शहरं
Join us  
Trending Stories
1
"फडणवीसांनी पुन्हा एकदा महाराष्ट्राच्या आणि माय मराठीच्या छातीत सुरा भोसकून..."; हिंदी सक्तीवरून काँग्रेस प्रदेशाध्यक्षांची जहरी टीका
2
Israel Iran War : "युद्धाला सुरुवात झालीय, आता कोणतीही दया नाही"; खामेनींनी इस्रायलविरुद्ध केली युद्धाची घोषणा
3
तुकोबांच्या पालखीचे आज प्रस्थान, कोणत्या ठिकाणी कधी पोहोचणार? A टू Z माहिती
4
किती आहे तुमचा Cibil Score, लोन मिळवून देऊ शकतो का? समजून घ्या निरनिराळ्या रेंजचा अर्थ
5
अमेरिकेने पाठवली ३० लढाऊ विमाने, ट्रम्प यांनी इराणला दिला बिनशर्त शरणागतीचा प्रस्ताव, खामेनी खवळले, म्हणाले...
6
शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी! पीएम किसानचा २० वा हप्ता 'या' तारखेला येणार? असे तपासा तुमचे नाव!
7
अमेरिकेनं टॅरिफ लावावा किंवा नाही, चीनवर फरक नाही.., जगासमोर उभं केलं हे मोठं संकट; भारताचं काय होणार?
8
ठाकरेंचा सुपुत्र बॉलिवूड गाजवणार, 'निशांची' सिनेमाचं पोस्टर रिलीज
9
AI Pandharpur Wari: आता पंढरीच्या वारीतही 'एआय दिंडी' पाहायला मिळणार!
10
Team India, IND vs ENG: इंग्लंडविरूद्धच्या पहिल्या कसोटीत 'या' तिघांचा Playing XI मधून होणार पत्ता कट, कॅप्टन गिल मोठा निर्णय घेणार
11
जयदीप अहलावतने दोन आठवड्यामध्ये अंधेरीत खरेदी केलं आणखी एक घर, किंमत आहे कोटींच्या घरात
12
Maharashtra Cabinet: आणीबाणीतील बंदीवानांचे मानधन दुप्पट
13
"हवे ते निर्बंध लादून दहशतवाद्यांना पाठिंबा देणाऱ्या देशांना बक्षीस देता, दुटप्पीपणा चालणार नाही"; PM मोदींचा इशारा
14
Air India Plane Crash: 'टेकऑफसाठी जास्त वेळ अन् ओव्हरलोडिंग', माजी वैमानिकाने दोन मुद्द्यांवर ठेवलं बोट
15
अनेक तर्कवितर्कांनंतर अखेर पंतप्रधान मोदी आणि कॅनडाच्या पंतप्रधानांची भेट, चर्चेत झाला मोठा निर्णय   
16
२५,३०,३५ किती वर्षांचे आहात तुम्ही; रिटायरमेंटवर ५ कोटी हवे असतील तर केव्हापासून, किती करावी लागेल गुंतवणूक?
17
Sant Tukaram Maharaj palkhi 2025: 'ज्ञानोबा तुकाराम'चा जयघोष; तुकोबांच्या पालखी प्रस्थानासाठी देहूनगरी सज्ज
18
सलग दुसऱ्या दिवशी शेअर बाजार 'धडाम'; Sensex २६९ अंकांच्या घसरणीसह उघडला, 'या' वृत्तानं दिलं टेन्शन
19
Air India: एअर इंडिया ड्रीमलाइनरची जगभरातील सहा उड्डाणे रद्द
20
राज्यात हिंदीची सक्ती नाही, पण सर्व माध्यमांच्या शाळांमध्ये मराठी अनिवार्य!

