शहरं
Join us  
Trending Stories
1
CA नगराध्यक्ष सगळ्यांचा हिशेब ठेवतील अन् काहींचा 'हिशोब करतील'...; फडणवीसांचे सूचक विधान
2
माणिकराव कोकाटे यांना अखेर मोठा दणका; त्यांच्याकडची मंत्रिपदाची सर्व खाती अजित पवारांकडे!
3
U19 Asia Cup 2025 : ...तर आशिया कप जेतेपदासाठी भारत-पाक यांच्यात रंगणार फायनल!
4
महागाईचा ‘रॉकेट’ वेग! चांदी २ लाखांच्या पार, तर सोने १.३७ लाखांवर... आतापर्यंत सर्व विक्रम मोडले
5
Lokmat Parliamentary Award 2025: सुधा मूर्ती ते दिग्विजय सिंह... 'लोकमत पार्लिमेंटरी अवार्ड २०२५'ने ८ प्रतिभावान खासदारांचा गौरव
6
IND vs SA T20I: पहिल्यांदाच असं घडलं! धुक्यामुळे भारत-दक्षिण आफ्रिका यांच्यातील चौथा सामना रद्द
7
मुंबई: कोस्टल रोड प्रवेशद्वारावर अचानक लागली भीषण आग; वाहनांच्या लांब रांगा, प्रवाशांचे हाल
8
धनंजय मुंडे परत मंत्री झाले तर...; अंजली दमानियांकडून भाजपा लक्ष्य; 'तो' फोटोही केला शेअर
9
"पंडित नेहरूंची पत्रे अजूनही सोनिया गांधींकडेच"; केंद्राचा खळबळजनक दावा; म्हणाले, 'हा देशाचा वारसा'
10
“मी माझ्या पक्षाचा पर्मनंट चिफ, कुणी बायपास करणार नाही, तसा प्रयत्न झाला तर…”: रामदास आठवले
11
IND vs SA 4th T20I : शुभमन गिल 'आउट'; टॉसला उशीर! जाणून घ्या त्यामागचं कारण
12
गुरुवारी मार्गशीर्ष शिवरात्रि २०२५: ‘असे’ करा व्रत, शिवाचे विशेष पूजन; काही कमी पडणार नाही!
13
"मला कधीच वाटलं नव्हतं की इतकी पर्सनल..."; MMS लीक प्रकरणावर Payal Gaming चे स्पष्टीकरण
14
“माणिकराव कोकाटेंना वाचवण्याचा सरकारकडून प्रयत्न, २४ तास झाले अद्याप अटक का नाही?”: सपकाळ
15
वांद्रे-वरळी सी लिंकवर २५२ किमी प्रतितास वेगाने पळवली लॅम्बॉर्गिनी, पोलिसांनी केली अशी कारवाई  
16
आवळा कँडी ते च्यवनप्राश... आरोग्यासाठी ठरू शकतं घातक; न्यूट्रिशनिस्टने सांगितले साइड इफेक्ट
17
"शिक्षा देण्यापेक्षा माफ करण्यातच कायद्याचा मोठेपणा"; बूट फेक प्रकरणावर माजी सरन्यायाधीश गवईंचे रोखठोक भाष्य
18
Maruti Suzuki ने लॉन्च केली नवीन WagonR; वृद्ध आणि दिव्यांगांसाठी मिळणार खास 'स्विव्हल सीट'
19
प्रियंका आणि राहुल गांधी यांच्यात वाद, कुटुंबीयांशी भांडून परदेशात गेले; केंद्रीय मंत्र्याचा मोठा दावा
20
“SIR प्रक्रिया निरर्थक, ५०० परदेशींसाठी ८ कोटी लोकांचा छळ”; माजी निवडणूक आयुक्त थेट बोलले
Daily Top 2Weekly Top 5

