शहरं
Join us  
Trending Stories
1
विरारमध्ये इमारत कोसळून १४ जणांचा मृत्यू, ३० तासांनंतरही बचाकार्य सुरु; शेजारील चाळही उद्ध्वस्त
2
पाणीच पाणी! पावसाचं रौद्ररुप, अटारी बॉर्डर जलमग्न; पाकिस्तानच्या पंजाबमध्ये २ लाख लोक बेघर
3
आमदाराच्या मुलाच्या बंगल्यात घरकाम करणाऱ्या तरुणीचा लटकलेल्या अवस्थेत मिळाला मृतदेह
4
"ताई, तू हे काय केलंय..." निक्की प्रकरणाला नवं वळण; आणखी एक व्हिडिओ व्हायरल, गुंता आणखी वाढला
5
आता ATM आणि UPI द्वारे काढता येणार PF चे पैसे; EPFO 3.0 मध्ये आणखी काय बदलणार?
6
दुर्गा पूजेदरम्यान धुबरीत 'शूट अ‍ॅट साइट ऑर्डर' लागू, आसामचे मुख्यमंत्री हिमंत बिस्वा सरमा यांनी सांगितलं कारण
7
हृदयद्रावक! लेकीचा पहिला वाढदिवस, घर सजवलं, केक कापला आणि पाच मिनिटांत इमारत कोसळली, माय लेकीचा मृत्यू, वडील बेपत्ता
8
"गोविंदा फक्त माझा आहे, आम्हाला कोणीच...", घटस्फोटांच्या चर्चांना सुनीता अहुजाने लावलं पूर्णविराम
9
शाळेची फी भरण्यास उशीर, सहावीच्या विद्यार्थ्याला एका खोलीत नेलं आणि...; शिक्षकांविरोधात गुन्हा दाखल
10
ट्रम्प यांच्या पत्नीची 'AI चॅलेन्ज', जिंकणाऱ्याला मिळणार लाखोंचं बक्षीस...! जाणून घ्या, करायचं काय?
11
ट्रम्प टॅरिफचा बाजाराला जोरदार झटका! सेन्सेक्स ६०० अंकांनी कोसळला; काही मिनिटांत ४.१४ लाख कोटींचे नुकसान
12
टॅरिफबाबत भारत आणि अमेरिकेमध्ये चर्चेचे दरवाजे अजूनही खुले, दोन्हीकडून मिळाले संकेत  
13
Ganesh Chaturthi 2025: 'चिक मोत्याची माळ' हे अतिशय लोकप्रिय गाणे; त्याची निर्मिती कशी झाली माहितीय?
14
Russia Ukraine War: रशियाचा पुन्हा एकदा युक्रेनवर भयावह हल्ला, तीन ठार, १२ जण जखमी
15
"रशिया युक्रेन युद्ध मोदींचे" अमेरिकन राजदूताने भारताला धरलं जबाबदार, टॅरिफ कमी करण्यासाठी ठेवली अट
16
Rishi Panchami 2025: ऋषी मुनी तथा देव, मृत हरणाचे किंवा वाघाचे कातडे 'आसन' म्हणून का वापरत असत? वाचा 
17
पुतिन नव्हे..., आता झेलेन्स्कींवरच भडकले ट्रम्प, म्हणाले, "युद्ध..., युक्रेनने ऐकले नाही, तर बंदी घालेन!"
18
गजानन महाराज पुण्यतिथि: जाणून घ्या त्यांनी दिलेला सिद्धमंत्र; जो तुमचे आयुष्य बदलून टाकेल!
19
Mumbai: डॉकयार्ड रेल्वे स्टेशनजवळ सापडलेल्या मृतदेहाचा उलगडा, जमिनीच्या वादातून हत्या, तिघांना अटक
20
जामीन अर्जावरील सुनावणी ४३ वेळा पुढे ढकलल्याबद्दल सर्वोच्च न्यायालयाची नाराजी, आरोपीला दिलासा

सेनेची ‘मात्रा’ विधानसभेतही लागू पडणार!

