शहरं
Join us  
Trending Stories
1
IND vs ENG : टीम इंडियाने 'बॅझबॉल'वाल्यांची जिरवली.. संयम अन् धैर्याची लढाई जिंकली; सामना अनिर्णित
2
रेल्वे रुळ ओलांडताना एक्स्प्रेसनं उडवलं, तिघांचा मृत्यू, माढा येथील घटना!
3
Pune Rave Party: 'त्या' दोन रुममध्ये तीन दिवसांपासून रेव्ह पार्टी? कधीपासून बुक होत्या रुम, बिल बघितलं का?
4
मुंबई: बँकेकडून आलेल्या महिलेला मागून धरलं, मानेवर चुंबन घेतलं अन् 'नको तिथे' हात...
5
पाकिस्तानमध्ये बस दरीत कोसळून नऊ जण ठार, दोन लहान बाळांचाही समावेश, ३०हून अधिक जखमी
6
Thane Crime: पालन पोषणाचा खर्च परवडेना, पोटच्या तिन्ही मुलींना पाजलं विष, आईला अटक!
7
VIDEO : स्टोक्सनं दुखावलेल्या खांद्यासह गिलला मारला हाताला झिणझिण्या आणणारा बाउन्सर; मग...
8
Pune Rave Party : पुण्यातील 'त्या' हॉटेलचे बुकिंग कुणाचा नावावर झाले होते ? पोलिसांनी दिली महत्वाची माहिती
9
IND vs ENG : वॉशिंग्टनसह जड्डूची फिफ्टी; टीम इंडियावरील मोठ संकट टळलं, पण...
10
Pune Rave Party : प्रांजल खेवलकरांसह सातही आरोपींना 2 दिवसांची पोलीस कोठडी
11
Pune Rave Party: रेव्ह पार्टीतील त्या दोन तरुणी कोण? पोलिसांना फ्लॅटमध्ये काय काय सापडलं?
12
बिजापूरमध्ये सुरक्षा दलांची मोठी कारवाई, १७ लाख रुपयांचे बक्षीस असलेले ४ नक्षलवादी ठार
13
Raigad Boat Capsized: रायगडमध्ये मासेमारीसाठी गेलेली बोट समुद्रात बुडाली, ५ जणांनी नऊ तास पोहून समुद्रकिनारा गाठला, ३ जण बेपत्ता!
14
'मी दोन वेळा मरता मरता राहिलोय'; धनंजय मुंडेंनी मन केलं मोकळं; मंत्रि‍पदाबद्दलही बोलले
15
Crime : आईवडिलांनी लेकीच्या नावावर केली जमीन, चिडलेल्या मुलाने तिघांचीही कुऱ्हाडीने केली हत्या
16
VIDEO: राज ठाकरे तब्बल ६ वर्षांनंतर 'मातोश्री'मधील स्व. बाळासाहेब ठाकरेंच्या खोलीत गेले अन्...
17
IND vs PAK : भारतीय सेनेचा अभिमान वाटतो, ही फक्त नौटंकी होती का? सोशल मीडियावर BCCI विरोधात संतप्त प्रतिक्रिया
18
Pune Rave Party Crime : रेव्ह पार्टीपूर्वी पुण्यातील या दोन ठिकाणी झाल्या पार्ट्या; नेमकं काय घडलं ?
19
अरेरे... देवाचं कामही नीट केलं नाही! तीन वर्षांत ५० कोटींचा खर्च तरीही विठ्ठल-रुक्मिणी मंदिराच्या छताला गळती
20
सलमानच्या Ex गर्लफ्रेंडचे आदित्य पांचोली यांच्यावर गंभीर आरोप, म्हणाली- "तुम्ही महिलांना फसवता, त्यांना मारहाण करता..."

