शहरं
Join us  
Trending Stories
1
व्हाईट हाऊसचे सल्लागार बनले २ जिहादी; एक लश्कर ए तोयबा तर दुसरा अल कायदाशी लिंक
2
केवळ ठाकरे गटाला नाही, मनसेलाही धक्का; दादरा नगर हवेलीसह ७ ठिकाणचे पदाधिकारी शिंदेसेनेत
3
PM मोदींचा एअरबेस दौरा, डेलीगेशन अन् चॅनेल बॅन...शहबाज शरीफ करताहेत भारताची नक्कल
4
Ayodhya Temple : राम मंदिराच्या सुरक्षेत मोठा बदल, २५० सुरक्षा रक्षकांना कामावरून कमी केले! करण काय?
5
“मोदी २०० देश फिरले, पण एकही पाठिशी नाही; शिष्टमंडळाच्या वऱ्हाडावर बहिष्कार टाकला पाहिजे”
6
संपूर्ण यादीच आली, सर्वपक्षीय शिष्टमंडळाचे सदस्य ठरले, प्रत्येक टीममध्ये किती अन् कोण नेते?
7
ज्या गर्लफ्रेंडशी गुलूगुलू बोलायचा ती निघाली त्याचीच पत्नी, रंगेल पतीची झाली अशी फजिती, त्यानंतर...
8
पीएमपीएमएलच्या ईलेक्ट्रीक बसची रेंज किती; कालच पाहिली, १,२४,००० किमी एवढे प्रचंड रनिंग झालेली बस...
9
अमेरिकेने ४ कोटी रुपये किमतीचे भारतीय आंबे का नष्ट केले? एक चूक सर्वांना महागात पडली
10
मिथुन चक्रवर्ती अडचणीत, BMC कडून सात दिवसांची 'डेडलाइन', काय आहे संपूर्ण प्रकरण?
11
बारावी शिकलेली रिसेप्शनिस्ट ज्योती पाकिस्तानपर्यंत पोहोचली कशी? 'या' देशांचीही केलीय वारी
12
मेकर्ससोबतच्या क्रिएटिव्ह मतभेदांमुळे सोडला 'हेरा फेरी ३'? परेश रावल ट्वीट करत म्हणाले...
13
पोखरणच्या जमिनीवर 'असा' झाला स्फोट, अमेरिकाही हादरली; आजच्या दिवशी भारताची दखल जगानं घेतली
14
पाकची नवी चाल! भारताच्या ‘डिप्लोमॅटिक स्ट्राइक’ला ‘शांतीदूता’ने उत्तर; जगाला सांगणार काय?
15
गिलख्रिस्टच्या IPL संघात विराटला स्थान नाही, Mumbai Indiansचे ५ जण, कर्णधार कोण?
16
पाकिस्तानसोबतच्या तणावादरम्यान भारत आणि अफगाणिस्तानमधील व्यापार पुन्हा सुरू
17
सोलापूरलगत बाळे ओढ्यावर ट्रक पलटी; सोलापूर-हैदराबाद-पुणे महामार्गावरील वाहतुकीला अडथळा
18
आयडियाची कल्पना झाली फेल! बेपत्ता झालेला गुरुग्रामचा आयटी मॅनेजर पकडला गेला अन् समोर आलं खरं कारण
19
अटकेत पाकिस्तानी स्पाय? ज्योती मल्होत्राची कमाई किती? कोरोनात नोकरी गेली अन्... पाकिस्तानही फिरून आली...
20
Hyundai ने आखली मोठी योजना! भारतात लॉन्च करणार 20 पेट्रोल-डिझेल अन् 6 EV कार

दर्याचा राजा झालाय मासेमारीसाठी सज्ज

By admin | Updated: August 1, 2015 00:22 IST

मोठ्या नौका किनारीच : हवामान बदलाची भीती

मालवण : भारताच्या पूर्व-पश्चिम किनारपट्टीवरील शासनाने लागू केलेला १ जून ते ३१ जुलै हा पावसाळी मासेमारी बंदीचा कालावधी संपल्याने नव्या मासेमारी हंगामाचा श्रीगणेशा काही मच्छिमारांनी केला आहे, असे असले तरी नारळी पौर्णिमेपर्यंत हवामान बदल होण्याची भीतीही व्यक्त होत आहे. समुद्र शांत असल्याने शुक्रवारी अनेक मच्छिमारांनी आपल्या नौका आज समुद्रात लोटत नव्या मासेमारी हंगामाचा श्रीगणेशा केला. मात्र, मोठ्या नौका अद्याप किनाऱ्यावरच सुरक्षित ठिकाणी उभ्या आहेत. गेल्या काही वषार्तील मच्छिमारांतील वादाची स्थिती पाहता मत्स्य विभाग, बंदर विभाग सतर्क झाला असून पोलिस प्रशासनानेही खबरदारीच्या सूचना दिल्या आहेत.केंद्र शासनाने राज्याच्या पश्चिम किनारपट्टीवर १ जून ते ३१ जुलै या २महिन्याच्या कालावधीत मासेमारी बंदी जारी केली होती. ही बंदी आज, ३१ जुलै रोजी संपत आहे. आगामी काळात समुद्रात पाऊस व वादळी वाऱ्याचा जोर वाढण्याची शक्यता आहे. या हंगामात होणाऱ्या वादळी वाऱ्यात नौकांच्या सुरक्षेचा प्रश्न निर्माण होऊ शकतो. छोट्या नौका मासेमारी करून तात्काळ किनाऱ्यावर पोहचू शकतात. त्यामुळे किनाऱ्यावर बंदिस्त ठेवलेल्या नौका जागेवरच आहे. बदलत्या हवामानामुळे आगामी काही दिवस अघोषित मासेमारी बंदी राहणार आहे. मत्स्य विभागानेही आगामी महिनाभराच्या कालावधीत पावसाळी हवामान तसेच वादळी वारे याचा अंदाज घेऊनच मासेमारी करण्याच्या सूचना मच्छिमारांना केल्या आहेत. (वार्ताहर)अनधिकृत मासेमारीवर कडक कारवाई व्हावी मासेमारी बंदी कालावधी संपल्याने पुन्हा गोवा, कर्नाटक, गुजरात राज्यातील ट्रॉलर्सचा सिंधुदुर्ग किनारपट्टीवर हैदोस घालतात. त्यामुळे गतवर्षीसारखे आक्रमण उदभवण्याची शक्यता आहे. स्थानिक व परराज्यातील अनधिकृत मासेमारीवर मत्स्य विभागाने दिलेल्या आश्वासनानुसार कारवाई करावी, अशी मागणी मालवण तालुका श्रमिक संघ, श्रमजीवी रापण संघ यांनी निवेदनाद्वारे मत्स्य विभाग सहाय्यक मत्स्य आयुक्त यांना केली आहे.