शहरं
Join us  
Trending Stories
1
पहलगाम हल्ल्याचा मास्टरमाइंड पाकच; लष्कर, आयएसआय व आर्मीने रचला कट; एनआयएच्या अहवालात दावा
2
कांजूर डम्पिंग ग्राउंड बेकायदा, उच्च न्यायालयाचा राज्य सरकार, महापालिकेला झटका; तीन महिन्यांत जैसे थे करा
3
पाकला उत्तर देण्यासाठी गंगा एक्स्प्रेस-वेवरून झेपावतील लढाऊ विमाने; लँडिंग ड्रिल यशस्वी : देशाच्या संरक्षण तयारीत ऐतिहासिक टप्पा
4
चोंडीत ६०० व्हीव्हीआयपी, दोन हजार पाहुण्यांचा खास पाहुणचार; ६ मे रोजी मंत्रिमंडळाची पहिल्यांदा हाेणार बैठक
5
जातगणना : मॅजिक की मंडल?
6
भारताविरुद्ध पाकिस्तानचे सायबर युद्ध, आठवडाभरात १० लाख हल्ले
7
उत्तरेत अवकाळीचा कहर; वादळात सापडून १० ठार; २०० विमानांना उशीर; राजस्थानात कुठे पाऊस तर कुठे उष्णतेची लाट
8
हंड्रेड डेज’ : पास कोण? नापास कोण?
9
‘त्या’ बाळांच्या उपचारासाठी २४ लाख रुपये; बाळांचे वजन खूपच कमी, अतिदक्षता विभागात उपचार सुरू
10
भरपाईशिवाय जमीन ताब्यात घेण्याचे कृत्य बेकायदा; उच्च न्यायालयाची सरकारवर टीका
11
‘अमेरिकन आहात? - बिलावर १०४% सेवाशुल्क द्या!
12
पंतप्रधान मोदी अमरावतीत असं काय बोलले? की मुख्यमंत्री चंद्राबाबूंना रोखता आलं नाही आपलं हसू! बघा VIDEO
13
अनिल कपूरच्या आईचे निधन; वयाच्या 90व्या वर्षी निर्मला कपूर यांनी घेतला अखेरचा श्वास...
14
Heavy Rain In Jammu & Kashmir : जम्मू-कश्मिरात मुसळधार पाऊस, पाकिस्तानचं टेन्शन वाढवलं! ...तर पुराच्या पाण्यात वाहून जाईल PoK
15
Pahalgam Terror Attack : पाकिस्तानी क्रिकेटरनंतर आता पंतप्रधान शहबाज शरीफ यांच्यावरही भारताचे डिजिटल स्ट्राइक
16
Waves Summit 2025 मध्ये मुख्यमंत्री फडणवीसांच्या उपस्थितीत ८००० कोटींचे सामंजस्य करार
17
'पहलगाम हल्ल्याबाबत सरकारचे धोरण स्पष्ट नाही', मल्लिकार्जुन खरगेंचा केंद्रावर निशाणा
18
हिंदू म्हणून गोळ्या झाडल्या, शुद्ध आल्यावर शेजारी मृतदेह पाहिले; सुबोध पाटलांचा थरारक अनुभव
19
श्रीनगरमधील दल सरोवरात वेगवान वाऱ्यांमुळे बोट उलटली, पर्यटकांकडून मदतीसाठी आरडाओरडा
20
उल्हासनगरात बांगलादेशी नागरिक सापडण्याचे सत्र सुरूच, तीन दिवसात ९ बांगलादेशी नागरिकांना अटक 

