शहरं
Join us  
Trending Stories
1
“राज ठाकरे यांना जवळ करणे राजकीय सोय, ठाकरे गटाचे ७५ नगरसेवक शिंदेंकडे गेले”: चंद्रकांत पाटील
2
पाऊस थांबला! लगेच आकाश दीपचा 'हमला'! बॅक टू बॅक ओव्हरमध्ये दोन विकेट्स अन् इंग्लंडचा अर्धा संघ तंबूत (VIDEO)
3
मतदारयाद्यांतील गैरप्रकार रोखण्यास काँग्रेसची समिती; अध्यक्ष पृथ्वीराज चव्हाण अहवाल देणार
4
अंत्यसंस्कारासाठी मृतदेह घेऊन निघाले अन् घरी जिवंत सापडली 'ती' व्यक्ती; जळगावातील प्रकार
5
“जीवनात ही घडी अशीच राहू दे”; फोटो शेअर करत बाळा नांदगावकरांची पांडुरंगाकडे प्रार्थना
6
मनातलं सगळंच सांगितलं; प्रताप सरनाईकांचं उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना ३ पानी खुलं पत्र
7
बर्मिंगहॅमच्या मैदानात पावसाची बॅटिंग! इंग्लंडच्या ७ विकेट्स घेण्यासाठी टीम इंडियाला किती षटके मिळणार?
8
“एकाचं भाषण अपूर्ण अन् दुसऱ्याचं अप्रासंगिक, तर पूर्ण कार्यक्रम अवास्तव”; भाजपाची टीका
9
१६ वर्षे अत्याचार झालेल्या मुलींच्या मृतदेहाची लावत होता विल्हेवाट; एका घटनेमुळे केला खुलासा
10
आधी कॅब चालकांची करायचे हत्या, दऱ्यांमध्ये फेकायचे मृतदेह; सीरियल किलरला अखेर अटक
11
शेतकऱ्यांसाठी खुशखबर! पीएम किसानचा २०वा हप्ता 'या' दिवशी खात्यात येणार? आत्ताच यादी तपासा!
12
राज्यात सुरू असलेल्या भाषा वादावर बाबा रामदेव यांची पहिली प्रतिक्रिया, स्पष्टच बोलले; दिला असा सल्ला
13
सोलापूर : 'तुझ्यामुळेच माझी बायको...'; सावत्र दिराने भावजयीच्या मानेवर कुऱ्हाडीने केला वार, जागेवरच गेला जीव
14
“विठ्ठला...! सरकारला कर्जमाफी देण्याची सद्बुद्धी दे...”; आषाढी एकादशीला बच्चू कडूंची पोस्ट
15
ऐकवं ते नवलंच! पोलिसात भरती झाला, पण १२ वर्षे ड्युटीवरच गेला नाही; तरीही मिळाली ₹२८ लाख पगार
16
हाफिज सईद आणि मसूद अजहर भारताकडे सोपवू, पण...; बिलावल भुट्टो यांची 'ती' मागणी काय?
17
ENG vs IND : इंग्लंड टेस्ट मॅच ड्रॉ करण्यासाठी खेळणार? कोच म्हणाला, आम्ही एवढेही मूर्ख नाही की,...
18
'देशात गरीब वाढत चाललेत आणि काही श्रीमंताच्या हातात संपत्ती चाललीये'; नितीन गडकरींनी व्यक्त केली चिंता
19
"२० कोटी दिले तरी ...", बिग बॉस १९ मध्ये सहभागी होण्याच्या चर्चांवर राम कपूरने सोडलं मौन
20
ज्या घटनेमुळे बापाने केली हत्या, त्यात आईचा होता सहभाग; कोल्हापुरातील प्रकरणात काय आले समोर?

