शहरं
Join us  
Trending Stories
1
यंदा जूनमध्येच 'अलमट्टी' ६१ टक्के भरले; कृष्णा नदीकाठच्या नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण
2
Raj Thackeray : 'दोन्ही ठाकरे एकत्र न आल्यास मराठी माणूस हताश होईल'; मनसे नेत्याचं मोठं विधान
3
मुख्यमंत्री फडणवीसांच्या मतदारसंघात ५ महिन्यात ८ टक्के मतदार वाढ ही मतचोरीच- हर्षवर्धन सपकाळ
4
संसाराची स्वप्न रंगवून पतीच्या घरी आली अन्...; लग्नाच्या अवघ्या दोन महिन्यात नवविवाहितेने उचलले टोकाचे पाऊल
5
'या' केसांच्या तेलामुळे गुंतवणूकदार झाले मालामाल! एका दिवसात २०% नफा, स्टॉक झाला रॉकेट!
6
"एक, दोन नव्हे, पत्नीने केली पाच लग्नं, आता दिरासोबत करतेय प्रेमाचे चाळे’’, त्रस्त पतीची पोलिसांत धाव 
7
Crime: शिक्षिकाचे शाळेतच नको ते उद्योग; २४ विद्यार्थिनींसोबत...; नराधमाला अटक!
8
IND vs ENG: ऋषभ पंत-केएल राहुलच्या शतकानंतर इंग्लंडच्या माजी गोलंदाजाचा आरोप, अंपायरनाही सुनावलं...
9
५ वर्षात चौपट झाला गुंतवणूकदारांचा पैसा, आता प्रत्येक शेअरवर मिळणार डिविडेंड; तुमच्याकडे आहे का स्टॉक?
10
बी २ बॉम्बर बनविणारा भारतीय इंजिनिअर होता, मती फिरली आणि चीनला गेला...
11
इराणच्या बाजुलाच आहे अमेरिकन लष्कराचा ताफा, कशासाठी झाला आहे वापर?
12
अरबी समुद्र, बंगालच्या उपसागराबाबत WMO चा भयानक रिपोर्ट; भारताच्या किनारपट्टीवरील शहरांना धोका
13
Turmeric Glow Trend: हळद ट्रेंड फॉलो कराल तर भयंकर संकट ओढावून घ्याल; ज्योतिषांचा अनोखा दावा!
14
'ही' कंपनी दिवाळखोर होण्यापासून वाचवणार सरकार! गुंतवणूकदारांच्या शेअरवर उड्या, ₹७ आहे किंमत
15
विमान प्रवास स्वस्त होणार! इंधन भरण्याचा त्रास संपणार, पहिल्यांदाच 'या' तंत्रज्ञानाचा वापर करुन विमान उड्डाण करणार
16
IND vs ENG: ऋषभ पंतची दोन डावात दोन शतकं, पण ICC ने केली कारवाई, कारण काय?
17
इराणच्या हल्ल्यात प्रचंड वित्तहानी, आयरन डोमच्या मर्यादा उघड, युद्धातून इस्राइलला मिळाले हे पाच धडे 
18
Raigad Boat Capsizes: रायगडमध्ये सावित्री नदीत बोट उलटली; काळजाचा ठोका चुकवणारा व्हिडीओ समोर!
19
कमी व्याजदरावर होम लोन घ्यायचंय? 'या' सरकारी बँका ठरू शकतात बेस्ट; ७.५०% पेक्षाही कमी आहेत दर 
20
ड्रॅगनची वळवळ; पँगाँग सरोवराजवळ चीन नेमकं करतोय काय? सॅटेलाईट फोटोंमधून झाली पोलखोल  

अतिरिक्त शिक्षणसेवकांचा प्रश्न धसास लावणार

By admin | Updated: April 9, 2017 17:20 IST

वेणूनाथ कडू यांचे आश्वासन, सिंधुदुर्ग दौऱ्यात शिक्षकांशी साधला संवाद

 आॅनलाईन लोकमत

कुडाळ, दि. ९ : सिंधुदुर्गातील त्या १४ शिक्षणसेवकांना न्याय मिळवून देण्यासाठी त्यांचे प्रश्न धसास लावणार, असे आश्वासन महाराष्ट्र राज्य शिक्षक परिषदेचे राज्य अध्यक्ष वेणूनाथ कडू यांनी रविवारी दिले.

सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या दौऱ्यावर असलेल्या कडू यांनी ओरोस येथे अतिरिक्त शिक्षक, शिक्षणसेवक, सर्व समस्याग्रस्त शिक्षकांसोबत बैठक घेतली, त्यात ते बोलत होते. निवडणूक निकालानंतर कडू यांनी प्रथमच सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या दौऱ्यात शिक्षकांशी संवाद साधला. यावेळी त्यांनी समायोजन प्रक्रियेसंदर्भात शिक्षकांना मार्गदर्शन केले.

यावेळी शिक्षक परिषदेचे अध्यक्ष राजेंद्र माणगावकर, सचिव सलिम तकीलदार आदींनीही मार्गदर्शन केले. कडू म्हणाले, एस. एम. हायस्कूलच्या शिक्षिका नयना कृष्णा केसरकर यांना त्यांचा संवर्ग तत्काळ मिळवून न दिल्यास शिक्षणाधिकाऱ्यांनी संबंधित शिक्षणसंस्थेवर फौजदारी कारवाई करावी, अशी मागणी केली. याशिवाय २४ जानेवारी २0१७ च्या महाराष्ट्र शासनाच्या सेवाज्येष्ठता निर्णयानुसार यादी तयार करण्याचे आदेश तत्काळ संस्थाचालकांना शिक्षणाधिकाऱ्यांनी द्यावेत, अशीही मागणी त्यांनी केली.

निवडणूक निकालानंतर प्रथमच सिंधुदुर्ग दौऱ्यात आलेल्या कडू यांनी सांगितले, की मी संघटनेचा सर्वसामान्य कार्यकर्ता आहे. मी पराभवाने खचून जाणारा कार्यकर्ता नाही. शिक्षक परिषदेचा कार्यकर्ता एका आमदाराच्या तोडीचा असला पाहिजे, असे मतही त्यांनी व्यक्त केले. माझ्या पराभवानंतर तब्बल दीड ते दोन हजार शिक्षक-शिक्षिकांनी मतदान केंद्राबाहेर ढाळलेले अश्रू फुकट जाउ देणार नाही. मेहनतीने काम करुन पुन्हा महाराष्ट्र राज्य शिक्षक परिषदेचा झेंडा कोकण मतदार संघावर फडकविणारच, असा निर्धार वेणूनाथ कडू यांनी यावेळी व्यक्त केला. यावेळी कडू यांनी निवडणुकीतील किस्से सांगून शिक्षक कार्यकर्त्यांशी संवाद साधला.

१0 एप्रिल रोजी शिक्षणाधिकाऱ्यांना भेटणार

जिल्ह्यातील सर्व शिक्षकांच्या समस्यासंदर्भात सोमवार, दि. १0 एप्रिल रोजी माध्यमिक शिक्षणाधिकारी रंगराव काळे यांची भेट घेणार असून जिल्ह्यातील सर्व शिक्षक, संस्थाचालक, पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी उपस्थित राहण्याचे आवाहन जिल्ह्याध्यक्ष राजेंद्र माणगावकर यांनी केले.

शिक्षणमंत्र्यांसमावेत १८ रोजी बैठक

शिक्षणमंत्री विनोद तावडे यांच्या निवासस्थानी सिंधुुदुर्ग जिल्ह्यातील समस्याग्रस्त शिक्षकांच्यासमवेत १८ एप्रिल रोजी बैैठक होणार आहे, अशी माहितीही कडू यांनी यावेळी दिली.