शहरं
Join us  
Trending Stories
1
“...तरच दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येऊ शकतात”; पुतण्याची काकांना थेट ऑफर; पण ठेवली मोठी अट
2
ठाकरे बंधूंच्या युतीला काँग्रेसचा ग्रीन सिग्नल? संजय राऊत म्हणतात, “आमची चर्चा झाली आहे...”
3
'क्रिमीलेअर'बाबत केंद्र सरकार मोठा निर्णय घेण्याच्या तयारीत; उत्पन्नाची मर्यादा बदलणार?
4
पाकिस्तानातून अवैधपणे शस्त्रास्त्रे पुरवणाऱ्या सलीम पिस्तुलला मुसक्या बांधून आणलं भारतात
5
केवळ आठवणीतच राहणार 'ही' १३३ वर्ष जुनी कंपनी? बंद होण्याच्या मार्गावर, प्रत्येक घराशी आहे हिचं नातं
6
मोहम्मद रिझवान बॉल सोडायला गेला अन् क्लीन बोल्ड झाला! अंपायरनं अशी उडवली खिल्ली (VIDEO)
7
सरकार LIC मधील हिस्सा विकणार, पुढच्या आठवड्यापासून प्रक्रिया सुरू; शेअर विक्रीसाठी रांग
8
गणेशोत्सवासाठी मुंबईहून दोन मोफत ट्रेन सुटणार; टाईम टेबल, तिकीटे कधी मिळणार..., नितेश राणेंची घोषणा...
9
महागाई भत्त्याची १८ महिन्यांची थकबाकी मिळणार का? सरकारने संसदेत दिले उत्तर
10
स्वामींची सेवा न चुकता-नियमितपणे करतो, पण स्वामीकृपा झाली हे कसे ओळखावे? ‘हे’ अनुभव येतातच!
11
Gold Silver Price 13 August 2025: सोन्या-चांदीच्या दरात मोठा बदल, Silver च्या दरात ₹१५३७ ची तेजी; खरेदीपूर्वी पाहा काय आहे नवी किंमत?
12
‘मत चोरी’वरून भाजपाचा काँग्रेसवर प्रतिहल्ला, रायबरेली आणि डायमंड हार्बर येथील उदाहरण देत घेरले   
13
भाजपा विरुद्ध भाजपा लढाईत विरोधी पक्ष बनला 'विजेता'; संसदेत राहुल गांधींनी टाकला डाव, काय घडलं?
14
ईडी चौकशी करत असलेल्या सुरेश रैनाकडे किती संपत्ती? उत्पन्नाचा मुख्य स्त्रोत कोणता?
15
भटक्या कुत्र्यांबाबतीत कोर्टाच्या निर्णयाची चर्चा, तिकडे आर्चीने शेअर केला क्युट व्हिडिओ; म्हणाली...
16
जेवढे जन्माला येतायेत, त्यापेक्षा १० लाख जास्त मरतायेत; भारताच्या मित्र देशात 'सायलेंट इमरजंन्सी'!
17
ठाकरे बंधू दादरच्या कबुतरखाना विरोधातील आंदोलनात दिसणार? ‘या’ समितीचे सहभागी होण्याचे आवाहन
18
Jaiprakash associates limited: ₹४ चा शेअर खरेदी करण्यासाठी गुंतवणुकदारांच्या उड्या; आता बंद करावं लागलं ट्रेडिंग, अदानींचं जोडलंय नाव
19
चंद्रावर घेऊन जातो...! नासाच्या इंटर्नने चंद्रावरून आणलेला दगड चोरला, बेडखाली ठेवला अन् गर्लफ्रेंडसोबत रोमान्सही केला...

