शहरं
Join us  
Trending Stories
1
तुळजापुरातील मंदिरात जिंतेंद्र आव्हाड समर्थक आणि सुरक्षारक्षकांमध्ये धक्काबुक्की, नेमकं काय घडलं?
2
काँग्रेसने ३००० मते खरेदी केली, भाजप निवडणूक आयोगात पोहोचला; २०१८ मध्ये CM सिद्धरामय्या १६९६ मतांनी विजयी झाले
3
पगार येताच, ५ मिनिटांनी कर्मचाऱ्याने राजीनामा दिला! एचआरची पोस्ट सोशल मीडियावर व्हायरल
4
पुन्हा आयएएस अधिकाऱ्यांच्या बदल्या! सात अधिकाऱ्यांचे खाते बदलले; कोणते खाते कोणाकडे?
5
India-China Flight: भारत - चीन दरम्यान लवकरच थेट विमानसेवा सुरू होणार; सरकारने विमान कंपन्यांना दिल्या या सूचना
6
जगदीप धनखड अचानक पंतप्रधान मोदींना का भेटले? काँग्रेसचा नवा दावा आणखी एक प्रश्न
7
केंद्र सरकारचा मोठा निर्णय; ४ सेमीकंडक्टर प्रकल्पांना मंजुरी, 'या' राज्यांमध्ये हजारो कोटींची गुंतवणूक
8
Aaditya Thackeray: "आम्ही काय खायचं, हे सांगणारे तुम्ही कोण?" आदित्य ठाकरे केडीएमसीवर भडकले!
9
आधी पत्नीचे नग्न फोटो काढले, मग बळजबरी बाप आणि मेहुण्यासोबत ठेवायला लावले संबंध; कारण...
10
"...त्यानंतरच होणार राज ठाकरेंना मविआत घेण्याचा निर्णय", काँग्रेसचे प्रभारी रमेश चेन्निथला स्पष्टच सांगितलं
11
महाराष्ट्राच्या पैठणीला लंडनमध्ये मोठा मान, व्हिक्टोरिया अल्बर्ट संग्रहालयामध्ये दिसणार!
12
आधारबाबत सुप्रीम कोर्टाचं सूचक विधान, बिहारमधील SIRवरून निवडणूक आयोगाला दिलासा 
13
कोण आहेत 'बेडरूम जिहादी', जे सुरक्षा यंत्रणेसाठी बनले डोकेदुखी?; भारतात दहशत पसरवण्याचा नवा डाव
14
बिहारपासून दिल्लीपर्यंत गोंधळ, अखेर १२४ वर्षांची महिला मतदार आली समोर, वयाबाबत म्हणाली...  
15
"शोना, मला मार" फक्त एवढेच ऐकताच प्रेयसीने प्रियकराचं डोकं भिंतीवर आपटलं, त्यानंतर जे घडले...
16
पाकिस्तानी दहशतवादी दक्षिण कोरियात पोहोचला, ओळख बदलून कंपनीत काम करत होता; दहशतवाद्याला अटक
17
"देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री आहेत की निवडणूक आयुक्त? प्रश्न आयोगाला विचारले तर तुम्ही उत्तर का देता?", रमेश चेन्निथला यांचा सवाल   
18
RCB मुळं वर्ल्ड कप स्पर्धेवर संकट! एम. चिन्नास्वामी स्टेडियमवर बंदी; BCCI सह ICC चं टेन्शन वाढलं
19
९ महिने पाठपुरावा केला तरीही ऊसाचे बिल थकवले; चिठ्ठी लिहून तरुण शेतकऱ्यानं आयुष्य संपवले
20
भारतासाठी धोक्याची घंटा; चीन LAC जवळ उभारतोय नवीन रेल्वे प्रकल्प, तणाव वाढणार..?

