शहरं
Join us  
Trending Stories
1
'एक बैठक घेण्यासाठी मनोज जरांगेंना आमदार १०-१५ लाख रुपये देतात'; लक्ष्मण हाकेंचा गंभीर आरोप
2
Manoj Jarange Patil : 'जीव गेला तरीही मागे हटणार नाही, गुलाल उधळूनच परतायचे' मनोज जरांगेंचा सरकारला इशारा
3
सुनेला जाळून मारण्यात मुलाची केली मदत; दिल्लीच्या निक्की भाटी प्रकरणात सासूला अटक!
4
स्कॉर्पिओ, बुलेट, रोख रक्कम आणि सोने; एवढे सगळे देऊनही निक्कीला रोज रात्री मारहाण करायचे, बहिणीने केले धक्कादायक खुलासे
5
विद्यार्थ्याचा पाय घसरला, शिक्षक वाचवायला गेले; वेरुळच्या जोगेश्वरी कुंडात बुडून दोघांचा मृत्यू 
6
'सन्मानजनक निरोप द्यायला हवा होता...', पुजाराच्या निवृत्तीवर शशी थरुर यांची भावनिक पोस्ट
7
Ganpati 2025: शिव ठाकरेच्या घरी वाजत गाजत आले गणपती बाप्पा, इतकी सुंदर मूर्ती की नजरच हटेना, पाहा व्हिडीओ
8
भारतानंतर आता युरोपचाही अमेरिकेला मोठा धक्का; 'या' दोन देशांनी 'एफ ३५' फायटर जेट्स खरेदीला दिला नकार!
9
राहुल गांधींच्या सुरक्षेत मोठी चूक; तरुण Kiss घेऊन पळाला, व्हिडिओ व्हायरल...
10
राज्यात १७ लाख कर्मचाऱ्यांना बाप्पा पावला! पगाराबाबत सरकारने घेतला महत्त्वाचा निर्णय
11
"मी सोहमला सांगितलंय लग्नानंतर वेगळं राहायचं...", सुचित्रा बांदेकर स्पष्टच बोलल्या, म्हणाल्या- "एकत्र राहून रोज..."
12
मिस्त्री, प्लंबर, फिटरपासून कनिष्ठ अभियंतापर्यंत; मिरा-भाईंदर महानगरपालिकेत विविध पदांसाठी भरती
13
आता त्या गोष्टीवर मी काहीच बोलणार नाही; सचिन-द्रविड अन् MS धोनीचं नाव घेत पुजारा म्हणाला की,..
14
आईस्क्रीम विक्रेत्याला कॉलेज प्लेसमेंटमधून १.८ कोटींचं पॅकेज? व्हायरल Video मागचं 'सत्य'
15
सासू केस ओढून मारायची, पती हुंडा घेऊन...; निक्कीच्या आईने जावयाबद्दल केला धक्कादायक खुलासा!
16
"वडिलांच्या नवीन मर्सिडीजवर विपिनची नजर, ६० लाखांची मागणी", निक्कीच्या भावाने मांडली व्यथा
17
दुसरे घर घेण्याचा विचार करताय? आधी ‘या’ महत्त्वाच्या गोष्टी तपासा, अन्यथा होईल मोठं नुकसान!
18
बायकोला जिवंत जाळल्याचा आरोप असलेल्या पतीची पहिली प्रतिक्रिया, पत्नीच्या हत्येमागील कारण काय सांगितले?
19
पहिल्यांदाच मिझोरममध्ये पोहोचली रेल्वे; १४२ पूल अन् ४८ बोगद्यांद्वारे तयार झाला मार्ग...
20
निवृत्तीनंतर चेतेश्वर पुजाराला BCCI किती पेन्शन देणार? निवृत्त वेतनासाठी कोणतं सूत्र वापरतात?

