शहरं
Join us  
Trending Stories
1
इराण हल्ल्याचा तीव्र शब्दांत निषेध; कतारने क्षेपणास्त्रे हवेतच रोखली, जीवितहानी झाली नसल्याचा दावा
2
आखाती देशांत तणाव वाढण्याची चिन्हे, अनेक ठिकाणी एअरस्पेस बंद; एअर इंडिया, इंडिगोकडून सूचना जारी
3
इराणचा पलटवार...! कतारमधील अमेरिकेच्या सर्वात मोठ्या एअरबेसवर डागली 6 क्षेपणास्त्रे
4
IND vs ENG मालिके दरम्यान दु:खद बातमी! भारताच्या दिग्गज फिरकीपटूचं निधन; लंडनमध्ये घेतला अखेरचा श्वास
5
“त्रिभाषा सूत्रावर सर्व संबंधितांशी बोलूनच अंतिम निर्णय घेणार”; CM फडणवीसांनी केले स्पष्ट
6
ENG vs IND : फलंदाजांनी आपलं काम केलं! टीम इंडियानं हा मंत्र जपला तर विजय पक्का, पण...
7
“स्वसंरक्षणाचा इराणला पूर्ण अधिकार”; रशियाने स्पष्टच सांगितले, तणाव वाढण्याची चिन्हे
8
ठरले! महादेव बाबर NCPमध्ये करणार प्रवेश; DCM अजित पवार राहणार उपस्थित, पुण्यात ताकद वाढणार
9
कुर्ला-सायनदरम्यान ओव्हरहेड वायर तुटली; मध्य रेल्वेच्या जलद फेऱ्या ठप्प, प्रवाशांचे हाल
10
"...तेलाच्या किमती कमी ठेवा, मी बघतोय!" इराण-इस्रायल युद्धादरम्यान डोनाल्ड ट्रम्प यांचं मोठं विधान
11
ENG vs IND: KL राहुल-पंतच्या सेंच्युरीनंतर जड्डूची उपयुक्त खेळी! इंग्लंडसमोर ३७१ धावांचे टार्गेट
12
इस्रायलचा इराणवर मोठा हल्ला, ५० हून अधिक लढाऊ विमानांचा कहर; महत्त्वाच्या लष्करी तळांवर तुफान बॉम्बिंग
13
"२०२२ मध्ये केवळ वादळ होतं, २०२७ मध्ये....", पोटनिवडणुकीच्या निकालानं केजरीवाल खूश, केली मोठी भविष्यवाणी
14
खामेनेई पळून जाण्याच्या तयारीत! इराणच्या माजी युवराजांचा दावा, 'सुप्रीम लीडर'बद्दल काय म्हणाले?
15
२८ जुलैचा दावा खरा होणार? तिसरे महायुद्ध अटळ? बाबा वेंगा-नास्त्रेदमस यांची मोठी भविष्यवाणी
16
"तमीज से खेलने के चक्कर में..." कडक खेळी शिवाय पंतची 'मन की बात' चर्चेत (VIDEO)
17
राजाच्या पैशानेच बनली त्याच्या मृत्यूची योजना! लग्नाआधीच सुरू केलेलं नवं खातं, सोनमनं तेच पैसे वापरले अन्... 
18
रिषभ पंतला तोड नाय! सेंच्युरीसह रचला इतिहास; स्टेडियम स्टँडमधून गावसकरांचा 'कोलांटी उडी' मार असा इशारा
19
७६ लाख रहस्यमय मतांबाबतच्या याचिकेवर हायकोर्टात सुनावणी पूर्ण; प्रकाश आंबेडकरांनी मांडली बाजू
20
आषाढी वारीत काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ सहभागी होणार; दिवसभर दिंडीसोबत चालणार

भेकुर्लीतील जमीन हस्तांतरणाची प्रक्रिया सुरु

By admin | Updated: June 8, 2014 01:13 IST

भेकुर्ली येथील चाळीस भूमिहीन कुटुंबांना घर बांधण्यासाठी व शेतीसाठी शासनाकडून जमीन मिळणार आहे. जिल्हाधिकारी ई. रवींद्रन यांनी स्वत: भेकुर्लीला भेट