By admin | Updated: June 6, 2014 00:18 IST

रत्नागिरी मतदारसंघ : महायुती-आघाडीत होणार चुरशीची लढत

रत्नागिरी : शिवसेनेतील एका गटाची ‘हाराकिरी’ हाच रत्नागिरी विधानसभा मतदारसंघातील गेल्या दोन विधानसभा निवडणुकीतील राजकीय चर्चेचा मुद्दा बनला आहे. महायुतीला त्यामुळे या मतदारसंघात पराभव पत्करावा लागल्याची भावना शिवसेनेच्या वरिष्ठांतही आहे. परिणामी २००४ प्रमाणेच लोकसभा निवडणुकीत मिळालेले या मतदारसंघातील मताधिक्य विधानसभेलाही मिळालेच पाहिजे, अशी रणनीती शिवसेनेने आखण्यास सुरूवात केल्याने लोकसभेची ‘मात्रा’ विधानसभा निवडणुकीत लागू पडणार काय, असा सवाल निर्माण झाला आहे. शिवसेनेच्या या धोरणामुळे रत्नागिरीत अटीतटीची निवडणूक होण्याची शक्यता निर्माण झाली आहे. दुसरीकडे गेल्या दोन विधानसभा निवडणुकीत विजयी होत आमदार व आता मंत्री म्हणून उदय सामंत यांनी आपले बस्तान बसविल्याने सेनेची ही ‘राजकीय मात्रा’ निष्प्रभ करण्यात त्यांना यश येणार काय, याबाबत राजकीय वर्तुळात चर्चेला उधाण आले आहे.यावेळी कॉँग्रेसचे नीलेश राणे यांचा पराभव करून निवडून आलेले शिवसेनेचे खासदार विनायक राऊत व शिवसेनेचे वरिष्ठ पदाधिकारी यांनी रत्नागिरीची जागा महायुतीला मिळालीच पाहिजे, असा चंग आतापासूनच बांधला आहे. त्यामुळे या निवडणुकीत प्रथमच आघाडीसमोर मोठे आव्हान उभे राहण्याची शक्यता निर्माण झाली आहे.रत्नागिरी विधानसभेची जागा मित्रपक्ष भाजपाची आहेच. परंतु राज्यात सत्तापरिवर्तन होणार असून, महायुती सत्तेत येण्यासाठी राज्यभरातील अन्य जागांप्रमाणेच रत्नागिरीची जागाही महायुतीकडे असणे आवश्यक वाटते आहे. त्यामुळेच लोकसभेप्रमाणेच निवडणूक ‘स्ट्रॅटेजी’ विधानसभा निवडणुकीत राबविली जाणार असल्याचे संकेत जिल्ह्यात महायुतीकडून दिले जात आहेत. २००४च्या लोकसभा निवडणुकीत सेनेचे अनंत गीते यांना रत्नागिरी विधानसभा मतदारसंघात ३४ हजारांपेक्षा अधिक मताधिक्य मिळाले होते. परंतु विधानसभेत बाळ माने यांना हे मताधिक्य मिळू शकले नाही, त्यामागे ‘हाराकिरी’ हा विषय होता. यावेळीही लोकसभेला रत्नागिरी विधानसभा मतदारसंघात सेनेचे राऊत यांना ३१ हजारांवर मताधिक्य मिळाले आहे.यावेळी लोकसभेत भाजपाने सेनेला या मतदारसंघात संपूर्ण सहकार्य दिले. त्यामुळे त्याची परतफेड म्हणून हाराकिरी करणार्‍यांना ‘खास मात्रा’ दिली जाणार असल्याची सेना गोटातील चर्चा आहे. खासदार विनायक राऊत यांनी तर रत्नागिरी-सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघातील सहाही विधानसभा मतदारसंघात येत्या निवडणुकीत विजय मिळणार असल्याचे सुतोवाच केले आहे. (प्रतिनिधी)