शहरं
Join us  
Trending Stories
1
प्रशासकराज संपणार : १५ जानेवारीला मतदान, तर १६ जानेवारीला निकाल! महापालिकांचा महासंग्राम
2
आजचे राशीभविष्य, १६ डिसेंबर २०२५: सरकारी कामात यश, अचानक धनलाभ; सुखाचा दिवस
3
पाकिस्तानमध्ये शिजला पहलगाम हल्ल्याचा कट, सहा जणांविरोधात १,५९७ पानांचे आरोपपत्र!
4
क्रिकेटवेड्या देशाने मेस्सीवर जीव टाकला... पुढे? भारतीय फुटबॉलच्या विकासासाठी काय?
5
इंडिगो गोंधळाबाबतच्या याचिकेवर सुनावणी घेण्यास सुप्रीम कोर्टाचा नकार; दिल्ली उच्च न्यायालयात दाद मागण्याचे आदेश
6
एक कोटी मतदार बजावणार हक्क; मुंबई महापालिका निवडणूक : एक लाख दुबार मतदार तपासणीत वगळले जाण्याची शक्यता
7
ऑर्डर कॅन्सल करण्याच्या कारणावरून वाद; डिलिव्हरी बॉयचा मित्रावर चाकूहल्ला
8
संपादकीय : यत्र, तत्र, पाकिस्तान सर्वत्र! ऑस्ट्रेलियातील हल्ल्याचे पाकिस्तानी कनेक्शन
9
...जेव्हा गुंडच पोलिसांच्या कॉलरला हात घालतात; कांदिवलीत ५ अटकेत
10
सर्वोच्च न्यायालयाचा सल्ला-उत्तर कमी, गुंता अधिक! न्यायालयीन सल्ल्यामुळे राजकीय अनिश्चितता वाढली
11
कबड्डीपटू राणा बालचौरियाची गोळ्या घालून हत्या; सिद्धू मुसेवाला हत्येचा बदला घेतल्याची चर्चा
12
IND vs SA T20I: अक्षर पटेल OUT! फक्त ३ वनडे खेळलेला खेळाडू ३ वर्षांनंतर टीम इंडियात
13
भाजपचा विजयी चौकार की काँग्रेस ठरणार ‘गेमचेंजर’? शिवसेना, राष्ट्रवादीसाठी अस्तित्वाची लढाई
14
IPL 2026 Auction Live Streaming : क्रिकेटर्सवर होणार पैशांची 'बरसात'! कधी अन् कुठे पाहता येईल लिलाव?
15
कुख्यात गँगस्टर सुभाषसिंह ठाकूरचा ताबा मिरा भाईंदर पोलिसांकडे; मंगळवारी कोर्टात हजर करणार
16
कोंबड्यांचा व्यवसायाआड चालणारा अमली पदार्थांचा कारखाना पोलिसांकडून उद्ध्वस्त, ११ अटकेत
17
पार्थ पवारांचा भागीदार दिग्विजय पाटील अखेर पोलिसांसमोर; सव्वा महिन्याने बावधन पोलीस ठाण्यात
18
मुख्यमंत्र्यांच्या कार्यक्रमाला रस्ता वळवताना नियोजनाचा अभाव; शिक्षिकेचा उपचाराअभावी मृत्यू
19
बालविवाह थांबवला..! नवरदेव लग्न मंडपात जाणार होता, पण त्यापूर्वीच दामिनी पथकाची धडक अन्...
20
डोंबिवलीत ४० वार करून खून करणारे आरोपी १२ तासात गजाआड, पाच दिवसांची पोलिस कोठडी
Daily Top 2Weekly Top 5

ं‘अंनिस’ फरार मारेकºयांची पोस्टर्स लावणार : सुशीला मुंडे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 19, 2017 00:06 IST

लोकमत न्यूज नेटवर्कवैभववाडी : राज्य शासन दाभोलकर, पानसरे खुनाच्या तपासात अक्षम्य दिरंगाई करीत असल्याने विवेकवादी लोकांना धोका कायम आहे, असा आरोप करीत या प्रकरणातील संशयित फरार आरोपी सारंग अकोळकर व विनय पवार यांची ‘अंनिस’तर्फे राज्यभर पोस्टर्स लावली जाणार आहेत, अशी माहिती महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीच्या प्रधान सचिव सुशीला मुंडे यांनी ...

