शहरं
Join us  
Trending Stories
1
बांगलादेशमध्ये हिंदूंवर होत असलेल्या अत्याचारावरून मुंबईपासून दिलीपर्यंत संताप, तीव्र आंदोलने
2
पाकिस्तानला 'लॉटरी' लागली... १,३५,००,००,००,०००च्या बोलीवर PIA एअरलाईन्सचा सौदा पक्का !
3
IND W vs SL W : गोलंदाजीत शर्मा; फलंदाजीत वर्मा! दुसऱ्या टी-२० सामन्यातही लंकसमोर टीम इंडियाचा डंका!
4
'भारताच्या दोन्ही शत्रूंकडे न्यूक्लिअर वेपन', CDS अनिल चौहान यांचे भविष्यातील युद्धाबाबत मोठे वक्तव्य
5
IND W vs SL W : 'शर्माजी की बेटी' वैष्णवीसह श्री चरणीनं घेतली श्रीलंकेच्या बॅटर्सची फिरकी!
6
ठाकरे बंधूंच्या युतीचा मुहुर्त ठरला, बुधवारी होणार घोषणा, अधिकृत कार्यक्रम पत्रिका समोर
7
उल्हासनगर: शिंदेसेनेत 'जुने विरुद्ध नवे' संघर्ष; तरुणांना संधी देण्याची युवासेनेची मागणी
8
चिनी शस्त्रास्त्रे विकून पाकिस्तान मिळवतोय पैसे; लिबियाशी केला ४ अब्ज डॉलर्सचा लष्करी करार
9
T20I पदार्पणात वर्ल्ड रेकॉर्ड! या पठ्ठ्यानं पहिल्याच षटकात ५ विकेट्स घेत फिरवली मॅच
10
"नरेंद्र मोदींपेक्षा देवेंद्र फडणवीस जास्त फेकाफेकी करतात’’, हर्षवर्धन सपकाळ यांची बोचरी टीका
11
Jemimah Rodrigues: मुंबईकर जेमीला DC कडून मोठं सरप्राइज! फोटोशूटला गेली आणि दिल्लीची कॅप्टन झाली!
12
ज्ञानपीठ पुरस्काराने सन्मानित साहित्यिक विनोद कुमार शुक्ल यांचे निधन, पीएम मोदींनी वाहिली श्रद्धांजली
13
लेकीला शाळेत सोडण्यासाठी आलेल्या वडिलांचा गेटवर अचानक मृत्यू; Video पाहून पाणावतील डोळे
14
गोल्डन बॉय नीरज चोप्राने सपत्निक घेतली पंतप्रधान मोदींची भेट, खास फोटो सोशल मीडियावर पोस्ट
15
मुंबईतील एवढ्या वॉर्डात मुस्लिम मतदार निर्णायक, काँग्रेस उद्धवसेनेसह 'या' पक्षांची मुस्लिम मतांवर नजर
16
फास्ट फूड बनलं सायलेंट किलर; चाऊमीन, पिझ्झा-बर्गरमुळे आतड्यांना छिद्र; १६ वर्षीय मुलीचा मृत्यू
17
राहुल गांधींनी जर्मनीत उपस्थित केला 'व्होट चोरी'चा मुद्दा; देशाची बदनामी केल्याचा भाजपचा आरोप
18
Beed: सरपंच संतोष देशमुख हत्येप्रकरणी वाल्मिक कराडसह सर्व आरोपींवर आरोप निश्चित
19
पाकिस्तानी एअरलाइन्स PIAचा नवा मालक कोण होणार? 'या' कंपनीने लावली तब्बल १० लाख कोटींची बोली
20
भारतीय रेल्वेच नंबर १… चीन, रशिया, जपान देशांना धोबीपछाड दिली; नवा मोठा वर्ल्ड रेकॉर्ड केला!
Daily Top 2Weekly Top 5

