शहरं
Join us  
Trending Stories
1
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
2
खळबळजनक दावा! एपस्टीन फाईल्समध्ये Modi On Board उल्लेख, एका केंद्रीय मंत्र्याचेही नाव समोर
3
India T20 World Cup Squad Announced : टी-२० वर्ल्ड कपसाठी टीम इंडियाची घोषणा! गिलचा पत्ता कट, ईशान किशनला संधी
4
२०×१२×२० SIP Rule ची कमाल, दर महिन्याची छोटी रक्कम बनवेल कोट्यधीश; सोप्या भाषेत समजून घ्या
5
तुमचे आरोग्य खऱ्याच गोष्टीस पात्र आहे! बनावट उत्पादनांविरोधात हर्बालाइफ इंडियाचा उपक्रम
6
एपस्टीन फाइल्स प्रकरण, मोदींचे नाव घेणाऱ्या पृथ्वीराज चव्हाणांना DCM शिंदेंचे उत्तर; म्हणाले…
7
"हा तोच अब्दुल रशीद खान उर्फ मामू आहे, ज्याच्यावर..."; उद्धव ठाकरेंना अमित साटमांनी घेरले
8
‘वंदे मातरम्’ हा राष्ट्र निर्माणाचा मंत्र बनवायचा आहे; प. बंगालमधून PM मोदींचे देशाला आवाहन
9
Menstrual Syndrome: फक्त पोटदुखीच नाही; पाळी येण्यापूर्वी शरीर देते 'हे' ५ संकेत, या बदलांकडे वेळीच लक्ष द्या
10
२०२६ मध्ये सोनं १.५० लाखांच्या पार जाणार, महिन्याभरात चांदीही ₹४८,००० नं महागली
11
नितीश कुमारांनी हिजाब ओढलेल्या डॉक्टर तरुणी सरकारी सेवेत रुजू होण्यासाठी आलीच नाही, कारण...
12
बांगलादेशात हिंदू तरुणाच्या मॉब लिंचिंग प्रकरणात 7 जणांना अटक; सर्वत्र टीकेची झोड उठल्यानंतर, अखेर मोहम्मद युनूस झुकले
13
कल्याणमध्ये ठाकरेंना मोठा धक्का, माजी आमदाराचा भाजपात प्रवेश; शिंदेसेनेची कोंडी करणार?
14
'धुरंधर'मुळे पालटले या टीव्ही कलाकारांचे नशीब; कोणी आयटम साँगने गाजवले, तर कोणी अभिनयाने जिंकली मने!
15
भाजपचा यू-टर्न! आमदार देवयानी फरांदेंच्या नियुक्तीनंतर नाराजीची लाट, भाजपने आमदार ढिकलेंबद्दल केला खुलासा
16
३ लाख पगार, सरकारी घर, हवी तिथे नोकरी; बुरखा प्रकरणातील डॉ. नुसरत यांना कुणी दिली मोठी ऑफर?
17
बॉक्स ऑफिस मॉन्स्टर 'धुरंधर'सोबत 'उत्तर' रिलीज झाला अन्.., क्षितिज पटवर्धनची लक्षवेधी पोस्ट
18
सरकारच्या तिजोरीत लोकांनी भरले १७ लाख कोटी; कॉर्पोरेट, वैयक्तिक करात मोठी वाढ
19
'धुरंधर'मध्ये अक्षय खन्नाचंच होतंय कौतुक, आर माधवनचा जळफळाट? म्हणाला, "तो नव्या घरात..."
20
BMC निवडणुकीपूर्वी महायुतीत ट्विस्ट! भाजपा-राष्ट्रवादी नेत्यांची बैठक, शिंदेसेनेला डच्चू?
Daily Top 2Weekly Top 5