निकृष्ट काम करणारे काळ्या यादीत

By admin | Updated: July 7, 2015 23:15 IST

वैभव नाईकांचा इशारा : कुडाळची आमसभा खेळीमेळीत, मोठा पोलीस बंदोबस्त

कुडाळ : तालुक्यातील विकासकामांच्या पूर्णत्वासाठी सर्वांनी एकत्र येवून काम करूया, असे आवाहन आमदार वैभव नाईक यांनी आमसभेत बोलताना केले. यापुढे निकृष्ट काम करणाऱ्या ठेकेदारांना काळ्या यादीत टाकणार असून वेळ पडल्यास संंबंधित विभागाच्या अधिकाऱ्यांवरही कारवाईचा बडगा उगारला जाईल, असा इशारा यावेळी आमदार नाईक यांनी दिला. आमसभा खेळीमेळीत व शांततेत पार पडली. कुडाळ तालुक्याची आमसभा चार वर्षांनंतर आमदार वैभव नाईक यांनी मंगळवारी येथील महालक्ष्मी सभागृहात आयोजित केली होती. आमसभेच्या अध्यक्षस्थानी आमदार नाईक होते तर यावेळी जिल्हा परिषद उपाध्यक्ष रणजीत देसाई, पंचायत समिती सभापती प्रतिभा घावनळकर, उपसभापती आर. के. सावंत, उपमुख्य कार्यकारी अधिकारी सुनील रेडकर, गटविकास अधिकारी इजाज अहमद शरीक मसलत, माजी जिल्हा परिषद अध्यक्ष काका कुडाळकर, संजय पडते, विकास कुडाळकर, दीपलक्ष्मी पडते, जिल्हा परिषद सदस्य रमाकांत तामाणेकर, भारती चव्हाण, रुक्मिणी कांदळगावकर, जान्हवी सावंत, पंचायत समिती सदस्य बबन बोभाटे, दीपक नारकर, गंगाराम सडवेलकर, परशुराम परब, अतुल बंगे, संतोष कुंभार, जिल्हा नियोजन सदस्य अभय शिरसाट, पोलीस उपनिरीक्षक सतीश निकम, नायब तहसीलदार प्रवीण लोकरे व इतर लोकप्रतिनिधी, अधिकारी उपस्थित होते. यावेळी विविध पक्षाच्या कार्यकर्त्यांनी, ग्रामीण भागातील जनतेने तालुक्यातील अनेक प्रलंबित प्रश्नांची माहिती आमसभेत मांडली. आमसभेच्या उशिरा होण्याबाबत संजय भोगटे यांनी प्रश्न उपस्थित केला. आमसभेत कोणताही अनुचित प्रकार घडू नये, यासाठी पोलीस प्रशासनाने मोठ्या प्रमाणात पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला होता. यावेळी बोलताना जिल्हा परिषद उपाध्यक्ष रणजीत देसाई म्हणाले, या अगोदरच्या सभेतील जनतेच्या मागण्या तत्कालीन आमदार नारायण राणे यांनी जवळपास पूर्ण केल्या असून, यापुढेही सध्याचे आमदार येथील जनतेच्या मागण्या पूर्ण करतील, असे सांगत कुडाळातून जाणाऱ्या महामार्गाचा आराखडा संदर्भात कुडाळवासीयांना विश्वासात घ्या. मगच आराखडा तयार करा, असे सांगितले. यावेळी आमदार नाईक म्हणाले, कुडाळ तालुक्यातून कोल्हापूरला जोडणारा घोडगे सोनवडे घाटाचे काम लवकरच सुरू होईल. यापुढे निकृष्ट काम करणाऱ्याला थारा नाही. सभेत केलेल्या सर्व मागण्यांची पूर्तता करण्याचे आश्वासन त्यांनी दिले. या सभेचे सूत्रसंचालन प्रफुल्ल वालावलकर यांनी केले. आभार वासुदेव नाईक यांनी मानले. (प्रतिनिधी)तालुक्यातील रस्ते गेले वाहूनयावेळी जमलेल्या सर्व जनतेने सार्वजनिक बांधकाम विभाग, जिल्हा परिषद बांधकाम व पंतप्रधान सडक योजना विभागाच्या गलथान कारभाराला टार्गेट करीत चुकीच्या पद्धतीने भ्रष्टाचार करून बांधलेले रस्ते तीन वर्षे सोडाच, दोनच वर्षात वाहून गेले आहेत. संपूर्ण तालुक्यातील बहुतांशी रस्ते वाहून गेलेल्याचे मत व्यक्त केले. तालुक्यातील नेरू र, रायवाडी, गिरगाव, कुसगाव, निरुखे सुतारवाडी, पांग्रड, केसरी, आंजिवडे असे नवीन रस्ते दोन वर्षातच वाहून गेले.आरोग्य सेवेचे तीनतेराकसाल प्राथमिक आरोग्य केंद्र महामार्गाच्या जवळ असून अत्यंत आवश्यक असलेल्या या आरोग्य केंद्रात वैद्यकीय अधिकारीच नाहीत. तर हिर्लोक प्राथमिक आरोग्य केंद्रातही सोयी सुविधांचा अभाव आहे. रुग्णवाहिका नाही, अशी अवस्था तालुक्यातील इतरही केंद्रांचीही असून याकडे प्रामुख्याने लक्ष देण्याची मागणी ग्रामस्थांनी केली. भारमान नसले, तरी ‘गाव तिथे एसटी’ या घोषवाक्यानुसार एसटी प्रशासनाने तालुक्यातील प्रत्येक गावामध्ये ग्रामस्थांच्या मागणीनुसार एसटी बस पाठवावी, अशी मागणी करण्यात आली.