प्रचारतोफा आज थंडावणार

By admin | Updated: February 18, 2017 23:17 IST

राजकीय धुळवड थांबणार : जिल्हा परिषद, पंचायत समिती निवडणूक

रत्नागिरी : जिल्हा परिषदेच्या ५५ आणि पंचायत समितीच्या ११0 जागांसाठीच्या जाहीर प्रचाराची मुदत आज, रविवारी संपणार आहे. तब्बल ६६२ उमेदवार रिंगणात असून, शिवसेनेतील नाराजी, एकमेकांवरील आरोप-प्रत्यारोप, भाजपमधील इन्कमिंग, राष्ट्रवादीतील अंतर्गत वाद एवढ्याच गोष्टी या निवडणुकीत गाजल्या आहेत. रात्री १२ पर्यंत प्रचारास वेळ दिल्याने रविवार हा प्रचाराचा वार ठरणार आहे. जिल्हा परिषद, पंचायत समित्यांचा निवडणूक कार्यक्रम यंदा अत्यंत घाईचाच ठरला असून, अर्ज माघारी सोमवार, दि. १३ रोजी घेण्यात आले. अर्ज मागे घेतल्यानंतर प्रचारासाठी केवळ सहाच दिवस मिळाले. त्यामुळे निवडणुकीत खरी रंगत आली. जिल्हा परिषदेच्या ५५ जागांसाठी २३७, तर पंचायत समितीच्या ११0 जागांसाठी ४२५ उमेदवार रिंगणात आहेत. शिवसेना आणि भाजप या निवडणुकीत स्वबळावर आमने-सामने आले आहेत. काँग्रेस आणि राष्ट्रवादीने पाच तालुक्यांत आघाडी केली आहे आणि तीन तालुक्यांत हे दोन पक्षही आमने-सामने लढत आहेत.शिवसेनेत इच्छुकांची संख्या मोठी होती. त्यामुळे साहजिकच उमेदवारी न मिळालेल्या नाराजांना भाजपने आपल्याकडे वळवले. काही नाराजांनी अपक्ष म्हणून उमेदवारी अर्ज दाखल केला आहे.दापोलीमध्ये पर्यावरणमंत्री रामदास कदम आणि माजी आमदार सूर्यकांत दळवी यांच्यातील शीतयुद्धामुळे शिवसेनेत जोरदार आरोप-प्रत्यारोप झाले आहेत. हेच यावेळेच्या निवडणुकीचे वैशिष्ट्य ठरले आहे. (प्रतिनिधी)जिल्ह्यात प्रचार सभा कमीचजिल्हा परिषद, पंचायत समितीच्या प्रचारासाठी जिल्ह्यात अत्यंत कमी जाहीर सभा झाल्या. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, पर्यावरणमंत्री रामदास कदम, शिक्षण मंत्री विनोद तावडे आणि माजी मुख्यमंत्री नारायण राणे यांच्याच जाहीर सभा झाल्या. राणे यांची राजापुरातील सभा वगळता उर्वरित सभा या उत्तर रत्नागिरी जिल्ह्यातच झाल्या आहेत. त्यातही राष्ट्रवादी काँग्रेसकडून एकही जाहीर सभा झालेली नाही.रविवार ठरणार प्रचार वारआज, रविवारी सायंकाळी प्रचार संपणार आहे. त्यातच रविवार असल्यामुळे प्रचारावर अधिक भर देण्याची तयारी सर्वच पक्षांनी केली आहे. सध्या आंबा बागायतीच्या कामांमुळे ग्रामीण भागातील लोक दिवसभरात घरी भेटत नाहीत. त्यामुुळे रविवारी सकाळपासूनच प्रचार सुरू करण्याची तयारी राजकीय पक्षांनी केली आहे.बंडखोरांची हकालपट्टीया निवडणुकीत शिवसेनेत बंडखोरी करणाऱ्या आठजणांची पक्षातून हकालपट्टी करण्यात आली आहे. प्रथमच अशी तडकाफडकी कारवाई करण्यात आली आहे. या आठजणांमध्ये राजापुरातील सात आणि रत्नागिरीतील एका शिवसेना पदाधिकाऱ्याचा समावेश आहे.आचारसंहिता भंगाची एकच तक्रारआचारसंहिता जाहीर झाल्यापासून जिल्ह्यात आचारसंहिता भंगाची केवळ एकच तक्रार दाखल झाली आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी चिपळूण येथील जाहीर प्रचार सभेत बोलताना कृषी अंदाजपत्रकासाठी केलेल्या तरतुदींचा मुद्दा जाहीर करून आचारसंहिता भंग केला असल्याची तक्रार काँग्रेसचे माजी खासदार नीलेश राणे यांनी निवडणूक विभागाकडे केली आहे. निवासी उपजिल्हाधिकारी तथा निवडणूक आदर्श आचारसंहिता कक्षा समिती प्रमुख सारंग कोडोलकर यांनी ही तक्रार चिपळूण प्रांताधिकारी तथा चिपळूणचे निवडणूक निर्णय अधिकारी यांच्याकडे चौकशीसाठी पाठविली आहे.