शहरं
Join us  
Trending Stories
1
"ज्यांच्याकडे काहीच नाही, त्यांच्याकडे संविधानाची गॅरंटी आहे"; नामिबियात PM मोदींच्या भाषणाला स्टँडिंग ओव्हेशन
2
संजय गायकवाडांचा कँटिनमध्ये राडा; अन्न आणि औषध प्रशासनाची अजंता केटरर्सवर मोठी कारवाई
3
ट्रम्प यांनी पुन्हा फोडला टॅरिफ बॉम्ब...! इराक, फिलिपिन्ससह 'या' 6 देशांना बसणार फटका
4
'डोनाल्ड ट्रम्प यांच्यावर कधीही होऊ शकतो 'ड्रोन हल्ला', खामेनेई यांच्या जवळच्या माणसाची अमेरिकेला खुली धमकी!
5
कुणाचा तरी राग माझ्यावर का काढता? अर्थसंकल्प कशाला मांडता म्हणणाऱ्या जाधवांना अजितदादांचे प्रत्युत्तर
6
"...तर मॉस्को अन् बिजिंग बॉम्बनं उडवेन!" ट्रम्प यांची पुतीन-जिनपिंग यांना खुली धमकी? 'ऑडिओ' लीक!
7
"गौतम गंभीरला काहीही बोलू नका; भारत मालिका हरला तरीही..."; योगराज सिंह यांनी कुणाला ठणकावलं?
8
“...तर राज्याच्या साधनसंपत्तीत भर, आर्थिक शिस्तीचे पालन करीतच अर्थकारभार”: DCM अजित पवार
9
युतीबाबत न बोलण्याचे राज ठाकरेंचे स्पष्ट आदेश, उद्धव ठाकरेंची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले...
10
"मराठी अस्मिता जपली पाहिजे पण..."; भाषेच्या वादात जान्हवी कपूरची उडी; बॉयफ्रेंड शिखर पहारियाची पोस्ट केली शेअर
11
सावधान! हे अ‍ॅप तुमच्या हॉट्स अ‍ॅपचे मेसेज वाचू शकते, आताच सेटिंग्स बदला
12
अकोल्यात तरुणीवर कारमध्ये अत्याचाराचा प्रयत्न, आराेपीच्या गुप्तांगावर लाथ मारत करून घेतली स्वतःची सुटका
13
ठाकरे बंधू एकत्र आल्यास महाविकास आघाडी फुटणार का? पृथ्वीराज चव्हाणांचे सूचक विधान, म्हणाले...
14
शाळेत शिकणारी मुलगी प्रेगनंट राहिल्यास १ लाख रुपये मिळणार; रशियाच्या या योजनेची होतेय चर्चा
15
मीरारोडचे पोलीस आयुक्त मधुकर पांडेंची बदली; मराठी मोर्चाला परवानगी नाकारल्याने मुख्यमंत्रीही वैतागले
16
पुन्हा रॉकेट बनला MRF चा शेअर, गेला ₹ 150000 पार; लोकांना केलं मालामाल! दिला बंपर परतावा
17
“महाराष्ट्रातील मतचोरीचा पॅटर्न बिहारमध्ये वापरायचा भाजपा, निवडणूक आयोगाचा प्रयत्न”: सपकाळ
18
"आमच्यावर आरोप केला जातो, शिवसेनेने मराठी माणसासाठी काय केलं? माझं सरकार यांनी पाडलं नसतं तर...! काय म्हणाले उद्धव ठाकरे?
19
रामललांसाठी आणखी एक अस्सल सागवानी लाकडाचे खास भव्य मंदिर बनणार; अयोध्येत कुठे बांधले जाणार?
20
Maruti Suzuki ते Mahindra..; जगातील सर्वात श्रीमंत कार कंपन्यांमध्ये भारतीय कंपन्यांचा दबदबा

वीज कर्मचाऱ्यांचा मोर्चा

By admin | Updated: December 30, 2015 00:35 IST

उत्स्फूर्त प्रतिसाद : विविध मागण्यांचे जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन

