शहरं
Join us  
Trending Stories
1
धनगर आरक्षणासाठी तरूणाने स्वतःची कार जाळून केला सरकारचा तीव्र निषेध; जालना तालुक्यातील घटना
2
आमची ट्रॉफी, मेडल्स आम्हाला परत द्या... BCCI चा मोहसीन नक्वी यांना इशारा, ACC बैठकीत राडा
3
मोहसीन नक्वी यांनी अखेर टीम इंडियापुढे गुडघे टेकले... भारताचा मोठा विजय! बैठकीत काय घडलं?
4
'मला मंगळसूत्र चोर म्हणता, कितव्या बायकोचं मंगळसूत्र चोरलं ते सांगा'; पडळकरांची जयंत पाटील यांच्यावर टीका
5
ऑक्टोबर महिन्यात पाऊस आणखी झोडपणार, हवामान खात्याने दिली धडकी भरवणारी माहिती 
6
‘राहुल गांधींना जिवे मारण्याची धमकी देणाऱ्यास कठोर शिक्षा करा, त्यांच्या सुरक्षेत वाढ करा’, काँग्रेसचं लोकसभा अध्यक्षांना पत्र  
7
ट्रम्प यांच्या निर्णयाचा भारताला फायदा; अमेरिकन कंपन्या भारतात शिफ्ट होण्याच्या तयारीत
8
ठाकरे बंधूंच्या युतीसंदर्भात संजय राऊतांचं सूचक विधान, दसऱ्याला...! स्पष्टच बोलले
9
पहलगाम हल्ल्यानंतर १६० दिवसांनी काश्मीरमधील 'ही' १२ पर्यटनस्थळे पुन्हा पर्यटकांसाठी खुली
10
सचिन तेंडुलकरसारखी मॅचविनर खेळी करून रायगड जिल्हयात पक्षाला बळ देऊ- सुनिल तटकरे
11
नागपूरमधील प्रकल्प इतर राज्यांकडे वळण्याच्या प्रयत्नात ? ८८४४ कोटींचे प्रकल्प जमिनीअभावी अडकले !
12
Maharashtra Flood: "ओला दुष्काळ जाहीर करण्याची मागणी होतेय, पण..."; CM फडणवीसांनी सांगितली निर्णय घेण्यातील अडचण
13
फायदाच फायदा...! गाजाच्या निर्मितीत भारताला मोठी संधी! पार पाडू शकतो महत्वाची भूमिका, असा आहे इस्रायलचा संपूर्ण प्लॅन?
14
भरधाव कारचा भीषण अपघातात! अनेक वेळा उलटल्यानं चुराडा, तरुणीही दूर फेकली गेली; बघा VIDEO
15
Omega Seiki: जगातील पहिली ड्रायव्हरलेस रिक्षा भारतात लॉन्च, एका चार्जवर १२० किमी धावणार!
16
महात्मा गांधींना शरण जाणे हा राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचा वैचारिक पराभव; काँग्रेसचा खोचक टोला
17
पाकिस्तानात गेलं की ISI एजंट बनतं का? सोनम वांगचुक यांच्या पत्नीने हिंसाचारासाठी CRPF ला धरलं जबाबदार
18
गावात वास्तव्य, सायकलवरून प्रवास आणि..., असं आहे Arattaiचे संस्थापक श्रीधर वेंबू यांचं साधं राहणीमान
19
"आजकाल मुलांना वाढवणं कठीण...", मृण्मयी देशपांडेने व्यक्त केलं मत, पालकांबद्दल म्हणाली...
20
मोठी बातमी! दिवाळीपूर्वी शेतकऱ्यांच्या खात्यात मदत पोहचणार; पुढच्या आठवड्यात घोषणा करू - CM देवेंद्र फडणवीस

‘त्या’ टोळीचे परजिल्ह्यांतही प्रताप

By admin | Updated: June 12, 2016 00:48 IST

अनेकांना गंडा : पावणेपाच लाखांचे दागिने जप्त

रत्नागिरी : दागिने घेण्याच्या बहाण्याने दुकानात शिरून चोरी करणाऱ्या टोळीतील चौघांच्या पोलिस कोठडीत शनिवारी न्यायालयाने दोन दिवसांची वाढ केली. सातजणांच्या या टोळीतील तीन संशयितांचा शोध पोलिस घेत आहेत. दरम्यान या टोळीने रत्नागिरीसह सांगली, पुणे, कोल्हापूर जिल्ह्यांमध्येही अनेक सराफांना गंडा घातला असल्याचे तपासात पुढे आले आहे. या चोऱ्यांमधील सुमारे ४ लाख ७३ हजार १६१ रुपयांचे दागिने जप्त करण्यात स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेच्या पथकाला यश आले. काही दिवसांपूर्वी मारुती मंदिर परिसरातील एका ज्वेलर्स दुकानासमोर चौघेजण संशयितरित्या फिरत असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती. त्या आधारावर पोलिसांनी ज्योत्स्ना कच्छवाह, सूरज कच्छवाह, कमल विनोद राठोड, संदीप राम जाधव या चौघांना ताब्यात घेतले. त्यावेळी त्यांच्याकडे ५१ हजार रुपये रोख आणि दागिने आढळले होते. याबाबतच्या चौकशीत ते उडवाउडवीची उत्तरे देत होते, त्यामुळे पोलिसांचा संशय बळावला आणि या चौघांना तत्काळ अटक करण्यात आली. त्यांच्या पोलीस कोठडीची मुदत संपल्याने शनिवारी त्यांना न्यायालयासमोर हजर केले असता न्यायालयाने त्यांच्या पोलीस कोठडीत दोन दिवसांची वाढ केली. ही सातजणांची टोळी गेल्या काही महिन्यांपासून रत्नागिरीत कार्यरत होती. अटक करण्यात आलेल्या ज्योत्स्ना कच्छवाह, सूरज कच्छवाह, संदीप जाधव व कमल राठोड यांचा समावेश आहे. रत्नागिरीसह लांजा, राजगड, पुणे, सांगली, गारगोटी, आजरा व निपाणी या ठिकाणी चोऱ्या केल्या असल्याची कबुली पोलिसांना दिली आहे. त्यातील रत्नागिरी, लांजा, सांगली व गारगोटी येथे चार गुन्हे उघड झाले आहेत. या चोऱ्यांमधील सुमारे ४ लाख ७३ हजार १६१ रुपयांचे दागिने जप्त करण्यात यश आले आहे. पुढील तपासासाठी स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेचे पथक पुणे येथे रवाना करण्यात येणार आहे. दरम्यान, शनिवारी त्यांना न्यायालयासमोर हजर केले असता त्यांच्या पोलीस कोठडीत दोन दिवसांची वाढ केली आहे.