शहरं
Join us  
Trending Stories
1
“तुम्ही बोलत नाही, आम्ही ओबीसी आरक्षणासाठी लढायचे नाही का?”; छगन भुजबळांचा शरद पवारांना सवाल
2
Nanded: शांतता बैठकीतच मराठा-ओबीसी वादाला हिंसक वळण, रिसनगावात ४ जखमी
3
हैदराबाद गॅझेटवर हायकोर्टाचा मोठा निर्णय; याचिकाकर्त्यांना सुनावले, आता मराठा आरक्षणाचे काय?
4
“GST सुधारणा हा राहुल गांधींच्या दूरदृष्टीचा विजय, २२ तारखेला राज्यभर पेढे वाटणार”: काँग्रेस
5
'खोटारडं' पाकिस्तान पुन्हा उघडं पडलं... मॅच रेफरीच्या केबिनमध्ये काय घडलं? सत्य समोर आलं...
6
Kangana Ranaut : "माझ्याच हॉटेलचा काल ५० रुपयांचा धंदा", पूरग्रस्तांसमोर कंगना राणौतने मांडली स्वत:चाची व्यथा
7
अभिमानास्पद! वडील हवाई दलात अधिकारी, लेक झाली लेफ्टनंट; इंजिनिअरिंगनंतर देशसेवेचं स्वप्न
8
ठाकरे बंधू एकत्र आले तर मविआवर काय परिणाम होईल? शरद पवार थेट म्हणाले, “मग आता वेगळे...”
9
Video: उंटाने पहिल्यांदाच चाखली लिंबाची चव अन् 'अशी' झाली अवस्था, पाहून तुम्हालाही येईल हसू
10
Javelin Throw Final : भारताचा गोल्डन बॉय नीरज अन् पाक ऑलिम्पिक चॅम्पियन नदीमवर भारी पडला सचिन; पण...
11
यंदा रावण नाही, सोनम रघुवंशीचा पुतळा जाळणार! इंदूरच्या नागरिकांचा वेगळाच दसरा प्लॅन; राजाच्या कुटुंबालाही आमंत्रण
12
राहुल गांधींच्या हायड्रोजन बॉम्बपूर्वी चंद्रपूरच्या 'राजुरा' मतदारसंघात खळबळ ! निवडणूक आयोगावर मत वगळण्याचे गंभीर आरोप
13
घटस्फोटाचे प्रमाण कमी करण्यासाठी राज्यात दहा ठिकाणी सुरु होणार प्री-मॅरेज काउन्सिलिंग सेंटर
14
भगवान विष्णू यांच्यावरील वक्तव्यासंदर्भात CJI बीआर गवई यांचं स्पष्टिकरण; 'संयम राखायला हवा...', विश्वहिंदू परिषदेचा सल्ला
15
सात दिवस अविरत उपसले कष्ट, तेव्हा हाती लागली मौल्यवान रत्नं, मजूर महिलेचं नशीब उजळलं 
16
IND vs PAK हस्तांदोलन वादाचा खरा आरोपी सापडला... सामनाधिकारी पॉयक्रॉफ्टची चूकच नव्हती!
17
लग्न कधी करणार? श्रिया पिळगावकरला थेट प्रश्न; म्हणाली, "माझे आईबाबा सांगतात की..."
18
अंगणवाडी सेविकांना मिळणार स्मार्टफोन, वाढणार मानधन; योगी आदित्यनाथ यांची मोठी घोषणा
19
अभिनेता श्रेयस तळपदेवर गुन्हा दाखल; उत्तराखंडमधील घोटाळा प्रकरण, आलोक नाथ यांचेही नाव...
20
सुनेला वाचवण्यासाठी धावली सासू, पण तेवढ्यात धडाधड कोसळली भिंत, सून वाचली पण...  

