शहरं
Join us  
Trending Stories
1
बिहार विजयाच्या पडद्यामागे विनोद तावडेंचा हात; भाजपा मोठे बक्षीस देण्याची शक्यता...
2
“निवडणूक आयुक्तांना नेपाळला पाठवा, तिथेही भाजपा सरकार स्थापन करेल”; कुणाल कामराची टीका
3
कॅश-कट्टा डावानं तेजस्वींचं स्वप्न उधळलं; पण विजयानंतरही भाजपला मोठं टेंशन! नीतीश कुमारांशिवाय सरकार बनू शकतं, पण...
4
बिहारमध्ये आज जे तेजस्वी यादवांसोबत घडलं, तेच २०१०मध्ये लालू प्रसादांसोबतही घडलं होतं...
5
उपमुख्यमंत्री होण्याचे स्वप्न पाहणाऱ्या मुकेश साहनींच्या पदरी भोपळा; VIP चा दारुण पराभव...
6
मी काय बोललो समजलं का? धर्मेंद्र यांच्या प्रकरणावरुन 'भिडू'ने पापाराझींची मराठीत घेतली शाळा
7
सोन्या-चांदीचे दर मोठ्या प्रमाणात घसरले, खरेदीपूर्वी पाहा १४ ते २४ कॅरेट Gold ची नवी किंमत
8
Kuldeep Yadav: कुलदीप यादवच्या नावावर नव्या विक्रमाची नोंद, घरच्या मैदानावर घेतल्या १५० विकेट्स!
9
Delhi Blast : दिल्ली स्फोटानंतर काश्मीरचा 'टिकिंग टाईम बॉम्ब' डॉक्टर बेपत्ता; उमरसोबत केलं होतं काम
10
कोण आहेत नागपूरचे सुपुत्र आयपीएस विजय साखरे ? मराठमोळ्या अधिकाऱ्याकडे दिल्लीतील स्फोटप्रकरणी एनआयए पथकाचे नेतृत्व
11
"एनडीए जोरदार आघाडीवर...": बिहार निकालांवर शशी थरूर यांचे मोठे विधान; काँग्रेसला दिला सल्ला
12
पर्सनल लोन घेताय? केवळ व्याजदर नका पाहू! 'या' Hidden Charges मुळे कर्ज बनते डोकेदुखी!
13
अंता पोटनिवडणुकीत १५९ मतांमुळे भाजपाची लाज राखली; मात्र काँग्रेस उमेदवारानं मारली बाजी
14
"नितीश कुमार मुख्यमंत्री होते, आहेत अन् राहतील..."; JDU नं केलेली पोस्ट काही मिनिटांतच डिलीट
15
Nitin Gilbile: कारमध्येच मित्राला घातल्या गोळ्या, नितीन गिलबिले हत्या प्रकरणात लोणावळ्यात एकाला अटक
16
ज्येष्ठ अभिनेत्री कामिनी कौशल यांचं निधन, वयाच्या ९८व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
17
आरोग्य विमा घेताना धूम्रपान, मद्यपान या सवयी जाहीर करणे का महत्त्वाचे आहे? काय म्हणताहेत एक्सपर्ट
18
कोटींचा आकडा गाठायचा आहे? 'हॉट स्टॉक टिप्स' सोडा, फक्त 'या' २ सवयी पाळा; तज्ञांनी सांगितला 'श्रीमंतीचा मंत्र'!
19
Bihar Election 2025 Result: धीरेंद्र शास्त्रींची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले, “राष्ट्रवाद...”
20
Turmeric Coffee : हटके ट्रेंड! कॉफीला द्या हळदीचा तडका; आश्चर्यकारक फायदे समजल्यावर रोजच न चुकता प्याल
Daily Top 2Weekly Top 5

सुरक्षारक्षकांचे उपोषण अद्याप सुरुच

By admin | Updated: December 10, 2014 23:45 IST

एकाची प्रकृती ढासळली : सुरक्षा अधिकाऱ्यांची आंदोलनस्थळी भेट, आंदोलनाचा तिसरा दिवस

