शहरं
Join us  
Trending Stories
1
जोधपूरमध्ये भीषण अपघात, टेम्पो ट्रॅव्हलर उभ्या असलेल्या ट्रकला धडकला, १५ जणांचा मृत्यू
2
धक्कादायक! बंगालमध्ये सातवीत शिकणाऱ्या मुलीवर सामुहिक अत्याचार; तिघांना अटक
3
निवडणुकांमुळे हिवाळी अधिवेशन दहा दिवस पुढे ढकलले जाणार ? राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण
4
Womens World Cup Final:'वाइल्ड कार्ड' एन्ट्रीसह आली अन् बॅटिंगनंतर बॉलिंगमध्येही 'ट्रम्प कार्ड' ठरली (VIDEO)
5
महाराष्ट्र ऑलिम्पिक संघटनेचे अध्यक्षपद अजित पवारांकडेच; चौथ्यांदा मिळवली जबाबदारी
6
IND vs SA Womens World Cup 2025 Final : ...अन् अमनजोतच्या 'रॉकेट थ्रो'सह मिळाला मोठा दिलासा (VIDEO)
7
शफालीसह दीप्तीचं अर्धशतक! दक्षिण आफ्रिकेसमोर टीम इंडियानं सेट केलं २९९ धावांचे टार्गेट
8
मोठे आश्वासन देऊ नका; 10-20%..; अमेरिकन टॅरिफबाबत रघुराम राजन यांचा इशारा
9
वर्ल्ड कप फायनलमध्ये 'लेडी सेहवाग'चा विक्रमी धमाका! धोनी-गंभीरला मागे टाकण्याचीही होती संधी, पण...
10
पाकिस्तान करतोय हल्ले, भारतानं पाठवली 'अनमोल' मदत...; दिल्लीच्या निर्णयानं अफगाणिस्तानचं मन जिंकलं, मुनीरला मिरची लागणार!
11
2026 मध्ये किती रुपयांपर्यंत जाऊ शकतं सोनं? जाणून थक्क व्हाल! आता ₹10 हजारनं स्वस्त मिळतंय, एक्सपर्ट म्हणतायत चांगली संधी
12
Fact Check: आधार कार्ड दाखवून फुकटात मिळतेय बाईक? मोदींचा व्हिडीओ व्हायरल! सत्य समोर!
13
मेक्सिकोच्या सुपरमार्केटमध्ये भीषण स्फोट, २३ जणांचा मृत्यू; नेमके काय घडले?
14
IND W vs SA W Final : वनडे 'क्वीन' स्मृतीनं रचला इतिहास! मितालीचा विक्रम मोडत ठरली 'नंबर वन'
15
शत्रूच्या हालचालींवर भारताची करडी नजर! ISRO ने लॉन्च केले नौदलाचे सर्वात शक्तिशाली सॅटेलाईट
16
'दहशतवादी हल्ल्याचा कट अमेरिकेने रचला, पाकिस्तानने घडवून आणला'; शेख हसीना यांनी मौन सोडले
17
अभिषेक शर्माचा मोठा कारनामा! हिटमॅन रोहितसह गब्बरचा विक्रम मोडत रचला नवा इतिहास
18
"राज ठाकरे हे फेक नॅरेटीव्हच्या बाबतीत राहुल गांधींशी स्पर्धा करत आहेत का?", भाजपाचा सवाल
19
'ऑपरेशन सिंदूरद्वारे विस्फोट पाकिस्तानात, अन् झोप उडाली काँग्रेसची', पीएम मोदींचा घणाघात...
20
IND vs AUS : वॉशिंग्टनची अति 'सुंदर' बॅटिंग! विक्रमी विजयासह टीम इंडियानं केली ऑस्ट्रेलियाची बरोबरी

