शहरं
Join us  
Trending Stories
1
बालेंद्र शाहांचा नकार; सुशीला कार्की होणार नेपाळच्या पंतप्रधान? तरुणांचा सर्वाधिक पाठिंबा...
2
महाराष्ट्राचे नवे राज्यपाल कोण? सीपी राधाकृष्णन राजीनामा देणार; १२ सप्टेंबरला उपराष्ट्रपतीपदाची शपथ घेण्याची शक्यता
3
IND vs UAE : सूर्यानं टॉस जिंकला! बॉलिंग घेतल्यावर UAE चा कॅप्टन म्हणाला; बॅटिंग करायची ना...
4
पुण्यात भलामोठा आयकर रिटर्न घोटाळा; आयटी, मल्टीनॅशनल कंपन्यांचे कर्मचारी अडकले... 
5
नेपाळमधील सत्तापालटावर चीनची पहिली प्रतिक्रिया; माजी पंतप्रधान ओलींचं नाव घेणं टाळलं!
6
मुंबई महापालिका निवडणुकीसाठी शिंदेसेनेची 'जम्बो टीम'; २१ नेत्यांची मुख्य कार्यकारी समिती जाहीर
7
आर्टिफिशियल फ्लेवर्स, प्रिझर्व्हेटिव्ह्जशिवाय घरीच करा 'अ‍ॅपल जॅम'; मुलं म्हणतील, यम्मी...
8
ठाकरेंचा आवाज छत्रपती शिवाजी महाराज पार्कवर घुमणार; दसरा मेळाव्याला महापालिकेची परवानगी
9
Samruddhi Mahamarg : ‘समृद्धी महामार्गावर’वर दिसणारे ते खिळे नाहीत, मग काय?; समजून घ्या 'इपॉक्सी ग्राउटिंग' तंत्रज्ञान
10
वायफाय राउटरच्या बाजूला ठेवल्यात 'या' गोष्टी? आताच बाजूला करा अन्यथा...
11
आयटी सेक्टरमध्ये तेजी! गुंतवणूकदारांनी कमावले २.६४ लाख कोटी रुपये; 'हे' स्टॉक्स ठरले टॉप गेनर
12
वॉशिंग्टन सुरक्षित केले म्हणून डोनाल्ड ट्रम्प हॉटेलमध्ये जेवायला गेले...; लोकांनी जे केले...
13
अमरावतीची 'हवा'च न्यारी! देशात डंका, राष्ट्रीय स्तरावर पटकावला पहिला क्रमांक
14
उपराष्ट्रपती निवडणुकीत 'क्रॉस व्होटिंग'च्या संशयाची सुई; कोणत्या खासदारांनी ऐनवेळी पलटी मारली?
15
भरणी श्राद्ध २०२५: गुरुवारी भरणी श्राद्ध, एकदा करावे की दरवर्षी? अधिकार कोणाला आणि नियम काय?
16
भारतीय अर्थव्यवस्था सुसाट! टॅरिफचा धाक दाखवणाऱ्या अमेरिकेला 'फिच' रिपोर्टने धक्का! इतका वाढणार जीडीपी
17
भयंकर! नेपाळनंतर फ्रान्समध्ये सरकारविरुद्ध मोठं आंदोलन; रस्त्यावर जाळपोळ अन् तोडफोड
18
जिच्यासाठी माजी उपसरपंच गोविंद बर्गे यांनी आयुष्य संपवलं, ती पूजा गायकवाड कोण?
19
मस्तच! नवरात्रात कन्या पूजनानंतर मुलींना द्या 'ही' यूजफुल गिफ्ट्स; आनंदाने उजळतील चिमुकल्यांचे चेहरे
20
फुलांचा गजरा माळून गेली आणि फसली, ऑस्ट्रेलियात भारतीय अभिनेत्रीवर कारवाई, नेमकं कारण काय?  