पुलाच्या कामाला आजही जमिनदारांचा विरोध

By admin | Updated: October 21, 2015 21:37 IST

उपोषण सोडण्यासाठी आश्वासनांची खैरात : हे सर्व ठेकेदाराच्या हट्टापायी सुरू असल्याचा ग्रामस्थांचा आरोप

अनंत जाधव-- सावंतवाडी तळवणे वेळेवाडी पुलाच्या भूमिपूजनाच्या दिवशी स्थानिक शेतकऱ्यांनी आंदोलन करीत आमच्या जमिनीला योग्य किंमत द्या तरच जमिनी देणार असा पवित्रा घेत उपोषणही केले होते. मात्र, त्यांच्यावर आश्वासनाची खैरात करीत त्यांना उपोषणावरून उठवण्यात आले होते. मात्र, परिसरातील ३० जमिनदारांचा आजही या पुलाच्या कामाला विरोध जसाच्या तसा आहे. त्यातच १६ मार्च २०१३ ला कामाचे भूमिपूजन झाले. त्यावेळी बांधकाम विभागाकडे कोणत्याही प्रकाराचे रेखाचित्र नव्हते. तसेच पूल बांधण्यासाठी पुरेशी जागा आहे का? याची माहितीही घेतली नव्हती, असे असताना ठेकेदाराला मार्च २०१३ मध्येच ८६ लाखांचा धनादेश देण्यात आला. त्यावेळी काम ५ टक्केही झाले नव्हते. मात्र, याची जोरदार चर्चा जिल्हाभर झाल्यानंतर अधिकाऱ्यांनी हे प्रकरण मिटवत काम पुढे सुरू केले. तरीही तत्कालीन अधिकाऱ्यांनी पुलाच्या वेलसाठी अनेकवेळा आराखडे बदलले. काहीवेळा तर नदीच्याखाली खडक मिळू लागल्याने कामाचा वेग मंद करण्यात आला होता.त्यातच पुलासाठी एक वेल बांधण्यात आली होती. तर दुसरी वेल बांधत असताना त्याची उंची वाढवण्यात आल्याने बांधकाम विभागाने ती वेल अर्धवट टाकण्यास ठेकेदाराला सांगितले. या कामाच्या दर्जाबाबत पहिल्यापासून शंका होती. पण त्याकडे लक्ष देण्यास कोण अधिकारी उपस्थित राहत नसल्याचे दिसून येत होते. कामाचा वेग मंदावला तरी अधिकाऱ्यांनी ठेकेदारावर मेहरबान होण्याचे काही सोडले नाही.काम सुरू होण्याआधी ८६ लाखाचा धनादेश दिल्यानंतर मे २०१५ मध्ये पुलाची भिंत तोडल्यानंतरही ठेकेदाराला ७० लाखाचा धनादेश देण्यात आला. हे खरे वैशिष्ट्य. तर पुलाला जोडणाऱ्या रस्त्याचे काम अद्याप अर्धवट स्थितीत असून फक्त वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या डोळ्यात धूळफेक करण्यासाठी रस्त्यावरची माती काढणे, तसेच भराव टाकणे ही कामे पूर्ण करण्यात आली आहेत. मात्र, अद्यापपर्यंत रस्त्यावर खडीकरण किंवा डांबरीकरण झाले नाही. मात्र, रस्त्याचे काम करणाऱ्या ठेकेदाराला ६५ लाखाच्या कामापैकी ५४ लाख रूपये पूर्वीच अदा करण्यात आले आहेत.भूसंपादनासाठी वेगळा निधी येणार : अनामिका जाधवतळवणे वेळवेवाडी पुलाचे काम सध्या सुरू असले तरी ते कोणत्याही भूसंपादनाशिवाय सुरू असल्याची कबुली उपविभागीय अभियंता अनामिका जाधव यांनी दिली. तसेच कामाच्या निधीमध्ये भूसंपादनाचा भाग येत आहे. भूसंपादनासाठी वेगळा निधी येणार असून यामध्ये ३० ते ३५ शेतकऱ्यांचा समावेश असल्याचे त्यांनी सांगितले.तसेच पुलाच्या किंवा जोड रस्त्याच्या कामासाठी कोणताही वाढीव निधी आकारला नसल्याचेही अनामिका जाधव यांनी स्पष्ट केले. नव्याने दाखल झालेल्या कार्यकारी अभियंता सुरेश बच्चे यांना काही अधिकाऱ्यांनी अंधारात ठेवल्याचा ग्रामस्थांचा आरोप आहे.