शहरं
Join us  
Trending Stories
1
माणिकराव कोकाटेंच्या शिक्षेला सुप्रीम कोर्टाकडून स्थगिती; आमदारकीही जाणार नाही, आज काय घडलं?
2
डोनाल्ड ट्रम्प यांचा मोठा निर्णय; २९ देशांतील अमेरिकन राजदुतांना तडकाफडकी परत बोलावले; काय आहे कारण?
3
आता मनमानी चालणार नाही! रुग्णालयांना आधीच सांगावा लागणार आयसीयू-व्हेंटिलेटरचा खर्च; 'यांची' मंजुरीही आवश्यक
4
थरारक घटना! टेकऑफनंतर काही मिनिटांतच Air India विमानाचा यू टर्न; हवेत अडकला प्रवाशांचा श्वास
5
सैराटची पुनरावृत्ती! आंतरजातीय विवाहामुळे बदल्याची आग; बापानेच केली गर्भवती लेकीची हत्या
6
रस्त्यांवर झाडू मारतोय भारतीय 'सॉफ्टवेअर डेव्हलपर'! महिना सव्वा लाखाची कमाई; कंपनी का देते इतके पैसे?
7
विधवा वहिनीचं दीरासोबतच सुरू झालं अफेअर अन् अचानक घरातून झाली गायब! एक महिन्यानंतर जे समोर आलं... 
8
तुम्ही वापरत असलेला चार्जर FAKE तर नाहीये ना? कसा ओळखायचा ओरिजनल चार्जर, टाळू शकता मोबाइलचं होणारं नुकसान
9
Mumbai Crime: मुंबईतील धक्कादायक प्रकार! चालत्या लोकलमधून मुलीला खाली फेकलं; Video व्हायरल, आरोपीला पकडलं
10
भीषण अपघात! इंडोनेशियात डिव्हायडरला धडकून बस महामार्गावर उलटली, १६ जणांचा मृत्यू
11
सहा पक्षांच्या जय, पराजयाचा संदेश काय? भाजपपेक्षा एकनाथ शिंदेंना सर्वाधिक यश? एवढा विस्तृत लेख कुठेच मिळणार नाही...
12
बॉलिवूडचे चर्चेतले चेहरे अक्षय खन्ना-सनी देओल २९ वर्षांनंतर एकत्र दिसणार? 'या' सिनेमाची चर्चा
13
Budh Gochar 2025: २०२५ ला निरोप देताना 'या' ७ राशींचे नशीब चमकणार, आयुष्यात येणार सुवर्णकाळ
14
लग्नाच्या आदल्या रात्री वडील ओरडले; नवरदेवाच्या लागलं मनाला, वरातीऐवजी घरातून निघाली अंत्ययात्रा!
15
कोट्यधीश होण्याचे स्वप्न आता होणार पूर्ण! २१X१०X१२ हा फॉर्म्युला वापरा; ५१ व्या वर्षी व्हाल मालामाल
16
KVP Scheme: पैसा दुप्पट करणारी सरकारी स्कीम; विना जोखीम 'इतक्या' महिन्यांत तुमचे पैसे होतील दुप्पट
17
केंद्रीय मंत्री किरेन रिजिजू अजमेर दर्ग्यावर चादर चढवणार; म्हणाले, "दुआ करने जा रहा हूं..."
18
भाडं वाढणार; १००, २००, ५०० कोटी नाही तर, 'इतक्या' कोटींचा होणार रेल्वेला बंपर फायदा, जाणून घ्या
19
एस एस राजामौलींच्या 'वाराणसी'चं बजेट १३०० कोटी? प्रियंका चोप्रा म्हणाली, "अर्धे पैसे माझ्या..."
20
शरीफ उस्मान हादीचा मारेकरी देश सोडून पळाला? बांगलादेश पोलिसांनी सत्य परिस्थिती केली स्पष्ट
Daily Top 2Weekly Top 5

