शहरं
Join us  
Trending Stories
1
IND vs SA : बुमराह-वरुण चक्रवर्तीचा जलवा! मालिका विजयासह टीम इंडियानं वर्षाचा शेवट केला गोड
2
तैवान: मेट्रो स्टेशनवर थरार! ग्रेनेड, चाकूहल्ल्यात तीन जणांचा मृत्यू, हल्लेखोरही ठार
3
लालू यादव यांची पत्नी राबडी देवी यांंना दिल्ली न्यायालयाचा मोठा धक्का, काय आहे प्रकरण?
4
अवैध सावकारी प्रकरणात ब्रह्मपुरीत पुन्हा तक्रार; राजकुमार बावणे यांचा गंभीर आरोप
5
Hardik Pandya : पांड्याचा हार्ड हिटिंग शो! जलद अर्धशतकी खेळीसह घातली विक्रमाला गवसणी
6
रशिया-युक्रेन युद्ध तत्काळ थांबवण्यासाठी पुतिन तयार, पण ठेवली एक मोठी अट! ट्रम्प यांच्यासंदर्भातही बोलले
7
सायबर फ्रॉड करणाऱ्यांना आता चक्क मारले जाणार चाबकाचे फटके; कुठल्या देशात झाला निर्णय?
8
IND vs SA 5th T20I : तिलक वर्मा- हार्दिक पांड्यानं धु धु धुतलं! भारतीय संघानं उभारला धावांचा डोंगर
9
"She was Lo, plain Lo"; अल्पवयीन मुलींच्या शरीरावर एपस्टीनने लिहिलेल्या ओळींमागे भयानक अर्थ, अमेरिकेचे डार्क सिक्रेट उघड
10
"मीरा भाईंदर महापालिका निवडणुकीत ५० टक्के जागा द्या, नाहीतर..."; मंत्री सरनाईकांचा इशारा
11
SIR मुळे तामिळनाडूत खळबळ, मतदार यादीतून हटवली तब्बल ९८ लाख नावं, धक्कादायक माहिती समोर
12
IND vs SA 5th T20I : वर्ल्ड कप संघ निवडीआधी गिल 'आउट'; संजूला पुन्हा मिळाली ओपनिंगची संधी अन्...
13
Manikrao Kokate: माणिकराव कोकाटे यांची अटक टळली; हायकोर्टाने शिक्षेला स्थगिती दिली, पण...
14
नालासोपारा: जमिनीवर पाडलं, लाथाबुक्क्यांनी मारलं... सख्ख्या भावाचा खून करणाऱ्या आरोपीला अटक
15
सावधान! तुम्हीही घाईघाईत जेवताय? आताच बदला सवय; स्वत:च देताय अनेक आजारांना आमंत्रण
16
लाडात वाढवलं, खूप शिकवलं, पण मुलीनं पळून जाऊन लग्न केलं, संतप्त कुटुंबानं जिवंतपणी काढली अंत्ययात्रा 
17
अंगठी घातल्याने अथवा नाव बदलल्याने नशीब बदलतं का? प्रेमानंद महाराजांनी दिलं असं उत्तर
18
NCP नेत्यांची अजितदादांसोबत बैठक, CM फडणवीसांशीही चर्चा अपेक्षित; २९ मनपात महायुती म्हणून…
19
U19 Asia Cup 2025 : ठरलं! आशिया कप स्पर्धेत पुन्हा भारत-पाक यांच्यात रंगणार फायनल!
20
“भगवान ऋषभदेवांचे विचार भारताच्या प्राचीन व महान संस्कृतीचे प्रतीक”: CM देवेंद्र फडणवीस
Daily Top 2Weekly Top 5