लोकदबावाने भूमिका बदलू शकते

By admin | Updated: September 24, 2015 00:12 IST

संजय देशमुख : इको - सेन्सिटिव्ह, प्रदूषणकारी प्रकल्पाबाबत मांडली भूमिका

सावंतवाडी : इको - सेन्सिटिव्ह लोकांना विश्वासात घेऊन केला पाहिजे. लोकांना काय हवे आणि काय नको हे जर माहीत नसेल, तर त्याचा काय फायदा? इको-सेन्सिटिव्हचा पुनर्विचार करीत असताना लोकदबावामुळे अजूनही इको-सेन्सिटिव्हबाबत सरकार भूमिका बदलू शकते, असे स्पष्ट मत मुंबई विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. संजय देशमुख यांनी व्यक्त केले. मुंबई विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. संजय देशमुख यांनी मंगळवारी येथील पंचम खेमराज महाविद्यालयास भेट दिली. त्यावेळी त्यांनी अनेक विषयावर स्पष्ट मते मांडली. त्यांच्यासोबत कुलसचिव खान, ‘सिंधुस्वाध्याय’चे प्रमुख विनायक दळवी उपस्थित होते.कुलगुरू डॉ. संजय देशमुख यांचे महाविद्यालयाच्यावतीने राजमाता सत्वशिलादेवी भोसले यांनी स्वागत केले. यावेळी शुभदादेवी भोसले, प्राचार्य दिलीप भारमल, अ‍ॅड. सुभाष देसाई, अ‍ॅड. प्रमोद प्रभूआजगावकर आदी उपस्थित होते. डॉ. देशमुख म्हणाले की, पश्चिम घाटात मोठ्या प्रमाणात जैवविविधता आहे; मात्र, त्याचा म्हणावा तसा अभ्यास झालेला नाही. त्यामुळे हा अमूल्य खजिना नष्ट होण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्यामुळे मुंबई विद्यापीठाच्या माध्यमातून कोकणातील जैवविविधतेचा अभ्यास करणारा अभ्यासक्रम सुरू करण्याचा प्रयत्न सुरू आहे. येथे इको-सेन्सिटिव्ह तसेच प्रदूषणकारी प्रकल्प लादताना शासनाने घाई केली आहे. एखाद्या समितीला जबाबदारी देऊन सुमारे साडेचार हजार किलोमीटर परिसराचे सॅटेलाईट सर्वेक्षण करण्यात आले. त्यानंतर इको-सेन्सिटिव्ह राबविण्याबाबतचा निर्णय घेण्यात आला. मात्र, याठिकाणी असणारी विपुल संपत्ती लक्षात घेता गावागावात जाऊन याचा अभ्यास होणे गरजेचे आहे. त्यासाठी शासनाने आपल्या धोरणाबाबत पुनर्विचार करणे गरजेचे असल्याचे देशमुख यांनी यावेळी सांगितले.इको-सेन्सिटिव्हबाबत अद्यापही वेळ गेली नसून मीडिया तसेच लोकदबावामुळे आपण आताही इकोसेन्सिटिव्हबाबत सरकार वेगळा निर्णय घेऊ शकते. एखाद्या ठिकाणी जैवविविधता आहे, म्हणून तो गाव सरसकट इको-सेन्सिटिव्ह करावा या मताचा मी नाही, असेही त्यांनी यावेळी स्पष्ट केले. (प्रतिनिधी)+परीक्षांमध्ये आमुलाग्र बदल करण्याची गरजमुंबई विद्यापीठाच्या परीक्षांमध्ये आमुलाग्र बदल करण्याची गरज असून, अनेक विभागातील परीक्षा विभाग हे विद्यापीठाचे असून गेली अनेक वर्षे या विभागात काम करणारे कर्मचारी निवृत्त झाले आहेत. त्यामुळे विविध पदे भरणे गरजेची आहेत. ती पदे शासन आता भरणार असून परीक्षांबाबत काही वेगळे निर्णय घ्यायचे आहेत. ते नक्की घेऊ. यापुढे कोणताही गैरप्रकार टाळता येईल असेच काम करून आम्ही दाखवू, असा विश्वासही त्यांनी यावेळी व्यक्त केला. तळेरे येथील मॉडेल कॉलेजच्या जागेचे हस्तातंरण झाले असून हे मॉडेल कॉलेज येत्या चार वर्षात उभे राहील, असा विश्वासही त्यांनी यावेळी व्यक्त केला. पश्चिम घाटातील जैवविविधतेचा म्हणावा तसा अभ्यास नाही.इको - सेन्सिटिव्ह तसेच प्रदूषणकारी प्रकल्प लादताना शासनाने घाई केली.शासनाने आपल्या धोरणाबाबत पुनर्विचार करणे गरजेचे.गावागावात जाऊन अभ्यास होणे गरजेचे आहे.