शहरं
Join us  
Trending Stories
1
"...तर आपल्या प्रजेचं रक्षण करणं हा राजाचा धर्म! लोक लक्षात ठेवतील"; मोहन भागवत स्पष्टच बोलले
2
Pahalgam Terror Attack: मोठाच पेचप्रसंग! ‘त्या’ महिला आता पाकिस्तानात जाऊ शकत नाहीत; नेमका काय आहे ‘लाँग टर्म व्हिसा’?
3
सर्वार्थ सिद्धी योगात चैत्र अमावास्या: १० राशींवर धनलक्ष्मीची कृपा, लाभच लाभ; भरघोस भरभराट!
4
सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार
5
Prabhsimran Singh ची कडक फटकेबाजी; नरेनच्या गोलंदाजीवर 'उलटा' फटका मारला अन्... (VIDEO)
6
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा
7
CM पदाबाबत आता खुद्द फडणवीसांनी मनातील इच्छा बोलून दाखवली; बावनकुळेंच्या विधानावर म्हणाले...
8
"एकनाथ शिंदेनी मला पुन्हा जिवंत केलं, कधीच शिवसेना सोडणार नाही"; निलेश राणेंचे विधान
9
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
10
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
11
VIDEO: सीमेवर युद्धाची तयारी? लोकांकडून जमिनीखालील सरकारी तळघरांची साफसफाई
12
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
13
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
14
कधी सारा, कधी अनन्या, अनेक अभिनेत्रींसोबत जोडलं गेलं नाव, शुभमन गिल म्हणतो, "मागच्या ३ वर्षांपासून मी…”  
15
आता तेही नको! भारत-पाक क्रिकेट संदर्भात गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला...
16
पहलगामचा हल्ला, भारताचा पाकवरील 'स्ट्राईक' आणि तिसरं महायुद्ध; नॉस्ट्रॅडॅमसचे भाकित काय?
17
पाकिस्तानला ड्रोन हल्ल्याची भीती! सैनिकांना फोन बंद करण्याचे दिले निर्देश
18
“२०३४ नंतरही फडणवीस CM असावेत, भाजपाची सत्ता अविरत राहावी”; भाजपा नेत्यांची ‘मन की बात’
19
इराणच्या राजाई बंदरात भीषण स्फोट; ४०६ जखमी, अनेकांचा मृत्यू झाल्याची भीती
20
पाकिस्तानींना देश सोडण्याचे आदेश, अदनान सामी सोशल मीडियावर झाला ट्रोल, अखेर संतापून म्हणाला...  

जनतेच्या हितासाठी झटणाऱ्या उमेदवारांना पसंती

By admin | Updated: March 29, 2016 00:09 IST

कुडाळ नगरपंचायत निवडणूक : मतदारांच्या भावना, राजकारणापलिकडे समाजकारणाची आवड असणाऱ्यांना मिळेल संधी

रजनीकांत कदम --कुडाळ नगरपंचायतीचे निवडून जाणारे उमेदवार हे अभ्यासू, राजकारणापेक्षा समाजकारणाची आवड असणारे व विकासात्मक अजेंडा तयार करून जनतेच्या व कुडाळच्या सर्वांगीण विकासासाठी झटणारे असावेत, अशी मते कुडाळच्या मतदारांतून येत आहेत. अत्यावश्यक गोष्टींबाबत सुधारणा करणे, विशेष करून मुलांसाठी वसतिगृह उभारणे, वाहतुक कोंडीचा प्रश्न सोडविणे, अशा अनेक समस्यांचे निराकरण करणे आवश्यक असून, नवीन नगरसेवकांनी याकडे प्रामुख्याने लक्ष दिले पाहिजे, असेही मत काही मतदार नागरिकांनी ‘लोकमत’शी बोलताना व्यक्त केले. कुडाळचे नगरसेवक कसे असावेत, याबाबत कुडाळातील अनेक नागरिकांशी चर्चा करण्यात आली. यापैकी काही मतदारांच्या निवडक प्रतिक्रिया येथे प्रातिनिधीक स्वरूपात देण्यात आल्या आहेत. काही ठिकाणी तर अनेक मतदारांनी अशी मते व्यक्त केली की, या नगरपंचायतीमध्ये नव्या, अभ्यासू चेहऱ्यांना संधी मिळणे आवश्यक आहे. मात्र, त्यांनीही मागच्यांचे धडे गिरविता कामा नयेत. ठेकेदारी पध्दत अवलंबिणाऱ्यांना व काही जुन्या चेहऱ्यांना दूर केले पाहिजे, अशी मते मतदारांनी व्यक्त केली आहे. निवडणूक आता काही दिवसांवर येऊन ठेपल्याने मतदार कोणाला कौल देतात हे पाहणे औत्सुक्याचे ठरणार आहे. त्यासाठी आणखी काही दिवस वाट पहावी लागणार आहे.