शहरं
Join us  
Trending Stories
1
लेकी- सुनांवर अन्याय करणाऱ्यांना इथून पुढे...; महिलांच्या संरक्षणासाठी शिंदेंनी उचलला विडा
2
उपराष्ट्रपतीपदासाठी विरोधक तामिळनाडूचाच उमेदवार देणार; ठरल्यात जमा, बलाबल काय...
3
Crime News : पुन्हा निळ्या ड्रमचे प्रकरण आले, बायको घरमालकाच्या प्रेमात पडली; पतीला संपवले अन्...
4
२०१४ मध्येच भाजपा शिवसेनेला हात दाखवणार होती,पण...; प्रफुल्ल पटेलांचा १० वर्षांनी गौप्यस्फोट
5
Mumbai Rain: 'गो अराऊंड'चा मेसेज आणि 9 विमानांच्या मुंबई विमानतळावर बराच वेळ घिरट्या
6
'अलास्का' इथं डोनाल्ड ट्रम्पच्या भेटीला पोहचले डुप्लिकेट पुतिन; सोशल मीडियात चर्चांना उधाण, कारण...
7
सोहम बांदेकरचं 'ठरलं तर मग'! 'या' अभिनेत्रीसोबत बांधणार लग्नगाठ? होतोय अभिनंदनाचा वर्षाव
8
Asia Cup 2025 : गिलमुळे धोक्यात होतं तिलक वर्माचं स्थान; शेवटी BCCI निवडकर्त्यांनी असा काढला तोडगा
9
गुंतवणूकदार होणार मालामाल! 'ही' ऑटोमोबाईल कंपनी देणार प्रति शेअर १०० रुपये लाभांश, तुम्हालाही संधी?
10
मोठी नाचक्की...! ऑपरेशन सिंदूरवेळी कराची बंदरातून पाकिस्तानी नौदल पळून गेलेले; कुठे लपलेले...
11
Russia-Ukraine War : एकीकडे शांतता चर्चा, दुसरीकडे बॉम्ब वर्षाव: झेलेन्स्की अमेरिकेत असताना रशियाने युक्रेनला हादरवले!
12
Russia Ukrain War : डोनाल्ड ट्रम्प युक्रेनचे दोन तुकडे करणार? क्रिमिया अन् दोन मोठी शहरे रशियाला मिळणार
13
तरुण वयात ₹१०० ची बचत वृद्धापकाळात देऊ शकते ३ कोटींची रक्कम; SIP मध्ये गुंतवणुकीसाठी वापरू शकता 'हा' फॉर्म्युला
14
दहावीतील विद्यार्थ्याची नववीतील विद्यार्थ्याने केली हत्या, चाकूने सपासप वार केले आणि...  
15
Mumbai Local: मुंबईत मुसळधार पाऊस! हार्बर आणि मध्य मार्गावरील लोकल सेवा विस्कळीत
16
आभाळ फाटले! मुखेड तालुक्यातील सहा गावांत पाणी शिरले; बेपत्ता १२ जणांचा शोध सुरु
17
Mumbai Rain Alert: मुंबईत रेड अलर्ट; तीन ते चार तासात 'अतिमुसळधार' कोसळणार, शाळांना सुट्टी जाहीर
18
परळी हादरलं! लग्नावरून परतताना जीप पुरात वाहून गेली; तिघे बचावले, एकाचा मृत्यू
19
School Holiday: मुंबईत शाळांना सुट्टी जाहीर, पाणी साचल्याने अनेक ठिकाणी वाहतूक ठप्प; ४८ तासांसाठी रेड अलर्ट जारी
20
Video: टोलनाक्यावरील कर्मचारी की गुंड; लष्कराच्या जवानावर तुटून पडले, खांबाला बांधून दांडक्याने मारले

बंदरे विकसित होणार : चॅटर्जी

By admin | Updated: April 18, 2015 00:01 IST

कोळशाचे महाकाय जहाज प्रथमच जयगड बंदरात दाखल

रत्नागिरी : राज्यातील खासगी व शासनाच्या ताब्यात असलेली सर्वच बंदरे विकसित करून जलवाहतुकीची क्षमता कित्येक पटीने वाढवण्याचा शासनाचा मानस आहे. त्याद्वारे मोठ्या प्रमाणात रोजगार निर्मितीही केली जाणार आहे. जिंदल कंपनीचे जयगडमधील बंदर हे अत्याधुनिक बंदर असून, दिघी व उरण ही बंदरेही विकसित केली जाणार आहेत, अशी माहिती राज्याच्या बंदर विभागाचे अतिरिक्त सचिव गौतम चॅटर्जी यांनी जयगड येथे पत्रकारांना दिली. जिंंदालच्या जयगड बंदरात इंडियन फ्रेंडशीप हे महाकाय जहाज १ लाख ६० हजार मेट्रिक टन कोळसा घेऊन तब्बल चौदा दिवसांचा सागरीप्रवास करून दाखल झाले आहे. राज्यातील पहिल्या क्रमांकाचे हे बंदर असल्याची माहिती यावेळी देण्यात आली. बंदर विभागाचे संयुक्त प्रबंधक बी. व्ही. के. शर्मा यांनी सांगितले की, भविष्यात तीन लाख मेट्रिक टन माल जहाजातून आणून देशात हे बंदर अव्वल ठरेल. गेल्या सात वर्षांपासून जिंदलचे हे बंदर कार्यरत असून, आधुनिकतेच्या स्तरावर अनेक सुधारणा करीत मालवाहतुकीत या बंदराने विक्रम केले आहेत. त्यामुळे देश-विदेशातील मालवाहतूकदार कंपन्यांकडूनही बंदराला पसंती मिळत आहे. या बंदराचा अजूनही मोठ्या प्रमाणात विस्तार केला जाणार असून, त्यामुळे मालवाहतुकीची क्षमता आणखी वाढणार आहे. या बंदरापर्यंत मालवाहतुकीसाठी रेल्वे ट्रॅक होत असून, त्यामुळे बंदरात येणारा माल रेल्वेद्वारे वाहतूक करणे किफायतीर ठरणार आहे. जहाजावरील सर्व अधिकारी व कर्मचाऱ्यांचे जिंदल कंपनीतर्फे स्वागत करण्यात आले. यावेळी मेरीटाईम बोर्डाचे मुख्य कार्यकारी अधिकारी आशिष शर्मा, बंदर विभागाचे मुख्य सचिव गौतम चॅटर्जी, हिरानंदानी ग्रुपचे दर्शन हिरानंदानी, जिंदाल कंपनीचे मुख्य जनसंपर्क अधिकारी राजीव लिमये, अन्य अधिकारी व कर्मचारीवर्ग उपस्थित होता. राज्यातील पहिले मोठे बंदर म्हणून जिंदाल बंदराची ओळख या जहाजामुळे निर्माण झाली आहे. (प्रतिनिधी)जलवाहतुकीची क्षमता कित्येक पटीने वाढवण्याचा शासनाचा मानस.जिंदल कंपनीचे जयगडमधील अत्याधुनिक बंदर.जहाजावरील सर्व अधिकारी व कर्मचाऱ्यांचे जिंंदाल कंपनीतर्फे स्वागत.जहाजात १ लाख ६० हजार मेट्रिक टन कोळसा.