शहरं
Join us  
Trending Stories
1
तामिळनाडू हादरलं! कडलूरमध्ये भीषण अपघात; भरधाव बसने दोन कारना चिरडले, ९ जणांचा मृत्यू
2
तारिक रहमान परतण्यापूर्वी बांगलादेशात पुन्हा हिंसाचार उफाळला; ढाका बॉम्बस्फोटात एकाचा मृत्यू
3
उद्धवसेना-मनसे युतीची घोषणा; १९ वर्षांनी उद्धव आणि राज दोन्ही भाऊ आले एकत्र; या प्रश्नांचे काय?
4
संपादकीय: निवडणूक कामात शिक्षकच का? समोर दहावी, बारावीच्या परीक्षाही...
5
Today's Horoscope: आजचे राशीभविष्य, २५ डिसेंबर २०२५: आनंदाची बातमी मिळेल, कुटुंबातील वातावरण सुखावह राहील!
6
अखेर ठाकरेयुती! बदलेल ‘राज’नीती?  कोणत्याही भांडणापेक्षा महाराष्ट्र मोठा, राज-उद्धव काय म्हणाले...
7
‘निवडून आलो, तर पक्ष बदलणार नाही’, असे लिहून देता का?
8
थेट निवडलेल्या नगराध्यक्षास सदस्यत्व, मताचाही अधिकार; मंत्रिमंडळाचा निर्णय 
9
मोठा धक्का! बीकेसीतील बुलेट ट्रेन स्थानकाचे काम तात्काळ थांबवण्याची नाेटीस
10
देशातील हवाई वाहतूक क्षेत्रात आणखी दोन नव्या कंपन्यांची एन्ट्री; हिंद एअर, फ्लाईएक्स्प्रेसला केंद्र सरकारकडून मंजुरी
11
‘त्या’ कुटुंबाची जबाबदारी बांगलादेश सरकारने स्वीकारली
12
सुट्टीसाठी तळमळणाऱ्या मंत्र्यांना ‘डिसेंबर’ हुडहुडी!
13
जिथे नेटवर्क नाही, तिथेही मोबाइल चालणार; आपत्तींतही इंटरनेट मिळेल
14
बिहार संघाने नोंदवली विश्वविक्रमी धावसंख्या; वैभवने चोपल्या १९० धावा, त्याही एवढ्याच चेंडूत...
15
विजय हजारे स्पर्धेत विक्रमच विक्रम, एकाच दिवसात दोन दीड शतके, दोन स्फोटक शतके...
16
वायुप्रदूषण असेच कायम राहिल्यास बांधकामे थांबवण्याचे आदेश देऊ! मुंबई उच्च न्यायालयाचा महापालिकेला इशारा
17
कमी मद्यपानामुळेही तोंडाच्या कर्करोगाचा धोका; ‘टाटा मेमोरियल’च्या अभ्यासातील निष्कर्ष
18
घरांच्या विक्रीला ‘ब्रेक’; पुणे, मुंबईत मोठी घसरण; नव्या विमानतळामुळे...
19
Smartphones: २०२५ मधील 'टॉप ५' पैसा वसूल स्मार्टफोन, यादीत मोठ्या ब्रँड्सचा समावेश!
20
रेल्वे प्रवासादरम्यान माजी मंत्र्यांच्या बॅगवर चोरांचा डल्ला, फोन, रोख रक्कम आणि दागिने लंपास
Daily Top 2Weekly Top 5

सेनेची ‘मात्रा’ विधानसभेतही लागू पडणार!

By admin | Updated: June 6, 2014 00:18 IST

रत्नागिरी मतदारसंघ : महायुती-आघाडीत होणार चुरशीची लढत

रत्नागिरी : शिवसेनेतील एका गटाची ‘हाराकिरी’ हाच रत्नागिरी विधानसभा मतदारसंघातील गेल्या दोन विधानसभा निवडणुकीतील राजकीय चर्चेचा मुद्दा बनला आहे. महायुतीला त्यामुळे या मतदारसंघात पराभव पत्करावा लागल्याची भावना शिवसेनेच्या वरिष्ठांतही आहे. परिणामी २००४ प्रमाणेच लोकसभा निवडणुकीत मिळालेले या मतदारसंघातील मताधिक्य विधानसभेलाही मिळालेच पाहिजे, अशी रणनीती शिवसेनेने आखण्यास सुरूवात केल्याने लोकसभेची ‘मात्रा’ विधानसभा निवडणुकीत लागू पडणार काय, असा सवाल निर्माण झाला आहे. शिवसेनेच्या या धोरणामुळे रत्नागिरीत अटीतटीची निवडणूक होण्याची शक्यता निर्माण झाली आहे. दुसरीकडे गेल्या दोन विधानसभा निवडणुकीत विजयी होत आमदार व आता मंत्री म्हणून उदय सामंत यांनी आपले बस्तान बसविल्याने सेनेची ही ‘राजकीय मात्रा’ निष्प्रभ करण्यात त्यांना यश येणार काय, याबाबत राजकीय वर्तुळात चर्चेला उधाण आले आहे.यावेळी कॉँग्रेसचे नीलेश राणे यांचा पराभव करून निवडून आलेले शिवसेनेचे खासदार विनायक राऊत व शिवसेनेचे वरिष्ठ पदाधिकारी यांनी रत्नागिरीची जागा महायुतीला मिळालीच पाहिजे, असा चंग आतापासूनच बांधला आहे. त्यामुळे या निवडणुकीत प्रथमच आघाडीसमोर मोठे आव्हान उभे राहण्याची शक्यता निर्माण झाली आहे.रत्नागिरी विधानसभेची जागा मित्रपक्ष भाजपाची आहेच. परंतु राज्यात सत्तापरिवर्तन होणार असून, महायुती सत्तेत येण्यासाठी राज्यभरातील अन्य जागांप्रमाणेच रत्नागिरीची जागाही महायुतीकडे असणे आवश्यक वाटते आहे. त्यामुळेच लोकसभेप्रमाणेच निवडणूक ‘स्ट्रॅटेजी’ विधानसभा निवडणुकीत राबविली जाणार असल्याचे संकेत जिल्ह्यात महायुतीकडून दिले जात आहेत. २००४च्या लोकसभा निवडणुकीत सेनेचे अनंत गीते यांना रत्नागिरी विधानसभा मतदारसंघात ३४ हजारांपेक्षा अधिक मताधिक्य मिळाले होते. परंतु विधानसभेत बाळ माने यांना हे मताधिक्य मिळू शकले नाही, त्यामागे ‘हाराकिरी’ हा विषय होता. यावेळीही लोकसभेला रत्नागिरी विधानसभा मतदारसंघात सेनेचे राऊत यांना ३१ हजारांवर मताधिक्य मिळाले आहे.यावेळी लोकसभेत भाजपाने सेनेला या मतदारसंघात संपूर्ण सहकार्य दिले. त्यामुळे त्याची परतफेड म्हणून हाराकिरी करणार्‍यांना ‘खास मात्रा’ दिली जाणार असल्याची सेना गोटातील चर्चा आहे. खासदार विनायक राऊत यांनी तर रत्नागिरी-सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघातील सहाही विधानसभा मतदारसंघात येत्या निवडणुकीत विजय मिळणार असल्याचे सुतोवाच केले आहे. (प्रतिनिधी)