पुलाच्या कामाला आजही जमिनदारांचा विरोध

By admin | Updated: October 21, 2015 21:37 IST

उपोषण सोडण्यासाठी आश्वासनांची खैरात : हे सर्व ठेकेदाराच्या हट्टापायी सुरू असल्याचा ग्रामस्थांचा आरोप

अनंत जाधव-- सावंतवाडी तळवणे वेळेवाडी पुलाच्या भूमिपूजनाच्या दिवशी स्थानिक शेतकऱ्यांनी आंदोलन करीत आमच्या जमिनीला योग्य किंमत द्या तरच जमिनी देणार असा पवित्रा घेत उपोषणही केले होते. मात्र, त्यांच्यावर आश्वासनाची खैरात करीत त्यांना उपोषणावरून उठवण्यात आले होते. मात्र, परिसरातील ३० जमिनदारांचा आजही या पुलाच्या कामाला विरोध जसाच्या तसा आहे. त्यातच १६ मार्च २०१३ ला कामाचे भूमिपूजन झाले. त्यावेळी बांधकाम विभागाकडे कोणत्याही प्रकाराचे रेखाचित्र नव्हते. तसेच पूल बांधण्यासाठी पुरेशी जागा आहे का? याची माहितीही घेतली नव्हती, असे असताना ठेकेदाराला मार्च २०१३ मध्येच ८६ लाखांचा धनादेश देण्यात आला. त्यावेळी काम ५ टक्केही झाले नव्हते. मात्र, याची जोरदार चर्चा जिल्हाभर झाल्यानंतर अधिकाऱ्यांनी हे प्रकरण मिटवत काम पुढे सुरू केले. तरीही तत्कालीन अधिकाऱ्यांनी पुलाच्या वेलसाठी अनेकवेळा आराखडे बदलले. काहीवेळा तर नदीच्याखाली खडक मिळू लागल्याने कामाचा वेग मंद करण्यात आला होता.त्यातच पुलासाठी एक वेल बांधण्यात आली होती. तर दुसरी वेल बांधत असताना त्याची उंची वाढवण्यात आल्याने बांधकाम विभागाने ती वेल अर्धवट टाकण्यास ठेकेदाराला सांगितले. या कामाच्या दर्जाबाबत पहिल्यापासून शंका होती. पण त्याकडे लक्ष देण्यास कोण अधिकारी उपस्थित राहत नसल्याचे दिसून येत होते. कामाचा वेग मंदावला तरी अधिकाऱ्यांनी ठेकेदारावर मेहरबान होण्याचे काही सोडले नाही.काम सुरू होण्याआधी ८६ लाखाचा धनादेश दिल्यानंतर मे २०१५ मध्ये पुलाची भिंत तोडल्यानंतरही ठेकेदाराला ७० लाखाचा धनादेश देण्यात आला. हे खरे वैशिष्ट्य. तर पुलाला जोडणाऱ्या रस्त्याचे काम अद्याप अर्धवट स्थितीत असून फक्त वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या डोळ्यात धूळफेक करण्यासाठी रस्त्यावरची माती काढणे, तसेच भराव टाकणे ही कामे पूर्ण करण्यात आली आहेत. मात्र, अद्यापपर्यंत रस्त्यावर खडीकरण किंवा डांबरीकरण झाले नाही. मात्र, रस्त्याचे काम करणाऱ्या ठेकेदाराला ६५ लाखाच्या कामापैकी ५४ लाख रूपये पूर्वीच अदा करण्यात आले आहेत.भूसंपादनासाठी वेगळा निधी येणार : अनामिका जाधवतळवणे वेळवेवाडी पुलाचे काम सध्या सुरू असले तरी ते कोणत्याही भूसंपादनाशिवाय सुरू असल्याची कबुली उपविभागीय अभियंता अनामिका जाधव यांनी दिली. तसेच कामाच्या निधीमध्ये भूसंपादनाचा भाग येत आहे. भूसंपादनासाठी वेगळा निधी येणार असून यामध्ये ३० ते ३५ शेतकऱ्यांचा समावेश असल्याचे त्यांनी सांगितले.तसेच पुलाच्या किंवा जोड रस्त्याच्या कामासाठी कोणताही वाढीव निधी आकारला नसल्याचेही अनामिका जाधव यांनी स्पष्ट केले. नव्याने दाखल झालेल्या कार्यकारी अभियंता सुरेश बच्चे यांना काही अधिकाऱ्यांनी अंधारात ठेवल्याचा ग्रामस्थांचा आरोप आहे.