शहरं
Join us  
Trending Stories
1
अनकॅप्ड मुकुल चौधरीची अविश्वसनीय खेळी! KKR च्या तोंडचा घास हिसकावत LSG ला जिंकून दिली मॅच
2
मुंबईला भारतातील पहिली नॉन-एसी ‘बंद दरवाजांची’ लोकल ट्रेन; उपनगरीय सेवेत होणार दाखल  
3
"आमचे हात अजूनही ट्रिगरवरच आहेत", खवळलेल्या इराणची इस्रायलला खुली धमकी, लेबनाननंतर आक्रमक
4
Video: मुंबई विमानतळाच्या टर्मिनल १ मध्ये आगीचा भडका; प्रवेशद्वार बंद, धुराचे लोट बघून प्रवासी घाबरले
5
Latest Marathi News LIVE: इराणने हल्ला केला, तर आम्हीही निष्ठुरपणे उत्तर देऊ; इस्रायलच्या संरक्षण मंत्र्याचा इशारा
6
बॉलिंगसाठी 'ग्रीन' सिग्नल! तब्बल २५ कोटींचा ऑलराउंडर अखेर गोलंदाजीला आला; पहिल्याच षटकात रिषभ पंतची शिकार
7
Pune Crime: प्रेमात सगळं विसरली अन् प्रियकराच्या मदतीने सहा वर्षांच्या लेकराची केली हत्या, कारण...; पुणे जिल्ह्यातील घटना
8
KKR vs LSG : अजिंक्य रहाणेचा भन्नाट सिक्सर! बॅट निसटली तरीही चेंडू थेट सीमारेषेबाहेर (VIDEO)
9
उपराष्ट्रपती जे.डी. व्हान्स यांना पाकिस्तानात जायला वाटतेय भीती; US-इराण चर्चा फिस्कटणार?
10
"...तोपर्यंत आम्ही हल्ले करत राहू", इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांचा इशारा; हल्ल्याचे व्हिडीओही दाखवले
11
22 वर्षाचा बॉयफ्रेंड, ३५ वर्षाची गर्लफ्रेंड; दोघे रुममध्ये गेले आणि नंतर 'बेड बॉक्स'मध्ये मिळाला तिचा मृतदेह
12
KKR vs LSG: Finn Allen खराब पंचगिरीचा शिकार? दिग्वेश राठीनं टिपलेल्या झेलवरुन वादंग (VIDEO)
13
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
14
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
15
रशियाच्या पाणबुड्या महिनाभर ब्रिटनच्या समुद्रात लपलेल्या, काय करत होत्या? ब्रिटीशांच्या दाव्याने खळबळ...
16
KKR vs LSG : अर्जुन तेंडुलकरची नुसतीच हवा! Playing XI मध्ये मिळाली नाही जागा; अजिंक्य रहाणेचा गेम प्लॅनही फसला
17
टी-२० सामन्यात तब्बल ९ विकेट्स, एका षटकांत ४ बळी; कधीही न तुटणारा वर्ल्ड रेकॉर्ड कुणी बनवला?
18
ट्रम्प यांच्या दाव्याने खळबळ, १०० मिसाईल...! 'शांतीदूत' म्हणवून घेणारा पाकिस्तान 'बेनकाब'; चीनचा बुरखा फाटला
19
अजबच विनोद...! अमेरिका-इराण सीजफायरनंतर पाकिस्तानची थेट 'नोबेल' शांतता पुरस्काराची मागणी
20
Fashion On Bike: बाईकवर लॉन्ग राईडचा प्लॅन आहे? फॉलो करा 'या' फॅशन टिप्स; दिसाल कूल आणि डॅशिंग!
Daily Top 2Weekly Top 5

