शहरं
Join us  
Trending Stories
1
Rain Update : काळजी घ्या! बंगालच्या उपसागरात कमी दाबाचा पट्टा, आज मुसळधार; विदर्भ, मराठवाड्यासह या भागात बरसणार
2
फायनलमध्ये पाकिस्तानविरोधात भारताचा रेकॉर्ड फारसा चांगला नाही; आजपर्यंत १० वेळा भिडला, पण...
3
भारत-पाक अंतिम सामना: सूर्यकुमार पाकिस्तानी मंत्री मोहसिन नकवी यांच्या हस्ते ट्रॉफी स्वीकारणार?
4
Video - तामिळनाडूतील चेंगराचेंगरीत मृत्युमुखी पडलेल्यांचे मृतदेह पाहून शिक्षणमंत्री ढसाढसा रडले
5
LPG ते पेन्शन, UPI पासून रेल्वे तिकीटापर्यंत... १ ऑक्टोबरपासून 'हे' ५ नियम बदलणार
6
आधी मसाज करायला आले अन्..; हायकोर्टाच्या वकिलाकडून ब्लॅकमेलिंगद्वारे पैसे उकळले!
7
IND vs PAK Final, Asia Cup 2025 Marathi : आज 'ऑपरेशन पाकिस्तान'! फायनलमध्ये भारतीय संघात दोन मोठे बदल होणार; अशी असेल प्लेइंग 11 
8
वाट चुकलेले दुचाकीस्वार थेट बेलापूर खाडीत; दोन महिन्यांतील दुसरी घटना; एक जण गेला वाहून
9
लैंगिक अत्याचार प्रकरणातील आरोपी स्वामी चैतन्यानंद यांना अटक; पोलिसांनी आग्र्यातून ताब्यात घेतले
10
केंद्रीय गृह मंत्रालयाने तामिळनाडूतील चेंगराचेंगरीचा अहवाल मागितला; अभिनेता विजयचीही चौकशी होणार
11
BSNL 4G स्पीड टेस्ट 2025: किती मिळतोय स्पीड? MBPS चा आकडा पहाल तर, म्हणाल...
12
आजचे राशीभविष्य, २८ सप्टेंबर २०२५: अचानक धनलाभ होईल; आनंददायी बातमी मिळेल
13
"एकेकाळी कौतुक करणारे लोक आज...", सलमान खानचा अप्रत्यक्षपणे अभिनव कश्यपवर निशाणा
14
पाकिस्तानी लष्करानेच केली होती शस्त्रसंधीसाठी विनंती; भारताने सुनावले खडेबोल!
15
स्वतःच्या पायावर धोंडा, अमेरिकेच्या व्हिसा धोरणावरून भयकंप; पुढे काय अन् निर्णयामागे काय? जाणून घ्या
16
भारत विरुद्ध इंडिया; शहरी-ग्रामीण विषमतेचा अर्थ आणि परिणाम काय?
17
मी २०२९ सालापर्यंत महाराष्ट्रातच राहणार; दिल्लीला जाण्याची शक्यता फडणवीस यांनी फेटाळली!
18
कामाचा जास्त ताण घेता? हेल्थ कोण सांभाळणार? आतापासूनच घ्या 'या' गोष्टींची काळजी
19
सामान्य माणसाला न्याय हे बळकट लोकशाहीचे प्रतिक - सरन्यायाधीश भूषण गवई
20
जगप्रसिद्ध ऑर्थोपेडिक सर्जन राणावत यांचे निधन; ९०व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास

वीज ग्राहकांना एलईडी बल्ब

By admin | Updated: June 25, 2015 23:25 IST

महावितरण कंपनी : चार लाख सोळा हजार लोकांना लाभ

रत्नागिरी : विजेची बचत करता यावी यासाठी राज्यातील १ कोटी ७५ लाख घरगुती ग्राहकांना एलईडी बल्ब वाटप योजनेचा शुभारंभ मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याहस्ते करण्यात आला आहे. रत्नागिरी जिल्ह्यातील ४ लाख १६ हजार ८८६ घरगुती ग्राहकांना या एलईडी बल्बचा लाभ मिळणार आहे.एलईडी दिव्यांमुळे राज्याच्या १३ दशलक्ष युनिटस् वार्षिक विजेची बचत होणार आहे. कमाल मागणीच्या काळात ५०० मेगावॅट वीजेची मागणी कमी होण्यास मदत होईल. तसेच ग्राहकांची एका वर्षात प्रती बल्ब १८० रुपयांची वीजबिलामध्ये बचत होणार आहे. केंद्र सरकारने वीज बचतीसाठी घरगुती ग्राहकांना एलईडी दिवे वाटप योजना जाहीर केली आहे. या योजनेतील घरगुती ग्राहकांना प्रत्येकी ७ वॅट क्षमतेचे २ ते ४ बल्ब देण्यात येणार आहेत. हे बल्ब १०० रुपये रोखीने किंवा १०५ रुपये दराने मासिक योजनेच्या हप्त्याने घेता येतील. या योजनेमुळे बिलातून शून्य व्याजाने रक्कम वसूल केल्यामुळे ग्राहकांचा आर्थिक भार कमी होईल. शिवाय या योजनेचा विजेच्या दरावर किंंवा महावितरणवर कोणताही आर्थिक बोजा येणार नाही.तीन वर्षामध्ये मोफत बल्ब बदलण्याची गॅरंटी राहणार आहे. या योजनेत सहभागी होण्यासाठी ग्राहकाला एसएमएस, ईमेल किंवा प्रत्यक्ष कक्षावर भेटून बल्बची नोंदणी करावी लागेल. योजनेच्या अंमलबजावणीसाठी महावितरणचे शाखा कार्यालय, बिल भरणा केंद्र व इतर ठिकाणी बल्ब वाटप कक्ष उघडण्यात येणार आहे. ईईएसएल कंपनीतर्फे घरपोच सेवेची व्यवस्था करण्यात आली आहे. स्थानिक पातळीवरील लोकप्रतिनिधींच्या सहभागाने बल्ब वाटपाचा कार्यक्रम हाती घेण्यात येणार आहे. (प्रतिनिधी)राज्याच्या १३ दशलक्ष युनिटस् वार्षिक वीजेची बचत होणार.कमाल मागणीच्या काळात ५०० मेगावॅट वीजेची मागणी कमी होण्यास मदत.ग्राहकांची एका वर्षात प्रती बल्ब १८० रुपयांची बचत.बल्ब १०० रुपये रोखीने किंवा मासिक योजनेच्या हप्त्याने घेता येणार.