ओरोस : महावितरण कंपनीचे पाच विभागात विभाजन करण्याच्या निर्णयाविरोधात व आपल्या आठ प्रमुख मागण्यांकडे शासनाचे लक्ष वेधण्यासाठी महाराष्ट्र राज्य मागासवर्गीय विद्युत कर्मचारी संघटनेच्यावतीने मंगळवारी जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढण्यात आला. आपल्या न्याय मागण्यांसाठी विविध घोषणा देत संघटनेने येथील परिसर दणाणून सोडला.महाराष्ट्र राज्य मागासवर्गीय विद्युत कर्मचारी संघटनेचे कोकण परिमंडलचे अध्यक्ष नीलेश आंबेरकर यांच्या नेतृत्वाखाली जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढत जिल्हाधिकारी अनिल भंडारी यांना निवेदन सादर करण्यात आले. यावेळी सचिव प्रशांत आस्वेकर, कृष्णा साटेलकर, विजय शिरोडकर, सुभाष डिगसकर, अमित मेस्त्री यांच्यासह विद्युत सहाय्यक अभियंता, तांत्रिक कर्मचारी सहभागी झाले होते.महाराष्ट्र राज्य विद्युत मंडळ या कंपनीतर्फे महावितरण कंपनीचे क्षेत्रीय पातळीवर पाच कंपन्यांमध्ये विभाजन करण्याबाबतची घोषणा करण्यात आली. त्यामुळे कर्मचाऱ्यांमध्ये कमालीची अशांतता निर्माण झाली आहे. विभागीकरण ही कंपनीकरणाचीच पायरी असल्यामुळे त्यास संघटनेने जोरदार विरोध सुरु केला आहे. विभागीकरण करण्याऐवजी राज्यातील सर्व १६ झोन अधिक मजबूत करून प्रशासकीय विकेंद्रीकरण करण्यात यावे व त्यावर विभागीय कार्यकारी संचालक यांचे नियंत्रण ठेवावे. तसेच आपल्या अन्य मागण्यांसाठी शासनाचे व कंपनीचे लक्ष वेधण्यासाठी २७ आॅक्टोबर रोजी मुंबई येथील कंपनीचे मुख्य कार्यालय प्रकाशगड येथे एकदिवसीय धरणे आंदोलन छेडण्यात आले होते. परंतु आपल्या मागण्यांबाबत कोणत्याही हालचाली सुरु नसल्याने या संघटनेने राज्यव्यापी मोर्चाचे आयोजन केले होते. याचाच एक भाग म्हणून मंगळवारी जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढण्यात आला. (वार्ताहर)प्रमुख मागण्या : ...अन्यथा २0 पासून बेमुदत संपमहावितरणचे कोणत्याही परिस्थितीत क्षेत्रीय पातळीवर पाच विभागात विभाजन करण्यात येवू नये.कोणतीही पदे कंत्राटी पद्धतीने न भरता रिक्त जागा मागासवर्गीय यांचा अनुशेष लक्षात घेऊन भरण्यात यावीत.५ नोव्हेंबरचे परिपत्रक त्वरीत मागे घ्यावे.सुधारीत परिपत्रक काढून निवडपदांमध्ये गुणांची सवलत यादी द्यावी.सेवानिवृत्तीच्या दोन वर्षे आधी एक तृतीयांश उत्पादनाची रक्कम पूर्वीप्रमाणेच देण्यात यावी.वीज कर्मचाऱ्यांना पेन्शन लागू करावी.मृत कर्मचारी वारसांना त्यांच्या शैक्षणिक अर्हतेनुसार सेवेत सामावून घ्यावे.बदली प्रकरणे त्वरित निकालात काढावीत व संघटनेने सुचविल्यानुसार बदली धोरणात बदल करण्यात यावा.बंदचा इशाराकंपनीने व शासनाने आपल्या ाागण्या मान्य न केल्यास २० जानेवारीपासून बेमुदत संपावर जाणार असल्याचा इशारा निवेदनात दिला आहे.