कसई दोडामार्ग : भेकुर्ली येथील चाळीस भूमिहीन कुटुंबांना घर बांधण्यासाठी व शेतीसाठी शासनाकडून जमीन मिळणार आहे. जिल्हाधिकारी ई. रवींद्रन यांनी स्वत: भेकुर्लीला भेट देऊन जमीन हस्तांतरणाची प्रक्रिया सुरू असल्याचे लाभार्थ्यांना सांगितले. घरांसाठी लाभार्थ्यांना तीन गुंठ्यांचे भूखंड, शाळा व अन्य नागरी सुविधांसाठी गावठाण निर्माण करण्यात येईल. त्यानंतर प्रत्येक कुटुंबाला दोन एकर शेतजमीन देण्यासाठीचा प्रस्ताव शासनाकडे तातडीने पाठविला जाणार आहे. भूमिहिनांना घरांसाठी हक्काची जमीन मिळणार आहे. भेकुर्लीत शासकीय जमीन आहे. निडली व भेकुर्लीतील धनगर, दलित व इतर मागासवर्गीय ४० भूमिहीन कुटुंबांना शेती व घरांसाठी ही जागा मिळावी, यासाठी सरपंच प्रेमानंद देसाई यांनी प्रयत्न सुरू केले. जागा मिळविण्यासाठीचा प्रस्ताव जिल्हाधिकाऱ्यांना सादर केला. त्यानंतर जिल्हा परिषद सदस्य एकनाथ नाडकर्णी यांच्यासह जिल्हाधिकाऱ्यांकडे पाठपुरावा केला. जिल्हाधिकाऱ्यांनी सुरुवातीपासूनच या प्रस्तावासंबंधी सकारात्मकता दर्शविली. स्वत: लक्ष घालून तहसीलदारांना जमीन हस्तांतरणाची प्रक्रिया तातडीने मार्गी लावण्याच्या सूचना केल्या. शुक्रवारी जिल्हाधिकारी ई. रवींद्रन यांनी भेकुर्लीला भेट दिली. यावेळी त्यांच्यासोबत तहसीलदार बी.बी. जाधव, एकनाथ नाडकर्णी, जनार्दन गोरे, प्रभारी गटविकास अधिकारी प्रशांत चव्हाण, भूमिअभिलेखचे अधीक्षक महेश गावकर, तालुका कृषी अधिकारी कांबळे, चौकुळ कुंभवडेचे सरपंच विजय गावडे, पोलीस उपनिरीक्षक पोवार व कर्मचारी उपस्थित होते. यावेळी भेकुर्ली मंदिरात झालेल्या चर्चेदरम्यान तहसीलदार व भूमी अभिलेखच्या अधिकाऱ्यांनी जमिनीची माहिती दिली. तसेच चाळीस कुटुंबांना देण्यात येणाऱ्या जमिनीचा आराखडा सादर केला. यावेळी जिल्हाधिकारी यांनी, लाभार्थ्यांना घर बांधण्यासाठी दहा एकर क्षेत्र गावठाण म्हणून विकसित करणे शक्य आहे. जिल्हास्तरावरून त्याला मान्यता मिळू शकते. प्रत्येक कुटुंबाला तीन गुंठ्यांचे भूखंड देण्यात येतील. त्यासाठी सुमारे पाच हजार रुपये रक्कम शासनाकडे जमा करावी लागेल, असे सांगितले. तळकट रस्त्यासाठी निधी देणार जिल्हा परिषद सदस्य एकनाथ नाडकर्णी व कुंभवडे सरपंच विजय गावडे यांनी कुंभवडे व तळकट रस्त्यासाठी निधी देण्याची मागणी जिल्हाधिकाऱ्यांकडे केली. ई. रवींद्रन यांनी रस्त्याच्या मोरी व गटारासाठी निधी दिला जाईल, असे आश्वासन दिले. (वार्ताहर)