शहरं
Join us  
Trending Stories
1
ऑपरेशन सिंदूर' दहशतवादाविरुद्धच्या लढाईत एक उदाहरण निर्माण करेल : राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू
2
आम्ही रशियन तेल खरेदी करणे थांबवलेले नाही, जे फायदेशीर असेल ते आम्ही करू; भारतीय कंपन्यांनी स्पष्टच सांगितले
3
Kishtwar Cloud Burst Photos: मृत्यूचं तांडव... जीवलगांचा आक्रोश; जिवंत माणसं गाडली, 52 मृतदेह सापडले, 200 बेपत्ता
4
धनंजय मुंडेकडून १० हजार रुपये वसूल करण्याचे खंडपीठाचे आदेश; नेमके कारण काय?
5
हॉटेलच्या रुममध्ये सापडला महिला आणि पुरुषाचा मृतदेह; पोलिसांनी दरवाजा तोडला धक्काच बसला
6
जजच्या परीक्षेची तयारी करणारी युवती चालत्या ट्रेनमधून गायब; ७ दिवस सुगावा नाही, ५ थेअरी समोर आल्या
7
मैत्रिणीने पार्टीला बोलावलं आणि दारूमध्ये मिसळले ड्रग्ज; तरुणीवर सामूहिक बलात्कार करून बनवले व्हिडीओ
8
Aadhaar Card : खुशखबर! ई-आधार अ‍ॅपवरुन घरबसल्या काही मिनिटांत नाव, पत्ता, मोबाईल नंबर अपडेट करता येणार
9
वाहनधारकांना मोठा दिलासा! हाय सिक्युरिटी नंबर प्लेट लावण्यास 'या' तारखेपर्यंत मुदतवाढ
10
'ट्रम्प यांनी टॅरिफवर चर्चा करण्यासाठी बोलावले, पण नोबेलबद्दल बोलायला लागले'; नॉर्वेजियन वृत्तपत्राने डोनाल्ड ट्रम्प यांचा पर्दाफाश केला
11
'मी फक्त मटण हंडीचं आमंत्रण स्वीकारतो'; दहीहंडीच्या मुद्द्यावर राज ठाकरेंचं उत्तर, काय घडलं?
12
मोठी बातमी! सोमनाथ सूर्यवंशी मृत्यू प्रकरणात खंडपीठाचे एसआयटी स्थापन करण्याचे आदेश
13
ही घरे नाहीत तर पुढच्या पिढ्यांसाठी ‘सोन्यासारखी’ गुंतवणूक; CM देवेंद्र फडणवीसांचा BDD वासियांना सल्ला
14
"जबान संभालें, वरना...!"; पाकिस्तानच्या चिथावणीखोर वक्तव्यांवर भारताचं चोख प्रत्युत्तर
15
दिल्ली, बीजिंग आणि मॉस्कोच्या लागोपाठ बैठका; काय आहे पंतप्रधान मोदींची SCO रणनीती?
16
Vir Chakra: दहशतवाद्यांचे अड्डे उद्ध्वस्त करणाऱ्या फाइटर पायलट्सना 'वीर चक्र'! कोण आहेत ते नऊ जवान?
17
ढगफुटीनंतर किश्तवाडमध्ये मृत्यूचं तांडव, आतापर्यंत ३३ जणांचा मृत्यू, १२० हून अधिक जखमी, २०० जण बेपत्ता
18
आमदार पतीची हत्या, पुढे 3 वेळा जिंकली निवडणूक; आता सपाने केली हकालपट्टी, कोण आहे पूजा पाल?
19
India-Pakistan Tension : '...तर तुम्हाला सोसणार नाही', पाकिस्तानच्या धमकीला भारताने फटकारले
20
सावत्र आईबरोबर मुलगा करत होता अश्लील चाळे, नेमकं त्याच वेळी बापाने पाहिलं अन् मग...

मुख्यमंत्र्यांकडून बंधाऱ्यांचे कौतुक

By admin | Updated: January 19, 2016 23:41 IST

लोकसहभाग : कृषी विकास अधिकाऱ्यांच्या पाठीवर थाप

रहिम दलाल --रत्नागिरी लोकसहभाग व श्रमदानातून जिल्ह्यात मिशन बंधारे मोहीम राबवण्यात आली. या यशस्वी योजनेची दखल जिल्हा दौऱ्याच्या वेळी मुख्यमंत्र्यांनी घेतली आणि जिल्हा परिषद कृषी विकास अधिकारी पी. एन. देशमुख यांच्या पाठीवर कौतुकाची थाप मारली. श्रमदानातून बांधण्यात आलेल्या बंधाऱ्यांमुळे २४१ कोटी लीटर्स पाणी साठा करण्यात आला. दरवर्षीच्या तुलनेत यंदा सुमारे १००० मिलिमीटर पाऊस कमी पडल्याने जिल्ह्यात उन्हाळ्याच्या दिवसांत भीषण पाणीटंचाई उद्भवणार असल्याचे चित्र समोर ठेवण्यात आले होते. त्यामुळे भूगर्भातील पाण्याची पातळी वाढवण्याच्या दृष्टिने जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी प्रेरणा देशभ्रतार यांनी जिल्ह्यात महात्मा फुले जलभूमी संधारण अभियानांतर्गत मिशन बंधारे २०१५-२०१६ हे अभियान राबवण्याचा निर्णय घेतला. त्याप्रमाणे जिल्हा परिषद कृषी विभागाने जिल्हा व तालुकास्तरावर कृषी अधिकाऱ्यांची कार्यशाळा घेऊन तालुकास्तरावर अधिकारी, कर्मचारी, सरपंच यांना बंधारे बांधण्याबाबत प्रशिक्षण देण्यात आले.ग्रामीण भागातील नदी, नाले, ओढे आदींमध्ये वनराई बंधारे बांधून पाणी अडवण्याचे काम सुरु करण्यात आले. जिल्ह्यात गावोगावी बंधारे बांधण्याची मोहीम हाती घेण्यात आली. जिल्हा परिषद अध्यक्ष जगदीश राजापकर, मुख्य कार्यकारी अधिकारी पे्ररणा देशभ्रातर, उपाध्यक्ष सतीश शेवडे यांच्या मार्गदर्शनाखाली हे काम सुरू होते. साडेतीन महिन्यांच्या कालावधीत ४५७७ वनराई, विजय व कच्चे बंधारे बांधण्यात आले. त्यांची तालुकानिहाय संख्या पुढीप्रमाणे आहे.हे बंधारे बांधण्यासाठी खासगी कंपन्या, ठेकेदार, स्वयंसेवी संस्था, दानशूर व्यक्तींकडून आवश्यक असलेल्या साहित्याचा वापर करण्यात आला. बंधाऱ्यांमुळे परिसरातील विहिरी व कूपनलिकांतील पाण्याची पातळी वाढण्यास मदत झाली. त्यामुळे वन्य प्राणी, पाळीव जनावरे, शेळ्या-मेंढ्यांना पिण्याचे पाणी उपलब्ध झाले. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस जिल्हा दौऱ्यावर आले असताना चिपळूण येथील एका कार्यक्रमामध्ये त्यांनी मिशन बंधारे २०१५-१६ च्या माध्यमातून उभारण्यात आलेल्या बंधाऱ्यांच्या कामाची दखल घेतली व बंधारे उभारण्याच्या कामाची प्रशंसा केली. या कार्यक्रमाला जिल्हाभरातील हजारो लोक उपस्थित होते.