पोयनार धरणग्रस्त आजही उपेक्षितच

By admin | Updated: May 5, 2017 23:31 IST

पोयनार धरणग्रस्त आजही उपेक्षितच

लोकमत न्यूज नेटवर्कदापोली : खेड तालुक्यातील पोयनार धरण हे १९७२ साली मंजूर झालं. त्यानंतर १९९६-९७साली प्रत्यक्ष धरणाच्या कामाला सुरुवात झाली. या धरणामुळे खेड - दापोली या दोन तालुक्यांमधील २५ गावांची पाणी समस्या दूर होणार आहे. मात्र, राजकीय मंडळींकडून आजपर्यंत धरणाच राजकारणच करण्यात आलं. येथील धरणग्रस्तांच्या समस्या लोकप्रतिनिधींनी जाणून घेतल्या नाहीत. त्यामुळे २० वर्षाहून अधिककाळ लोटला, तरीही पोयनार धरणग्रस्तांना उपेक्षितांसारखे जीवन जगावे लागत आहे.पोयनार व धामणी या दोन गावांच्या सीमेवर पोयनार धरणाचे काम अतिशय संथगतीने गेल्या २० वर्षांपासून सुरु आहे. या धरणाचे काम अनेकदा बंद पडले व पुन्हा सुरु झाले. या धरणाचे काम करणारे अनेक ठेकेदार बदलले व अनेक अधिकारीही बदलून गेले. मात्र, धरणाचे काम ज्या गतीने व्हायला हवे होते, त्या गतीने झालेले नाही. धरण कामाच्या संथ गतीमुळे या धरणाचे बजेटही पाचपट वाढले आहे. सरकारच्या तिजोरीवरही फुकटचा ताण वाढला. धरणाचे काम लवकर पूर्ण होऊन पाणी मिळावे, या माफक अपेक्षेने येथील जनता गेली अनेक वर्षे प्रतीक्षा करीत आहे. परंतु, ‘सरकारी काम, अनेक वर्षे थांब’ या म्हणीप्रमाणे या धरणाचे काम आजही सुरु आहे. या धरणाचे सध्या ८० टक्के काम पूर्ण झाले आहे. त्यामुळे या धरणाचे काम लवकर पूर्ण व्हावे, अशी मागणी आता जोर धरत आहे.पोयनार धरणामुळे २५ गावांची पाणी समस्या दूर होणार असल्याने या गावातील ‘व्होट बँके’वर नजर ठेवून राजकीय पुढारी तुम्हाला लवकरच धरणाचे पाणी देऊ, असे सांगत आहेत. पोयनार धरण आपणच मार्गी लावले असून, २५ गावांमधील पाणीटंचाई दूर करु व हा भाग सुजलाम सुफलाम करु, अशी घोषणा करुन राजकीय श्रेय लाटण्याचा प्रयत्न होताना दिसत आहे. एका बड्या नेत्याने तर चक्क दिवाळीत या धरणाचे पाणी देऊन फटाके फोडण्याची घोषणा केल्याचे ग्रामस्थांचे म्हणणे आहे. केवळ राजकीय श्रेय घेणाऱ्या या पुढाऱ्यांना धरणाचे निकृष्ट काम व धरणग्रस्तांचे अश्रू आजपर्यंत दिसले नाहीत का? त्यामुळे श्रेय घेऊ पाहणारे पुढारी आजपर्यंत कुठे होते, असा संतप्त सवाल येथील जनता विचारत आहे.पोयनार धरणग्रस्तांनी आपल्या जमिनी कवडीमोल किंमतीने या धरणासाठी दिल्या. मात्र, आज हेच धरणग्रस्त पुनर्वसनाच्या प्रतीक्षेत आहेत. धरणाच्या बुडीत क्षेत्रात जमिनी, घरे गेल्यामुळे पोयनार रामवाडी व बौद्धवाडीतील लोकांना पुनर्वसित व्हावे लागले आहे. यातील बौद्धवाडीचे पुनर्वसन झाले असून ते चुकीच्या पद्धतीने झाले आहे. धरणाशेजारीच बौद्धवाडीचे पुनर्वसन केले आहे. लोकांनी कर्ज काढून येथे घरे बांधली आहेत. मात्र, आता पाणी पातळीत वाढ होण्याची शक्यता असल्याने याठिकाणची घरे पुन्हा दुसरीकडे पुनर्वसित करावी, असे येथील अधिकारी खासगीत बोलत आहेत. एकदा पुनर्वसित व्हावे लागले आहे. आता सरकारच्या चुकीमुळे पुन्हा तेच करायचे का? असा सवाल ग्रामस्थ विचारु लागले आहेत.ंपुनर्वसन आराखडा नाहीपोयनार धरणाची गळभरणी करण्याची व राजकीय श्रेय घेण्याची घाई राजकीय पुढाऱ्यांना लागली आहे. परंतु, ज्या लोकांच्या जमिनी धरणासाठी गेल्या, २० वर्षांपासून भूमिहीन म्हणून जीवन जगण्याची वेळ ज्यांच्यावर आली, त्यांच्या समस्या व धरणग्रस्त म्हणून शासनाकडून देण्यात येणाऱ्या योजना त्यांना मिळवून देण्यासाठी मात्र याच राजकीय पुढाऱ्यांनी पाठ फिरवली आहे. त्यामुळे धरणग्रस्त ग्रामस्थ कमालीचे नाराज झाले असून, येथील पुनर्वसन आराखडा व संकलन रजिस्टर शासनाकडे तयार नसल्याने त्यांना न्याय मिळणेदेखील कठीण झाले आहे.