शहरं
Join us  
Trending Stories
1
Rohit Sharma: रोहित शर्माची कसोटी क्रिकेटमधून निवृत्तीची घोषणा
2
Mumbai Local: मुसळधार पाऊस आणि वादळी वाऱ्यामुळे मुंबई लोकल सेवा विस्कळीत, प्रवाशांची गैरसोय
3
'ऑपरेशन सिंदूर'बद्दल पंतप्रधान मोदींनी कालच दिले होते संकेत? 'त्या' वाक्यावरून रंगलीये चर्चा
4
"मारुतीरायाच्या आदर्शांचं पालन केलं, आम्ही त्यांनाच मारलं ज्यांनी…’’, राजनाथ सिंह यांचं मोठं विधान  
5
"दहशतवाद्यांना माफी नाही"; 'ऑपरेशन सिंदूर'वर इंग्लंडचे माजी PM ऋषी सुनक यांची रोखठोक प्रतिक्रिया
6
Operation Sindoor : "कलमाबद्दल विचारणाऱ्यांना भारतीय सैन्याने महाभारत सुनावलं, आपल्या शांत झोपेमागे..."
7
भारताच्या कारवाईने पाकिस्तानचा तीळपापड, शाहबाज शरीफ बैठका घेत सुटले; म्हणाले, 'आम्हीही उत्तर..."
8
हाफिज सईद, मसूद अझहर, सय्यद सलाउद्दीन..., भारताच्या एअर स्ट्राईकमध्ये दहशतवाद्यांच्या म्होरक्यांचं झालं एवढं नुकसान
9
'सैन्याच्या शौर्याला सलाम, आम्ही सरकारसोबत उभे आहोत'; 'ऑपरेशन सिंदूर'वर काँग्रेसची पहिली प्रतिक्रिया
10
लादेन पुरवायचा निधी, कसाब-हेडलीने घेतलेले प्रशिक्षण..; भारताने 'ते' मरकज केले जमीनदोस्त
11
Operation Sindoor : "मुलाच्या मृत्यूचा बदला घेतला"; पर्यटकांसाठी जीव धोक्यात घातलेल्या आदिलच्या वडिलांची प्रतिक्रिया
12
ऑपरेशन सिंदूर: शरद पवारांनी केला पंतप्रधान नरेंद्र मोदींना फोन; म्हणाले, “या कठीण काळात...”
13
'ऑपरेशन सिंदूर'मुळे IPL 2025 स्पर्धेच्या नियोजनात काय बदल होणार? BCCI ने दिलं उत्तर
14
operation sindoor video: जिथे रचले गेले, भारतात रक्ताचा सडा पाडणारे कट; ती ठिकाणं अशी उडवली, बघा व्हिडीओ
15
Naxal news: दहशतवाद्यांपाठोपाठ नक्षल्यांवरही 'वार'; तेलंगणाच्या सीमेवर २२ नक्षलवादी ठार
16
Operation Sindoor Live Updates: देशाच्या विविध भागांत मॉकड्रिल आणि ब्लॅकआऊट
17
भारत आणि पाकिस्तानमध्ये कोणत्या वस्तूंचा व्यापार होतो? किती आहे टॅरिफ?
18
तणाव वाढवायचा नाही, पण...; अजित डोवाल यांची अमेरिका,ब्रिटन आणि सौदीसह अनेक देशांशी चर्चा!
19
"भारतीय सैन्याने पाकिस्तानच्या दहशतवादी तळांवर केलेला हल्ला अभिमानास्पद, आता...", उद्धव ठाकरे यांची प्रतिक्रिया
20
Jemimah Rodrigues: जेमिमा रॉड्रिग्जनं दक्षिण आफ्रिकेच्या गोलंदाजांना धु-धू धुतलं, ऐतिहासिक शतक ठोकलं!

