शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकची कोंडी करण्यासाठी हालचाली; अमेरिकेसह विविध देशांचा पाठिंबा मिळविण्यासाठी संपर्क साधणे सुरू
2
काश्मीरमध्ये मोठे कोंबिंग ऑपरेशन, दहशतवाद्यांना मदत करणाऱ्या ४४६ पेक्षा जास्त लोकांना घेतले ताब्यात
3
बेकायदा पार्किंगबाबत जनजागृती करा; उच्च न्यायालयाची ज्येष्ठ नागरिकांना सूचना
4
पर्यटकांना होऊ शकतो घाबरण्याचा आजार; मानसिक आरोग्यावर घातक परिणाम होऊ शकतात
5
पाकचे तीन तुकडे होणे गरजेचे, तर युद्ध क्षमता कमी होईल..!
6
पाकिस्तानला पाण्यासाठी भीक मागायला लावायची असेल तर...
7
पाण्यानंतर आता मेडिसीनसाठीही तरसणार पाकिस्तान? आपत्कालीन परिस्थिती टाळण्यासाठी तयारीला लागलं फार्मा सेक्टर
8
'झेलम'ला अचाकच पूर आला, पाकिस्तानात एकच गोंधळ उडाला; पाक मीडियानं भारतावर मोठा आरोप केला! नेमकं काय घडलं?
9
पर्यटकाच्या व्हिडिओमध्ये कैद झाले दहशतवादी...? देहूरोड येथील सामाजिक कार्यकर्त्याचा दावा
10
चोपड्यात थरार...! प्रेमविवाह केलेल्या मुलीला बापानेच गोळी झाडून संपवलं, जावई जखमी  
11
"...तर आपल्या प्रजेचं रक्षण करणं हा राजाचा धर्म! लोक लक्षात ठेवतील"; मोहन भागवत स्पष्टच बोलले
12
अंबाला गावात लग्नाच्या जेवणातून विषबाधा; आठ वर्षीय बालकाचा मृत्यू, अनेकांची प्रकृती चिंताजनक
13
पाकिस्ताननं बांगलादेशात तैनात केले फायटर जेट? PAK पत्रकाराचा मोठा दावा; म्हणाला, यावेळी...
14
पहलगाम ईफेक्ट : सूक्ष्म नजर ठेवा, सतर्क रहा; भारतीय रेल्वेला अलर्ट!
15
Pahalgam Terror Attack: मोठाच पेचप्रसंग! ‘त्या’ महिला आता पाकिस्तानात जाऊ शकत नाहीत; नेमका काय आहे ‘लाँग टर्म व्हिसा’?
16
सर्वार्थ सिद्धी योगात चैत्र अमावास्या: १० राशींवर धनलक्ष्मीची कृपा, लाभच लाभ; भरघोस भरभराट!
17
सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार
18
Prabhsimran Singh ची कडक फटकेबाजी; नरेनच्या गोलंदाजीवर 'उलटा' फटका मारला अन्... (VIDEO)
19
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा
20
CM पदाबाबत आता खुद्द फडणवीसांनी मनातील इच्छा बोलून दाखवली; बावनकुळेंच्या विधानावर म्हणाले...

बंदरे विकसित होणार : चॅटर्जी

By admin | Updated: April 18, 2015 00:01 IST

कोळशाचे महाकाय जहाज प्रथमच जयगड बंदरात दाखल

रत्नागिरी : राज्यातील खासगी व शासनाच्या ताब्यात असलेली सर्वच बंदरे विकसित करून जलवाहतुकीची क्षमता कित्येक पटीने वाढवण्याचा शासनाचा मानस आहे. त्याद्वारे मोठ्या प्रमाणात रोजगार निर्मितीही केली जाणार आहे. जिंदल कंपनीचे जयगडमधील बंदर हे अत्याधुनिक बंदर असून, दिघी व उरण ही बंदरेही विकसित केली जाणार आहेत, अशी माहिती राज्याच्या बंदर विभागाचे अतिरिक्त सचिव गौतम चॅटर्जी यांनी जयगड येथे पत्रकारांना दिली. जिंंदालच्या जयगड बंदरात इंडियन फ्रेंडशीप हे महाकाय जहाज १ लाख ६० हजार मेट्रिक टन कोळसा घेऊन तब्बल चौदा दिवसांचा सागरीप्रवास करून दाखल झाले आहे. राज्यातील पहिल्या क्रमांकाचे हे बंदर असल्याची माहिती यावेळी देण्यात आली. बंदर विभागाचे संयुक्त प्रबंधक बी. व्ही. के. शर्मा यांनी सांगितले की, भविष्यात तीन लाख मेट्रिक टन माल जहाजातून आणून देशात हे बंदर अव्वल ठरेल. गेल्या सात वर्षांपासून जिंदलचे हे बंदर कार्यरत असून, आधुनिकतेच्या स्तरावर अनेक सुधारणा करीत मालवाहतुकीत या बंदराने विक्रम केले आहेत. त्यामुळे देश-विदेशातील मालवाहतूकदार कंपन्यांकडूनही बंदराला पसंती मिळत आहे. या बंदराचा अजूनही मोठ्या प्रमाणात विस्तार केला जाणार असून, त्यामुळे मालवाहतुकीची क्षमता आणखी वाढणार आहे. या बंदरापर्यंत मालवाहतुकीसाठी रेल्वे ट्रॅक होत असून, त्यामुळे बंदरात येणारा माल रेल्वेद्वारे वाहतूक करणे किफायतीर ठरणार आहे. जहाजावरील सर्व अधिकारी व कर्मचाऱ्यांचे जिंदल कंपनीतर्फे स्वागत करण्यात आले. यावेळी मेरीटाईम बोर्डाचे मुख्य कार्यकारी अधिकारी आशिष शर्मा, बंदर विभागाचे मुख्य सचिव गौतम चॅटर्जी, हिरानंदानी ग्रुपचे दर्शन हिरानंदानी, जिंदाल कंपनीचे मुख्य जनसंपर्क अधिकारी राजीव लिमये, अन्य अधिकारी व कर्मचारीवर्ग उपस्थित होता. राज्यातील पहिले मोठे बंदर म्हणून जिंदाल बंदराची ओळख या जहाजामुळे निर्माण झाली आहे. (प्रतिनिधी)जलवाहतुकीची क्षमता कित्येक पटीने वाढवण्याचा शासनाचा मानस.जिंदल कंपनीचे जयगडमधील अत्याधुनिक बंदर.जहाजावरील सर्व अधिकारी व कर्मचाऱ्यांचे जिंंदाल कंपनीतर्फे स्वागत.जहाजात १ लाख ६० हजार मेट्रिक टन कोळसा.