शहरं
Join us  
Trending Stories
1
T20 World Cup: त्यावेळीच ठरलेलं Shubman Gill संघाबाहेर जाणार; टीम सिलेक्शनची Inside Story
2
नवी मुंबई: संजय नाईक पुन्हा 'भाजपावासी'; मुख्यमंत्री, प्रदेशाध्यक्षांची भेट घेत 'घरवापसी'
3
दाट धुक्यामुळे दिल्ली विमानतळाचे वेळापत्रक विस्कळीत, १३८ विमान उड्डाणे रद्द, श्रीनगरलाही फटका
4
"सत्ता आणि सामर्थ्य याचा अर्थ आता बदलला आहे..."; जागतिक अशांततेवर जयशंकर यांचे मोठे विधान
5
संरक्षण मंत्रालयात खळबळ; लेफ्टनंट कर्नल दीपक शर्मा यांना लाच घेताना सीबीआयने पकडले; घरात सापडले २ कोटींहून अधिक रोख
6
मीरा भाईंदर: "...त्यातूनच लाडकी बहीण योजनेचा जन्म झाला"; एकनाथ शिंदे यांनी सांगितली कहाणी
7
अमेरिकेचं ‘ऑपरेशन हॉकआय स्ट्राइक’, इस्लामिक स्टेटच्या 70 ठिकाणांवर US चे मोठे हल्ले; प्रकरण काय?
8
"नीतीश वडिलांप्रमाणे, बाप-लेकीत..."; बिहार 'नकाब' वादावर राज्यपाल आरिफ मोहम्मद खान स्पष्टच बोलले
9
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
10
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
11
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
12
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
13
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
14
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
15
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
16
“भ्रष्ट महायुती सरकार विरोधात काँग्रेसचा वैचारिक लढा, मनपा निवडणुकीत...”: हर्षवर्धन सपकाळ
17
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
18
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
19
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
20
'त्या' प्रश्नावर सूर्याची बोलतीच बंद! सर्वांसमोर मुख्य निवडकर्ते आगरकरांना म्हणाला; "तुम्हीच सांगा"
Daily Top 2Weekly Top 5

उद्योजक बनून रोजगार द्यावा : रवींद्र माने

By admin | Updated: June 29, 2015 00:38 IST

दरवर्षी ३०० कलेक्टर होतील

रत्नागिरी : मराठा युवकांनी नोकरीपेक्षा उद्योजक होऊन नोकऱ्या देण्याकडे लक्ष द्यावे. दहावी, बारावीच्या टप्प्यावरच समाजकारणाचे संस्कार होत असतात. आयडॉल बनता आले नाही, तर समाजाचे प्रतिनिधी व्हा, असे आवाहन माजी राज्यमंत्री रवींद्र माने यांनी क्षत्रिय मराठा मंडळातर्फे दहावी, बारावीतील गुणवंतांच्या कार्यक्रमात केले.विवेक हॉटेलच्या मराठा सभागृहात शनिवारी सायंकाळी हा कार्यक्रम झाला. यावेळी मंडळाचे अध्यक्ष सुरेश सुर्वे, जिल्हा परिषदेच्या सदस्य नेहा माने, उर्मिला घोसाळकर, सतीश साळवी, महेंद्र साळवी, राजाभाऊ साळवी उपस्थित होते. या कार्यक्रमात मराठा समाजातील दहावी आणि बारावीमध्ये सुयश पटकावणाऱ्या विद्यार्थ्यांना गौरवण्यात आले. या कार्यक्रमात बोलताना रवींद्र माने पुढे म्हणाले, मी नववीत असतानाच आमदार व्हायचे ठरवले. आमदार कशाशी खातात, हे मला माहीत नव्हे. मात्र, लहानपणीच समाजकारणाची बिजे पेरली गेल्याने मी तीन वेळा आमदार झालो. अभियंता नसलो तरी आंबव येथील माझ्या कॉलेजमधून दरवर्षी ३०० अभियंते बाहेर पडतात. अलिकडे मुले व्हॉट्सअपवर जास्त वेळ खेळताना दिसतात. तंत्रज्ञानाचा उपयोग चांगल्या कामासाठी करा, असे आवाहनही त्यांनी केले.नेहा माने म्हणाल्या, गुगलमुळे जग जवळ येऊ लागले आहे. या माहितीचा विद्यार्थ्यांनी योग्य वापर केल्यास प्रगती होऊ शकते. आपले मूल मोबाईलवर काय करते आहे, याकडे पालकांनीही बारीक लक्ष ठेवले पाहिजे. गौरी सावंत हिने सूत्रसंचालन केले. सतीश साळवी यांनी आभार मानले. (प्रतिनिधी)दरवर्षी ३०० कलेक्टर होतीलगुणवंत विद्यार्थिनी पायल घोसाळकर हिने मनोगतामध्ये सांगितले, राजेंद्र माने अभियांत्रिकी महाविद्यालयातून दरवर्षी ३०० अभियंता बाहेर पडतात. जिल्ह्यात युपीएससी, एमपीएससी या स्पर्धा परीक्षांचे परिपूर्ण मार्गदर्शन केंद्र साकारल्यास येथून प्रतिवर्षी ३०० कलेक्टर तयार होतील, असा विश्वास व्यक्त केला. प्रतिकूल परिस्थितीत दहावीमध्ये यश मिळवणाऱ्या मनाली सावंत हिला रवींद्र माने यांनी १० हजार रुपयांची व खजिनदार अविनाश खामकर यांनी आर्थिक मदत केली.