शहरं
Join us  
Trending Stories
1
तुटलेल्या विद्युत वाहिनीच्या स्पर्शाने दोन शेतकऱ्यांचा मृत्यू; महावितरण विरोधात चिकलठाण्यात रास्ता रोको
2
इस्रायलकडून इराणी टीव्ही स्टुडिओवर क्षेपणास्त्र हल्ला, लाईव्ह बुलेटीन सोडून अँकरने काढला पळ!
3
खुल्लम खुल्ला रोमान्स पडला महागात! बाईकच्या टाकीवर गर्लफ्रेंडला बसवणाऱ्या तरुणाला 'इतका' दंड
4
रांचीला जाणारे एअर इंडियाचे विमान टेक ऑफनंतर दिल्लीला परतले! नेमके झाले तरी काय?
5
आमच्या मागणीपुढे PM मोदींना झुकावे लागले...जनगणनेच्या अधिसूचनेवरुन काँग्रेसचा निशाणा
6
सोनमच्याही एक पाऊल पुढे निघाली गुलफाशा; प्रियकरासोबत मिळून लग्नाच्या एक दिवस आधीच पतीला संपवलं!
7
आर्थिक मदतीशिवाय हल्ला होऊ शकत नाही; पहलगाम हल्ल्यावरुन FATF ने पाकिस्तानला फटकारले
8
सायप्रसच्या महिला खासदाराने PM मोदींचे चरणस्पर्श केले, पंतप्रधानांनी डोक्यावर हात ठेवत दिला आशीर्वाद
9
दहा कोटी वृक्ष लावगडीचे उद्दिष्ट; वन विभाग ‘साइट ट्रॅक’वर, रेशीमला झुकते माप
10
आता पाकिस्तान अणुबॉम्बची धमकी देण्यापूर्वी शंभर वेळा विचार करेल...! SIPRI च्या अहवालात भारताच्या अण्वस्त्रांसंदर्भात मोठा दावा
11
Viral Video : रीलसाठी जीवाशी खेळ; धबधब्यावर उभी राहिली तरुणी, पुढे जे झालं ते बघून चुकेल काळजाचा ठोका
12
"माझाही राजा रघुवंशी झाला असता"; गोव्याला जाताना पत्नीसमोर मारहाण, पतीने सांगितली आपबिती
13
बाप म्हणाला चिंता आहे, मुलगी म्हणाली मी आहे! ३ एकरांत सोयाबीन लावून मुलीची बापाला साथ
14
वृद्ध व्यक्तीला डिजिटल अरेस्ट करून नकली कोर्टात हजर केलं; घातला 'इतक्या' कोटींचा गंडा!
15
इराणचा अमेरिकेच्या दुतावासावर हल्ला अन् अमेरिकेची २८ टँकर विमाने एकाचवेळी झेपावली...
16
NPT मधून बाहेर पडण्याच्या तयारीत इराण, इस्रायलसोबत सुरू असलेल्या युद्धादरम्यान खामेनेई यांचं मोठं प्लॅनिंग?
17
कच्चे तेल ३०० डॉलरवर जाण्याची शक्यता; इराकच्या मंत्र्यांनी जर्मनीच्या कानावर घातला मोठा धोका...
18
"...तर पाकिस्तानकडे युद्धाशिवाय दुसरा पर्याय उरणार नाही!"; पाणी बंद झाल्याने बिलावल बिथरले, दिली अशी धमकी
19
माजी आमदार बच्चू कडू यांना मोठा राजकीय धक्का; जिल्हा बँकेचे अध्यक्ष म्हणून अपात्र
20
प्रेमानेच केला घात! राजावर पाठीमागून केला वार, हत्येसाठी वापरलेला चाकू पोलिसांना सापडला...