व्यावसायिकांचा खिसा कापला

By admin | Updated: December 8, 2015 00:33 IST

सुभाष मोहिते : नवीन निकष त्रासदायक; दीड वर्षानंतर व्यवसाय सुरू

चिपळूण : शेतीला जोडधंदा म्हणून चिरेखाण व्यवसाय करणाऱ्या शेतकऱ्याला शासनाने नवे निकष लावून अधिक अडचणीत टाकले आहे. गेल्या दीड वर्षाच्या बंदी कालावधीत झालेली नुकसानभरपाई भरुन काढण्याची संधी देण्याऐवजी नव्याने सुरु होणाऱ्या चिरेखाण व्यवसायात शेतकऱ्यांचे खिसा कापण्याचे काम नव्या शासन धोरणाने केले आहे. चिपळूण तालुका जांभा चिरेखाण संघटनेचे तालुकाध्यक्ष सुभाष मोहिते यांनी शासनाचे नवे निकष बदलण्याची मागणी केली आहे. ग्रामीण भागात शेतीबरोबरच चिरेखाण व्यवसाय तालुक्यातील अनेक शेतकरी करतात. जांभा चिऱ्याला दिवसेंदिवस मागणी वाढत आहे. अनेक तरुण व शेतकरी या व्यवसायाकडे वळले आहेत. अनेकांच्या रोजगाराचा प्रश्न यामुळे मार्गी लागला. उत्खननामुळे पर्यावरणाला धोका पोहचतो. यासाठी नेमण्यात आलेल्या समितीच्या शिफारसी व न्यायालयीन निर्णयानंतर दीड वर्ष चिरेखाण व्यवसायाला बंदी घालण्यात आली. बंदीच्या काळात विनापरवाना झालेल्या उत्खननावर दंडात्मक कारवाईमुळे हा व्यवसाय पूर्णपणे ठप्प झाला होता. या व्यवसायावरच अवलंबून असलेल्यांना यामुळे आर्थिक चणचण निर्माण झाली होती. उत्खनन बंदी उठल्यानंतर शासनाने चिरेखाण व्यवसाय करणाऱ्यांना काही प्रमाणात आर्थिक सूट द्यायला हवी होती. मात्र शासनाने तसे न करता आधीच अडचणीत असलेला चिरेखाण व्यावसायिक या नव्या निकषांमुळे आणखी अडचणीत सापडला आहे. पूर्वी १०० ब्रास जांभा चिरा उत्खननासाठी ५ हजार रुपयांची रॉयल्टी भरावी लागत होती. त्यात शासनाने आता दुपटीने वाढ करत ती १० हजार रुपये केली आहे. पूर्वी १०० ब्रास उत्खननाला एक महिन्याची मुदत असताना, तोही कालावधी कमी करुन आता २० दिवसांवर आणण्यात आला आहे. विनापरवाना उत्खनन अथवा वाहतूक यासाठी तीन पटीत दंड वसूल करण्याची तरतूद होती. मात्र, त्यातही आता शासनाने पाच पटीने वाढ केली आहे. तसेच बाजारभावाप्रमाणे दंड आकारणी करण्याची तरतूद नव्या निकषांमध्ये केली आहे. चिरा व्यवसाय हा विनापरवाना आढळला तर दंड आकारणीसह यंत्रसामुग्रीचीही जप्ती केली जाणार आहे. याबरोबरच इन्कम टॅक्स आणि वॅट लागू करण्याचे शासन धोरण असल्यामुळे हा व्यवसाय अडचणीत येण्याची शक्यता आहे. जांभा चिरेखाणीसाठी शेतकरी शासकीय जमीन वापरत नाही. शिवाय शासकीय स्तरावरुन कोणतीही सवलत किंवा मदत घेत नाही. स्वत:ची अथवा भाडेकराराने जमीन घेऊन जांभा चिरा हा केवळ बांधकामाकरिताच काढला जातो. पडदी, दोरा, फूट यातून विक्रीला योग्य चिरा निघतो. त्याहीपेक्षा वाया जाणारे मटेरियल जास्त प्रमाणात असते. यातून अनेक व्यावसायिकांना फायद्यापेक्षा नुकसानाला सामोरे जावे लागत आहे. शासन वस्तुनिष्ठ परिस्थिती समजावून न घेता केवळ महसूल गोळा करणे या उद्देशाने चिरेखाण व्यवसायाकडे पाहत असल्याचा आरोप सुभाष मोहिते यांनी केला आहे. (प्रतिनिधी)रोजीरोटीचा व्यवसाय : स्थानिक सर्वसामान्य व्यावसायिकांचे दुर्लक्षचिरेखाण व्यवसायावर कामगार, वाहनधारक, त्यावरील हमाल, इमारत बांधकाम करणारे कारागीर, इमारत वस्तू विक्रेते दुकानदार अशा अनेकांची रोजीरोटी या व्यवसायावर चालते. मात्र, स्थानिक सर्वसामान्य चिरेखाण व्यावसायिकांचे कोणालाही काही पडलेले नाही. जांभा, वाळू व सिमेंट हे घटक एकमेकांसाठी पूरक आहेत. वाळूचा लिलाव होण्यास विलंब होत असल्याने त्याचा मोठा फटका व्यावसायिकांना बसतो. आपल्या समस्यांबाबतचे आपले दुखणे मांडण्याऐवजी सोसण्याचे काम चिरेखाण व्यावसायिक करत आहेत.कोकणात जांभा चिऱ्यांचे मोठ्या प्रमाणात उत्पादन केले जाते. कोकणातील कातळी भागाचा वापर यासाठी केला जात आहे. यातून अनेकांच्या हाताला काम मिळाले आहे. चिरेखाणीसाठी जाचक अटी ठेवल्यास हा व्यवसाय करणे पुढील काळात कठीण होणार आहे.अन्यथा आंदोलनाचा इशाराशासनाने नव्याने लावलेल्या निकषांमध्ये फेरबदलाचा विचार करावा. शिवाय चिरेखाण व्यवसायाला पूरक अशा योजना राबविल्यास अनेक तरुण यामुळे उभे राहू शकतात. याचा विचार शासनाने करावा. अन्यथा आंदोलन करण्याचा इशारा चिरेखाण व्यावसायिकांनी दिला आहे.