प्रभुगावकर, वळंजू, पालयेकर बिनविरोध

By admin | Updated: January 25, 2016 23:12 IST

सतीश सावंत यांची माहिती : जिल्हा परिषद अध्यक्ष, सभापतीपदांची निवड

सिंधुदुर्गनगरी : सिंधुदुर्ग जिल्हा परिषदेच्या २५ व्या अध्यक्षपदी संग्राम नारायण प्रभुगावकर यांची निवड झाली. महिला व बालविकास सभापतीपदी रत्नप्रभा वळंजू तर विषय समिती सभापतीपदी दिलीप रावराणे आणि आत्माराम पालयेकर यांची बिनविरोध निवड झाली आहे. उपाध्यक्षपदाचा निर्णय येत्या दोन दिवसात काँग्रेस नेते नारायण राणे घेतील अशी माहिती काँग्रेस जिल्हाध्यक्ष सतीश सावंत यांनी दिली. जिल्हा परिषद अध्यक्ष, विषय समिती सभापतींच्या रिक्त झालेल्या पदांसाठी सोमवारी निवडणूक प्रक्रिया पूर्ण झाली. या सर्व पदांसाठी प्रत्येकी एक अर्ज आल्याने या निवडीसाठी झालेल्या जिल्हा परिषदेच्या विशेष सभेत ही बिनविरोध निवड झाली. निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून अप्पर जिल्हाधिकारी रविंद्र सावळकर यांनी काम पाहिले. या निवडीनंतर काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष सतीश सावंत, माजी जिल्हा परिषद अध्यक्ष संदेश सावंत, जिल्हा परिषदेचे उपाध्यक्ष रणजित देसाई, अशोक सावंत, दीपलक्ष्मी पडते आदींनी नूतन पदाधिकाऱ्यांचे अभिनंदन केले. जिल्हा परिषद अध्यक्ष पदासाठी अनेकांची नावे चर्चेत असल्यामुळे उत्सुकता ताणली होती. नव्या टिमची यादी काँग्रेस जिल्हाध्यक्षांनी पक्षाच्या बैठकीत जाहीर करत लागलीच नामनिर्देशनपत्राचे सोपस्कार पूर्ण केले. त्यानंतर दुपारी जिल्हा परिषद सभेचे कामकाज पूर्ण केले. यावेळी विरोधी पक्षाचे राजन म्हापसेकर, जान्हवी सावंत व काँग्रेसचे सर्व जिल्हा परिषद सदस्य उपस्थित होते. राष्ट्रवादी काँग्रेसमधून जिल्हा परिषद सदस्य म्हणून निवडून आल्यानंतर काँग्रेसमध्ये दाखल झालेले प्रकाश कवठणकर, निकिता जाधव, पंढरी राऊळ, समीर नाईक हे सदस्य सुरुवातीला अध्यक्षांसह सभापतीपदांसाठीच्या अर्ज भरणाऱ्यांची नावे जाहीर होईपर्यंत जिल्हा परिषदेमध्ये उपस्थित होते. मात्र त्यानंतर हे सर्व जिल्हा परिषदेमधून निघून गेल्याने त्याच्यातील काही इच्छुकांना या पदांमध्ये सहभाग मिळाला नसल्याने ते नाराज होऊन गेले असल्याची चर्चा जिल्हा परिषद भवनात सुरु होती. मात्र याबाबत काँग्रेस जिल्हाध्यक्ष सतीश सावंत यांना विचारले असता हे सर्व जण बैठकीस उपस्थित होते. मात्र त्यांची काही कामे असल्याने ते परवानगी घेऊन गेले असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. (प्रतिनिधी) अखेर लॉटरी लागली : मांडलेले प्रश्न सोडवा संग्राम प्रभुगांवकर हे माजी राज्यमंत्री बापूसाहेब प्रभुगांवकर यांचे पुतणे होत. मसुरे येथील प्रभुगांवकर हे सरदार घराणे. त्यांच्याच पावलावर पाऊल टाकून संग्राम प्रभुगांवकर यांनी सामाजिक कार्यात कामकाज सुरु केले. मसुरे पंचक्रोशीमध्ये विविध संस्थांवर त्यांनी काम केले. सन २००५ ते २०१० या कालावधीत ते मसुरे सरपंच म्हणून कार्यरत होते. २०१३ मध्ये प्रथमच ते काँग्रेस नेते नारायण राणे यांच्या नेतृत्वाखाली जिल्हा परिषद सदस्य म्हणून निवडून आले. अध्यक्षपद हे खुल्या वर्गासाठी राखीव झाल्यावर गेली ३ वर्षे सातत्याने ते अध्यक्षपदाच्या शर्यतीत होते.