येणाऱ्या कुळांना आता नव्या समस्येला सामोरे जावे लागणार आहे.गुहागरमधील असगोली, लांजा शहर, गुहागर शहर आणि देवरूख शहर पूर्वी ग्रामीण भागात येत असल्याने येथील कुळांनी वहिवाट शाबूत करण्यासाठी प्रस्ताव दाखल केलेले आहेत. मात्र, आता या चारही शहरात नगरपंचायत झाल्याने ही शहरे ग्रामीण क्षेत्रात न येता नगरपंचायतीत समाविष्ट झाली आहेत. शहरातील कूळवहिवाटदारांच्या मालकीची जमीनही आता नगरपंचायतीच्या क्षेत्रात येत असल्याने नगरपंचायतीच्या आकृतीबंधानुसार त्यावर कुळांना हक्क सांगता येणार नाही. त्यामुळे आता ही कुळे अडचणीत आली आहेत.असगोली हे गाव गुहागर नगरपंचायतीमध्ये समाविष्ट झाले आहे. याबाबत असगोलीतील कुळांनी कोकण आयुक्त राधेश्याम मोपलवार यांच्या अध्यक्षतेखाली कोकण दौऱ्यावर आलेल्या समितीसमोर आपली व्यथा मांडली. ही उद्भवलेली नवीन समस्या शासनासमोर मांडून लवकरच त्याबाबत योग्य निर्णय देऊ, अशी ग्वाही आयुक्तांनी दिली आहे. मात्र, याबाबत सुधारणा होईस्तोवर कुळांना आपल्या जमिनीच्या हक्कासाठी झगडावे लागणार आहे. नगरपंचायत क्षेत्रातील कुळांना याबाबतचा न्याय कधी मिळणार, असा सवाल विचारला जात आहे. (प्रतिनिधी)