व्यावसायिकांचा खिसा कापला

By admin | Updated: December 8, 2015 00:33 IST

सुभाष मोहिते : नवीन निकष त्रासदायक; दीड वर्षानंतर व्यवसाय सुरू

चिपळूण : शेतीला जोडधंदा म्हणून चिरेखाण व्यवसाय करणाऱ्या शेतकऱ्याला शासनाने नवे निकष लावून अधिक अडचणीत टाकले आहे. गेल्या दीड वर्षाच्या बंदी कालावधीत झालेली नुकसानभरपाई भरुन काढण्याची संधी देण्याऐवजी नव्याने सुरु होणाऱ्या चिरेखाण व्यवसायात शेतकऱ्यांचे खिसा कापण्याचे काम नव्या शासन धोरणाने केले आहे. चिपळूण तालुका जांभा चिरेखाण संघटनेचे तालुकाध्यक्ष सुभाष मोहिते यांनी शासनाचे नवे निकष बदलण्याची मागणी केली आहे. ग्रामीण भागात शेतीबरोबरच चिरेखाण व्यवसाय तालुक्यातील अनेक शेतकरी करतात. जांभा चिऱ्याला दिवसेंदिवस मागणी वाढत आहे. अनेक तरुण व शेतकरी या व्यवसायाकडे वळले आहेत. अनेकांच्या रोजगाराचा प्रश्न यामुळे मार्गी लागला. उत्खननामुळे पर्यावरणाला धोका पोहचतो. यासाठी नेमण्यात आलेल्या समितीच्या शिफारसी व न्यायालयीन निर्णयानंतर दीड वर्ष चिरेखाण व्यवसायाला बंदी घालण्यात आली. बंदीच्या काळात विनापरवाना झालेल्या उत्खननावर दंडात्मक कारवाईमुळे हा व्यवसाय पूर्णपणे ठप्प झाला होता. या व्यवसायावरच अवलंबून असलेल्यांना यामुळे आर्थिक चणचण निर्माण झाली होती. उत्खनन बंदी उठल्यानंतर शासनाने चिरेखाण व्यवसाय करणाऱ्यांना काही प्रमाणात आर्थिक सूट द्यायला हवी होती. मात्र शासनाने तसे न करता आधीच अडचणीत असलेला चिरेखाण व्यावसायिक या नव्या निकषांमुळे आणखी अडचणीत सापडला आहे. पूर्वी १०० ब्रास जांभा चिरा उत्खननासाठी ५ हजार रुपयांची रॉयल्टी भरावी लागत होती. त्यात शासनाने आता दुपटीने वाढ करत ती १० हजार रुपये केली आहे. पूर्वी १०० ब्रास उत्खननाला एक महिन्याची मुदत असताना, तोही कालावधी कमी करुन आता २० दिवसांवर आणण्यात आला आहे. विनापरवाना उत्खनन अथवा वाहतूक यासाठी तीन पटीत दंड वसूल करण्याची तरतूद होती. मात्र, त्यातही आता शासनाने पाच पटीने वाढ केली आहे. तसेच बाजारभावाप्रमाणे दंड आकारणी करण्याची तरतूद नव्या निकषांमध्ये केली आहे. चिरा व्यवसाय हा विनापरवाना आढळला तर दंड आकारणीसह यंत्रसामुग्रीचीही जप्ती केली जाणार आहे. याबरोबरच इन्कम टॅक्स आणि वॅट लागू करण्याचे शासन धोरण असल्यामुळे हा व्यवसाय अडचणीत येण्याची शक्यता आहे. जांभा चिरेखाणीसाठी शेतकरी शासकीय जमीन वापरत नाही. शिवाय शासकीय स्तरावरुन कोणतीही सवलत किंवा मदत घेत नाही. स्वत:ची अथवा भाडेकराराने जमीन घेऊन जांभा चिरा हा केवळ बांधकामाकरिताच काढला जातो. पडदी, दोरा, फूट यातून विक्रीला योग्य चिरा निघतो. त्याहीपेक्षा वाया जाणारे मटेरियल जास्त प्रमाणात असते. यातून अनेक व्यावसायिकांना फायद्यापेक्षा नुकसानाला सामोरे जावे लागत आहे. शासन वस्तुनिष्ठ परिस्थिती समजावून न घेता केवळ महसूल गोळा करणे या उद्देशाने चिरेखाण व्यवसायाकडे पाहत असल्याचा आरोप सुभाष मोहिते यांनी केला आहे. (प्रतिनिधी)रोजीरोटीचा व्यवसाय : स्थानिक सर्वसामान्य व्यावसायिकांचे दुर्लक्षचिरेखाण व्यवसायावर कामगार, वाहनधारक, त्यावरील हमाल, इमारत बांधकाम करणारे कारागीर, इमारत वस्तू विक्रेते दुकानदार अशा अनेकांची रोजीरोटी या व्यवसायावर चालते. मात्र, स्थानिक सर्वसामान्य चिरेखाण व्यावसायिकांचे कोणालाही काही पडलेले नाही. जांभा, वाळू व सिमेंट हे घटक एकमेकांसाठी पूरक आहेत. वाळूचा लिलाव होण्यास विलंब होत असल्याने त्याचा मोठा फटका व्यावसायिकांना बसतो. आपल्या समस्यांबाबतचे आपले दुखणे मांडण्याऐवजी सोसण्याचे काम चिरेखाण व्यावसायिक करत आहेत.कोकणात जांभा चिऱ्यांचे मोठ्या प्रमाणात उत्पादन केले जाते. कोकणातील कातळी भागाचा वापर यासाठी केला जात आहे. यातून अनेकांच्या हाताला काम मिळाले आहे. चिरेखाणीसाठी जाचक अटी ठेवल्यास हा व्यवसाय करणे पुढील काळात कठीण होणार आहे.अन्यथा आंदोलनाचा इशाराशासनाने नव्याने लावलेल्या निकषांमध्ये फेरबदलाचा विचार करावा. शिवाय चिरेखाण व्यवसायाला पूरक अशा योजना राबविल्यास अनेक तरुण यामुळे उभे राहू शकतात. याचा विचार शासनाने करावा. अन्यथा आंदोलन करण्याचा इशारा चिरेखाण व्यावसायिकांनी दिला आहे.