नीलेश राणे यांच्याकडे धुरा द्या

By admin | Updated: January 16, 2016 00:52 IST

संतोष मांढरे : मंडणगड तालुक्यातील काँग्रेस कार्यकर्त्यांची मागणी

मंडणगड : रत्नागिरी जिल्हा काँग्रेस (आय) पार्टीला पक्षाचे गतवैभव परत मिळवून देण्यासाठी माजी खासदार व युवा नेते नीलेश राणे यांनी जिल्हा काँग्रेसच्या नेतृत्वपदाची धुरा आपल्या खांद्यावर घ्यावी, अशी मागणी मंडणगड तालुका काँग्रेसी कार्यकर्ते करीत असल्याची प्रतिक्रिया तालुका काँग्रेस सरचिटणीस संतोष मांढरे यांनी पत्रकरांना दिली आहे.विधानसभा निवडणुकीनंतर गेल्या वर्षभरात जिल्हा काँगे्रसला मोठी घरघर लागली आहे. जिल्ह्यातील पाचही विधानसभा मतदान क्षेत्रात पक्षात मोठ्या पराभवाचा सामना करावा लागला. शिवसेना व राष्ट्रवादीच्या लाटेत काँग्रेसचे अगदी पांरपरिक मतदानही पक्षाला शक्य झाले नाही. या पार्श्वभूमीवर काँग्रेसची सदस्य नोंदणी सोडता जिल्ह्यात पक्षाच्या वतीने पक्षवाढीसाठी गेल्या वर्षभरात कोणाताही ठोस कार्यक्रम हाती घेण्यात आलेला नाही़ या कालावधीत शेतकरी व सर्वसामान्यांचे प्रश्न गंभीर झाले आहेत, याचा राज्य शासनाला जाब विचारण्याची वेळ आली आहे. धर्मनिरपेक्ष तत्वतज्ञानाच्या आधारे देशातील सर्वसामान्य जनतेच्या प्रश्नांसाठी रस्त्यावर उतरण्याची सव्वाशे वर्षांची गौरवशाली पंरपरा या देशात केवळ काँग्रेस पक्षाला लाभली आहे. जिल्ह्यातील राजकारणात शिवसेनेच्या राजकारणाला सक्षम पर्यायांची आजही आवश्यकता आहे. पक्षाकडे युवक व बुजुर्ग अशा कार्यकर्त्यांचा सुरेख मेळ आहे. प्रत्येक जाती धर्माचे लोक या पक्षात कार्य करत आहेत, असे असताना केवळ सक्षम नेतृत्त्वाअभावी जिल्ह्यात काँग्रेस पक्ष वाढीचा वेग मंदावला आहे. या पार्श्वभूमीवर तरुण, तडफदार व सर्वसामान्यांच्या प्रश्नांची जाण असणाऱ्या व पक्षाचे दीर्घकाळ नेतृत्व करु शकेल, अशा युवा नेतृत्त्वाकडे जिल्ह्याचे नेतृत्व जाण्याची आवश्यकता आहे. युवानेते माजी खासदार नीलेश राणे यांच्याकडे नेतृत्त्वास आवश्यक असणारे सर्व गुण आहेत, याचबरोबर सर्वांना बरोबर घेऊन जाण्याचे कौशल्य त्यांच्यात आहे. मंडणगड नगरपंचायत निवडणुकीत तालुक्याने त्यांच्या नेतृत्त्वाचे गुण व मार्गदर्शन यांची प्रचिती घेतली आहे. त्यामुळे रत्नागिरी जिल्ह्याचे नेतृत्व माजी खासदार राणे यांनी स्वीकारावे, असे तालुक्यातील तमाम ज्येष्ठ व युवा कार्यकर्त्यांचे मत आहे. जिल्हा काँग्रेसचे नेतृत्व डॉ. राणे यांनी स्वीकारावे, यासाठी तालुक्यातील निवडणूक कार्यकर्त्यांचे शिष्टमंडळ लवकरच पार्टीचे प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण व ज्येष्ठ नेते नारायण राणे यांची भेट घेऊन तशी आग्रही मागणी करणार आहे, अशी माहिती संतोष मांढरे यांनी पत्रकारांना दिली. (प्रतिनिधी)वाली कोण? : जिल्ह्यात संपर्क सुरूचरत्नागिरी जिल्ह्यातील काँग्रेसला सध्या कोणीच वाली नसल्याचे दिसत आहे. त्यामुळे काँग्रेसचे कार्यकर्ते वाऱ्यावर पडले आहेत. या कार्यकर्त्यांना दिलासा देण्यासाठी विधानसभा निवडणुकीनंतर नीलेश राणे यांनी जिल्ह्यात संपर्क ठेवून कार्यकर्त्यांना आधार दिला आहे.