शहरं
Join us  
Trending Stories
1
जलसमाधी आंदोलनावेळी नदीत उडी घेणाऱ्या 'त्या' आंदोलनकर्त्याचा मृतदेह १५ किमी अंतरावर सापडला
2
दहीहंडीला २४ तासांत तब्बल १.१३ कोटी दंड वसूल; वाहतूक पोलिसांनी बेशिस्त गोविंदांना लावला चाप
3
मोठी बातमी! महाराष्ट्राचे राज्यपाल सीपी राधाकृष्णन उपराष्ट्रपती पदाची निवडणूक लढणार; भाजपाची घोषणा
4
योगींच्या गोटात खळबळ! १०० हून अधिक आमदारांचा पत्ता कट होण्याची शक्यता; सपाही टेन्शनमध्ये...
5
लग्नानंतर ४५ दिवसांत असं काय घडलं, २७ वर्ष युवकानं स्वत:ला संपवलं?; आईला केला होता शेवटचा कॉल
6
पावसाळ्यात बेडूक येतात तसं निवडणूक आल्यावर जरांगे बाहेर पडतात; भाजपा आमदाराची बोचरी टीका
7
न्यायालयात लेखी स्वरुपात देणार का? निवडणूक आयोगाच्या 'त्या' वक्तव्यावर काँग्रेसचा पलटवार
8
'आता तरी उठा' या पुण्यातील बॅनरवरून अण्णा हजारेंनी मौन सोडलं, म्हणाले, "हे माझं दुर्दैव..."
9
महाराष्ट्रातील मतदानावर आरोप, ECI नं राहुल गांधींना सुनावलं; "निकालानंतर आरोप केले, पण आजपर्यंत एकही..."
10
जिथे नवीन मतदार, तिथे BJP चा विजय; महाराष्ट्रात जादूने १ कोटी मतदार निर्माण झाले- राहुल गांधी
11
दावा जगाची युद्धे थांबविल्याचा, ट्रम्पना वॉशिंग्टन डीसीतील परिस्थिती आवरेना...; दुसऱ्या राज्यातून सुरक्षा मागविली
12
आई-पत्नी आणि मुलीसमोर तरुणावर तलवारीने हल्ला; एका व्हॉट्सअॅप फॉरवर्डमुळे गेला जीव
13
७ दिवसांत प्रतिज्ञापत्र द्या अन्यथा देशाची माफी मागा; निवडणूक आयोगाचं राहुल गांधींना चॅलेंज
14
उतावीळ...! नोबेल द्या नाहीतर प्रचंड टेरिफ लावू...; ट्रम्प यांची नॉर्वेच्या अर्थमंत्र्यांना धमकी
15
'मत चोरी'च्या आरोपांना आम्ही घाबरत नाही; राहुल गांधींना निवडणूक आयोगाचे उत्तर
16
आता अफगाणिस्तानही पाकिस्तानचे पाणी रोखणार; नद्यांवर धरणे बांधण्यास सुरुवात 
17
तुमचं पॅन कार्ड हरवलंय? काळजी करू नका, घरबसल्या फक्त ५ मिनिटांत मिळेल डुप्लिकेट ई-पॅन
18
एल्विश यादवच्या घरावरील गोळीबाराचा व्हिडीओ समोर, ते आले अन् धाड धाड गोळ्या झाडल्या!
19
कार-बाईक खरेदी करायचीय? दिवाळीपर्यंत थांबा; GST दरात बदलाची शक्यता, स्वस्तात मस्त दर मिळतील
20
बाजारातून परदेशी गुंतवणूकदारांचा काढता पाय? १५ दिवसात २१ हजार कोटी काढले; कारण आलं समोर

सुरक्षारक्षकांचे उपोषण अद्याप सुरुच

By admin | Updated: December 10, 2014 23:45 IST

एकाची प्रकृती ढासळली : सुरक्षा अधिकाऱ्यांची आंदोलनस्थळी भेट, आंदोलनाचा तिसरा दिवस

