शहरं
Join us  
Trending Stories
1
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
2
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
3
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
4
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
5
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
6
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
7
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
8
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
9
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
10
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
11
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
12
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
13
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
14
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
15
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
16
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
17
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
18
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
19
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
20
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
Daily Top 2Weekly Top 5

प्रचारतोफा आज थंडावणार

By admin | Updated: February 18, 2017 23:17 IST

राजकीय धुळवड थांबणार : जिल्हा परिषद, पंचायत समिती निवडणूक

रत्नागिरी : जिल्हा परिषदेच्या ५५ आणि पंचायत समितीच्या ११0 जागांसाठीच्या जाहीर प्रचाराची मुदत आज, रविवारी संपणार आहे. तब्बल ६६२ उमेदवार रिंगणात असून, शिवसेनेतील नाराजी, एकमेकांवरील आरोप-प्रत्यारोप, भाजपमधील इन्कमिंग, राष्ट्रवादीतील अंतर्गत वाद एवढ्याच गोष्टी या निवडणुकीत गाजल्या आहेत. रात्री १२ पर्यंत प्रचारास वेळ दिल्याने रविवार हा प्रचाराचा वार ठरणार आहे. जिल्हा परिषद, पंचायत समित्यांचा निवडणूक कार्यक्रम यंदा अत्यंत घाईचाच ठरला असून, अर्ज माघारी सोमवार, दि. १३ रोजी घेण्यात आले. अर्ज मागे घेतल्यानंतर प्रचारासाठी केवळ सहाच दिवस मिळाले. त्यामुळे निवडणुकीत खरी रंगत आली. जिल्हा परिषदेच्या ५५ जागांसाठी २३७, तर पंचायत समितीच्या ११0 जागांसाठी ४२५ उमेदवार रिंगणात आहेत. शिवसेना आणि भाजप या निवडणुकीत स्वबळावर आमने-सामने आले आहेत. काँग्रेस आणि राष्ट्रवादीने पाच तालुक्यांत आघाडी केली आहे आणि तीन तालुक्यांत हे दोन पक्षही आमने-सामने लढत आहेत.शिवसेनेत इच्छुकांची संख्या मोठी होती. त्यामुळे साहजिकच उमेदवारी न मिळालेल्या नाराजांना भाजपने आपल्याकडे वळवले. काही नाराजांनी अपक्ष म्हणून उमेदवारी अर्ज दाखल केला आहे.दापोलीमध्ये पर्यावरणमंत्री रामदास कदम आणि माजी आमदार सूर्यकांत दळवी यांच्यातील शीतयुद्धामुळे शिवसेनेत जोरदार आरोप-प्रत्यारोप झाले आहेत. हेच यावेळेच्या निवडणुकीचे वैशिष्ट्य ठरले आहे. (प्रतिनिधी)जिल्ह्यात प्रचार सभा कमीचजिल्हा परिषद, पंचायत समितीच्या प्रचारासाठी जिल्ह्यात अत्यंत कमी जाहीर सभा झाल्या. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, पर्यावरणमंत्री रामदास कदम, शिक्षण मंत्री विनोद तावडे आणि माजी मुख्यमंत्री नारायण राणे यांच्याच जाहीर सभा झाल्या. राणे यांची राजापुरातील सभा वगळता उर्वरित सभा या उत्तर रत्नागिरी जिल्ह्यातच झाल्या आहेत. त्यातही राष्ट्रवादी काँग्रेसकडून एकही जाहीर सभा झालेली नाही.रविवार ठरणार प्रचार वारआज, रविवारी सायंकाळी प्रचार संपणार आहे. त्यातच रविवार असल्यामुळे प्रचारावर अधिक भर देण्याची तयारी सर्वच पक्षांनी केली आहे. सध्या आंबा बागायतीच्या कामांमुळे ग्रामीण भागातील लोक दिवसभरात घरी भेटत नाहीत. त्यामुुळे रविवारी सकाळपासूनच प्रचार सुरू करण्याची तयारी राजकीय पक्षांनी केली आहे.बंडखोरांची हकालपट्टीया निवडणुकीत शिवसेनेत बंडखोरी करणाऱ्या आठजणांची पक्षातून हकालपट्टी करण्यात आली आहे. प्रथमच अशी तडकाफडकी कारवाई करण्यात आली आहे. या आठजणांमध्ये राजापुरातील सात आणि रत्नागिरीतील एका शिवसेना पदाधिकाऱ्याचा समावेश आहे.आचारसंहिता भंगाची एकच तक्रारआचारसंहिता जाहीर झाल्यापासून जिल्ह्यात आचारसंहिता भंगाची केवळ एकच तक्रार दाखल झाली आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी चिपळूण येथील जाहीर प्रचार सभेत बोलताना कृषी अंदाजपत्रकासाठी केलेल्या तरतुदींचा मुद्दा जाहीर करून आचारसंहिता भंग केला असल्याची तक्रार काँग्रेसचे माजी खासदार नीलेश राणे यांनी निवडणूक विभागाकडे केली आहे. निवासी उपजिल्हाधिकारी तथा निवडणूक आदर्श आचारसंहिता कक्षा समिती प्रमुख सारंग कोडोलकर यांनी ही तक्रार चिपळूण प्रांताधिकारी तथा चिपळूणचे निवडणूक निर्णय अधिकारी यांच्याकडे चौकशीसाठी पाठविली आहे.