भेकुर्लीतील जमीन हस्तांतरणाची प्रक्रिया सुरु

By admin | Updated: June 8, 2014 01:13 IST

भेकुर्ली येथील चाळीस भूमिहीन कुटुंबांना घर बांधण्यासाठी व शेतीसाठी शासनाकडून जमीन मिळणार आहे. जिल्हाधिकारी ई. रवींद्रन यांनी स्वत: भेकुर्लीला भेट

कसई दोडामार्ग : भेकुर्ली येथील चाळीस भूमिहीन कुटुंबांना घर बांधण्यासाठी व शेतीसाठी शासनाकडून जमीन मिळणार आहे. जिल्हाधिकारी ई. रवींद्रन यांनी स्वत: भेकुर्लीला भेट देऊन जमीन हस्तांतरणाची प्रक्रिया सुरू असल्याचे लाभार्थ्यांना सांगितले. घरांसाठी लाभार्थ्यांना तीन गुंठ्यांचे भूखंड, शाळा व अन्य नागरी सुविधांसाठी गावठाण निर्माण करण्यात येईल. त्यानंतर प्रत्येक कुटुंबाला दोन एकर शेतजमीन देण्यासाठीचा प्रस्ताव शासनाकडे तातडीने पाठविला जाणार आहे. भूमिहिनांना घरांसाठी हक्काची जमीन मिळणार आहे. भेकुर्लीत शासकीय जमीन आहे. निडली व भेकुर्लीतील धनगर, दलित व इतर मागासवर्गीय ४० भूमिहीन कुटुंबांना शेती व घरांसाठी ही जागा मिळावी, यासाठी सरपंच प्रेमानंद देसाई यांनी प्रयत्न सुरू केले. जागा मिळविण्यासाठीचा प्रस्ताव जिल्हाधिकाऱ्यांना सादर केला. त्यानंतर जिल्हा परिषद सदस्य एकनाथ नाडकर्णी यांच्यासह जिल्हाधिकाऱ्यांकडे पाठपुरावा केला. जिल्हाधिकाऱ्यांनी सुरुवातीपासूनच या प्रस्तावासंबंधी सकारात्मकता दर्शविली. स्वत: लक्ष घालून तहसीलदारांना जमीन हस्तांतरणाची प्रक्रिया तातडीने मार्गी लावण्याच्या सूचना केल्या. शुक्रवारी जिल्हाधिकारी ई. रवींद्रन यांनी भेकुर्लीला भेट दिली. यावेळी त्यांच्यासोबत तहसीलदार बी.बी. जाधव, एकनाथ नाडकर्णी, जनार्दन गोरे, प्रभारी गटविकास अधिकारी प्रशांत चव्हाण, भूमिअभिलेखचे अधीक्षक महेश गावकर, तालुका कृषी अधिकारी कांबळे, चौकुळ कुंभवडेचे सरपंच विजय गावडे, पोलीस उपनिरीक्षक पोवार व कर्मचारी उपस्थित होते. यावेळी भेकुर्ली मंदिरात झालेल्या चर्चेदरम्यान तहसीलदार व भूमी अभिलेखच्या अधिकाऱ्यांनी जमिनीची माहिती दिली. तसेच चाळीस कुटुंबांना देण्यात येणाऱ्या जमिनीचा आराखडा सादर केला. यावेळी जिल्हाधिकारी यांनी, लाभार्थ्यांना घर बांधण्यासाठी दहा एकर क्षेत्र गावठाण म्हणून विकसित करणे शक्य आहे. जिल्हास्तरावरून त्याला मान्यता मिळू शकते. प्रत्येक कुटुंबाला तीन गुंठ्यांचे भूखंड देण्यात येतील. त्यासाठी सुमारे पाच हजार रुपये रक्कम शासनाकडे जमा करावी लागेल, असे सांगितले. तळकट रस्त्यासाठी निधी देणार जिल्हा परिषद सदस्य एकनाथ नाडकर्णी व कुंभवडे सरपंच विजय गावडे यांनी कुंभवडे व तळकट रस्त्यासाठी निधी देण्याची मागणी जिल्हाधिकाऱ्यांकडे केली. ई. रवींद्रन यांनी रस्त्याच्या मोरी व गटारासाठी निधी दिला जाईल, असे आश्वासन दिले. (वार्ताहर)