पोयनार धरणग्रस्त आजही उपेक्षितच

By admin | Updated: May 5, 2017 23:31 IST

पोयनार धरणग्रस्त आजही उपेक्षितच

लोकमत न्यूज नेटवर्कदापोली : खेड तालुक्यातील पोयनार धरण हे १९७२ साली मंजूर झालं. त्यानंतर १९९६-९७साली प्रत्यक्ष धरणाच्या कामाला सुरुवात झाली. या धरणामुळे खेड - दापोली या दोन तालुक्यांमधील २५ गावांची पाणी समस्या दूर होणार आहे. मात्र, राजकीय मंडळींकडून आजपर्यंत धरणाच राजकारणच करण्यात आलं. येथील धरणग्रस्तांच्या समस्या लोकप्रतिनिधींनी जाणून घेतल्या नाहीत. त्यामुळे २० वर्षाहून अधिककाळ लोटला, तरीही पोयनार धरणग्रस्तांना उपेक्षितांसारखे जीवन जगावे लागत आहे.पोयनार व धामणी या दोन गावांच्या सीमेवर पोयनार धरणाचे काम अतिशय संथगतीने गेल्या २० वर्षांपासून सुरु आहे. या धरणाचे काम अनेकदा बंद पडले व पुन्हा सुरु झाले. या धरणाचे काम करणारे अनेक ठेकेदार बदलले व अनेक अधिकारीही बदलून गेले. मात्र, धरणाचे काम ज्या गतीने व्हायला हवे होते, त्या गतीने झालेले नाही. धरण कामाच्या संथ गतीमुळे या धरणाचे बजेटही पाचपट वाढले आहे. सरकारच्या तिजोरीवरही फुकटचा ताण वाढला. धरणाचे काम लवकर पूर्ण होऊन पाणी मिळावे, या माफक अपेक्षेने येथील जनता गेली अनेक वर्षे प्रतीक्षा करीत आहे. परंतु, ‘सरकारी काम, अनेक वर्षे थांब’ या म्हणीप्रमाणे या धरणाचे काम आजही सुरु आहे. या धरणाचे सध्या ८० टक्के काम पूर्ण झाले आहे. त्यामुळे या धरणाचे काम लवकर पूर्ण व्हावे, अशी मागणी आता जोर धरत आहे.पोयनार धरणामुळे २५ गावांची पाणी समस्या दूर होणार असल्याने या गावातील ‘व्होट बँके’वर नजर ठेवून राजकीय पुढारी तुम्हाला लवकरच धरणाचे पाणी देऊ, असे सांगत आहेत. पोयनार धरण आपणच मार्गी लावले असून, २५ गावांमधील पाणीटंचाई दूर करु व हा भाग सुजलाम सुफलाम करु, अशी घोषणा करुन राजकीय श्रेय लाटण्याचा प्रयत्न होताना दिसत आहे. एका बड्या नेत्याने तर चक्क दिवाळीत या धरणाचे पाणी देऊन फटाके फोडण्याची घोषणा केल्याचे ग्रामस्थांचे म्हणणे आहे. केवळ राजकीय श्रेय घेणाऱ्या या पुढाऱ्यांना धरणाचे निकृष्ट काम व धरणग्रस्तांचे अश्रू आजपर्यंत दिसले नाहीत का? त्यामुळे श्रेय घेऊ पाहणारे पुढारी आजपर्यंत कुठे होते, असा संतप्त सवाल येथील जनता विचारत आहे.पोयनार धरणग्रस्तांनी आपल्या जमिनी कवडीमोल किंमतीने या धरणासाठी दिल्या. मात्र, आज हेच धरणग्रस्त पुनर्वसनाच्या प्रतीक्षेत आहेत. धरणाच्या बुडीत क्षेत्रात जमिनी, घरे गेल्यामुळे पोयनार रामवाडी व बौद्धवाडीतील लोकांना पुनर्वसित व्हावे लागले आहे. यातील बौद्धवाडीचे पुनर्वसन झाले असून ते चुकीच्या पद्धतीने झाले आहे. धरणाशेजारीच बौद्धवाडीचे पुनर्वसन केले आहे. लोकांनी कर्ज काढून येथे घरे बांधली आहेत. मात्र, आता पाणी पातळीत वाढ होण्याची शक्यता असल्याने याठिकाणची घरे पुन्हा दुसरीकडे पुनर्वसित करावी, असे येथील अधिकारी खासगीत बोलत आहेत. एकदा पुनर्वसित व्हावे लागले आहे. आता सरकारच्या चुकीमुळे पुन्हा तेच करायचे का? असा सवाल ग्रामस्थ विचारु लागले आहेत.ंपुनर्वसन आराखडा नाहीपोयनार धरणाची गळभरणी करण्याची व राजकीय श्रेय घेण्याची घाई राजकीय पुढाऱ्यांना लागली आहे. परंतु, ज्या लोकांच्या जमिनी धरणासाठी गेल्या, २० वर्षांपासून भूमिहीन म्हणून जीवन जगण्याची वेळ ज्यांच्यावर आली, त्यांच्या समस्या व धरणग्रस्त म्हणून शासनाकडून देण्यात येणाऱ्या योजना त्यांना मिळवून देण्यासाठी मात्र याच राजकीय पुढाऱ्यांनी पाठ फिरवली आहे. त्यामुळे धरणग्रस्त ग्रामस्थ कमालीचे नाराज झाले असून, येथील पुनर्वसन आराखडा व संकलन रजिस्टर शासनाकडे तयार नसल्याने त्यांना न्याय मिळणेदेखील कठीण झाले आहे.