किल्ल्यातील तलावांचे होणार पुनरूज्जीवन

By admin | Updated: April 14, 2017 23:10 IST

दीपक केसरकर यांची माहिती; किल्ला पर्यटनासाठी ५० कोटी खर्च करणार

मालवण : पर्यटन हंगामात दरवर्षी किल्लावासीय तसेच पर्यटकांना पाण्याची समस्या भेडसावते. त्यामुळे पाण्याची समस्या दूर करण्यासाठी किल्ल्यातीलच ऐतिहासिक दोन तलावांचे पुनरूज्जीवन करून मुबलक पाणीसाठा उपलब्ध करून दिला जाईल, अशी माहिती पालकमंत्री तथा अर्थराज्यमंत्री दीपक केसरकर यांनी दिली.पुनरुज्जीवन करण्यात येणाऱ्या तलावातील पाणी शुद्धीकरणासाठी ‘आरओ’ यंत्रणा उभारली जाईल. किल्ले दर्शनासाठी येणाऱ्या पर्यटकांना दर्जेदार सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी राज्य शासनाच्यावतीने वर्षभरात ५० कोटी रुपये खर्च करण्यात येणार असल्याचे केसरकर यांनी स्पष्ट केले.मालवण येथे पालकमंत्री केसरकर यांची सार्वजनिक बांधकाम विभाग, यूएनडीपी, पुरातत्त्व विभाग, महसूल, तसेच किल्ले प्रेरणोत्सव समितीच्या पदाधिकाऱ्यांशी संयुक्त बैठक पार पडली. शिवराजेश्वर मंदिर सुशोभीकरण, मसुरे भरतगड किल्ला, हडी बेट, आदींचा पर्यटनाच्या माध्यमातून विकास करण्यात येणार असून, जिल्ह्याच्या किनारपट्टीवरील गावांचा प्रामुख्याने विकास केला जाईल, असे केसरकर यांनी स्पष्ट केले.यावेळी नगराध्यक्ष महेश कांदळगावकर, नितीन वाळके, जिल्हा परिषद सदस्य हरी खोबरेकर, बबन शिंदे, पंकज साधये, सन्मेश परब, महेश मांजरेकर, किसन मांजरेकर, मंगेश सावंत, प्रेरणोत्सवचे गुरू राणे, भाऊ सामंत, ज्योती तोरसकर, दीपक मयेकर यांच्यासह प्रांताधिकारी डॉ. विकास सूर्यवंशी, बांधकाम विभागाचे प्रकाश चव्हाण, प्रदीप पाटील, नायब तहसीलदार सुहास खडपकर, पुरातत्त्व विभागाचे राजेश दिवेकर, आदी उपस्थित होते. (प्रतिनिधी)स्थानिकांसाठी ‘टेंट रिसोर्ट’ची उभारणीकिल्ला विकासासाठी संयुक्त आराखडा बनविण्याच्या सूचना संबंधित विभागांना देण्यात आल्या आहेत. किल्ल्यात व्यवसाय करणाऱ्या स्थानिक रहिवाशांसाठी ‘टेंट रिसोर्ट’ची उभारणी सार्वजनिक बांधकाम विभाग आणि पर्यटन विभागाच्या माध्यमातून करण्यात येणार आहे. यासाठी पुरातत्त्व विभागाच्या आवश्यक परवानग्यांची पूर्तता केली जाईल, असे केसरकर यांनी स्पष्ट केले.पुरातत्त्व विभागावर नाराजी : किल्ल्याची समस्या मांडताना मंगेश सावंत यांनी पुरातत्त्व विभागावर नाराजी व्यक्त केली. तटबंदीवर भलेमोठी पाळे घुसल्याने तटबंदी कमकुवत बनत चालली असून, याकडे पुरातत्त्व विभागाचे दुर्लक्ष झाल्याचा आरोपही सावंत यांनी पालकमंत्र्यासमोर केला. यावर पुरातत्त्वच्या दिवेकर यांनी वेळोवेळी तटबंदीवरील पाळे काढण्यात आल्याचे स्पष्ट केले. याला किल्ले प्रेरणोत्सव समितीच्या पदाधिकाऱ्यांनीही दुजोरा दिला.