कुडाळ : कुडाळ एमआयडीसी येथील एजन्सी नोंदणीकृत नसल्याने कायमस्वरुपी नोकरी असूनही नोकरी न मिळाल्याने वीस सुरक्षारक्षकांचे उपोषण तिसऱ्या दिवशीही सुरू होते. यातील रवींद्र साळवी या उपोषणकर्त्या सुरक्षारक्षकाची प्रकृती ढासळली. रत्नागिरीतील सुरक्षा अधिकाऱ्यांनी उपोषणकर्त्यांची भेट घेऊन चर्चा केली. मात्र, जोपर्यंत नोकरी मिळत नाही तोपर्यंत उपोषण सुरु ठेवण्याचा निर्णय उपोषणकर्त्यांनी घेतला आहे. कुडाळ येथील सुरक्षारक्षकांचा लढा अजूनही सुरुच आहे. या उपोषणाचा बुधवारी तिसरा दिवस होता. तिसऱ्या दिवशीही या आंदोलनाबाबत कोणताही तोडगा निघालेला नाही. प्रशासन आणि उपोषणकर्ते दोन्हीही आपापल्या निर्णयावर ठाम राहिल्याने उपोषण अजूनही सुरुच आहे. दरम्यान उपोषणाच्या तिसऱ्या दिवशी एका उपोषणकर्त्याची तब्येत खालावली. मात्र तरीही आंदोलन सुरूच आहे. जोपर्यंत नोकरी मिळत नाही, तोपर्यंत ते सुरुच ठेवण्याचा निर्धार व्यक्त करण्यात आला. कुडाळ एमआयडीसी येथे या अगोदर सुरक्षारक्षक एजन्सीच्यावतीने सुरक्षारक्षकांची नियुक्ती गेली अनेक वर्षे करण्यात आली होती. आता एमआयडीसी प्रशासनाच्या नवीन ध्येयधोरणांनुसार या ठिकाणी कायमस्वरुपी सुरक्षारक्षकांची भरती करण्यात आली. परंतु या भरतीमुळे अगोदर कार्यरत असलेल्या सुरक्षारक्षकांना नोकरी गमवावी लागली. गेली अनेक वर्षे येथे सुरक्षारक्षक म्हणून नोकरी केलेल्या व आता नोंदणीकृत नसल्यामुळे नोकरी गमावण्याची वेळ आलेल्या या २० सुरक्षारक्षकांसमोर कुटुंबांचा उदरनिर्वाह कसा चालवायचा, अशी समस्या उभी आहे. त्यामुळे या सुरक्षारक्षकांनी आमची सुरक्षारक्षक म्हणून नोंदणी करून घेऊन आम्हाला सेवेत घ्यावे, अन्यथा आंदोलन मागे घेणार नाही, असे सांगत सोमवारी सकाळपासून कुडाळ एमआयडीसी कार्यालयाच्या प्रवेशद्वारावर बेमुदत उपोषण सुरू केले आहे. (प्रतिनिधी)प्रकृती ढासळलीउपोषणाच्या तिसऱ्या दिवशी कुडाळ तालुक्यातील भडगाव येथील रहिवासी रवींद्र साळवी (वय ४५) यांची प्रकृती ढासळली. त्यांना रुग्णालयात दाखल करणार असल्याचे उपोषणकर्त्यांनी सांगितले. या घटनेमुळे आंदोलनाची तीव्रता वाढण्याची शक्यता आहे. त्यामुळे प्रशासन कोणता निर्णय घेते, याकडे साऱ्यांचे लक्ष लागले आहे.सुरक्षा अधिकाऱ्यांची निव्वळ चर्चाउपोषणकर्त्यांशी चर्चा करण्यासाठी बुधवारी रत्नागिरी येथील सुरक्षा अधिकारी संदेश अहिरे आले होते. त्यांनी उपोषणकर्त्यांचे नेते काका कुडाळकर, संजय भोगटे, बंड्या सावंत, किरण शिंदे यांच्याशी चर्चा केली. मात्र, नोकरीत सामावून घेण्याचा निर्णय वरिष्ठांचाच असल्याचे सांगण्यात आले. यावेळी एमआयडीसी उपअभियंता रेवणकर हेदेखील उपस्थित होते. मात्र, या चर्चेअंती कोणतेही ठोस आश्वासन न मिळाल्याने उपोषणकर्त्यांनी जोपर्यंत नोकरीत सामाविष्ठ करुन घेतले जात नाही तोपर्यंत लढत राहण्याचे धोरण अवलंबण्याचे ठरविले आहे.