ग्रामीण रुग्णालयांना सोयी देऊ

By admin | Updated: January 5, 2015 00:33 IST

दीपक सावंत : कुडाळवासीयांना आश्वासन, ग्रामीण रुग्णालयातील समस्यांचा आढावा

कुडाळ : कुडाळ ग्रामीण रुग्णालयात मूलभूत सोयीसुविधा येत्या तीन महिन्यांत देऊ, असे आश्वासन आरोग्यमंत्री डॉ. दीपक सावंत यांनी कुडाळवासीयांना दिले. यावेळी आरोग्यमंत्री डॉ. सावंत यांनी कुडाळ गामीण रुग्णालयाची पाहणी करून येथील ग्रामस्थांच्या समस्या, प्रश्न जाणून घेतले. त्यांच्यासोबत पालकमंत्री दीपक केसरकर, आरोग्य संचालक सतीश पवार, जिल्हा शल्य चिकित्सक आर. डी. माने, आमदार वैभव नाईक, शिवसेना उपजिल्हाप्रमुख अभय शिरसाट, तालुकाप्रमुख राजन नाईक, युवा सेना जिल्हाप्रमुख मंदार शिरसाट, माजी जिल्हा परिषद अध्यक्ष काका कुडाळकर, माजी जिल्हा परिषद सदस्य संजय भोगटे, महिला शिवसेना उपजिल्हाप्रमुख वर्षा कुडाळकर, बंड्या सावंत, संजय परब, शिवसेना आणि भाजपचे कार्यकर्ते उपस्थित होते. यावेळी ग्रामस्थांनी कुडाळ हे जिल्ह्याचे मध्यवर्ती शहर असून महामार्ग व रेल्वेस्थानक या ठिकाणी आहे. अपघातांचे तसेच येथील येणाऱ्या रुग्णांचे प्रमाण जास्त असते. मात्र, या ठिकाणी योग्य प्रमाणात सेवा-सुविधा मिळत नाहीत. वैद्यकीय अधिकारी पदे रिक्त असल्याने गंभीर रुग्णांना जिल्हा रुग्णालय किंवा पणजी-गोवा येथे पाठविण्यात येते. प्रवासादरम्यान रुग्ण दगावण्याच्या घटना घडल्या आहेत. त्यामुळे येथे योग्य सेवा-सुविधा पुरवाव्यात, अशी मागणी केली. माजी जिल्हा परिषद सदस्य संजय भोगटे म्हणाले की, या रुग्णालयातील सोयी-सुविधा जनतेला चांगल्या प्रमाणात देण्यात याव्यात याकरिता वेळोवेळी निवेदने दिली. परंतु प्रशासनाने दुर्लक्षच केले, असे सांगितले. यावेळी आरोग्यमंत्री डॉ. सावंत म्हणाले, जिल्ह्यातील, विशेष करून कुडाळ ग्रामीण रुग्णालयाच्या समस्या येथील आमदार वैभव नाईक यांनी आमच्या निदर्शनास आणून दिल्या आहेत. या समस्या निवारण्यासंदर्भात कारवाई सुरू झाली असून येथील मूलभूत सोयीसुविधा येत्या तीन महिन्यांत सुरळीत केल्या जातील, असे आश्वासन त्यांनी दिले. (प्रतिनिधी)आमदारांनी लक्ष वेधलेरुग्णालयाच्या नवीन इमारती बांधून ठेकेदारांना पैसे देण्यापेक्षा याठिकाणी वैद्यकीय अधिकाऱ्यांची रिक्त पदे भरावीत, तसेच वीज, पाणी, येथील रस्ता आणि इतर सुविधा द्याव्यात, अशी मागणी प्रसाद शिरसाट यांनी केली.याठिकाणी असलेल्या इमारतीमध्ये सध्या ३० खाटाच असल्याने अनेक रुग्णांना दुसरीकडे जावे लागत आहे. मात्र, याठिकाणी अजून ६० खाटा बसू शकतात. त्यामुळे आणखी चांगली सेवा देता येईल, याकडे आमदार वैभव नाईक यांनी लक्ष वेधले.