वीज कर्मचाऱ्यांचा मोर्चा

By admin | Updated: December 30, 2015 00:35 IST

उत्स्फूर्त प्रतिसाद : विविध मागण्यांचे जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन

ओरोस : महावितरण कंपनीचे पाच विभागात विभाजन करण्याच्या निर्णयाविरोधात व आपल्या आठ प्रमुख मागण्यांकडे शासनाचे लक्ष वेधण्यासाठी महाराष्ट्र राज्य मागासवर्गीय विद्युत कर्मचारी संघटनेच्यावतीने मंगळवारी जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढण्यात आला. आपल्या न्याय मागण्यांसाठी विविध घोषणा देत संघटनेने येथील परिसर दणाणून सोडला.महाराष्ट्र राज्य मागासवर्गीय विद्युत कर्मचारी संघटनेचे कोकण परिमंडलचे अध्यक्ष नीलेश आंबेरकर यांच्या नेतृत्वाखाली जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढत जिल्हाधिकारी अनिल भंडारी यांना निवेदन सादर करण्यात आले. यावेळी सचिव प्रशांत आस्वेकर, कृष्णा साटेलकर, विजय शिरोडकर, सुभाष डिगसकर, अमित मेस्त्री यांच्यासह विद्युत सहाय्यक अभियंता, तांत्रिक कर्मचारी सहभागी झाले होते.महाराष्ट्र राज्य विद्युत मंडळ या कंपनीतर्फे महावितरण कंपनीचे क्षेत्रीय पातळीवर पाच कंपन्यांमध्ये विभाजन करण्याबाबतची घोषणा करण्यात आली. त्यामुळे कर्मचाऱ्यांमध्ये कमालीची अशांतता निर्माण झाली आहे. विभागीकरण ही कंपनीकरणाचीच पायरी असल्यामुळे त्यास संघटनेने जोरदार विरोध सुरु केला आहे. विभागीकरण करण्याऐवजी राज्यातील सर्व १६ झोन अधिक मजबूत करून प्रशासकीय विकेंद्रीकरण करण्यात यावे व त्यावर विभागीय कार्यकारी संचालक यांचे नियंत्रण ठेवावे. तसेच आपल्या अन्य मागण्यांसाठी शासनाचे व कंपनीचे लक्ष वेधण्यासाठी २७ आॅक्टोबर रोजी मुंबई येथील कंपनीचे मुख्य कार्यालय प्रकाशगड येथे एकदिवसीय धरणे आंदोलन छेडण्यात आले होते. परंतु आपल्या मागण्यांबाबत कोणत्याही हालचाली सुरु नसल्याने या संघटनेने राज्यव्यापी मोर्चाचे आयोजन केले होते. याचाच एक भाग म्हणून मंगळवारी जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढण्यात आला. (वार्ताहर)प्रमुख मागण्या : ...अन्यथा २0 पासून बेमुदत संपमहावितरणचे कोणत्याही परिस्थितीत क्षेत्रीय पातळीवर पाच विभागात विभाजन करण्यात येवू नये.कोणतीही पदे कंत्राटी पद्धतीने न भरता रिक्त जागा मागासवर्गीय यांचा अनुशेष लक्षात घेऊन भरण्यात यावीत.५ नोव्हेंबरचे परिपत्रक त्वरीत मागे घ्यावे.सुधारीत परिपत्रक काढून निवडपदांमध्ये गुणांची सवलत यादी द्यावी.सेवानिवृत्तीच्या दोन वर्षे आधी एक तृतीयांश उत्पादनाची रक्कम पूर्वीप्रमाणेच देण्यात यावी.वीज कर्मचाऱ्यांना पेन्शन लागू करावी.मृत कर्मचारी वारसांना त्यांच्या शैक्षणिक अर्हतेनुसार सेवेत सामावून घ्यावे.बदली प्रकरणे त्वरित निकालात काढावीत व संघटनेने सुचविल्यानुसार बदली धोरणात बदल करण्यात यावा.बंदचा इशाराकंपनीने व शासनाने आपल्या ाागण्या मान्य न केल्यास २० जानेवारीपासून बेमुदत संपावर जाणार असल्याचा इशारा निवेदनात दिला आहे.