कुडाळ : कुडाळ एमआयडीसी येथील एजन्सी नोंदणीकृत नसल्याने कायमस्वरुपी नोकरी असूनही नोकरी न मिळाल्याने वीस सुरक्षारक्षकांचे उपोषण तिसऱ्या दिवशीही सुरू होते. यातील रवींद्र साळवी या उपोषणकर्त्या सुरक्षारक्षकाची प्रकृती ढासळली. रत्नागिरीतील सुरक्षा अधिकाऱ्यांनी उपोषणकर्त्यांची भेट घेऊन चर्चा केली. मात्र, जोपर्यंत नोकरी मिळत नाही तोपर्यंत उपोषण सुरु ठेवण्याचा निर्णय उपोषणकर्त्यांनी घेतला आहे. कुडाळ येथील सुरक्षारक्षकांचा लढा अजूनही सुरुच आहे. या उपोषणाचा बुधवारी तिसरा दिवस होता. तिसऱ्या दिवशीही या आंदोलनाबाबत कोणताही तोडगा निघालेला नाही. प्रशासन आणि उपोषणकर्ते दोन्हीही आपापल्या निर्णयावर ठाम राहिल्याने उपोषण अजूनही सुरुच आहे. दरम्यान उपोषणाच्या तिसऱ्या दिवशी एका उपोषणकर्त्याची तब्येत खालावली. मात्र तरीही आंदोलन सुरूच आहे. जोपर्यंत नोकरी मिळत नाही, तोपर्यंत ते सुरुच ठेवण्याचा निर्धार व्यक्त करण्यात आला. कुडाळ एमआयडीसी येथे या अगोदर सुरक्षारक्षक एजन्सीच्यावतीने सुरक्षारक्षकांची नियुक्ती गेली अनेक वर्षे करण्यात आली होती. आता एमआयडीसी प्रशासनाच्या नवीन ध्येयधोरणांनुसार या ठिकाणी कायमस्वरुपी सुरक्षारक्षकांची भरती करण्यात आली. परंतु या भरतीमुळे अगोदर कार्यरत असलेल्या सुरक्षारक्षकांना नोकरी गमवावी लागली. गेली अनेक वर्षे येथे सुरक्षारक्षक म्हणून नोकरी केलेल्या व आता नोंदणीकृत नसल्यामुळे नोकरी गमावण्याची वेळ आलेल्या या २० सुरक्षारक्षकांसमोर कुटुंबांचा उदरनिर्वाह कसा चालवायचा, अशी समस्या उभी आहे. त्यामुळे या सुरक्षारक्षकांनी आमची सुरक्षारक्षक म्हणून नोंदणी करून घेऊन आम्हाला सेवेत घ्यावे, अन्यथा आंदोलन मागे घेणार नाही, असे सांगत सोमवारी सकाळपासून कुडाळ एमआयडीसी कार्यालयाच्या प्रवेशद्वारावर बेमुदत उपोषण सुरू केले आहे. (प्रतिनिधी)प्रकृती ढासळलीउपोषणाच्या तिसऱ्या दिवशी कुडाळ तालुक्यातील भडगाव येथील रहिवासी रवींद्र साळवी (वय ४५) यांची प्रकृती ढासळली. त्यांना रुग्णालयात दाखल करणार असल्याचे उपोषणकर्त्यांनी सांगितले. या घटनेमुळे आंदोलनाची तीव्रता वाढण्याची शक्यता आहे. त्यामुळे प्रशासन कोणता निर्णय घेते, याकडे साऱ्यांचे लक्ष लागले आहे.सुरक्षा अधिकाऱ्यांची निव्वळ चर्चाउपोषणकर्त्यांशी चर्चा करण्यासाठी बुधवारी रत्नागिरी येथील सुरक्षा अधिकारी संदेश अहिरे आले होते. त्यांनी उपोषणकर्त्यांचे नेते काका कुडाळकर, संजय भोगटे, बंड्या सावंत, किरण शिंदे यांच्याशी चर्चा केली. मात्र, नोकरीत सामावून घेण्याचा निर्णय वरिष्ठांचाच असल्याचे सांगण्यात आले. यावेळी एमआयडीसी उपअभियंता रेवणकर हेदेखील उपस्थित होते. मात्र, या चर्चेअंती कोणतेही ठोस आश्वासन न मिळाल्याने उपोषणकर्त्यांनी जोपर्यंत नोकरीत सामाविष्ठ करुन घेतले जात नाही तोपर्यंत लढत राहण्याचे धोरण अवलंबण्याचे ठरविले आहे.