लोकमत न्यूज नेटवर्कवैभववाडी : राज्य शासन दाभोलकर, पानसरे खुनाच्या तपासात अक्षम्य दिरंगाई करीत असल्याने विवेकवादी लोकांना धोका कायम आहे, असा आरोप करीत या प्रकरणातील संशयित फरार आरोपी सारंग अकोळकर व विनय पवार यांची ‘अंनिस’तर्फे राज्यभर पोस्टर्स लावली जाणार आहेत, अशी माहिती महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीच्या प्रधान सचिव सुशीला मुंडे यांनी वैभववाडी येथे पत्रकार परिषदेत दिली. विचारांचा लढा विचारांनी लढवा; त्यासाठी खून पाडू नका, असे आवाहनही त्यांनी केले.डॉ. नरेंद्र दाभोलकर, कॉ. गोविंद पानसरे व प्रा. एम. एम. कलबुर्गी यांच्या संशयित मारेकºयांना पकडण्यात शासन दिरंगाई करीत आहे; त्यामुळेच पकडलेला संशयित आरोपी जामिनावर सुटला आहे. यासंबंधीचे प्रसिद्धीपत्रक देऊन मुंडे यांनी अंनिसची नेमकी भूमिका मांडली. यावेळी मच्छींद्रनाथ मुंडे, डॉ. शामकांत जाधव, किरण जाधव, प्रा. एस. एन. पाटील उपस्थित होते.सुशीला मुंडे पुढे म्हणाल्या की, डॉ. दाभोलकर यांच्या खुनाला २० आॅगस्ट रोजी चार वर्षे पूर्ण होत आहेत, परंतु त्यांचे मारेकरी आजही मोकाट आहेत. ते वेळीच शोधून कारवाई केली असती तर कॉ. पानसरे व कर्नाटकातील प्रा. कलबुर्गी या दोन विवेकवादी व्यक्तींचा खून झालाच नसता, याची आम्हाला खात्री आहे. डॉ. दाभोलकर व कॉ. पानसरे खुनाच्या तपासातील दिरंगाईमुळे महाराष्ट्र पोलिसांचे हसे झाले आहे. याबाबत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची आम्ही वारंवार भेट घेतली. समितीने अनेक निवेदने दिली, परंतु संशयित आरोपींना पकडण्यासाठी राज्य किंवा केंद्र शासन पुरेसे प्रयत्न करताना दिसत नाही.कॉ. पानसरे खुनाच्या संथगती तपासाचा फायदा घेऊन या प्रकरणातील संशयित आरोपी समीर गायकवाडला जामीन मिळाला. त्यामुळे तोही फरार होण्याची किंवा साक्षीदारांवर दबाव टाकण्याची शक्यता लक्षात घेऊन राज्य शासनाने त्याच्या जामिनाविरोधात उच्च न्यायालयात तातडीने अर्ज करायला हवा होता. तशी मागणीही अंनिसने मुख्यमंत्र्यांकडे केली होती, परंतु राज्य सरकारने त्याबाबत कोणतेही पाऊल उचललेले नाही. सनातन संस्थेचे साधक व खुनातील संशयित आरोपी सारंग अकोळकर व विनय पवार यांच्यापासून विवेकवादी लोकांना धोका असल्याने सीबीआयने त्यांच्यावर प्रत्येकी पाच लाखांचे बक्षीस जाहीर केले आहे, परंतु राज्य सरकारने कॉ. पानसरे खूनप्रकरणी त्या दोघा संशयितांवर अद्याप बक्षीस जाहीर केलेले नाही किंवा त्यांना फरार घोषित करून त्यांच्या संपत्तीची जप्तीही केलेली नाही.