राजकीय पक्षांची विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर तयारी

By admin | Updated: August 18, 2014 23:32 IST

आंदोलनांचा फार्स

मिलिंद पारकर -कणकवली --विधानसभा निवडणुक जशी जवळ येत आहे तशी विरोधकांकडून रणनीतिचा भाग म्हणून छोट्या-मोठ्या आंदोलनांमधून लोकांच्या मनात उतरण्याचा प्रयत्न केला जात आहे. शिवसेना, भाजपाकडून मॅरेथॉन आंदोलने करण्यात येत असल्याचे दिसून येत आहे. या आंदोलनातून आश्वासनांची गाजरे दाखवण्यात आली. आंदोलनांचे हे सत्र काही कालावधी सुरू राहण्याची चिन्हे आहेत. बांधकाम विभाग, बीएसएनएल, वीज कंपनी, नगरपंचायत अशी टारगेट या आंदोलनांसाठी निवडण्यात येत आहेत. बीएसएनएलच्या बाबतीत गेले काही महिने अनेक तक्रारी निर्माण झाल्या आहेत. ठोस उपाययोजनाच होत नसल्याने आश्वासनांशिवाय काही केले जात नाही. बीएसएनएलला अधिकाऱ्यांना घेराओ घालून शिवसेनेच्या तालुकास्तरीय पदाधिकाऱ्यांनी जाब विचारल्याचे आंदोलन फार्स ठरला. अशाच प्रकारे वीज कंपनीच्या अधिकाऱ्यांकडे नगरपंचायतीसाठी कायमस्वरूपी तंत्रज्ञ देण्याची मागणी सेनेच्या पदाधिकाऱ्यांनी केली. भाजपाच्या पदाधिकाऱ्यांकडून सावडाव धरणाकडे जाणारा रस्ता व तेथील संकुलाच्या बांधकामाबाबत आवाज उठवण्यात आला. मात्र, जिल्हा परिषद बांधकाम आणि सार्वजनिक बांधकाम दोन्ही विभागांकडून नियमावर बोट ठेवण्यात आल्याने काहीच निष्पन्न झाले नाही. निकृष्ट काम आणि रस्त्यांशेजारी सुयोग्य गटारांचे बांधकाम नसल्याने शहरासह तालुक्यातील रस्त्यांवर खड्डे पडले आहेत. मात्र, हे खड्डे बुजवण्यासाठी सार्वजनिक बांधकाम आणि जिल्हा परिषद बांधकामकडे निधी नसल्याने खड्डे कसे बुजवायचे असा प्रश्न निर्माण झाला आहे. गणेश चतुर्थीपूर्वी येनकेनप्रकारे खड्डे बुजवण्याची प्रथा आहे. शहरातील खड्डे गणेश चतुर्थीपूर्वी बुजवण्याचे आश्वासन नगरपंचायतीच्या सर्वसाधारण सभेत देण्यात आले. कणकवली विधानसभा मतदारसंघातून नितेश राणे यांच्या नावाची चर्चा नारायण राणे यांनी घडवून आणली. मात्र, कॉँग्रेसचेच आमदार विजय सावंत यांनी आपला दावा या मतदारसंघावर केला आहे. यावरून दोन्ही बाजूंनी आरोप-प्रत्यारोपांच्या फैरी झडल्या. विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर कॉँग्रेस वगळता इतर पक्षांनी आपापली संघटना बांधणीची कामे हाती घेतल्याचे दिसत आहेत. पदाधिकाऱ्यांच्या नेमणुका करून संघटना बांधणीचे काम सुरू झाले आहे. आचरा मार्गाला बायपास होणाऱ्या मार्गासाठी कणकवली बसस्थानकानजीक टपाल खात्याकडील जमिन देण्यास सहमती झाली. पालकमंत्र्यांच्या उपस्थितीत उच्चस्तरीय अधिकाऱ्यांच्या बैठकीत हा निर्णय झाल्याने आचरा बायपास मार्गाचा प्रश्न मार्गी लागण्याची शक्यता निर्माण झाली आहे. कणकवली शहरात सुरू झालेल्या वाय-फाय सेवेचा बराच गाजावाजा झाला. वायफाय सेवेबद्दल युवकांच्या मनात मोठी उत्सुकता होती. मात्र, शहरात सर्वच ठिकाणी न मिळता शहरातील काही पॉकेटमध्ये ही सेवा मिळत आहे. साकेडीतील १४ जणांना तापसरी अतिसाराने गाठल्याने आरोग्य यंत्रणा खडबडून जागी झाली. वार्तापत्रकणकवली