जिल्हा विभाजनाची प्रक्रिया थंडावली

By admin | Updated: May 22, 2017 23:08 IST

जिल्हा विभाजनाची प्रक्रिया थंडावली

शोभना कांबळे । लोकमत न्यूज नेटवर्करत्नागिरी : जिल्ह्याच्या विभाजनासाठी शासनाकडून दोन वर्षांपूर्वी अनुकूलता दर्शविण्यात आली होती. त्यानुषंगाने विविध मुद्द्यांच्या आधारे जिल्हा प्रशासनाकडून मंत्रालयाकडे माहितीही पाठवण्यात आली आहे. मात्र, आता दोन वर्षांचा काळ उलटला तरीही याबाबत कोणतीच हालचाल सुरू झाली नसल्याने जिल्हा विभाजनाची प्रक्रिया थंडावली की काय, असा सवाल होत आहे.शासन निर्णयानुसार जिल्हा विभाजनाचे निकष ठरवण्याकरिता महसूल विभागाचे प्रधान सचिव यांच्या अध्यक्षतेखाली जिल्हा पुनर्रचना समितीची बैठक २६ जून २०१५ रोजी आयोजित करण्यात आली होती. यावेळी रत्नागिरी जिल्हा पुनर्रचनेबाबतचे विविध निकष निश्चित करून या निकषांना गुणांक द्यावेत, निकष ठरविताना प्रशासकीय गरज लक्षात घेऊन त्याअनुषंगाने प्राप्त मागणीची तपासणी करून अहवाल सादर करण्याच्या सूचना या समितीकडून करण्यात आल्या होत्या. कोकणातील ठाणे जिल्ह्याचे विभाजन करून पालघर नवीन जिल्हा उदयाला आला आहे. पालघरबरोबरच महाराष्ट्रातील इतर नवनिर्मित जिल्ह्यांमध्ये प्रशासकीयदृष्ट्या आवश्यक असलेल्या मूलभूत सोयीसुविधांचा मोठ्या प्रमाणावर अभाव दिसून येत आहे. यात निधीची कमतरता, विविध कार्यालयांकरिता इमारतींचा अभाव, पदांची कमतरता तसेच इतर प्रशासकीय गोष्टींची उणीव असल्याने कामकाजात अडचणी येत असल्याचे या समितीकडून निदर्शनास आणून देण्यात आले आहे. त्यामुळे नवीन जिल्ह्याची निर्मिती करण्यापूर्वीच विविध बाबींची माहिती संकलित करण्यासाठी राज्याच्या महसूल व वन विभागाकडून जिल्हास्तरावर माहिती मागवण्यात आली होती.नवीन जिल्ह्याचे मुख्यालय विकसित करताना आवश्यक असलेल्या प्रशासकीय, कार्यालयीन इमारती, कर्मचारी-अधिकारी यांची निवासस्थाने, वाहने, तालुके, गावांची संख्या, क्षेत्रफळ, जिल्हास्तरीय कार्यालयांची संख्या, आकृतिबंधानुसार आवश्यक असलेली एकूण पदे, जिल्हा मुख्यालयापासून सर्वांत दूरच्या तालुका तसेच गावाचे अंतर, जिल्हास्तरीय कार्यालयांमध्ये मागील दहा वर्षात जनतेकडून प्रतिवर्षी प्राप्त झालेल्या अर्जांची, तक्रारींची संख्या आदींबाबत जिल्हा प्रशासनाकडून माहिती पाठविण्यात आली आहे. ही माहिती जिल्हा प्रशासनाकडून शासनाकडे पाठविल्यास दोन वर्षांचा कालावधी उलटला. मात्र, शासनाकडून जिल्हा विभाजनाबाबत कोणतीच हालचाल दिसून येत नाही. त्यामुळे रत्नागिरी जिल्ह्याचे विभाजन होणार की नाही, असा सवाल केला जात आहे.मध्यवर्ती ठिकाणी मुख्यालय हवेराज्याच्या स्थापनेपासून आतापर्यंत किती व केव्हा नव्याने जिल्हे निर्माण करण्यात आले, या जिल्ह्यांच्या निर्मितीच्या वर्षासह याबाबतची माहिती शासनाने मागविली होती. त्याचबरोबर सामान्य जनतेला सोयीसुविधा पुरविण्याकरिता सोयीस्कर होईल, अशा पद्धतीने नवीन जिल्ह्यांची निर्मिती करण्यात यावी, अशा पद्धतीच्या सूचना या समितीतर्फे करण्यात आल्या होत्या. या जिल्ह्याचे मुख्यालय नवनिर्मित जिल्ह्याच्या मध्यवर्ती ठिकाणी असावे, असेही समितीने सुचविले आहे.