‘अडत’च्या तोडग्यासाठी अभ्यास दौरा

By admin | Updated: May 11, 2015 23:26 IST

सोळा राज्यांचा समावेश : ३१ मेपर्यंत समिती शासनाला आराखडा सादर करणार

प्रकाश पाटील-कोपार्डे --राज्यातील अडतप्रश्नी तोडगा काढण्यासाठी देशातील १६ राज्यांतील बाजार समिती कायदा, अडत, तोलाई, पणन मंडळाचे कामकाज, आदी विविध १५ मुद्द्यांच्या अभ्यासासाठी पणन विभाग आणि मंडळाचे अधिकारी अभ्यास करून प्रत्येक राज्याचा अहवाल शासनाला सादर करणार आहेत. यात पणन संचालनालय, मंडळाचे उपसरव्यवस्थापक आणि सहायक सरव्यवस्थापक पदाच्या दोन अधिकाऱ्यांचा समावेश असणार आहे. ही समिती ३१ मेपर्यंत आपला अहवाल राज्य शासनाला सादर करणार आहे.तत्कालीन पणन संचालक सुभाष माने यांनी अडत शेतकऱ्यांऐवजी व्यापाऱ्यांकडून वसूल करावी, असा आदेश मागील वर्षअखेरीस काढला. यावर व्यापाऱ्यांनी बाजार समितीतील सौदे बंद पाडले होते. सहकारमंत्री चंद्रकांतदादा पाटील यांनी पणन संचालक माने यांचा आदेश रद्द करून ‘अडत’ शेतीमाल विक्रेत्यांकडूनच घ्यावी, असा निर्णय जाहीर केला. मात्र, शेतकरी संघटनांनीही अडत व्यापाऱ्यांकडूनच वसूल करावी यासाठी दबाव निर्माण केला. यासाठी पणन विभाग व मंडळाकडून २१ सदस्यांची समिती स्थापन केली आहे.बाजार समित्यांमध्ये सध्या २० टक्के शेतीमाल शेतकऱ्यांकडून येतो, तर ८० टक्के शेतीमाल व्यापारी थेट खरेदी करून आणतात. अडतीचा वाद कायमचा संपविण्यासाठी आता पणन विभागाने पुढाकार घेतला असून, देशातील बाजार समिती कायदा असणाऱ्या १६ इतर राज्यांतील माहिती घेण्यासाठी साचेबद्ध आराखडा तयार केला आहे. यामध्ये संबंधित राज्यातील पणन आणि बाजार समिती कायदा व अडत, तोलाई किती टक्के व कोणाकडून आकारली जाते, हमीभावाची अंमलबजावणी कशी केली जाते, शेतकऱ्यांना देण्यात येणारे पैसे कशाप्रकारे दिले जातात, व्यापाऱ्यांनी शेतकऱ्यांना पैसे दिले नाही, तर त्या पैशांची हमी कशाप्रकारे घेतली जाते, आदी मुद्द्यांची माहिती संकलित केली जाणार आहे. विविध राज्यांची माहिती संकलित झाल्यावर ती एकत्र करून अडत प्रश्नाबाबत करण्यात येणाऱ्या अहवालात ती समाविष्ट करण्यात येणार आहे. या एकत्रित माहितीमुळे राज्य शासनाला अडत आकारणीबाबत निर्णय घेणे सोपे जाणार आहे. हा अहवाल ३१ मे पर्यंत सादर केला जाणार आहे. शेतकऱ्यांकडून अडत घेणारी राज्ये : आंध्र प्रदेश (२ टक्के), महाराष्ट्र (३ व ६ टक्के), मुंबई बाजार समिती (८ ते १२ टक्के).अडत न घेणारी राज्ये : पश्चिम बंगाल, गोवा, मध्य प्रदेश, तमिळनाडू, ओडिशा, मेघालय, नागालँड, आसाम.व्यापाऱ्यांकडून अडत घेणारी राज्ये (कंसात अडतीची टक्केवारी) कर्नाटक (२ ते ५ टक्के), राजस्थान, दिल्ली, गुजरात (२ ते ६ टक्के), उत्तर प्रदेश (१.५ ते ३ टक्के), हिमाचल (२ ते ५ टक्के), हरियाणा (२.५ ते ५ टक्के), चंदीगढ (२ ते ५ टक्के), पंजाब (२.५ ते ५ टक्के), छत्तीसगड (१ टक्का, कमाल २० रुपये).अभ्यास दौऱ्यासाठी निवडलेली राज्येकेरळ, तमिळनाडू, कर्नाटक, आंध्र प्रदेश, गोवा, गुजरात, मध्य प्रदेश, उत्तर प्रदेश, छत्तीसगड, पश्चिम बंगाल, दिल्ली, हरियाणा, ओडिशा, बिहार, राजस्थान. बाजार समिती कायदा अस्तित्वात नसलेली राज्ये बिहार, जम्मू-काश्मीर, केरळ, मणीपूर, दीव दमण, दादरा नगरहवेली, लक्षद्वीप.